Sunday, December 25, 2011

RamVijay Adhyay - 40

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

जयजय निगमागमतनू अखिला ॥ वृंदारकवंद्या अजित अमला ॥ असुरसंहारणा परम मंगला ॥ अचळ अढळ अविनाशा ॥१॥
मन्मथवारणविदारक मृगेंद्रा ॥ क्रोधजलदविदारक समीरा ॥ मदतमनाशक भास्करा ॥ परात्परा परमानंदा ॥२॥
मत्सरतृणदाहका वैश्वानरा ॥ मायाचक्रचाळका विश्वंभरा ॥ दंभनगच्छेदका वज्रधरा ॥ भूमिजावरा भयनाशना ॥३॥
अहंद्विपंचमुखदर्पहरणा ॥ मोहघटश्रोत्रसंहारणा ॥ शोकशक्रजितगर्वविदारणा ॥ ऊर्मिलारमणाग्रजा श्रीरामा ॥४॥
तंव कृपेच्या समस्त ॥ संपत आला रामविजय ग्रंथ ॥ शेवटींचा अध्याय रसभरित ॥ वदवीं कैसा असे तो ॥५॥
गतकथाध्यायीं ॥ निरूपण ॥ संपले लहुकुशाख्यान ॥ जानकी आणूनियां यज्ञ ॥ अश्वमेघ संपविला ॥६॥
याउपरी एके दिनीं ॥ सिंहासनी बैसला कोदंडपाणी ॥ बंधुवर्ग कर जोडूनी ॥ स्वस्थानीं उभे राहिले ॥७॥
तों कृतांतभगिनीतीरवासी ॥ द्विज प्रजा पातल्या वेगेंसी ॥ जैसे सुर क्षीरसागरासी ॥ जाती गाऱ्हाणें सांगावया ॥८॥
तंव भक्तजनसभाभूषित ॥ मुक्तमंडपीं बैसला रघुनाथ ॥ जो कोटि कंदर्पांचा तात ॥ दीनबंधु गुणसिंधु ॥९॥
दूत जाणविती रघुराया ॥ प्रजानन आले भेटावया ॥ येऊं द्या म्हणे लवलाह्या ॥ कोणी पीडिल्या माझ्या प्रजा ॥१०॥
तों मुक्तमंडपासमोर ॥ पातले तेंव्हा प्रजांचे भार ॥ करूनियां जयजयकार ॥ नमस्कार सर्व घालिती ॥११॥
उभे ठाकले समोर ॥ भ्रूसंकेतें विचारी जगदोद्धार ॥ म्हणती यमुनातीरीं क्रूर ॥ महालवणासुर माजला ॥१२॥
महापातकी अत्यंत क्रूर ॥ मुरदैत्याचा कुमर ॥ भानुजेचें पैलतीर ॥ तेथें असुर असे सदा ॥१३॥
प्रजा गाई आणि ब्राह्मण ॥ चांडाळ भक्षितो नित्य मारून ॥ रघुराया तयासी वधून ॥ समस्त जन सुखी करी ॥१४॥
ऐसें ऐकतां कोदंडपाणी ॥ कोदंड आणवी तयेक्षणीं ॥ आरक्तता उदेली नयनी ॥ क्रोध मनीं न सांवरे ॥१५॥
तों शत्रुघ्न पुढें येऊनी ॥ मस्तक ठेविलें श्रीरामचरणीं ॥ म्हणे मज आज्ञा दीजे ये क्षणीं ॥ लवणासुर वधावया ॥१६॥
घेऊनियां चतुरंग दळ । वेगें जाय म्हणे तमालनीळ ॥ लवणासुर वधोनि तत्काळ ॥ प्रजा सुखें राखिजे ॥१७॥
मंत्रशक्ति दिव्य बाण ॥ बंधूस देत रघुनंदन ॥ सीतावधाचे चरण वंदोन ॥ वीर शत्रुघ्न चालिला ॥१८॥
संग्रामसंकेतभेरी ॥ सेवकीं ठोकिल्या ते अवसरीं ॥ तीन अक्षौहिणी दळ बाहेरी ॥ परम वेगें निघालें ॥१९॥
नौका आणूनिया अपार ॥ भानुकन्येचें लंघिले तीर ॥ तो चहूंकडून अपार ॥ ऋषीश्वर पातले ॥२०॥
ऋषी म्हणत हा दैत्य दारुण ॥ पूर्वीं मांधात राजयासी मरण ॥ हस्तें याच्या आलें जाण ॥ बळेंकरून नाटोपे ॥२१॥
शत्रुघ्न बोले तेव्हां वचन ॥ याचें सांगा कैसे मरण ॥ ऋषी म्हणती उमारमण ॥ येणें पूर्वीं आराधिला ॥२२॥
शंकरें स्वहातींचा दिधला शूळ ॥ तेणें बळें संहारीं विश्व सकळ ॥ तरी तो शूळ घेतां तत्काळ ॥ मरण त्यास तेणेंचि पैं ॥२३॥
तो शूळ ठेवूनियां मंदिरीं ॥ आहारालागी हिंडे दिवस रात्रीं ॥ श्वापदें गोब्राह्मण मारी ॥ शोधूनियां साक्षेपें ॥२४॥
तरी तो काळ साधून ॥ आधीं घ्यावें तयाचें दर्शन ॥ शूळ हातीं चढतांचि पूर्ण ॥ बळ क्षीण नव्हे तयाचें ॥२५॥
त्याचिया भयेंकरून ॥ ओस पडिलें मथुरापट्टण ॥ तें शत्रुघ्नें ओलांडून ॥ काळ साधून चालिला ॥२६॥
लवणासुर नसतां सदनीं ॥ मंदिर तयाचे पाहे उघडोनी ॥ तो शुळ ठेविलासे पूजोनी ॥ उचली तेक्षणीं दाशरथी ॥२७॥
शूळ घेऊनि कैकयीनंदन ॥ दळभारेंसी सिद्ध पूर्ण ॥ उभा ठाकला तों लवण ॥ वनींहून परतला ॥२८॥
गाई ब्राह्मण मारून ॥ प्रेतभार मस्तकीं घेऊन ॥ तों वेष्टिलें देखे सदन ॥ मानववीरदळेंसी ॥२९॥
नयनीं देखतां मानवभार ॥ परम आनंदला लवणासुर ॥ म्हणे ईश्वर मज आहार सदाप्रति पाठविला ॥३०॥
कृतावंत हाक फोडूनी ॥ लवणें शत्रुघ्नासी देखोनी ॥ परम क्रोधें आला धांवूनी ॥ तों शूळ हिरोनी नेलासे ॥३१॥
मग क्रोधावला दारुण ॥ म्हणे तूं मनुष्याचा नंदन ॥ तुज मारून अयोध्यापट्टण ॥ क्षणमात्रें घेईन आतां ॥३२॥
माझा मातुल रावण ॥ रामें मारिला कपटेंकरून ॥ परी त्या राघवासी वधून ॥ सीता आणीन बळेंचि ॥३३॥
तुम्हां चौघांस मारून ॥ मातुळाचा सूड घेईन ॥ आजि प्रथम अवदान ॥ तुझें घेईन शत्रुघ्ना ॥३४॥
लवणासी म्हणे शत्रुघ्न ॥ मशका तुज येथेंच वधीन ॥ जैसा मारावया मत्कुण ॥ उशीर कांही न लागेचि ॥३५॥
वृक्ष उपटोनि सत्वर ॥ वेगीं धांवला लवणासुर ॥ तों शत्रुघ्नें सोडिला शर ॥ चापावरी लावूनियां ॥३६॥
तेणें तो वृक्ष छेदिला ॥ असुरें पर्वत भिरकाविला ॥ तोही कैकयीनंदनें फोडिला ॥ क्षणमात्र न लागतां ॥३७॥
कोट्यानकोटी बाण ॥ शत्रुघ्नें मोकलिले दारुण ॥ परी तो न मानीच लवण ॥ बाण तृणवत तयासी ॥३८॥
जैसा कां वर्षे घन ॥ तैसे टाकी वृक्ष पाषाण ॥ ते बाण वरी फोडोन ॥ वीर शत्रुघ्न टाकीतसे ॥३९॥
मग शत्रुघ्नें तये वेळां ॥ बाण विचारून काढिला ॥ जो कमळासनें निर्मिला ॥ मधुकैटभवधालागीं ॥४०॥
विधीनें तो बाण तत्वतां ॥ रघुपतीसी दिधला होता ॥ तो लवणवधासी निघतां ॥ रामें दिधला शत्रुघ्ना ॥४१॥
तो बाण शत्रुघ्नें योजिला ॥ जैसी प्रकटली प्रळयचपळा ॥ तैसा चापापासोनि सुटला ॥ वेगें आला लवणावरी ॥४२॥
तेणें डळमळिलें भूमंडळ ॥ देवांस विमानीं सुटला पळ ॥ वज्रें चूर्ण होय अचळ ॥ तैसा हृदयीं भेदला ॥४३॥
मेरूवरूनि पडे ऐरावत ॥ तैसा जाहला असुरदेहपात ॥ प्राण निघोनि गेला त्वरित ॥ पडिले प्रेत धरणीवरी ॥४४॥
विजयी जाहला शत्रुघ्न ॥ सुमनें वर्षती सुरगण ॥ तत्काळ मथुरापट्टण ॥ प्रजा नेऊन भरियेले ॥४५॥
जैसें अयोध्यापुर सुंदर ॥ तैसेंच मथुरा जाण नगर ॥ देश भरला समग्र ॥ दुःख दरिद्र पळालें ॥४६॥
जय पावला शत्रुघ्न ॥ कळलें रघुपतीस वर्तमान ॥ छत्र चामरादि संपूर्ण ॥ राजचिन्हें पाठविली ॥४७॥
शत्रुघ्नावरी धरून छत्र ॥ केला मथुरेचा नृपवर ॥ समुद्रापर्यंत समग्र ॥ देश तयासी दीधला ॥४८॥
तों अयोध्येमाजी ते वेळें ॥ एक नवल परम वर्तले ॥ एकादश सहस्र वर्षे केले ॥ अयोध्येचें राज्य श्रीरामें ॥४९॥
रामराज्यामाजी मृत्य ॥ अकाळीं नसेच सत्य ॥ तंव तेथे एक ब्राह्मणसुत ॥ मरण अकस्मात पावला ॥५०॥

झालें त्याचे व्रतबंधन ॥ तों सवेंच पावला मरण ॥ तंव पित्यानें उचलोन ॥ राजद्वारा आणिला ॥५१॥
राघवास म्हणे ब्राह्मण ॥ त्वां काय केलें दोषाचरण ॥ अकाळीं बाळ पावला मरण ॥ करी प्रयत्न लवकरी ॥५२॥
परम चिंताक्रांत रघुनाथ ॥ तंव पातला कमलोद्भवसुत ॥ सीताकांतें वृत्तांत ॥ नारदासी सांगितला ॥५३॥
नारद म्हणे जानकीपती ॥ कोणी तप करितो शूद्रयाती ॥ त्या पापेंकरूनि निश्चितीं ॥ ऋृषिकुमर निमाला ॥५४॥
तप करणें हा ब्राह्मणांचा धर्म ॥ इतरांसी तो सहजचि अधर्म ॥ शूद्र तप आचरतां परम ॥ अकाळीं मरण होय पैं ॥५५॥
ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ राम चिंती पुष्पकविमान ॥ तें तत्काळ आलें धांवोन ॥ राघवें बाहिलें म्हणोनियां ॥५६॥
प्रधान सेनेसहित तत्काळ ॥ वरी आरूढे तमालनीळ ॥ शोधूं लागला पृथ्वीमंडळ ॥ गुहा अचळ कठीण स्थानें ॥५७॥
जो जो तपस्वी दृष्टी दिसे ॥ तयास कोणी जाती राघव पुसे ॥ तंव ते बोलती त्याचिसरसे ॥ श्रेष्ठवर्ण ब्राह्मण ॥५८॥
तयांसी राघव नमून ॥ करी मग तयांचे पूजन ॥ याचपरी उर्वीं संपूर्ण ॥ रघुनंदन शोधितसे ॥५९॥
दक्षिणपंथें शोधी श्रीराम ॥ तों लागले निबिड परम ॥ गिरीकंदरीं एक अधम ॥ किरात तप करीतसे ॥६०॥
तेणें आरंभिले धूम्रपान ॥ तयास पुसे जनकजारमण ॥ म्हणे कोण वेद कोण वर्ण ॥ तप किमर्थ आरंभिले ॥६१॥
तंव तो म्हणे मी किरात ॥ स्वर्गानिमित्त तप करितों येथ ॥ ऐकतां कोपला जानकीनाथ ॥ म्हणे हा आचरत परम अधर्म ॥६२॥
बाण तीक्ष्ण परम चपळ ॥ छेछिलें त्याचें कंठनाळ ॥ तो उद्धरूनि तत्काळ ॥ स्वर्गलोक पावला ॥६३॥
तो विमानीं बैसोन अमरनाथ ॥ रघुनाथासी येऊनि भेटत ॥ म्हणे बरा वधिला किरात ॥ पुरले मनोरथ देवांचे ॥६४॥
सीतावल्लभा रघुनंदना ॥ पुराणपुरुषा गुणसंपन्ना ॥ मज कांहीं सांगावी आज्ञा ॥ ते मी सिद्धी पाववीन ॥६५॥
रघुनाथ म्हणे ऋषिनंदन ॥ अयोध्येंत पावला मरण ॥ तयासी द्यावें जीवदान ॥ सहस्रनयन अवश्य म्हणे ॥६६॥
इंद्रआज्ञेंकरून ॥ परतला ऋषिपुत्राचा प्राण ॥ जैसा ग्रामासी जातां पंथीहून ॥ येत परतोन माघारा ॥६७॥
बहुतांचे सुत त्यावेगळे ॥ पूर्वीं होते जे निमाले ॥ तेही इंद्रें आणोनि दिधले ॥ तद्रूप तैसेच पूर्ववत ॥६८॥
उसनी जेवीं वस्तु नेत ॥ ती परतोनि तैसीच देत ॥ तैसे तयांचे त्यांसी सुत ॥ अमरेश्वरें दीधले ॥६९॥
असो इकडे अयोध्यापती ॥ अगस्तीच्या काननाप्रती ॥ जाता जाहला सहजगती ॥ वनें उपवनें विलोकित ॥७०॥
तों पुढें दोन पक्षी येऊन ॥ राघवासी घालिती लोटांगण ॥ म्हणती आमचा वाद निवडोन ॥ पुढें जावें राघवेंद्रा ॥७१॥
तें रघुत्तमें ऐकोन ॥ स्थिर केले विमान ॥ तों उलूक गृध्र दोघेजण ॥ बोलते जाहले तेधवां ॥७२॥
दिवाभीत बोले वचन ॥ गृह माझे पूर्वींहून ॥ हा गृध्र मज दवडून ॥ बळेंच येथे नांदतो ॥७३॥
मग गृध्र वचन बोलत ॥ उगेंच पीडितो दिवाभीत ॥ गृह माझें यथार्थ ॥ बहुकाळ येथेंचि ॥७४॥
प्रधानास म्हणे सीतावर ॥ यांचा वाद निवडावा सत्वर ॥ सत्य निवडोन मंदिर ॥ ज्याचें त्यास देइंजे ॥७५॥
तों गृध्र बोले पापमती ॥ जंव येथें पृथ्वी नव्हती ॥ तों या वृक्षावरी निश्चितीं ॥ गृह माझें म्यां रचियेलें ॥७६॥
दिवाभीत बोले वचन ॥ ईश्वरें पृथ्वी केली निर्माण ॥ मग वृक्ष वाढला पूर्ण ॥ म्यां सदन निर्मिलें तैं ॥७७॥
प्रधान म्हणे गृध्र सत्य ॥ बहुत काळाच्या गोष्टी सांगत ॥ ऐकोनि हांसिन्नला रघुनाथ ॥ म्हणे केवीं हा अर्थ निवडिला ॥७८॥
पृथ्वी वृक्षासी आधार ॥ नीडासी आश्रय तरुवर ॥ दुरात्मा गृध्र साचार ॥ उलूकालागीं पीडितसे ॥७९॥
निवडूनि यथार्थ व्यवहार ॥ राम उलूकासी देत मंदिर ॥ म्हणे हा गृध्र चांडाळ थोर ॥ यासी वधीन मी आतां ॥८०॥
बाण काढिला तये क्षणीं ॥ तंव गर्जिली तेथें आकाशवाणी ॥ म्हणे हे राम कोदंडपाणी ॥ यासी न मारीं सर्वथा ॥८१॥
हा पूर्वी भूपति ब्रह्मदत्त ॥ गौतम ऋषीचा अंकित ॥ तों याचे सदना अकस्मात ॥ भोजना आला गौतम ऋृषि ॥८२॥
तयासी येणें मांस वाढिले ॥ देखतां गुरूचे मन क्षोभले ॥ तत्काळ यासी शापिलें ॥ गृध्र होय म्हणूनियां ॥८३॥
मग हा लागला गुरुचरणी ॥ उःशाप बोले गौतम मुनि ॥ रामदर्शन होतां ते क्षणीं ॥ जासी उद्धरून स्वर्गातें ॥८४॥
ऐसें देववाणी बोलत ॥ तों विमान पातलें अकस्मात ॥ दिव्य देह पावल ब्रह्मदत्त ॥ भावें नमीत रामचंद्रा ॥८५॥
स्तवोनियां कोदंडपाणी ॥ तत्काळ बैसला विमानीं ॥ रघुवीरप्रतापेंकरूनी ॥ स्वर्गी सुखी राहिला ॥८६॥
असो कलशोद्भवाचे आश्रमासी ॥ येता जाहला अयोध्यावासी ॥ साष्टांग नमून ऋषिसी ॥ राघव उभा राहिला ॥८७॥
बहुत करून आदर ॥ आश्रमीं पूजिला रघुवीर ॥ हस्तकंकण एक सुंदर ॥ ऋषीनें दिधलें राघवा ॥८८॥
पृथ्वीचे मोल संपूर्ण ॥ ऐसें एक एक जडलें रत्न ॥ तें सीतावल्लभें देखोन ॥ घटोद्भवाप्रति पुसतसे ॥८९॥
म्हणे यासी निर्मिता चतुरानन ॥ स्वर्गीची वस्तु प्रभाघन ॥ मनुष्यांसी दुर्लभ पूर्ण ॥ तुम्हांस कैसी लाधली ॥९०॥
मग अगस्ति ते कथा सांगत ॥ पैल ते सरोवरीं पाहें प्रेत ॥ वैदर्भदेशींचा नृपनाथ ॥ पुण्यवंत तपोराशी ॥९१॥
दानें केलीं अपरिमित ॥ रामा तप आचरला बहुत ॥ परी अन्नदान किंचित ॥ घडलें नाही यापासूनि ॥९२॥
स्वर्गास गेला तो नृपनाथ ॥ परी क्षुधेनें पीडिला अत्यंत ॥ मग तयासी म्हणे पह्यजात ॥ नाहीं भक्षार्थ तुज येथें ॥९३॥
नाही केलें अन्नदान ॥ येथें न पाविले दिधल्याविण ॥ तरी तूं भूतळाप्रति जाऊन ॥ आपलें प्रेत भक्षीं कां ॥९४॥
तूं भक्षितां नित्यकाळ ॥ मांस वाढेल बहुसाल ॥ मग तो विमानीं बैसोन भूपाळ ॥ नित्यकाळ येत तेथें ॥९५॥
तों तें आपुलें प्रेत भक्षून ॥ स्वर्गासी जाय परतोन ॥ अन्नोदकाएवढे दान ॥ दुजें नाहीं राघवा ॥९६॥
भाग्य ते वैराग्य निश्चित ॥ दैवत एक सद्गुरुनाथ ॥ शांतिसुखाहून अद्भुत ॥ दुजें सुख नसेचि ॥९७॥
तिथींमाजी द्वादशी श्रेष्ठ ॥ कीं मंत्रांत गायत्री वरिष्ठ ॥ कीं तीर्थामाजीं सुभट ॥ प्रयागराज थोर जैसा ॥९८॥
तैसें दानांमाजी अन्नदान ॥ राघवा अत्यंत श्रेष्ठ पूर्ण ॥ असो त्या रायासी कमलासन ॥ बोलता झाला ते काळीं ॥९९॥
म्हणे अगस्तीचे होतां दर्शन ॥ तुझें कर्म खंडेल गहन ॥ तंव एके दिवशीं येऊन ॥ प्रेत भक्षी नृपवर ॥१००॥

तें म्यां अकस्मात देखिलें ॥ कृपेनें हृदय माझें द्रवलें ॥ मग म्यां वरदान दीधले ॥ कर्म खंडले तयाचे ॥१॥
मग तो वैदर्भराजा तेथून ॥ करी स्वर्गी अमृतपान ॥ तेणें गुरुपूजेसी संपूर्ण ॥ मज हे कंकण समर्पिले ॥२॥
देवांचे अंश रत्नावरी ॥ चिंतित मनोरथ सिद्ध करी ॥ ऐसें ऐकोनि अयोध्याविहारी ॥ घाली करीं कंकण तें ॥३॥
राघव म्हणे महाऋषी ॥ दंडकारण्य म्हणती यासी ॥ याची पूर्वकथा आहे कैसी ॥ ते मजपासी सांगिजे ॥४॥
अगस्ति म्हणे मित्रकुळीं देख ॥ मनूचा पुत्रइक्ष्वाक ॥ तयाचा पुत्र दंडक ॥ तो निघाला मृगयेसी ॥५॥
तों काननी ऋषिआश्रम बहुत ॥ दंडक जाय पहात पहात ॥ तंव भृगुऋषि नव्हता मंदिरीं ॥
घरीं तयाची होती कुमारी ॥ अरजा नाम तियेचें ॥७॥
देखोनियां एकांत ॥ कामातुर होत तो नृपनाथ ॥ परी ते बाळ असे अत्यंत ॥ दशवर्षांची कुमारिका ॥८॥
दंडकें धरूनियां बळें ॥ ऋषिकन्येप्रति भोगिलें ॥ शरीर तिचे अचेतन पडलें ॥ दंडक गेला तेथोनी ॥९॥
भृगु आश्रमासी आला त्वरित ॥ देखा कन्या पडली मूर्च्छित ॥ ऋषी वार्ता सांगता समस्त ॥ दंडके अनर्थ केला हा ॥११०॥
ऋषी क्षोभला जैसा कृतांत दंडकासी तेव्हां शापित ॥ म्हणे सेना प्रजा देश समस्त ॥ वनें पट्टणें सर्वही ॥११॥
वृक्ष तोय तृण धान्य ॥ तुझे वंशासहित प्रधान ॥ चांडाळा जाय रे भस्म होऊन ॥ सप्त दिन न लागतां ॥१२॥
ऐसें बोलतां विप्रोत्तम ॥ सर्वही जाहले तेव्हां भस्म ॥ नाहीं उरलें वृक्षाचें नाम ॥ पक्षी तोय मग कैंचें ॥१३॥
बहुत काळपर्यंत ॥ शून्य देश पडिला समस्त ॥ पुढें नारदें कलह बहुत पर्वतांमाजी लाविला ॥१४॥
मेरु आणि विंध्याचळ ॥ उंचावले भांडती सबळ ॥ खळबलें सूर्यमंडळ ॥ सृष्टि सकळ हडबडली ॥१५॥
विंध्याद्रिं नाटोपे साचार ॥ सूर्याविण पडला अंधकार ॥ मग मिळोनि ऋषि निर्जर ॥ मजप्रति येऊनि प्रार्थिती ॥१६॥
तुजविण विंध्याचळ ॥ नाटोपे कोणासी परम खळ ॥ तूं दक्षिणेसी जायीं तात्काळ ॥ तीर्थयात्रा करावया ॥१७॥
मग ती वारणसी टाकून त्वरित ॥ दक्षिणेंस आलों ऋषींसहित ॥ मज देखतां विंध्याचळ पडत ॥ पृथ्वीवरी आडवा ॥१८॥
तयासी मी बोलिलों वचन ॥ जों मी माघारा येईं परतोन ॥ तोंवरी न उठावें येथून ॥ उठल्या शापीन क्षणार्धें ॥१९॥
शापधाकें पर्वत ॥ अद्यापि न उठेचि यथार्थ ॥ मग उगवला आदित्य ॥ लोक समस्त सुखी जाहले ॥१२०॥
तें हें दंडकारण्य ओस ॥ ऋषीसह म्यां केला वास ॥ इंद्रासी सांगून बहुवस ॥ मेघवृष्टि करविली ॥२१॥
आणि धनधान्य बीजें बहुत ॥ तींही वर्षला अमरनाथ ॥ मग देश वसला अद्भुत ॥ दोष दुष्काळ निमाला ॥२२॥
तैंपासूनि दंडकारण्य ॥ राघवा म्हणती यालागून ॥ असो यावरी आज्ञा घेऊन ॥ रघुनंदन निघाला ॥२३॥
पुष्पकारूढ रघुवीर ॥ अयोध्येसी पातला सत्वर ॥ तों ऋषीश्वर घेऊन कुमर ॥ रामदर्शना पातले ॥२४॥
म्हणती धन्य धन्य रघुत्तमा केले ॥ मृतपुत्रां माघारें आणिलें ॥ यशाचें पर्वत उंचावले ॥ मेरूहून आगळे बहुत ॥२५॥
मुक्तमंडपीं रघुनाथ ॥ शोभला तेव्हां जानकीसहित ॥ भोंवते बंधु तिष्ठत ॥ पुढें हनुमंत उभा सदा ॥२६॥
श्रीरामविजय ग्रंथ पावन ॥ उत्तराकांड सुरस गहन ॥ पुढें निजधामा गेला रघुनंदन ॥ हें अनुसंधान न वर्णावें ॥२७॥
तों माध्यान्हीं प्रगटोनि रघुनाथ ॥ म्हणे येथोनि करी ग्रंथ समाप्त ॥ अवतार संपला हे चरित्र ॥ रामविजयी न सांगावे ॥२८॥
मी जन्ममरणाविरहित ॥ अभंग अक्षय शाश्वत ॥ तोच मी ब्रह्मानंद पंढरीनाथ ॥ भीमातीरीं उभा असे ॥२९॥
टाकूनियां चाप शर ॥ दोनी जधनीं ठेवूनि कर ॥ समपाद समनेत्र ॥ उभा साचार मी येथें ॥१३०॥
ऐसी आज्ञा होतां सत्वर ॥ श्रीधरें घातला नमस्कार ॥ करूनियां जयजयकार ॥ रामविजय ग्रंथ संपविला ॥३१॥
चाळीस अध्याय ग्रंथ तत्वतां ॥ तुजप्रति पावों पंढरीनाथा ॥ ब्रह्मानंदा विश्वभरिता ॥ जगदात्मया जगद्रुरो ॥३२॥
वाल्मीकिकृत मूळ ग्रंथ ॥ हनुमंतकाव्य गोड बहुत ॥ आणिकही ग्रंथीं सत्यवतीसुत ॥ रामकथा बोलिला ॥३३॥
तेथींचीं संमतें घेऊनी ॥ पंढरीनाथें कृपा करूनी ॥ सांगितलें कर्णीं येऊनी ॥ तेंच लिहिले साक्षेपें ॥३४॥
रामविजय वरद ग्रंथ ॥ कर्ता याचा पंढरीनाथ ॥ श्रीधर नाम हें निमित्त ॥ पुढें केलें उगेंचि ॥३५॥
या ग्रंथासी वरदान ॥ पंढरीनाथें दीधलें आपण ॥ वाचिती पढती जे अनुदिन ॥ होय ज्ञान अद्भुत तयां ॥३६॥
ओढवतां संकट महाविघ्न ॥ करितां एक तरी आवर्तन ॥ तात्काळ संकट जाय निरसोन ॥ वातेंकरून अभ्र जैसे ॥३७॥
पांच आवर्तनें करितां पूर्ण ॥ जाती महाव्याधी निरसोन ॥ संतति संपत्ति संपूर्ण ॥ पावेल सत्य निर्धारी ॥३८॥
होऊनियां शुचिर्भूत ॥ दहा आवर्तनें करितां सत्य ॥ पोटीं होईल दिव्य सुत ॥ रधुनाथभक्त प्रतापी ॥३९॥
जरी नव्हे श्रवण पठण ॥ नित्य करितां ग्रंथपूजन ॥ तरी ते घरींचें संकट पूर्ण हनुमंत येऊनि निवारिल ॥१४०॥
अद्यापि चिरंजीव हनुमंत ॥ जे रघुनाथकथा वाचिती भक्त ॥ त्यांस अंतर्बाह्य रक्षित ॥ उभा तिष्ठत त्यांजवळी ॥४१॥
करितां रामकथा श्रवण ॥ सप्रेम सदा वायुनंदन ॥ ग्रंथ वाची त्यापुढें येऊन ॥ कर जोडोनियां उभा राहे ॥४२॥
शुचिर्भूत होऊनी ॥ रामविजय उसां घेऊनी ॥ निद्रा करितां स्वप्नी ॥ मारुति दर्शन देतसे पैं ॥४३॥
ऐसा या ग्रंथाचा चमत्कार ॥ जाणती रामउपासक नर ॥ आधि व्याधि दुःख दरिद्र ॥ जाय सर्वत्र ग्रंथसंग्रहें ॥४४॥
बाळकांड आठ अध्यायवरी ॥ अयोध्याकांड अध्याय चारी ॥ चार अध्याय निर्धारी ॥ अरण्यकांड प्रचंड ॥४५॥
दोन अध्यायीं किष्किंधाकांड ॥ तेथोनि पांच अध्याय रसवितंड ॥ ते सुंदरकांड प्रचंड ॥ लीलाचरित्र मारुतीचें ॥४६॥
दहा अध्याय संपूर्ण ॥ युद्धकांड रसाळ गहन ॥ सात अध्याय परम पावन ॥ उत्तरकांड जाणावें ॥४७॥
ऐसें अध्याय अवघे चाळीस ॥ मिळून रामविजय जाहला सुरस ॥ श्रवण करितां आसपास ॥ ब्रह्मानंद उचंबळे ॥४८॥
प्रथम अध्यायी मंगलाचरण ॥ गणेशसरस्वतीगुरुस्तवन ॥ वाल्मीकाची उत्त्पत्ति सांगोन ॥ प्रथममाध्याय संपविला ॥४९॥
बंधूसमवेत निश्चिंती ॥ सांगितली रावणाची उत्पत्ती ॥ दशरथलग्नाची गती ॥ द्वितीयाध्यायीं निरूपिली ॥१५०॥

श्रावणवध श़ृंगीचें आगमन ॥ याग दशरथें केला पूर्ण ॥ त्यावरी हनुमंतजन्मकथन ॥ तृतीयाध्यायीं हेचि कथा ॥५१॥
कौसल्या सुमित्रा कैकयीप्रती ॥ डोहाळे पुसों गेला नृपती ॥ श्रीरामध्यान जन्मस्थिती ॥ चतुर्थाध्यायीं हेचि कथा ॥५२॥
श्रीरामाचे मौंजीबंधन ॥ ब्रह्मचर्य तीर्थाटन ॥ विश्वामित्र मागे रघुनंदन ॥ हें निरूपण पंचमाध्यायीं ॥५३॥
योगवासिष्ठकथन ॥ मायेनें गाधिज केला दीन ॥ वेदांतभागनिरूपण ॥ सहावा संपूर्ण जाणावा ॥५४॥
ताटिका मर्दूनि याग रक्षिला ॥ अहल्योद्धार पुढें केला सातव्यामाजी संपूर्ण ॥५५॥
आठव्यामाजी सीतास्वयंवर ॥ आपमानिला दशकंधर ॥ लग्न लागलें जिंकिला फरशधर ॥ आला रघुवीर अयोध्येसी ॥५६॥
राज्यीं बैसतां रघुनाथ ॥ कैकयीनें केला अनर्थ ॥ त्याकरितां दुःखी दशरथ ॥ नवमाध्यायीं हेंचि कथा ॥५७॥
श्रीराम वनासी निघाला ॥ कौसल्येनें शोक केला ॥ जान्हवीतीरा श्रीराम आला ॥ दशमाध्यायीं हेचि कथा ॥५८॥
मग दशरथें त्यागिला प्राण ॥ भरत आला मातुलगृहाहून ॥ भक्तिरस दिव्य निरूपण ॥ गोड बहुत अकरावा ॥५९॥
चित्रकूटीं भेटला रघुनंदन ॥ भरतें बहुत केलें स्तवन ॥ नंदिग्रामीं भरत स्थापन ॥ हें निरूपण बाराव्यांत ॥१६०॥
बहुत ऋषींचे दर्शन घेता जाहला रघुनंदन ॥ अगस्तीचा महिमा पूर्ण ॥ तेराव्यांत कथियेला ॥६१॥
शूर्पणखा विटंबून ॥ वधिले त्रिशिरा खरदूषण ॥ दशमुखासी वर्तमान ॥ हेचि कथा चवदाव्यांत ॥६२॥
मृग वधूं गेला रघुनंदन ॥ सीता घेऊनि गेला रावण ॥ जटायु वधिला कपटेंकरून ॥ पंधराव्यांत हेचि कथा ॥६३॥
सीताविरहे राम व्यापिला ॥ त्यावरी जटायु उद्धरिला ॥ पंपासरावरीं आला ॥ सोळाव्यांत हेचि कथा ॥६४॥
वाळिसुग्रीवांची उत्पत्ती ॥ मग शक्रसुत वधी रघुपति ॥ सत्रावें अध्यायी निश्चिती ॥ कथा हेचि निश्चयें ॥६५॥
तारेप्रति बोध करून ॥ शुद्धीस गेले वानरगण ॥ समुद्रातीरीं संपातीदर्शन ॥ हें निरूपण अठराव्यांत ॥६६॥
समुद्र उल्लंघून लंका शोधून ॥ रावणसभा विटंबून ॥ विजयी जाहला वायुनंदन ॥ हें चरित्र एकुणिसाव्यांत ॥६७॥
हनुमंतास सीतादर्शन ॥ विध्वंसिलें अशोकवन ॥ वधिला अखया आणि राक्षस संपूर्ण ॥ हेचि कथा विसाव्यांत ॥ ६८॥
इंद्रजिताचें विटंबन ॥ रावणा छळूनि लंकादहन ॥ किष्किंधेसी आला अंजनीनंदन ॥ हेचि कथा एकविसाव्यांत ॥६९॥
ब्रह्मपाशबंधन ॥ मिष घेऊनि वायुनंदन ॥ सागरीं पुच्छ विझवून ॥ सुवेळेसी पातला ॥१७०॥
ब्रह्मपत्र वाचून ॥ समुद्रतीरास आला रघुनंदन ॥ मग बिभीषणें बोधिला रावण ॥ हेचि कथा बाविसाव्यांत ॥७१॥
मग बिभीषण भेटे श्रीरामास येऊन ॥ सागरदर्शन सेतुबंधन ॥ सुवेळेसी आला सीतारमण ॥ हें निरूपण तेविसाव्यांत ॥७२॥
कापट्य दाविलें सीतेसी ॥ मंदोदरी भेटली जनककन्येसी ॥ मग सुग्रीवे त्रासिले रावणासी ॥ कथा हेच चाविसाव्यांत ॥७३॥
अंगदें बोधिला रावण ॥ अपार युद्ध जाहले दारुण ॥ नागपाशीं बांधिले रामलक्ष्मण ॥ हे लीला पंचविसाव्यांत ॥७४॥
प्रहस्तवध मंदोदरीनीति ॥ मग युद्धा आला लंकापति ॥ तो पराभव पावला निश्चतीं ॥ हे चरित्र सव्विसाव्यांत ॥७५॥
जागा केला कुंभकर्ण ॥ त्यावरी युद्ध जाहले दारुण ॥ समरीं घटश्रोत्रें दिधला प्राण ॥ हें निरूपण सत्ताविसाव्यांत ॥७६॥
नरांतकादि सहाजण पाडिले ॥ शक्रजितें शरजाल सोडिलें ॥ मारुती द्रोणाचळ आणि ते वेळे ॥ अठ्ठाविसाव्यांत हेंचि कथा ॥७७॥
निकुंभिलेसी जाऊन ॥ वानरीं होम विध्वंसून ॥ शक्रजितासी मारी लक्ष्मण ॥ एकुणतिसाव्यांत हेचि कथा ॥७७॥
तिसाव्यांत सुलोचना गहिंवर ॥ एकतिसाव्यांत अहिमहिसंहार ॥ शक्ति भेदोनी निर्धार ॥ बत्तिसावा संपूर्ण पैं ॥७९॥
रावणाचा होम विध्वंसून ॥ अपार माजविलें तेव्हां रण ॥ रावण वधोनि स्थापिला बिभीषण ॥ हे चरित्र तेतिसाव्यांत ॥१८०॥
जानकीनें दिव्य देऊन ॥ मग इंद्र वर्षला अमृतपर्जन्य ॥ देवस्थाना गेले स्तवून ॥ हे कथा संपूर्ण चौतिसाव्यांत ॥८१॥
पुष्पकी बैसोन रघुनंदन ॥ घेतलें अगस्तीचें दर्शन ॥ त्यावरी भरतभेटी पूर्ण ॥ हें चरित्र पस्तिसाव्यांत ॥८२॥
नंदिग्रामीं राहिला राघवेश ॥ मग केला अयोध्याप्रवेश ॥ राज्यीं स्थापून रामास वानर गेले स्वस्थाना ॥८३॥
छत्तिसावें अध्यायीं जाण ॥ हेचि कथा असे पूर्णं ॥ एकोणचाळीस अध्यायीं कौतुक गहन ॥ लहूकुशाख्यान गोड पैं ॥८४॥
चाळिसाव्यांत रघुवीरें ॥ मृत्यु पावलीं ऋषींचीं कुमरें ॥ किरात वधोनियां त्वरें ॥ बाळें माघारी आणिली ॥८५॥
चाळीस अध्यायपर्यंत ॥ रामविजय सपूर्ण ग्रंथ ॥ श्रवणमननें पुरे अर्थ ॥ जाणती पंडित विवेकी ॥८६॥
रामविजय ग्रंथ नृपती ॥ चाळिस अध्याय वीर निश्चितीं ॥ दोषदळ संहारिती ॥ प्रचंड प्रतापी वीर हे ॥८७॥
कीं रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हें चाळीस खणांचे दिव्य मंदिर ॥ सीतेसहीत रघुवीर ॥ क्रीडा करित तेथें पैं ॥८८॥
कीं हें चाळिस खणांचे वृंदावन ॥ रघुनाथकथा तुळसी पूर्ण ॥ दृष्टांत ती पत्रें जाण ॥ आवर्तन प्रदक्षिणा भक्त करिती ॥८९॥
रामविजय ग्रंथ मंदिर ॥ चाळीस कोठड्या अति सुंदर ॥ साहित्य द्रव्य अपार ॥ माजी भरलें न गणवें ॥१९०॥
कीं ग्रंथ हा वासरमणी ॥ वेष्टिला असे दृटांत किरणीं ॥ कीं साहित्य तारागणीं ॥ ग्रंथचंद्र वेष्टिला ॥९१॥
कीं ग्रंथ हाचि रघुवीर ॥ दृष्टांत हे त्याचे वानर ॥ मारूनि अहंदशकंधर ॥ विजयरूप सर्वदा ॥९२॥
रामविजय मांदुस आळी ॥ आंत होती चाळीस कोहळीं ॥ नररत्नद्रव्यें पूर्ण भरली ॥ मज दिधली ब्रह्मानंदें ॥९३॥
पळालें भवदुःखदरिद्र ॥ भाग्य घरा आलें अपार ॥ कीं ग्रंथ हा पंढरीनगर ॥ दृष्टांत अपार यात्रा तेथें ॥९४॥
रामविजय रत्नखाणी ॥ वर्णितां धन्य जाहली वाणी ॥ ब्रह्मानंदकृपेकरूनीं ॥ ग्रंथ सिद्धीस पावविला ॥९५॥
आनंदसांप्रदाय पूर्ण ॥ वाढत आले मुळींचे ज्ञान ॥ सृष्टीचे आदिकाळी कमलासन ॥ उपदेशिला नारायणें ॥९६॥
पद्मोद्भवें तेंचि ज्ञान ॥ अत्रीस दिधलें संपूर्ण ॥ त्याचे पोटीं आदिपुरुष जाण ॥ दत्तात्रेय अवतरला ॥९७॥
दत्तात्रेयें ज्ञान शुद्ध ॥ सांगूनि बोधिला सदानंद ॥ तेथूनि रामानंद प्रसिद्ध ॥ यतीश्वर अगाध पैं ॥९८॥
तेथोनि मंगलानंद ईश्वर ॥ गंभीर ज्ञानानंद दिवाकर ॥ सहजानंद योगेश्वर ॥ कल्याणधामवासी जो ॥९९॥
तेथूनि पूर्णानंद महायतिराज ॥ जो तपोज्ञानें तेजःपुंज ॥ तेथोनि दत्तानंद यति सहज ॥ पूर्ण दत्तात्रेय अवतार ॥२००॥
त्या दत्तात्रेयाचे उदरीं शुद्ध ॥ पूर्ण अवतरला ब्रह्मानंद ॥ पिता आणि गुरु प्रसिद्ध ॥ तोचि माझा जाणिजे ॥१॥
पंढरीहूनि चार योजनें दूरीं ॥ नैऋत्यकोनीं नाझरें नगरी ॥ तेथील देशलेखक निर्धारी ॥ ब्रह्मानंद पूर्वाश्रमीं ॥२॥
मग पंढरीस येऊन ॥ विधीनें केलें संन्यासग्रहण ॥ भीमातीरीं समाधिस्थ पूर्ण ॥ ब्रह्मानंद यतिराव ॥३॥
तों ब्रह्मानंद पूर्ण पिता ॥ सावित्री नामें माझी माता ॥ श्रीधरें वंदोनियां उभयतां ॥ रामविजय ग्रंथ संपविला ॥४॥
शके सोळाशे पंचवीस ॥ सुभानु नाम संवत्सरास ॥ भानुसप्तमी शुद्ध विशेष ॥ श्रावणमास विख्यात पैं ॥५॥
पंढीरीक्षेत्रीं निश्चयेंसीं ॥ ग्रंथ संपविला ते दिवशीं ॥ लेखक आणि श्रोतयांसी ॥ कल्याण असो सर्वदा ॥६॥
सुभानु संवत्सर भानुवार ॥ भानुवंशीं जन्मला रघुवीर ॥ भानु आणि रोहिणीवर ॥ तोंवरी ग्रंथ असो हा ॥७॥
ब्रह्मानंद पांडुरंगा ॥ श्रीधरवरदा पूर्ण अभंगा ॥ पुराणपुरुषा भक्तभवभंगा ॥ श्रोता वक्ता तूंचि पैं ॥८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ चत्वारिंशत्तमोध्याय गोड हा ॥२०८॥

श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥


Thursday, December 22, 2011

RamVijay Adhyay - 39

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

देवाधिदेव राजीवनेत्र ॥ पुराणपुरुष घनश्यामगात्र ॥ लीला दाखविली विचित्र ॥ भक्तजन तारावया ॥१॥
सौमित्र पडिला रणांगणीं ॥ श्रवणीं ऐकतां कोदंडपाणी ॥ शोकाकुलित पडिला धरणीं ॥ सुमंतें सांवरून उठविला ॥२॥
दळ घेऊन अपरिमित ॥ समागमें घेतला हनुमंत ॥ रणाप्रति धांविन्नला भरत ॥ पवनवेगें करूनियां ॥३॥
भरत आणि हनुमंत ॥ रण विलोकिती समस्त ॥ तंव ते सससावोनि सीतासुत ॥ दोघे पुढें पातले ॥४॥
हनुमंताचे कर्णीं समस्त ॥ भरत सांगे गुप्त मात ॥ म्हणे हे राघवाऐसे दिसत ॥ सीतासुत निश्चये ॥५॥
जानकी होती गर्भिणी ॥ तैसीच रामचंद्रे सोडिली वनीं ॥ हनुमंत म्हणे मजही मनीं ॥ ऐसेंच गमें निश्चयें ॥६॥
वैरागरावांचून रत्न ॥ सहसा न होय निर्माण ॥ हे जानकीचे नंदन ॥ मजही पूर्ण कळों आले ॥७॥
तों लहूसी म्हणे कुश वीर ॥ पैल ते नर आणि वानर ॥ हळूच करितात विचार ॥ तें तुज कांही समजलें ॥८॥
आम्हां दोघांसी युद्धी गोवूनी ॥ श्यामकर्ण न्यावा सोडोनि ॥ हेंच त्यांनीं धरिले मनीं ॥ सांगती कानीं एकमेकां ॥९॥
तरी तूं रक्षी श्यामकर्ण ॥ त्यांसीं युद्ध करितों मी निर्वाण ॥ ऐसें कुश वीर बोलोन ॥ सरसावून पुढें आला ॥१०॥
धनुष्यासी लावून बाण ॥ भरताप्रती बोले वचन ॥ तूं वडील काय लक्ष्मणाहून ॥ तुझें आंगवण थोर दिसतसे ॥११॥
तुझें नाम काय सांग सत्वर ॥ पिता तुझा कोठील नृपवर ॥ त्वां पूर्वी युद्ध दुर्धर ॥ कोणासीं केलें सांगपां ॥१२॥
माझे नाम पुससील ये क्षणीं ॥ तरी मी वीर कुशेंद्र चूडामणी ॥ या उपरी भरत तये क्षणी ॥ काय बोलता जाहला ॥१३॥
म्हणे लेकुरा तूं जाय येथोन ॥ तुज मी दिधले जीवदान ॥ भरतें मज सोडिलें म्हणोन ॥ सांग आपुले मातेसी ॥१४॥
मग कुश बोले हांसोन ॥ तुझें बंधू पडले दोघेजण ॥ त्यांचा सूड घ्यावया पूर्ण ॥ रामें पाठविलें तुम्हांसी ॥१५॥
युद्ध सांडूनि सांगसी गोष्टी ॥ बंधूचा सूड घेईं उठाउठी ॥ ना तरी आता रणीं दावून पाठी ॥ अयोध्येसीं पळें कां ॥१६॥
पाठमोऱ्यासी न मारीं जाण ॥ तज अभय दिधलें पूर्ण ॥ कोण तुझा आहे रघुनंदन ॥ त्यासी घेऊन येईं वेगें ॥१७॥
ऐसें बोलतां सीतानंदन ॥ भरतें चापासी लावूनि बाण ॥ आकर्णपर्यंत ओढून ॥ कुशावरी सोडिला ॥१८॥
सीतात्मजे शर टाकून ॥ मध्येंच तोडिला तो बाण ॥ सवेंच शरजाळ घालून ॥ कटक बहुत संहारिले ॥१९॥
भरत जे जे अस्त्र सोडित ॥ तें तें न मानी सीतासुत ॥ युद्धविद्या सरली समस्त ॥ सीतासुत नाटोपे ॥२०॥
भरतें प्रेरिलें कार्तवीर्यास्त्र ॥ सहस्रकरांचे प्रकटले वीर ॥ बाण सोती अनवार ॥ हांकें अंबर गाजविती ॥२१॥
ऐसें देखतां राघवकुमरें ॥ भार्गवास्त्र सोडिले त्वरें ॥ कार्तवीर्यास्त्र एकसरें ॥ गुप्त जाहले तेधवां ॥२२॥
मग भरते प्रेरिली कालरात्री ॥ तमें दाटली धरित्री ॥ तंव सीतापुत्रें ते अवसरी ॥ द्वादश सूर्य प्रकटविले ॥२३॥
त्या प्रकाशे ते वेळां ॥ विरिंचिगोळ तपों लागला ॥ भरत म्हणे हा कळिकाळा ॥ सर्वथाही नाटोपे ॥२४॥
भरतें सोडिले महिषासुर ॥ कुशें टाकिली शक्ति अनिवार ॥ भरतें सोडिलें त्र्यंबकास्त्र ॥ येरें भस्मासुरास्त्र सोडिलें ॥२५॥
मग कुशेंद्रें ते वेळां ॥ सूर्यमुख बाण काढिला ॥ जैसी मेघांतून निघे चपळा ॥ तैसा गेला त्वरेनें ॥२६॥
भरताचे हृदयीं येऊन ॥ खडतरला दिव्य बाण ॥ स्यंदनावरून उलथोन ॥ भरत खाली पडियेला ॥२७॥
दळ पूर्वीच आटिले समस्त ॥ ऐसें देखोनि हनुमंत ॥ घेऊन एक विशाळ पर्वत ॥ कुशेंद्रावरी धांविन्नला ॥२८॥
भोवंडून बळें भिरकाविला ॥ कुशें वज्रमुख बाण सोडिला ॥ अचळ फोडोन पिष्ट केला ॥ धुरोळा उडाला आकाशीं ॥२९॥
मारुतीचे हृदय लक्षून ॥ सोडिले तेव्हां वज्रबाण ॥ तो वज्रदेही परी मूर्च्छना येऊन ॥ धरणीवरी पडियेला ॥३०॥
इकडे बिभीषण आणि रघुनंदन ॥ विचार करीत बैसले पूर्ण ॥ बाळक हे कवणाचे कोण ॥ युद्ध निर्वाण करिताती ॥३१॥
तों अकस्मात आली मात ॥ रणीं पडला वीर भरत ॥ मूर्च्छना येऊनि हनुमंत ॥ रणांगणीं तळमळे ॥३२॥
बिभीषण म्हणे रघुनाथा ॥ आतां कासया यज्ञ करितां ॥ परमाश्चर्य तत्वतां ॥ जाऊनियां पहावें ॥३३॥
रघुवीर बोले तेव्हा वचन ॥ काळ कैसा परम कठिण ॥ बंधू पडिले तिघेजण ॥ कुलक्षय पूर्ण मांडला ॥३४॥
परम क्रोधावला रघुनंदन ॥ तोडोनि टाकिले यज्ञकंकण ॥ होमद्रव्यें उलंडून ॥ सीतारमण ऊठला ॥३५॥
हडबडली अयोध्या सर्व ॥ निशाणीं न घालितां घाव ॥ रथारूढ होऊनि सर्व ॥ पवनवेगें धांवले ॥३६॥
बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ नळ नीळ शरभ वाळिसुत ॥ अयोध्येचे दळ समस्त परम वेगें धांवत ॥३७॥
वर्षाकाळीं गंगेचे पूर ॥ सागराप्रति जाती सत्वर ॥ तेवीं नरवानरांचे भार ॥ रणसिंधूजवळी पातले ॥३८॥
तिघे बंधू पडिले रणीं ॥ ते नयनीं विलोकी चापपाणी ॥ की नमस्कार घातले धरणीं ॥ तिघांही मिळूनि एकदांचि ॥३९॥
तुझे कन्येस गांजिले व्यर्थ ॥ म्हणोनि पृथ्वीस नमस्कार करित ॥ असो प्रेते देखोनि रघुनाथ ॥ मनीं परम क्षोभला ॥४०॥
दुरोनी मग देखिले नयनीं ॥ श्यामसुंदर बाळें ते क्षणीं ॥ एकाकडे एक पाहोनी ॥ गोष्टी करिती कौतुकें ॥४१॥
कौपीन मौंजी यज्ञोपवीत ॥ तेणें शोभती किशोर अद्भुत ॥ माथांची शिखा उडत ॥ दृष्टी नाणिती परदळातें ॥४२॥
असो वृक्ष पाषाण घेऊन ॥ धांवले एकदांचि वानरगण ॥ तों दोघेही धनुष्य चढवून ॥ सरसावून पुढें आले ॥४३॥
आश्चर्य करी रघुनंदन ॥ सोडिती बाणापाठीं बाण ॥ मृगेंद्राऐसें गर्जोन ॥ दोघे वचन बोलती ॥४४॥
घालिती असंभाव्य बाणजाळ ॥ जर्जर केलें वानरदळ ॥ शिळा वृक्ष फोडोनि सकळ ॥ परदळावरी टाकिती ॥४५॥
अनिवार बाळकांचा मार ॥ न सोसवती दारुण शर ॥ प्रेते पडली अपार ॥ उरले वानर पळती भयें ॥४६॥
हनुमंत भावी मनांत ॥ ऊर्ध्वपंथे उतरून अकस्मात ॥ पुच्छें बांधोन दोघे त्वरित ॥ राघवापासी आणावे ॥४७॥
उडों पाहे अंजनीकुमर ॥ तो कुशें टाकिला सबळ शर ॥ त्याच्या हृदयीं आदळोनि सत्वर ॥ बाण पृथ्वीवरी पडियेला ॥४८॥
कुश बोले गर्जोन ॥ मर्कटा उभा राहे एक क्षण ॥ त्वां विध्वंसिले अशोकवन ॥ तें येथें न चले सर्वथा ॥४९॥
टाकोन वृक्षपाषाण ॥ हें राक्षसयुद्ध नव्हे जाण ॥ तों नव्हे रे गिरिद्रोण ॥ उपटून बळें न्यावया ॥५०॥

गोवत्सपद जीवन ॥ पुरुषार्थ भोगिसी समुद्र उडोन ॥ रावणाचें नगर जाळिलें पूर्ण ॥ ते येथें न चलें आम्हांसी ॥५१॥
हा संग्रामसिंधु परम दुर्धर ॥ येथें जय न पावसी तूं वानर ॥ आमचे जननीसी अपार ॥ स्नेह तुझा लागलासे ॥५२॥
ते क्षणक्षणां आठवित ॥ म्हणोनि तुज रक्षिले येथ ॥ उगाच राहें निवांत ॥ अचळवत हनुमंता ॥५३॥
तों वृक्ष घेऊनि सत्वर ॥ पुढें धांविन्नला मित्रपुत्र ॥ बाणघातें तरुवर ॥ लहूनें तोडिला हातींचा ॥५४॥
म्हणे ऐक रे चंडांशुसुता ॥ तो मागील काळ राहिलां आतां ॥ तुम्ही पतितांसी तत्वतां ॥ लावीन शिक्षा आज येथें ॥५५॥
वाळी ज्येष्ठबंधू मारवून ॥ त्याचे स्त्रियेसीं करिसी गमन ॥ ज्याचे बळें कर्म केले पूर्ण ॥ त्याचं ज्ञान कळों आले ॥५६॥
तुम्हां मर्कटांसी कैचें ज्ञान ॥ परी तुज गुरु भेटला जाण ॥ उत्तम न्याय करून ॥ तारा तुज दिधली ॥५७॥
गुरु अपंथें चाले सदा ॥ मग कैंची शिष्यास मर्यादा ॥ असो प्रायश्चित एकदां ॥ घेईं आजि रणांगणीं ॥५८॥
मग घालून सहस्र बाण ॥ रणीं पाडिला सूर्यनंदन ॥ फणसफळावरी कंटक पूर्ण ॥ तैसेचि शर भेदले ॥५९॥
तंव पुढें धांवला जांबुवंत ॥ तयाप्रति कुश वीर बोलत ॥ म्हणे अस्वला तूं निर्बळ बहूत ॥ वृद्ध अत्यंत दृष्टिहीन ॥६०॥
सोडोनियां सहस्र बाण ॥ तोही पाडिला उलथोन ॥ तों घेऊनियां पाषाण ॥ नळ वानर धांविन्नला ॥६१॥
तयाप्रति लहू बोले वचन ॥ म्हणे हे नव्हे सेतुबंधन ॥ पांच बाण सोडून ॥ तोही पाडिला रणभूमीं ॥६२॥
तंव अंगद धांवला सकोप ॥ तयासी बोले रविकुलदीप ॥ रावणाचा सभामंडप ॥ नव्हे पामरा उचलावयाचा ॥६३॥
माझे पाठीसी रिघे येऊन ॥ तुझे पित्याचा मी सूड घेईन ॥ शत्रूची सेवा करितां पूर्ण ॥ लाज न वाटे मर्कटा ॥६४॥
तुझें मातेने केला व्यभिचार ॥ त्याचें प्रायश्चित देईन सत्वर ॥ ऐसें म्हणोनि पांच शर ॥ टाकोनि अंगद पाडिला ॥६५॥
असो अष्ट जुत्पती आणि हनुमंत ॥ रणीं पाडले वीर समस्त ॥ मग कोदंड चढवूनि त्वरित ॥ बाण लावीत राघव ॥६६॥
वेगें सोडिले दश बाण ॥ कुशें शत सोडिले निर्वाण ॥ सहस्र शर रघुनंदन ॥ टाकिता जाहला तयावरी ॥६७॥
कुशें लक्ष बाण सोडिले ॥ राघवें कोटी मोकलिले ॥ बाणमंडपें ते वेळे ॥ झांकुळलें सूर्यबिंब ॥६८॥
रघुपतीचा हस्तवेग बहुत ॥ त्याहूनि विशेष कुशवीर दावित ॥ बाणांचे तेव्हां गणित ॥ लेखित शेषांते न करवे ॥६९॥
अनिवार बाळकें दोनी ॥ नाटोपती रामासी रणीं ॥ यावरी कोदंडपाणी ॥ काय बोले तेधवां ॥७०॥
म्हणे ऋषिबाळक हो ऐका वचन ॥ तुम्हांस भातुकें देईन ॥ करावयासी दुग्धपान ॥ धेनु देईन सवत्स ॥७१॥
मी तुम्हांसी जाहलो प्रसन्न ॥ जें मागाल ते इच्छा पुरवीन ॥ सकळ दुःख दरिद्र हरून ॥ देईन दान वाजी गज ॥७२॥
मग ते देती प्रतिवचना ॥ आम्हांस मागावयास नसे वासना ॥ तूं मागें मनकामना ॥ पूर्ण करूं तुझी आम्हीं ॥७३॥
तुझी तूंच भोगी संपत्ति ॥ आम्ही ऐकिली तुझी कीर्ति ॥ शोधितां हे त्रिजगती ॥ निर्दय नाहीं तुजऐसा ॥ तुज साधु म्हणेल तरी कोण ॥
व्यर्थ वाळी मारिला कपटेंकरून ॥ जानकीसारिखें चिद्रत्न ॥ अन्यायाविण दवडिले ॥७५॥
निष्पाप जैसी भागीरथी ॥ तिजहून पवित्र सीतासती ॥ घोरवनीं टाकिली ही ख्याति ॥ तुज न शोभे राघवा ॥७६॥
ऐसें दोघेही बाळ बोलती ॥ प्रत्त्युत्तर देत रघुपती ॥ मनांत उपजे बहु प्रीती ॥ कीं दोघांप्रति आलिंगावें ॥७७॥
बाळभाषण ऐकोन ॥ वाटे तयांसी द्यावें चुंबन ॥ यापरी ते दोघेजण ॥ म्हणती बाण सोडी वेगीं ॥७८॥
तूं क्षत्रिय म्हणविसी पूर्ण ॥ गोष्टी सांगसी युद्ध टाकून ॥ लीलावतारी रघुनंदन ॥ काय बोले याउपरी ॥७९॥
तुम्ही दोघे कोणाचे कोण ॥ झालेत कोणे वंशीं निर्माण ॥ मातापितयांची नाम खूण ॥ सांग संपूर्ण आम्हांप्रति ॥८०॥
दोघांचे देव्हडेंचि ठाण ॥ दोघांची विद्या समसमान ॥ वेद शास्त्र पुराण रामायण ॥ कोण्या गुरूनें पढविलें ॥८१॥
धनुर्वेद मंत्रास्त्र ॥ कळा कौशल्य युक्ति विचित्र ॥ सद्गुरु कोण तुमचा पवित्र ॥ नाम त्याचें सांगा पां ॥८२॥
ऐसें बोलता रघुनाथ ॥ दोघे गदगदां हांसत ॥ रणी बंधु पडले समस्त ॥ त्यांचा खेद सांडिला येणें ॥८३॥
विद्या सरली तुझी सकळिक ॥ रणीं पुससी आतां सोयरिक ॥ कीं बंधु पडले हा धाक ॥ मनीं दचक बैसला तुझा ॥८४॥
तुज पुसावया काय कारण ॥ सोडीं वेगें निर्वाणबाण ॥ बंधूचा सूड घेईं पूर्ण ॥ मग सोयरिक पुसे सुखे ॥।८५॥
म्हणती तूं अयोध्येचा नृपवर ॥ वधिले रावणादि असुर ॥ ती अवघी विद्या बाहेर ॥ काढीं आज पाहूं दे ॥८६॥
आम्हीं असों धाकुटें किशोर ॥ तूं पूर्वींचा जुनाट झुंजार ॥ धनुर्वेद पढविला समग्र ॥ गुरु वसिष्ठें तुजलागीं ॥८७॥
तुज एकपत्नीव्रत पूर्ण ॥ सत्कीर्ति जानकीतें सोडून ॥ अपकीर्ति कां वरिली दाटून ॥ हें तों दूषण जगीं जाहलें ॥८८॥
युद्ध केल्याविण सर्वथा ॥ आम्ही तुज न सोडूं आतां ॥ भय वाटत असेल चित्ता ॥ तरी पळून जाय अयोध्ये ॥८९॥
दारा कुटुंब तुज नाहीं ॥ आतां संन्यास घेऊन सुखें राही ॥ यावरी जनकाचा ज्येष्ठ जांवई ॥ काय बोलता जाहला ॥९०॥
तुम्ही सांगा आपले वर्तमान ॥ मग मी तुम्हांसी झुंजेन ॥ यावरी कुश बोले हांसोन ॥ ऐकें सावध होऊनि ॥९१॥
जानकी उदरकमळ शुद्ध ॥ त्यांत जन्मलों दोघे मिलिंद ॥ शत्रुकाष्ठें कोरून सुबुद्ध ॥ पिष्ठ करितो रणांगणीं ॥९२॥
वाल्मीकतात गुरु पूर्ण ॥ तेणें आमुचें केलें पाळण ॥ त्यानंतरें मौंजीबंधन ॥ करून वेद पढविले ॥९३॥
सकळ शास्त्रें रामचरित्र ॥ धनुर्वेद पढविला समग्र ॥ तो आमचे मातेचा तात पवित्र ॥ वाल्मीकऋृषि जाण पां ॥९४॥
मातेचे कैवारेंकरूनी ॥ भार्गवें निःक्षत्री केली अवनी ॥ तैसेंच आम्ही धरली मनीं ॥ करूं अवनी निर्वीर ॥९५॥
कीं मातृकैवारें विनासुत ॥ उरग संहारी तेव्हां समस्त ॥ तैसेंच करणें आजि येथ ॥ आम्हासही निर्धारें ॥९६॥
त्वां सांडिली जैं सीता सती ॥ तैंच गळाली तुझी शक्ती ॥ अविवेक केला निश्चिती ॥ पुनः मागुती आवरेना ॥९७॥
ऐसें ऐकतां रामचंद्र ॥ सीता आठवूनि दयासमुद्र ॥ हृदय पिटून सर्वेश्वर ॥ धरणीवरी पडियेला ॥९८॥
मूर्च्छना सांवरूनि पुढती ॥ मागुती उठिला रघुपति ॥ पुढें बिभीषण मारुति ॥ तयांप्रति पुसतसे ॥९९॥
म्हणे हे कवणाचे नंदन ॥ मग ते बोलती विचारून ॥ तुमचीं प्रतिबिंबें परिपूर्ण ॥ जानकी उदरी जन्मलीं ॥१००॥

चार घटिका संपूर्ण ॥ निवांत राहिला रघुनंदन ॥ सीता सोडिली त्या दिवसापासून ॥ संपूर्ण दिवस मोजिले ॥१॥
द्वादश वर्षें तीन मास पूर्ण॥ गणित करी जानकीजीवन ॥ तों लहू कुश दोघेजण ॥ एकाप्रति एक बोलती ॥२॥
म्हणती वृक्षाआड बैसोन ॥ काय करितो रघुनंदन ॥ तों कुशें सोडिला एक बाण ॥ वृक्ष छेदोनि उडविला ॥३॥
हस्तकौशल्ये देखोन ॥ हास्य करी जगन्मोहन ॥ म्हणे हे आम्हांलागून ॥ वश नव्हेति कदापि ॥४॥
आतां युद्धचि करावें यथार्थ ॥ म्हणोनि उभा राहिला रघुनाथ ॥ जे जे बाण सोडित ॥ ते ते निष्फळ जात आकाशीं ॥५॥
विमानीं इंद्रादि सुरवर ॥ आश्चर्य करिती तेव्हां थोर ॥ म्हणती रामाचे सामर्थ्य अपार ॥ काय जाहलें ये समयीं ॥६॥
अकाळींचीं अभ्रे व्यर्थ पूर्ण ॥ तैसे निष्फळ जाती रामाचे बाण ॥ मग कुशें मोहनास्त्र संपूर्ण ॥ निजबाणी स्थापिलें ॥७॥
तो मोहनबाण येऊन ॥ रघुनाथ हृदयीं भेदला पूर्ण ॥ मोहें विलोकितां पुत्रवदन ॥ मूर्च्छा येऊन पडियेला ॥८॥
रघुनाथ पडतां भूमंडळी ॥ एकचि हाक चोहींकडे जाहली पर्वत घेऊनि ते वेळीं ॥ हनुमंत पुढें धांविन्नला ॥९॥
त्यावरी टाकोनिया वज्रबाण ॥ मूर्च्छागत पाडिला न लागतां क्षण ॥ तों गदा घेऊन बिभीषण ॥ हाक देत पुढें आला ॥११०॥
तों कृशें बाण सोडिला ॥ लंकापतीचे हृदयी बैसला ॥ तोही मूर्च्छित पडियेला ॥ नाहीं उरला कोणी तेथें ॥११॥
मग लहू कुश दोघेजण ॥ आले रामाजवळी धांवोन ॥ पिता पाहिला अवलोकून ॥ वंदिले चरण प्रेमभावें ॥१२॥
रघुपतीचा मुकुट काढिला ॥ कुशें आपुलें मस्तकीं घातला ॥ कुंडले कौस्तुभ कटी मेखळा ॥ सर्वही लेइला कुश तेव्हां ॥१३॥
सौमित्राची भूषणें काढोनी ॥ लहू लेइला तेच क्षणीं ॥ मग श्यामकर्ण घेउनी ॥ दिव्य रथी बैसले ॥१४॥
लहू म्हणे दादा परियेसी ॥ वानर धरून आश्रमासी ॥ नेऊन दाखवूं मातेसी ॥ खेळावयासी सर्वदा ॥१५॥
मग नळ नीळ सुग्रीव मारुती ॥ यांचीं पुच्छें धरून हाती ॥ जांबुवंत अंगद ते क्षितीं ॥ ओढीतचि चालविले ॥१६॥
अंगे खरडती भूमीवरी ॥ जांबुवंत म्हणे मारुति अवधारी ॥ ऊठ वेगें झडकरी ॥ युद्ध करूं चला यांशी ॥१७॥
मग म्हणे हनुमंत ॥ पुढें आहे बहुत कार्यार्थ ॥ त्रिभुवननाथ सीताकांत ॥ तोही मूर्च्छित पडियेला ॥१८॥
आतां मेलियाचे मीस घेऊन ॥ घेऊं जानकीचें दर्शन ॥ शक्तीचें सामर्थ्य दारुण ॥ केलें विंदान अतर्क्य हे ॥१९॥
असो आश्रमा आले किशोर ॥ रथाखालीं उतरले सत्वर ॥ अलंकार मंडित सुंदर ॥ आश्रमामाजी प्रवेशले ॥१२०॥
कुश सन्मुख देखिला ॥ जानकीस ऐसा भाव गमला ॥ की रघुनाथचि आला ॥ सरसाविला अंचल ॥२१॥
तंव ते दोघेही कुमार ॥ साष्टांग घालिती नमस्कार ॥ सीतेसि दाटला गहिवर ॥ नंदन हृदयी कवळिले ॥२२॥
सीतेचे कंठीं मिठी घालून ॥ दोघे सांगती वर्तमान ॥ रामासमवेत बंधू चौघेजण ॥ रणांगणीं पहुडविले ॥२३॥
ऐकतांच ऐसी मात ॥ सीता पडली मूर्च्छागत ॥ सवेंच उठली आक्रंदत ॥ हृदय पिटीत ते काळीं ॥२४॥
म्हणे त्रिभुवनेश्वर घनसांवळा ॥ तो रणी तुम्हां केंवि सांपडला ॥ अरे पितृवध कैसा केला ॥ जाणोनियां बाळ हो ॥२५॥
मत्स्ये कैसा सागर शोषिला ॥ जंबुकें मृगेंद्र कैसा धरिला ॥ दीपतेजें काळवंडला ॥ वासरमणि कैसा हो ॥२६॥
तृणप्रहारें भंगले वज्र ॥ कीं पतंगे गिळिला वैश्वानर ॥ सर्षपभारे भोगींद्र ॥ ग्रीवा कैशा दडपिल्या ॥२७॥
मक्षिकेचा पक्षवात सुटला ॥ तेणें मेरु कैसा उलथोनि पडिला ॥ मुंगीचे मुखवातें विदारिला प्रळयमेघ जैसा पां ॥२८॥
तंदुळभारें ऐरावत ॥ कैसा पडिला हो मूर्च्छित ॥ पुष्पप्रहारें अद्भुत ॥ पाताळीं कूर्म दुखावला ॥२९॥
तों कुश लहू तेव्हां बोलत ॥ माते ते पडले मूर्च्छागत ॥ आतां उठतील समस्त ॥ चिंता काही न करावी ॥१३०॥
आई आम्ही आणिलीं वानरें उड्या घेती बहुत सुंदरें ॥ वृक्षास बांधिली समग्रें ॥ पाहीं बाहेरी अंबे तूं ॥३१॥
मग जगन्माता येऊन पाहात ॥ तों हनुमंत नळ नीळ जांबुवंत ॥ वीर देखोनि समस्त ॥ आश्चर्य करी अंतरी ॥३२॥
म्हणे बाळकांचे सामर्थ्य दारुण ॥ महावीर आणिले धरून ॥ म्हणे यांस ओळखी देतां पूर्ण ॥ लज्जायमान होतील हे ॥३३॥
मग पुत्रांसी म्हणे ते अवसरीं ॥ अरे हे वानर ठेवूं नये घरीं ॥ सोडा जाऊं द्या वनांतरी ॥ आपुलिया स्वस्थाना ॥३४॥
मग भोवंडिले पुच्छें करून ॥ दूर दिधले भिकावून ॥ मग ते महावीर उठोन ॥ राघवाकडे पळाले ॥३५॥
रणीं सावध जाहला रघुवीर ॥ तों पळतचि आले वानर ॥ सांगती सर्व समाचार ॥ वाल्मीकाचे आश्रमींचा ॥३६॥
आम्ही मूर्च्छेचे मीस घेऊनि ॥ जाऊन पाहिली जनकनंदिनी ॥ श्यामकर्ण दोघांनी नेऊनि ॥ आश्रमांगणीं पूजिलासे ॥३७॥
तुमचा रथ अलंकार ॥ घेऊन गेले दोघे कुमर ॥ जैसा सुपर्णें जिंकिला श्रीधर ॥ तैसेंच पूर्ण येथे जाहलें ॥३८॥
कीं नंदीनें जिंकिला उमारमण ॥ आपुलेच फळभारेंकरून ॥ वृक्ष जाय कैसा मोडून ॥ तैसेंच येथ जाहलें ॥३९॥
सूर्यापासून जाहले आभाळ ॥ तेणें त्यास आच्छादिलें तत्काळ ॥ ऐसें बोलतां तमालनीळ ॥ उगाच राहिला क्षणभरी ॥१४०॥
तों इकडे वर्तला वृत्तांत ॥ रामासीं झुंजले सुत ॥ उपवनाजवळी बहुत ॥ अपार रण पडियेले ॥४१॥
समाचार ऐकोनि विपरीत ॥ तों पाताळाहून अकस्मात ॥ वाल्मीक मुनि आला धांवत ॥ आश्रमापासीं आपुलिया ॥४२॥
सीतेनें सांगितलें वर्तमान ॥ श्यामकर्ण आणिला धरून ॥ मग वाल्मीक मुनि हांसोन ॥ तेचि क्षणीं ऊठिला ॥४३॥
रणांगणाप्रति येऊन ॥ अद्भुत करणी केली पूर्ण ॥ कमंडलूचें उदक शिंपून ॥ दळ अवघें उठविलें ॥४४॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ आदिकरून थोर लहान ॥ निद्रिस्थापरी उठोन ॥ उभे केले तें काळीं ॥४५॥
यावरी वाल्मीकें येऊन ॥ श्रीरामासी दिधलें आलिंगन ॥ म्हणे राघवा तूं सर्वज्ञ ॥ कर्तृत्व पूर्ण तुझेंच हें ॥४६॥
सर्वांचा गर्व झाडावया लीला तुवां केली रघुराया ॥ येरवी सीता तुजपासूनियां ॥ दूर कोठें गेली पां ॥४७॥
अनंत ब्रह्मांडांचा कर्ता ॥ तो तूं पुराणपुरुष रघुनाथा ॥ लटकेंच बाहेर आतां ॥ नेणतपण धरिसी तूं ॥४८॥
श्रीराम म्हणे युद्ध करूनी ॥ दोघांस जिंकीन समरंगणी ॥ म्यां आपुली निर्वाण करणी ॥ दाविली नाही तयांते ॥४९॥
हांसोनि बोले वाल्मीक ऋषि ॥ हस्ताचा ढका लागला नेत्रासी ॥ तरी क्रोध करून मानसीं ॥ हस्त काय छेदावा ॥१५०॥

भोजन करितां न कळत ॥ जिव्हेसी रुतला दंत ॥ तरी कोणावरी क्षोभ तेथ ॥ करावा सांग राजेंद्रा ॥५१॥
कनक रुसे कांतीवरी ॥ रत्न प्रभा घालूं इच्छी बाहेरी ॥ काष्ठ घेऊन निर्धारी ॥ वृक्ष मारी आपुलीं फळे ॥५२॥
गूळ गोडीवरी रुसला ॥ प्रवाहासी गंगा धरी अबोला ॥ प्रभेवरी दीप कोपला ॥ तैसा मांडिला विचार येथें ॥५३॥
हे जगदात्म्या अयोध्यापति ॥ तुझ्या वीर्याची अगाध गति ॥ आत्मा वै पुत्र नामासि निश्चिती ॥ गर्जती श्रुति राघवा ॥५४॥
वाल्मीकाचे बोल ऐकोन ॥ जाहले राघवाचें समाधान ॥ ते दिवसीं सीतारमण ॥ राहिले तेथें परिवारेंसी ॥५५॥
कुश लहू भेटती रघुनंदना ॥ तो सोहळा पाहावया नयना ॥ सकळ राजयांसहित सेना ॥ त्वरेंकरून धांवती ॥५६॥
शत्रुघ्न सुमंत धांवती ॥ हेममय शिबिरें उभी करिती ॥ अयोध्याजन वेगें येती ॥ महोत्साह पहावया ॥५७॥
वसिष्ठादिक मुनीश्वर ॥ कौतुके पाहूं आले सत्वर ॥ हेमांबर सभेसी रघुवीर ॥ सकळांसहित बैसला ॥।५८॥
नित्यनेम सारून रघुवीर ॥ नूतन वस्त्रें दिव्य अलंकार ॥ लेवोनियां श्रीरामचंद्र ॥ सभामंडपीं बैसला ॥५९॥
वाल्मीकें आश्रमाप्रति जाऊन ॥ लहू कुश आणि श्यामकर्ण ॥ राघवापाशीं आणून ॥ उभे केले तेधवां ॥१६०॥
इंद्रादि देवगण पाहती ॥ सर्व नृप सादर विलोकिती ॥ म्हणती केवळ रघुत्तमाच्या मूर्ती ॥ दोघे पुत्र दिसती हे ॥६१॥
श्यामसुंदर आकर्णनयन ॥ विशाळ भाळ सुहास्यवदन ॥ पुत्रांसहित रघुनंदन ॥ समसमान तिन्ही मूर्ती ॥६२॥
गर्जली तेव्हां आकाशवाणी ॥ राघवा तुझें पुत्र पाहे नयनीं ॥ जयजयकार करूनी ॥ मस्तक डोलविती सुरवर ॥६३॥
वस्त्रालंकारमंडित पूर्ण ॥ लहु कुश श्रीरामाजवळी येऊन ॥ हातीं तैसेंचि धनुष्यबाण ॥ घालिती लोटांगण पित्यासी ॥६४॥
जाहाला एकचि जयजयकार ॥ वृंदारक वर्षती सुमनसंभार ॥ रामास प्रार्थती नृपवर ॥ पुत्रांसी क्षेम देइंजे ॥६५॥
मग उठोनियां रघुनंदन ॥ हृदयीं धरिलें निजनंदन ॥ मस्तकीं करूनि अवघ्राण ॥ पुढें घेऊनि बैसला ॥६६॥
सकळवेदशास्त्रप्रवीण ॥ वाल्मीकें केलें दोघेजण ॥ पाठ शतकोटी रामायण ॥ बाळ म्हणोनि दाविती ॥६७॥
त्यावरी आरंभिलें गायन॥ अवतारचरित्रें गहन ॥ तीं ऐकतां रघुनंदन ॥ सप्रेम जाहला ते काळीं ॥६८॥
चवदा विद्या चौसष्टी कळा ॥ बाळांनी अभ्यासिल्या सकळा ॥ जैसा करतळींचा आंवळा ॥ अकळिल्या विद्या तैशाचि ॥६९॥
वाल्मीकास म्हणे रघुनाथ ॥ धन्य धन्य तुझें गुरुत्व ॥ विद्याभ्यास युद्ध अद्भुत ॥ बाळकांहातीं करविले ॥१७०॥
वाल्मीक वदे प्रत्त्युत्तर ॥ तुझें वीर्यसामर्थ्य परम तीव्र ॥ माझें गुरुत्व साचार ॥ काय करील नुसतेंचि ॥७१॥
सौमित्र भरत शत्रुघ्न ॥ सुमंत सुग्रीव बिभीषण ॥ हनुमंतादि सकळ सैन्य ॥ सीता आणावया चालिलें ॥७२॥
आश्रमापुढें येऊन ॥ घालिती सारे लोटांगण ॥ वाल्मीकें बहुत प्रार्थोन ॥ सीता आणिली बाहेरी ॥७३॥
सकळही सद्रद होऊन ॥ धरिती जगन्मातेचे चरण ॥ पुढें ठेविलें सुखासन ॥। जानकीसी बैसावया ॥७४॥
सकलऋषिपत्न्यांची पूजा करूनी ॥ जानकी बैसली सुखासनीं ॥ समुद्रासी भेटावया मंदाकिनी ॥ वेगेंकरून चालली जैसी ॥७५॥
जवळी देखोनि रघुनाथा ॥ खालीं उतरली जगन्माता ॥ वाल्मीक येऊनी तत्वतां ॥ रघुनाथाप्रति बोलतसे ॥७६॥
पंचभूतें शशी आदित्य ॥ रामा तूं साक्षी आहेस हृदयस्थ ॥ निष्पाप जानकी निश्चित ॥ आदिमध्यावसानीं ॥७७॥
माझी धर्मकन्या जनककुमारी ॥ आजिवरी पाळिली म्यां माहेरी ॥ आतां दिधली तुमचे करी ॥ अर्धांगी बैसवीं इयेतें ॥७८॥
तंव ते वदनी आकाशवाणी ॥ सत्य सती हे जनकनंदिनी ॥ मग श्रीरामें आलिंगोनी ॥ अंकावरी बैसविली ॥७९॥
लागला वाद्यांचा गजर ॥ मग वाल्मीकास प्रार्थीं रघुवीर ॥ घऊनी सकळ ऋषीश्वर ॥ अयोध्येसी तुम्ही चला ॥१८०॥
पूर्ण करावया महायज्ञ ॥ सकळिकां मानलें ते वचन ॥ मग वाल्मीकादि मुनिजन ॥ दिव्य वहनीं बैसविले ॥८१॥
जानकीसहित रघुनंदन ॥ रथीं बैसला चंडकिरण ॥ दोघे दोहींकडे नंदन ॥ विराजमान शोभती ॥८२॥
मस्तकीं विराजती दिव्य छत्रें ॥ मित्रपत्रें अतिविचित्रें ॥ निजभक्त अपार चामरें ॥ रघूत्तमावरी ढाळिती ॥८३॥
मकरबिरुदें पुढें चालती ॥ भाट सूर्यवंश वाखाणिती ॥ परम गजरें रघुपती ॥ अयोध्यामाजी प्रवेशला ॥८४॥
कौसल्या सुमित्रा प्रेमेंकरूनी ॥ सीतेस आलिंगिती तये क्षणीं ॥ लहूकुशांवरूनी ॥ मूद ओंवाळी कौसल्या ॥८५॥
सामुग्री पूर्वींच सिद्ध होती ॥ यज्ञदीक्षा घेऊन रघुपती ॥ पूर्ण केली पूर्णाहुती ॥ यज्ञ समाप्ति पावला ॥८६॥
वस्त्रालंकार दक्षिणा अपार ॥ देऊन बोळविले ऋषीश्वर ॥ वर्णित रघुवीरचरित्र ॥ आपले आश्रमाप्रति गेले ॥८७॥
रायांस दिधली पाठवणी ॥ श्रीरामाची आज्ञा घेऊनी ॥ सीतेचा महिमा वर्णित वदनीं ॥ निजनगरप्रति गेले ॥८८॥
बिभीषण सुग्रीव प्राणसखे ॥ गौरवूनियां रघुनायकें ॥ आपुले स्वस्थळाप्रति सुखें ॥ पाठविले तये काळी ॥८९॥
जानकीकुमरांसमवेत ॥ अयोध्येचें राज्य करी रघुनाथ ॥ ही कथा श्रवण करितां बहुत ॥ अक्षय सुख पाविजे ॥१९०॥
परम संकटहरणी हे कथा ॥ विजयी होय श्रोता वक्ता ॥ पाहतां श्रीरामविजयग्रंथा ॥ सर्व चिंता हरे पैं ॥९१॥
यावरी कथा गोड बहुत ॥ लीला कैसी दावी रघुनाथ ॥ तो शेवटींचा अध्याय यथार्थ ॥ सादर आतां परिसिंजे ॥९२॥
चाळीस अध्याय अवघा ग्रंथ ॥ त्यांत उरला एक गोड बहुत ॥ जैसा मुकुटावरी मणी झळकत ॥ तैसा अध्याय पुढील असे ॥९३॥
ब्रह्मानंदा स्वामी समर्था ॥ श्रीधरवरदा पंढरीनाथा ॥ हा ग्रंथ वाची त्या भक्ता ॥ तूंच रक्षी निजांगें ॥९४॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकोनचत्वारिंशत्तमोध्याय गोड ॥१९५॥
॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥  


Tuesday, December 20, 2011

RamVijay Adhyay - 38

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

हातीं घेऊनि चार शर ॥ उभा मंगलभगिनीचा कुमर ॥ तंव मागूनि चतुरंग दळभार ॥ अति गर्जरें पातलें ॥१॥
सवें सकळ पृथ्वीचे नृपवर ॥ मध्यें शत्रुघ्न प्रचंड वीर ॥ तों तेणें ऐकिली मात सुंदर ॥ घोडा धरिला म्हणोनि ॥२॥
भू्रसंकेत दावी शत्रुघ्न ॥ अपार लोटलें तेव्हा सैन्य ॥ तंव कर्दळीस श्यामकर्ण ॥ वस्त्रेंकरून बांधिला असे ॥३॥
ऋषींचीं मुंजियें बाळे खेळती ॥ जे वीर आले ते पुसती ॥ वारू कोणी बांधिला म्हणती ॥ लेकुरें बोलती भिऊनियां ॥४॥
कानावरी हात ठेविती ॥ आम्हीं नाहीं धरिला आण वाहती ॥ पैल दिसे धनुष्य हातीं ॥ कलागती करितो तो ॥५॥
तेणें बांधिला श्यामकर्ण ॥ तंव वीर बोलती हांसोन ॥ म्हणती लेकुरें नेणोन ॥ घोडा बांधिला कौतुकें ॥६॥
सोडा रे सोडा श्यामकर्ण ॥ जवळ उरलें आतां अयोध्यापट्टण ॥ वाट पाहतसे रघुनंदन ॥ सत्वर जावें वेगेंसी ॥७॥
घोडा सोडावया धांवले वीर ॥ तंव तो बोले जानकीकुमर ॥ कोण रे तुम्ही तस्कर ॥ घोडा सोडूं पातलां ॥८॥
घोडा धरिला तोचि मी एथ ॥ उभा लक्षित युद्धपंथ ॥ तुमचा कोण आहे रघुनाथ ॥ त्यासी जाऊन सांगा रे ॥९॥
मज म्हणतां तुम्ही बाळ ॥ परी सर्वांचा मी आहें काळ ॥ तुमचीं गर्वांची कवचें सकळ ॥ फोडीन आज समरांगणीं ॥१०॥
तटस्थ पाहती सकळ वीर ॥ म्हणती हा बाळ सुकुमार ॥ लीलाचाप घेऊनि परिकर ॥ धीट गोष्टी बोलतो ॥११॥
यावरी शस्त्र धरिता निश्चिंती ॥ सकळ योद्धे आम्हां हांसती ॥ तरी वारु सोडून त्वरितगती ॥ पुढें चला सत्वर ॥१२॥
घोडा सोडूं धांवले वीर ॥ लहू चाप ओढी सत्वर ॥ शतांचीं शतें सोडूनि शर ॥ तोडिले कर तितुक्यांचे ॥१३॥
जैसीं वटपत्रें तुटोनि पडती ॥ तैसीं मणगटें पडलीं क्षितीं ॥ तों मागुती बहु वीर धांवती ॥ घे घे शब्देंकरूनियां ॥१४॥
खर्गासहित भुजदंड ॥ लहूनें पाडिले उदंड ॥ जैसे शाखारहित तरू प्रचंड ॥ जैसे वीर उभे तेथे ॥१५॥
जाहला एकचि हाहाकार ॥ सेना लोटली तेव्हां समग्र ॥ लक्षांचे लक्ष वीर ॥ धांवते जाहले ते काळीं ॥१६॥
जैसा धारा वर्षे जलधर ॥ तैसे शर सोडी भूमिजाकुमर ॥ शिरांच्या राशी अपार ॥ पाडिल्या तेव्हां पुरुषार्थे ॥१७॥
दुरोनि पाहती वीर सकळ ॥ बारा वर्षांचा दिसे बाळ ॥ परी प्रचंड वीर समोर काळ ॥ उभा ठाकूं न शकेची ॥१८॥
एक म्हणती गुरु समर्थ ॥ याचा असेल हा यथार्थ तरीच एवढे सामर्थ्य ॥ कवणासही नाटोपे ॥१९॥
तंव सोळा पद्में दळभार ॥ एकदांचि लोटले समग्र ॥ परी त्या वीरांचे संधान थोर ॥ खिळिले समग्र बाणांनीं ॥२०॥
मयूरपिच्छें पिंजारती ॥ तैसे वीर सकळ दिसती ॥ मग हांक देऊनि महारथी ॥ शत्रुघ्न पुढें लोटला ॥२१॥
गजकलेवरें पडलीं सदट ॥ चालावया नाहीं वाट ॥ वीर पडिले महासुभट ॥ नामांकित पुरुषार्थी ॥२२॥
सकळ प्रेतें मागे टाकून ॥ पुढें धांवला शत्रुघ्न ॥ बाळ पाहिला विलोकून ॥ तंव रघुनंदन दुसरा ॥२३॥
म्हणे कोणाचा तूं किशोर येथ ॥ दळ पाडिलेंस असंख्यात ॥ आतां शिक्षा लावीन तुज बहुत ॥ पाहें पुरुषार्थ पैं माझा ॥२४॥
लहू म्हणे सिंहदरींत वारण ॥ आला मदभरेंकरून ॥ परी तो क्षेम स्वस्ति वांचून ॥ केवीं जाईल माघारा ॥२५॥
विष्णुवहनाचे कवेंतून ॥ उरग केवीं जाय वांचून ॥ ऐसें ऐकतां शत्रुघ्न ॥ लावी बाण चापासी ॥२६॥
आकर्णवरी ओढी ओढून ॥ लहूवरी सोडिला बाण ॥ सीतापुत्रें न लागतां क्षण ॥ तोडोनियां टाकिला ॥२७॥
आणीक सोडिले पांच बाण ॥ तेही तत्काळ टाकिले तोडून ॥ सवेंचि शत शर शत्रुघ्न ॥ मोकलीत अति रागें ॥२८॥
तेही लहू तोडी सत्वर ॥ मग काय करी सीतापुत्र ॥ बाणजाळ घातलें अपार ॥ झांकिलें अंबर प्रतापें ॥२९॥
सेनेसहित कैकयीनंदन ॥ बाणीं नजर जर्जर केला पूर्ण ॥ जें जें शस्त्र प्रेरी शत्रुघ्न ॥ तें तें सवेंच लहू छेदी ॥३०॥
मग निर्वाण बाण जो शत्रुघ्नाते ॥ दिधला होता रघुनाथें ॥ परम संकट देखोनि तेथें ॥ तृणीरांतून ओढिला ॥३१॥
वीज निघे मेघाबाहेर ॥ तैसा झळक तसे दिव्य शर ॥ तो धनुष्यीं योजून सत्वर ॥ लहूवरी सोडिला ॥३२॥
दृष्टीं देखतां सीताकुमर ॥ म्हणे बाण आला दुर्धर ॥ याचें निवारण समग्र ॥ कुश एक जाणतसे ॥३३॥
फळें आणावया कुश गेला ॥ माझा पाठिराखा दुरावला ॥ बाणापुढें यावेळां ॥ न वांचेंचि सर्वथा ॥३४॥
परम धैर्यवंत सीतानंदन ॥ वेगीं सोडिला दिव्यबाण ॥ तेणें शत्रुघ्नाचा निर्वाणबाण ॥ अर्ध खंडिला अंतराळीं ॥३५॥
अर्ध शर जे का उरला ॥ तो लहूचे हृदयीं भेदला ॥ मूर्च्छना येऊनि पडिला ॥ बाळ तेव्हां धरणीवरी ॥३६॥
भडाभडा चालिले रुधिर ॥ आरक्त नेत्र जाहले वक्र ॥ श्वासोच्छास कोंडले समग्र ॥ शेंडी रुधिरें थबथबली ॥३७॥
लहूपासोनि वांचले वीर ॥ त्याणीं सिंहनाद केला थोर ॥ पडिला पडिला किशोर ॥ म्हणोनि समग्र धांवले ॥३८॥
दुरोनि पाहती ते वेळे ॥ एक म्हणती मीस घेतले ॥ मग शत्रुघ्न रथाखालें ॥ उतरूनि जवळी पातला ॥३९॥
शत्रुघ्न जवळी बैसोन ॥ पाहे बाळ विलोकून ॥ धन्य जननी प्रसवली रत्न ॥ म्हणोनि उचलूनि घेतला ॥४०॥
श्यामसुंदर आकर्ण नयन ॥ आजानुबाहु सुहास्यवदन ॥ शत्रुघ्नें उदक आणून ॥ मुखींचें अशुद्ध धूतलें ॥४१॥
आश्चर्य करिती अवघे वीर ॥ म्हणती दुजा अवतरला रघुवीर ॥ आतां याची माता अपार ॥ शोक करील यालागीं ॥४२॥
स्नेहाचा पूर अत्यंत ॥ शत्रुघ्नाचे हृदयीं दाटत ॥ नयनीं आले अश्रुपात ॥ बाळक दृष्टीं विलोकितां ॥४३॥
रामचंद्रासी दाखवूं म्हणून ॥ रथी घातला त्वरेंकरून ॥ घेऊनियां श्यामकर्ण ॥ शत्रुघ्न त्वरेनें चालिला ॥४४॥
लागला वाद्यांचा एकचि नाद ॥ मनीं न सामाये आनंद ॥ महासिद्धि साधूनि सिद्ध ॥ घवघवीत परते जैसा ॥४५॥
इकडे लेकुरें धांवोनी ॥ जानकीस सांगती जाउनी ॥ माते तुझा लहू मारूनी ॥ नेला घालोनि रथावरी ॥४६॥
ऐकतां सर्व वर्तमान ॥ जानकी पडिली मूर्च्छा येऊन ॥ जैसें लोभियांचें धन गेलें हारपोन ॥ तैसे प्राण सर्व एकवटती ॥४७॥
जैसी काष्ठाची बाहुली ॥ तैसी निचेष्टित सीता पडली ॥ पुढती आक्रंदत उठिली ॥ वक्षःस्थळ बडवित ॥४८॥
मी अनाथ दुर्बळ ॥ परदेशी भणंग केवळ ॥ माझें धरूनियां बाळ ॥ कोणी निर्दय नेले पैं ॥४९॥
माझी दुर्बळाची दोन बाळें ॥ त्यांत एक धरूनि नेलें ॥ पूर्वकर्म फळास आलें ॥ अहाहा जाहले ओखटें ॥५०॥

बाळ माझे अत्यंत कोमळ ॥ घायें जाहलें असेल विकळ ॥ मुखचंद्र त्याचा अतिनिर्मळ ॥ नयन विशाळ सुरेख ॥५१॥
तेथें लागोनियां बाण ॥ फुटले असतील नयन ॥ सुहास्यवदन छिन्नभिन्न ॥ जाहले असेल बाळाचें ॥५२॥
माझी बाळें अत्यंत दीन ॥ होतीं कंदमुळें भक्षून ॥ तयासीं बळ कैचें संपूर्ण ॥ झुंजावया कोणासीं ॥५३॥
बाळावरी शस्त्र उचलिती ॥ ते क्षत्रिय नव्हेत दुर्मती ॥ कैसी कोणाचेही चित्ती ॥ दया उपजली नाहीं तेथें ॥५४॥
माझें दरिद्रियाचें किंचित धन ॥ कोणें निर्दयें नेलें चोरून ॥ मज अंधाची काठी हिरून ॥ कोणी वनी भिरकाविली ॥५५॥
कोणीं पक्ष माझा छेदिला ॥ कोणी नेत्र माझा फोडिला ॥ माझा कल्पवृक्ष उपडिला ॥ कोण्या पापियें येऊनि ॥५६॥
वाल्मीक तात ये वेळां ॥ तोही गेला असे पाताळा ॥ मजवरी अनर्थ जाहला ॥ कोणा सांगूं जाऊनियां ॥५७॥
कुश वनास गेला तत्वतां ॥ कोण धांवणें करील आतां ॥ माझा लहू बाळ मागुता ॥ कोण मज भेटवील ॥५८॥
तों कुश परतला वनींहून ॥ मार्गीं होती अपशकुन ॥ जड जाहले चालतां चरण ॥ तैसाच धांवून येतसे ॥५९॥
कोपीन मौंजी कटीं शोभत ॥ मस्तकीं शिखा वातें उडत ॥ माता जाहली असेल क्षुधित ॥ म्हणोन धांवत वेगेंसी ॥६०॥
पर्णकुटींत प्रवेशला ॥ म्हणे माते बंधु कोठें गेला ॥ आजि सामोरा मज नाहीं आला ॥ कोठें गुंतला खेळावया ॥६१॥
मग त्रिभुवनपतीची राणी ॥ बोले आक्रोशें हांक फोडूनी ॥ बारे आजि परचक्र ॥ येऊनी ॥ नेला धरून बंधु तुझा ॥६२॥
तूं त्याचा पाठिराखा पूर्ण ॥ तुझें करीत घडीघडी स्मरण ॥ सोडिला असेल तेणें प्राण ॥ तूं लवकरी धांव आतां ॥६३॥
कुशें घेतले धनुष्य बाण ॥ जानकीसी केले साष्टांग नमन ॥ जय सद्गुरु वाल्मीक म्हणून ॥ केली गर्जना ते काळीं ॥६४॥
कुरुनाममंत्रें ते वेळी ॥ सर्वांगी विभूति चर्चिली ॥ उभा राहून बाळ बळी ॥ जानकीप्रति बोलत ॥६५॥
अंबे इंद्र चंद्र कुबेर ॥ अथवा ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ जरी मी असेन तुझा कुमर ॥ तरी बाणेंकरूनि फोडीन ते ॥६६॥
समरांगणीं सर्व वीर ॥ आटोनियां रथ कुंजर ॥ बंधु सोडवीन सत्वर ॥ शिक्षा करीन वैरियां ॥६७॥
आजि दखवीन बळाची प्रौढी ॥ तरीच जन्मलो तुझे पोटी ॥ म्हणून चालिला जगजेठी ॥ नमून माता सत्वर ॥६८॥
कुंजरांचा मार्ग काढीत पूर्ण ॥ जेवीं आवेशें धांवे पंचानन ॥ कीं सर्प शोधावया सुपर्ण ॥ क्रोधें जैसा धांवत ॥६९॥
असो दूर देखोनियां भार ॥ प्रचंड हांक दिधली थोर ॥ उभेरे उभे तस्कर ॥ चोरून नेतां वस्तु माझी ॥७०॥
तस्करासी शिक्षा हेचि पूर्ण ॥ हस्तचरण खंडोन ॥ कर्ण नासिका छेदोन ॥ शिक्षा लावीन येथेंचि ॥७१॥
खळबळला सेनासमुद्र ॥ अवघे माघारें पाहती वीर ॥ तों राजस घनश्याम सुंदर ॥ दिसे राघव दुसरा ॥७२॥
द्वादश वर्षांचा किशोर ॥ देखोनि चळचळां कांपती वीर ॥ एक म्हणती सकळ संहार ॥ करील आतां उरलियांचा ॥७३॥
तों कुशें कोदंड चढवून ॥ सोडिले तेव्हां दिव्य बाण ॥ किंवा वर्षत पर्जन्य ॥ सायकांचा ते काळीं ॥७४॥
तों सेनापति दळ घेऊन ॥ मुरडला तेव्हां वर्षंत बाण ॥ म्हणे बाळा तुज न लागतां क्षण ॥ धरून नेईन अयोध्ये ॥७५॥
मग निर्वाणीचें दहा बाण ॥ कुशावरी प्रेरिले दारुण ॥ येरें एकचि शर सोडून ॥ दहाही छेदिले ते काळीं ॥७६॥
जैसे मूढाचे बोल अपार ॥ एकेंचि शब्दें चतुर ॥ कीं स्पर्शतां जान्हवीचें नीर ॥ पापें सर्वत्र संहारती ॥७७॥
तैसे कुशें शर छेदून ॥ तत्काळ सोडिले नव बाण ॥ चारी वारू आणि स्यंदन ॥ सेनापतीचा तोडिला ॥७८॥
आणिक तीन बाण सोडिले ॥ चाप हातींचे छेदिले ॥ कवच आंगींचे उडविले ॥ विरथ केलें ते काळीं ॥७९॥
पुढें चरणचाली चालत ॥ कुशावरी आला अकस्मात ॥ जैसा कां सुकर उन्मत्त ॥ मृगेंद्रावरी चौताळे ॥८०॥
तों कुशें सोडूनि दोन बाण ॥ दोनी हस्त टाकिले छेदून ॥ सवेंच दिव्य शर सोडून ॥ शिर तयाचें उडविलें ॥८१॥
सेनापति पडतांच ते वेळां ॥ एकचि हाहाकार जाहला ॥ तों तयाचा बंधु सरसावला ॥ नागेंद्र नाम जयासी ॥८२॥
विद्युत्प्राय वीस बाण ॥ नागेंद्रं सोडिले चापीं योजून ॥ त्या शरतेजें प्रकाशलें गगन ॥ मग सीतानंदन काय करी ॥८३॥
एकेंचि शरें ते वेळे ॥ वीसही बाण पिष्ट केले ॥ जैसीं एकाचि नामें सकळें ॥ महापातकें भस्म होती ॥८४॥
मग सोडोनि अर्धचंद्र शर ॥ उडविले नागेंद्राचे शिर ॥ सोडित बहु बाणांचा पूर ॥ न ये समोर कोणीही ॥८५॥
तों समीरासी मागें टाकून ॥ पुढें धांवला कैकयीनंदन ॥ चपळेहून सतेज बाण ॥ वर्षता जाहला ते काळीं ॥८६॥
तंव तो राघवी वीर चतुर ॥ एवं पिष्टवत् करी शर ॥ सवेंचि बाण अपार ॥ वर्षत मेघासारिखा ॥८७॥
उरलें शत्रुघ्नाचें दळ ॥ शिरें छेदोनि पाडी सकळ ॥ जैसें अपार जलदजाळ ॥ प्रभंजन विभाडी ॥८८॥
मग आठवोनि वाल्मीकाचे चरण ॥ काढिला सद्रुरुदत्त बाण ॥ सोडिला जेवीं पंचानन ॥ वारणावरी चपेटे ॥८९॥
वज्र पडे शैलशिखरी ॥ तैसा शत्रुघ्नाचे हृदयावरी ॥ बाण खडतरला ते अवसरीं ॥ पडला धरणीं शत्रुघ्न ॥९०॥
मग भोंवतें पाहे कुश वीर ॥ तंव एकही नये समोर ॥ जैसा दिनकराप्रति अंधकार ॥ मुख परतोनि न दाखवी ॥९१॥
षोडश पद्में दळभार ॥ आणीक देशोदेशींचे नृपवर ॥ तितुकेही संहारिले समग्र ॥ जैसें तृण अग्निसंगें ॥९२॥
मग कुश चापासी घाली गवसणी ॥ जैसा याज्ञिक आच्छादी अग्नी ॥ कीं मेघांमाजी सौदामिनी ॥ गुप्त जैसी राहिली ॥९३॥
जैसीं उद्वसग्रामींचीं मंदिरें ॥ तेवीं रथ शून्य दिसती एकसरें ॥ लहूवाकारणें कुशेंद्रें ॥ तितुकेंही शोधिले ते काळी ॥९४॥
व्हावया वस्तुसाक्षात्कार ॥ साधक शोधिती तत्वें समग्र ॥ तैसे रथ शोधित कुशेंद्र ॥ बंधुरत्नाकारणें ॥९५॥
तों शत्रुघ्नाचा मुख्य रथ ॥ त्यावरी लहु होता मूर्च्छागत ॥ तों कुशें उचलूनियां त्वरित ॥ हृदयकमळीं आलिंगिला ॥९६॥
तों लहूनें उघडिले नयन ॥ विलोकी निजबंधूचें वदन ॥ तत्काळ उभा ठाकला उठोन ॥ म्हणे शत्रुघ्न पळून गेला कोठें ॥९७॥
देह चारी शोधोनि विविध ॥ संत अंतरीं धरिती बोध ॥ तैसाच कुश होऊनि सद्रद ॥ बंधूस हृदयीं धरियेला ॥९८॥
मग कुश वचन बोलत ॥ बारें तूं श्रमलासी बहुत ॥ येरू म्हणे कष्ट समस्त ॥ हरले तुज देखतां ॥९९॥
म्हणे श्यामकर्ण घेऊन ॥ चला आश्रमा करूं गमन ॥ मग कुश बोलिला वचन ॥ कदा येथून जाऊं नये ॥१००॥

आतां युद्धास येतील बहुत ॥ ते समरीं जिंकून समस्त ॥ मग वारू घेऊनि त्वरित ॥ जाऊं जननीच्या दर्शना ॥१॥
लहू म्हणे घालोनि पैज ॥ घ्यावें अयोध्येचें राज्य ॥ धरून आणावा रघुराज ॥ वाल्मीकचरणाजवळी पैं ॥२॥
असो वृक्षीं बांधोन श्यामकर्ण ॥ हातीं घेऊनि धनुष्य बाण ॥ अयोध्यापंथ लक्षीत पूर्ण ॥ दोघेजण उभे असती ॥३॥
घायाळ सैन्य उरले किंचित ॥ तें अयोध्येसी गेले धांवत ॥ राघवासी सकळ मात ॥ श्रुत केली तेधवां ॥४॥
दळभारासहित पूर्ण ॥ रणीं आटिला वीर शत्रुघ्न ॥ विप्रबाळक दोघेजण ॥ द्वादश वर्षांचे असती पैं ॥५॥
यज्ञमंडपीं रघुनंदन ॥ बंधूचा समाचार ऐकोन ॥ टाकोनि हातींचे अवदान ॥ भूमीवरी उलंडला ॥६॥
नेत्रीं ढळढळां वाहे नीर ॥ गजबजिले भरत सौमित्र ॥ बिभीषण हनुमंत मित्रपुत्र ॥ हडबडिले तेधवां ॥७॥
म्हणती यज्ञासी जाहलें विघ्न ॥ पडला महावीर शत्रुघ्न ॥ असो सौमित्राप्रति राजीवनयन ॥ काय बोलिला तेधवां ॥८॥
म्हणे शत्रुघ्नाऐसा वीरराणा ॥ ऋषिकिशोरें आटिला रणा ॥ तरी सवें घेऊनि अपार सेना ॥ धांवण्या धावे बंधूच्या ॥९॥
श्रीरामचरणाब्ज नमून ॥ वायुवेगें निघाला लक्ष्मण ॥ सवें चतुरंग सैन्य ॥ अपार तेव्हां निघालें ॥११०॥
चवदा गांवें रुंद थोर ॥ मार्गी ॥ चालिला सेनासागर ॥ वायुवेगें ऊर्मिलावर ॥ रणमंडळासीं पातला ॥११॥
तो सेनापति काळजीत ॥ सौमित्रासी पावला त्वरित ॥ तंव दोघे देखिले अकस्मात ॥ शशी आदित्य ज्यापरी ॥१२॥
श्यामसुंदर दोघेजण ॥ द्वादश वर्षांच्या मूर्ती लहान ॥ हातीं घेऊनि धनुष्य बाण ॥ धीट दोघे विलोकिती ॥१३॥
पहावया बंधूचें मानस ॥ बोलता जाहला वीर कुश ॥ म्हणे सेना पातली विशेष ॥ प्रताप विशेष दिसतसे ॥१४॥
सेनापति क्रोधयमान ॥ चपळ येतसे त्याचा स्यंदन ॥ आतां हा युद्ध करील दारुण ॥ आम्हांसी पुन्हां नाटोपे ॥१५॥
मग बोलिला लहू वीर ॥ तूं पाठिराखा आलासी सत्वर ॥ आतां मज बळ अपार येथोनियां चढियेले ॥१६॥
जैसी साह्य होतां सरस्वती ॥ सकळ कठिनार्थ उमजती ॥ तेवीं आजि निर्वीर करीन क्षिती ॥ तुझ्या बळेंकरूनियां ॥१७॥
तुजसी युद्धीं राहे समोर ॥ ऐसा असेल कोण वीर ॥ जरी स्वयें आला रामचंद्र ॥ तरी तूं त्यासी नाटोपसी ॥१८॥
तोंवरी गर्जे जलार्णव ॥ जों देखिला नाहीं कलशोद्धव ॥ तूं पंचानन हे सर्व ॥ जंबूक तुजवरी पातले ॥१९॥
जरी तम जिंकील सूर्यासी ॥ कीं भूतें गिळितील काळासी ॥ तरी समरांगणी युद्धासी ॥ तुजसी हें पुरतील ॥१२०॥
जरी आकाश बुडेल मृगजळीं ॥ वारा कोंडिजे भूगोळीं ॥ तरीच तुजसी समदळीं ॥ भिडो शकतील बंधुराया ॥२१॥
परी एकें संशयें गोंविलें ॥ जें माझे धनुष्य भंगिलें ॥ असंख्यात युद्ध जाहले ॥ उपवनाजवळी प्रथमचि ॥२२॥
मग सैन्य दळभार ॥ धरा धरा म्हणती किशोर ॥ आतां जातील हे कोठवर ॥ पाहूं नयनीं आम्हीच कीं ॥२३॥
वीर दोघे उभे ठाकूनी ॥ दळभार विलोकिती नयनीं ॥ सैन्य जैसं तृणप्राय करूनी ॥ उभे ठाकती तैसेच ते ॥२४॥
कुश म्हणे ऐसिया समयासी ॥ कोण चाप देईल आम्हांसी ॥ तरी आतां प्रार्थूं सूर्यासी ॥ धनुष्यप्राप्तीकारणें ॥२५॥
मग ते राघवी वीर दोघेजण ॥ एकनिष्ठें मांडिती सूर्यस्तवन ॥ ऊर्ध्व वदनें करून ॥ सूर्यमंडळ विलोकिती ॥२६॥
जयजय तमनाशका सहस्रकिरणा ॥ अंबरचूडामणे सूर्यनारायणा ॥ जीवमिलिंदबंधमोचना ॥ हृदयदळप्रकाशका ॥२७॥
एकचक्र कनकभूषित रथ ॥ सप्तमुख अश्व वेग बहुत ॥ निमिषार्धामाजी अपार पंथ ॥ क्रमोनि जात मनोगती ॥२८॥
आदिपुरुष तूं निर्विकार ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ हीं स्वरूपें तुझींच साचार ॥ सर्वप्रकाशका आदित्या ॥२९॥
सकळ रोग दुःख भयहारका ॥ विश्वदीपना विश्वपाळका ॥ त्रिभुवननेत्रप्रकाशका ॥ काळात्मका काळरूपा ॥१३०॥
परिसोनि बाळकांची स्तुती ॥ तत्काळ प्रसन्न जाहला गभस्ती ॥ अक्षय्य धनुष्य क्षितीं ॥ ऊर्ध्वपंथें टाकिले ॥३१॥
सूर्यास साष्टांग नमून ॥ घेतले तेव्हां धनुष्यबाण ॥ म्हणती वाल्मीक गुरु धन्य पूर्ण ॥ सूर्यआराधन दिधलें जेणें ॥३२॥
आम्हांसी सद्गुरुराया अखंड ॥ क्षणें जिंकू हे ब्रह्मांड ॥ लहू म्हणे आजि कोड ॥ पुरवीन यांचे संग्रामीं ॥३३॥
सूर्यदत्त कोदंड घेऊन सत्वर ॥ सरसावला तेव्हां लहू वीर ॥ तों सौमित्राचें दळ समग्र ॥ चतुरंग भार लोटला ॥३४॥
अचुक दोघांचे संधान ॥ वायां न जाय टाकिला बाण ॥ पदाती अश्व रथ वारण ॥ तोडोनि पाडिती एकसरें ॥३५॥
कोणी धनुष्याची ओढी ओढित ॥ तों भुज तोडिती अकस्मात ॥ मणगटें असिलतेसहित ॥तोडोनि पाडिती क्षितीवरी ॥३६॥
शिरांच्या लाखोल्या घालोनी ॥ भूलिंगें पूजिली दोघांजणीं ॥ अशुद्धनदी लोटली वनीं ॥ जाती वाहून कलेवरें ॥३७॥
वीर संहारिले अपार ॥ काळजितास म्हणे सौमित्र ॥ हे दोघे असतां एकत्र ॥ कल्पांतीही नाटोपती ॥३८॥
तरी बहुत कटक घेऊन ॥ ज्येष्ठासी धरी तूं वेष्टून ॥ धाकट्याभोंवते आवरण ॥ मी घालूनि धरितसे ॥३९॥
मग दोन भाग कटक केले ॥ दोघे दोहींकडे फोडिले ॥ चोवीस वेढे घातले ॥ सभोंवते सैन्याचे तेधवां ॥१४०॥
सौमित्रें वेढिला लहू वीर ॥ जैसा तृणें झांकिला वैश्वानर ॥ कीं अजांनी कोंडिला महाव्याघ्र ॥ कीं खगेश्वर सर्पांनी ॥४१॥
परी तो लहू प्रतिज्ञावीर ॥ चापासी लावून सोडी शर ॥ फिरत फिरत चक्राकार ॥ सोडी पूर बाणांचा ॥४२॥
धन्य वाल्मीकाचे दिव्य मंत्र ॥ एका बाणाचे कोटी शर ॥ होऊनि शिरें पाडी समग्र ॥ नवल वीर राघवी ॥४३॥
रघुपतीचा मित्र विशेष ॥ रुधीनामा धांवला राक्षस ॥ तो महाबलिष्ठ गगनास ॥ उडोनि गेला तेधवां ॥४४॥
खालीं अकस्मात उतरूनी ॥ लहूचें चाप सत्वर हिरूनी ॥ अंतरिक्ष गेला उडोनी ॥ फळ घेऊन पक्षी जैसा ॥४५॥
हातींचे हिरून नेले चाप ॥ लहू पाहे तटस्थरूप ॥ तस्करापाठीं लागतां सर्प ॥ खंडी जैसा चरणातें ॥४६॥
व्याळ मूषक धरूं जातां ॥ वणव्यांत सांपडे अवचितां ॥ कीं रिसामागें धांवतां ॥ बोरांटी आंगी अडकली ॥४७॥
निधान साधावया गेला ॥ तों विवशीं पडली येऊन गळां ॥ तैसें लहूस जाहलें ते वेळा ॥ धनुष्य नेतां रुधीने ॥४८॥
असो सीतासुत परम चतुर ॥ जैसा निराळी उडे खगेश्वर ॥ तैसा उडोनियां सत्वर ॥ रुधी राक्षस धरियेला ॥४९॥
हातींचे धनुष्य हिरून घेतलें ॥ असुर झोटी धरिला तये वेळे ॥ गरगरां फिरवूनियां बळे ॥ पृथ्वीवरी आपटिला ॥१५०॥

मृत्तिकाघटाचीं शकलें ॥ तेंवि असुरअवयव चूर जाहले ॥ रुधीनें प्राण सोडिले ॥ सकळांदेखतां ते काळीं ॥५१॥
मागुतीं कटकांत उतरोन ॥ युद्ध करी सीतानंदन ॥ चोवीस वेढे संहाररून ॥ टाकिलें सैन्याचे ते क्षणी ॥५२॥
महाझुंजार येऊन ॥ हातींचीं शस्त्रें टाकून ॥ धरिती लहूचे चरण ॥ आमचे प्राण रक्षीं कां ॥५३॥
एक पळती रण सांडून ॥ एक दांतीं धरिती तृण ॥ मग सिंहानादें लक्ष्मण ॥ गर्जोनि पुढें धांविन्नला ॥५४॥
जैसा पांच विजा अतितीक्ष्ण ॥ तैसें सौमित्रें पांच बाण ॥ लहूवरी सोडिले पूर्ण ॥ महाक्रोधंकरूनियां ॥५५॥
रघुवीराचा लहू वीर ॥ तत्काळ सोडी दिव्य शर ॥ पांच बाण केले चूर ॥ लोहपिष्टन्यायेंसी ॥५६॥
लहू सौमित्राप्रति बोलत ॥ त्वां पूर्वी मारिला इंद्रजित ॥ ते तुझी विद्या समस्त ॥ आजि दावीं मजलागीं ॥५७॥
चतुर्दश वर्षें निराहार ॥ काननीं श्रमलासीं तूं फार ॥ आज समरांगणीं साचार ॥ सावकाश निद्रा करीं ॥५८॥
सौमित्र म्हणे तूं कोणाचा कोण ॥ तंव तो लहू बोले हांसोन ॥ तुज पुसावया काय कारण ॥ आला बाण सांभाळीं ॥५९॥
लहू निधडा प्रचंड वीर ॥ सोडी एक सबळ शर ॥ रथासहित सौमित्र ॥ आकाशपंथें उडविला ॥१६०॥
गरगरां गगनी भोंवे रथ ॥ भूमीवरी पडे अकस्मात ॥ मग दुजे रथी सुमित्रासुत ॥ आरूढला लवलाहे ॥६१॥
जैसा कां वर्षे घन ॥ तैसा बाण सोडी लक्ष्मण ॥ लहू त्याचिया त्रिगुण ॥ शर सोडीत सतेज ॥६२॥
ऊर्मिलापतीचे बाण ॥ तटतटां टाकी तोडून ॥ मग मंत्र जपोनि लक्ष्मण ॥ शर सोडोनि देतसे ॥६३॥
त्या शरापासून एकदा ॥ निघाल्या कोट्यवधि गदा ॥ विमानीं सकळ सुरवृंदा ॥ आश्चर्य तेव्हां वाटले ॥६४॥
तो लहू जपे गुरुमंत्र ॥ चक्रें सोडिली तेव्हां अपार ॥ गदा छेदोनि समग्र ॥ चक्रें सवेंचि गुप्त जाहली ॥६५॥
तों सौमित्रें सोडिले पर्वत ॥ सवेचि लहू वज्र प्रेरित ॥ फोडिले अचळ समस्त ॥ वज्र जात स्वस्थाना ॥६६॥
मंगळाचा भाचा लहू वीर ॥ सूर्यवंशमंडणाचा कुमर ॥ शरमुखीं द्वादश दिनकर ॥ स्थापोनियां सोडिले ॥६७॥
निघतां द्वादश आदित्य मेळ ॥ प्रतापें लोपला विरिंचिगोळ ॥ ऐसें देखतां फणिपाळ ॥ राहुअस्त्र सोडित ॥६८॥
सूर्य आणि राहुअस्त्र ॥ दोनी जाहलीं एकत्र ॥ सवेंच गुप्त जाहली क्षणमात्र ॥ नलगतां ते काळीं ॥६९॥
कामास्त्र सोडी अहिनायक ॥ लहूवीरे प्रेरिलें कामांतक ॥ कामास्त्र दग्ध जाहलें तात्कालिक ॥ नामें पातक हरे ज्यापरी ॥१७०॥
सौमित्रें सोडिलें तारकास्त्र ॥ लहू प्रेरी षण्मुखास्त्र ॥ विघ्नास्त्र सोडी सौमित्र ॥ हेरंबास्त्र लहू टाकी ॥७१॥
सौमित्र सोडी सरितापति ॥ लहू त्यावरी प्रेरी अगस्ति ॥ मग त्यावरी ऊर्मिलापति ॥ पावकास्त्र प्रेरितसे ॥७२॥
लहूनें मेघास्त्र प्रेरून ॥ विझविला प्रचंड अग्न ॥ जैसें प्रकटतां आत्मज्ञान ॥ जाय वितळोन प्रेममोह ॥७३॥
वातास्त्र प्रेरी ऊर्मिलानाथ ॥ लहू आड घाली पर्वत ॥ असो साठ अक्षौहिणी गणित ॥ रामसेना पाडिली ॥७४॥
आश्चर्य करी लक्ष्मण ॥ म्हणे याचा पार न कळे पूर्ण ॥ हातासीं कदा न ये श्यामकर्ण ॥ आतां यज्ञ कायसा ॥७५॥
हे असती कोणाचे कोण ॥ हे कदा न कळे वर्तमान ॥ मज वाटे शिव आणि रमारमण ॥ बाळवेषें प्रकटले ॥७६॥
आणिकांची नव्हे शक्ति ॥ हे त्रिभुवनासी नाटोपती ॥ असो लहू म्हणे सौमित्राप्रति ॥ कां रे उगाचि निवांत ॥७७॥
तुझे सरले असतील बाण ॥ तरी जाईं अयोध्येसी परतोन ॥ तुझा कैवारी रघुनंदन ॥ घेऊनि येई सत्वर ॥७८॥
सौमित्र नेदी प्रत्युत्तर ॥ विलोकी बाळांचा मुखचंद्र ॥ मागुती क्रोध उचंबळतां अपार ॥ सोडिले शर सौमित्रें ॥७९॥
भोगींद्रअवतार ॥ लक्ष्मण ॥ हें भूमिजासुतें जाणोन ॥ प्रेरिला नादास्त्र बाण ॥ नवल पूर्ण वर्तले ॥१८०॥
असंभाव्य नाद मंजुळ ॥ ध्वनीनें भरला ब्रह्मांडगोळ ॥ धनुष्य टाकूनि फणिपाळ ॥ नादब्रह्मीं मिसळला ॥८१॥
जे कनकबीज भक्षिती ॥ त्यांचे आंगीं संचरें भ्रांति ॥ ऊर्मिलापतीची गति ॥ तैसीच जाहली तेधवां ॥८२॥
नादास्त्र बाण हृदयीं भरला ॥ जैसा विखार बिळीं प्रवेशला ॥ त्यावरी नादरंगें व्यापिला ॥ भूतळी पडिला मूर्च्छित ॥८३॥
इकडे सैन्याचे चोवीस आवर्त ॥ कुशाभोंवते घातले अद्भुत ॥ ते संहारून समस्त ॥ काळजित मारिला ॥८४॥
विभांडोनि दोनी दळें ॥ दोनी बंधू एकवटले ॥ रण अपार तेथें पडिलें ॥ कुंजर मोकळे धांवती ॥८५॥
नाहीं रथस्वामी सारथी ॥ रिते रथ तुरंग ओढिती ॥ सैरावैरा चौताळती ॥ सव्य अपसव्य रणांगणीं ॥८६॥
असो अयोध्येंत कोदंडपाणी ॥ सांगें गुज भरताचे कर्णीं ॥ म्हणे आणिक सेना घेऊनी ॥ साह्य जाईं सौमित्रासी ॥८७॥
दारुण योद्धा तो लक्ष्मण ॥ त्याप्रति सांगें इतुकें वचन ॥ कीं बाळक दोघेजण ॥ जितेच धरून आणावे ॥८८॥
ते जिवें न मारावे सर्वथा ॥ आकांत करील त्यांची माता ॥ तरी बाण आंगीं न खुपतां ॥ मोहनास्त्र घालोनि धरावे ॥८९॥
त्यांचीं माता -पिता कोण ॥ धनुर्वेद गुरु संपूर्ण ॥ कां हिंडतां वनोपवन ॥ वर्तमान सर्व पुसावें ॥१९०॥
त्यांच्या स्वरूपाची आकृति ॥ कोणासारिखे दोघे दिसती ॥ धरूनि आणा त्वरितगती ॥ रथावरी घालोनियां ॥९१॥
सौमित्राचा क्रोध दारुण ॥ घेईल बाळकांचा प्राण ॥ अन्याय केला तरी पूर्ण । कृपा करावी बाळकांवरी ॥९२॥
ज्याचें हृदय परम कोमळ ॥ ते दृष्टीं देखतांचि बाळ ॥ स्नेहें द्रवेल तत्काळ ॥ अग्नि संगें घृत जैसें ॥९३॥
बाळकाविणें शून्य मंदिर ॥ आमुचें पडलें कीं साचार ॥ गुणसरिता ॥ सीता सुंदर ॥ विवेक न करिता त्यागिली ॥९४॥
ऐसें बोलतां रघुनाथ ॥ कंठ जाहला सद्रदित ॥ नयनीं सुटले अश्रुपात ॥ प्रिया हृदयांत आठवली ॥९५॥
ऐसें राजीवनेत्र बोलत ॥ तों घायाळ आले धांवत ॥ म्हणती सौमित्र आणि काळजित ॥ सेनेसहित आटिले ॥९६॥
ऐसें ऐकतां राजीवनेत्र ॥ परम चिंतातुर जाहले वानर ॥ श्रीराम म्हणे सर्वेश्वर ॥ अत्यंत कोपला आम्हांवरी ॥९७॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर॥ पुढें वीरश्री माजेल अपार ॥ ते श्रवण करोत श्रोते चतुर ॥ व्युत्पन्न आणि प्रेमळ ॥९८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥१९९॥
॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥


Sunday, December 18, 2011

RamVijay Adhyay - 37

 श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जयजय राघवा करुणाकरा ॥ अवनिजाकुलभूषणा मनविहारा ॥ रावणानुजपाळका समरधीरा ॥ मित्रपुत्रहितप्रिया ॥१॥
प्रतापसूर्यवंशिविवर्धना ॥ मयजामातकुलकाननच्छेदना ॥ सकळवृंदारकबंधमोचना ॥ आनंदसदना अक्षया ॥२॥
कौसल्याहृदयारविंदभ्रमरा ॥ भरतनयनपद्मदिवाकरा ॥ सौमित्रप्राणआधारा ॥ अतिउदारा अयोध्याप्रभो ॥३॥
ब्रह्मानंदा रघुनंदना ॥ वदवीं पुढें ग्रंथरचना ॥ तुझी लीला जगन्मोहना ॥ तूंचि बोलें यथार्थ ॥४॥
पंडितीं ऐकावें सावधान ॥ छत्तिसावे अध्यायीं जाण ॥ राजाधिराज रघुनंदन ॥ राज्यासनीं बैसला ॥५॥
एकादशसहस्र वर्षें ॥ निर्विघ्न राज्य पुराणपुरुषें ॥ अयोध्येचें केलें संतोषें ॥ विश्व सकळ कोंदलें ॥६॥
तों विदेहराजनंदिनी ॥ जगन्माता प्रणवरूपिणी ॥ ते अयोध्यापतीची राणी ॥ झाली गर्भिणी पहिल्यानेंं ॥७॥
शास्त्रसंख्या मास भरतां जाण ॥ वोंटभरण करी रघुनंदन ॥ तो सोहळा वर्णितां पूर्ण ॥ भागे वदन शेषाचें ॥८॥
वसंतकाळीं क्रीडावनांत ॥ राघव प्रवेशला सीतेसहित ॥ अत्यंत वन तें शोभिवंत ॥ नंदनवनाहूनियां ॥९॥
वृक्ष सदाफळ आणि सघन ॥ माजी न दिसे सूर्यकिरण ॥ तेथें सीतेची अंगुली धरून ॥ राजीवनयन विचरतसे ॥१०॥
नानावृक्षांचिया जाती ॥ सीतेस दावी त्रिभुवनपती ॥ एकांत देखोन सीतेप्रति ॥ पुसत राघव प्रीतीनें ॥११॥
म्हणे सुकुमारे जनकबाळे ॥ तुज काय होताती अंतरीं डोहळे ॥ मना आवडे ते यें वेळे ॥ सांग सर्वही पुरवीन ॥१२॥
मग इच्छित हास्यवदन ॥ जानकी देत प्रतिवचन ॥ म्हणे एक आवडे रघुनंदन ॥ नलगे आन पदार्थ ॥१३॥
राजीवाक्ष म्हणे लाज सोडोनी ॥ डोहळे सांग काय ते मनीं ॥ जें म्हणशील ते यें क्षणी ॥ पुरवीन जाण राजसे ॥१४॥
जनकजा बोले याउपरी ॥ म्हणे जन्हकुमारीचिये तीरीं ॥ पवित्र ऋषिपत्न्यांमाझारीं ॥ पंचरात्रीं राहावें ॥१५॥
घालोनियां तृणासन ॥ करावें भूमीवरी शयन ॥ कंदमुळें भक्षून ॥ शुचिर्भूत असावे ॥१६॥
मनांत म्हणे रघुनंदन ॥ पूर्वी वनवास भोगिले दारुण ॥ अजूनि न धायेचि मन ॥ आवडे कानन इयेते ॥१७॥
पुढील भविष्यार्थ जाणोन ॥ अवश्य म्हणे रघुनंदन ॥ मनकामना पूर्ण करीन ॥ तुझी जाण सुकुमारें ॥१८॥
याउपरी एकदां रघुवीर ॥ पुरींचे रक्षक जे हेर ॥ त्यांसी पुसतसे श्रीधर ॥ दृढभावे निर्धारें ॥१९॥
तुम्ही नगरीं हिंडतां निरंतर ॥ आकर्णितां जनवार्ता समग्र ॥ तरी तें सांगावें साचार ॥ लोक काय म्हणती आम्हां ॥२०॥
वंदिती किंवा निंदिती ॥ यश किंवा अपयश स्थापिती ॥ अभय असे तुम्हांप्रती ॥ सांगा निश्चिती काय तें ॥२१॥
हेर म्हणती नगरांत ॥ राघवा तुझे सर्व भक्त ॥ सकळ लोक पुण्यवंत ॥ यश वर्णिती सर्वदा ॥२२॥
पर रजक एक दुर्जन ॥ तेणें स्त्रीस केलें ताडन ॥ त्या रागें ती स्त्री रुसोन ॥ पितृसदनाप्रति गेली ॥२३॥
माहेरी होती बहुदिन ॥ मग पित्यानें हातीं धरून ॥ जामातगृहाप्रति नेऊन ॥ घालिता जाहला ते काळीं ॥२४॥
तंव तो रजक क्रोधायमान ॥ श्वशुराप्रति बोले वचन ॥ म्हणे ईस माझें सदन ॥ प्रवेशों नेदीं सर्वथा ॥२५॥
मी तों राम नव्हे निर्धारी ॥ रावणें नेली त्याची अंतुरीं ॥ षण्मास होती असुरघरीं ॥ तेणें माघारी आणिली ॥२६॥
आम्ही रजक शुद्ध साचार ॥ जगाचे डाग काढणार ॥ आमुचे जातींत निर्धार ॥ विपरीत ऐसें सोसेना ॥२७॥
हे अनुचित केले रघुनाथें ॥ मागुती नांदवितो सीतेतें ॥ तैसा लंपट मी नव्हे येथें ॥ वदन इचें न पाहेंचि ॥२८॥
ऐसा चांडाळ तो रजक ॥ बोलिला लावून कलंक ॥ ऐसें ऐकतां रघुनाथ ॥ परम संतप्त जाहला ॥२९॥
पाचारूनिया लक्ष्मण ॥ त्यास सांगे सकळ वर्तमान ॥ म्हणे रजक निंदिलें मजलागून ॥ जानकी त्यागीन सौमित्रा ॥३०॥
दशमुख मारूनि सहकुळीं ॥ सुवेळीं आणिली जनकबाळी ॥ विधि पुरंदर चंद्रमौळी ॥ देवमंडळी सर्व होती ॥३१॥
सकळां देखत ते वेळें ॥ जानकीनें दिव्य दाविलें ॥ अजूनि रजक लांछन बोले ॥ तें मज सोसवे निर्धारे ॥३२॥
तनु त्यागी जैसे प्राण ॥ कोप टाकी रेणुकारमण ॥ कीं संसारसंकल्प तपोधन ॥ त्यागी जैसा साक्षेपें ॥३३॥
संसारभय तत्वतां ॥ योगी टाकी जैसी ममता ॥ तैसीच त्यागीन मी सीता ॥ सुमित्रासुता सत्य हें ॥३४॥
अहिंसक हिंसा सांडिती पूर्ण ॥ कीं मौनी त्यागी वाचाळपण ॥ सत्पुरुष मनांतून ॥ परनिंदा त्यागी जैसा ॥३५॥
श्रोत्रिय त्यागी दुष्टाचार ॥ तैसी सीता त्यागीन साचार ॥ यावरी सुमित्राकुमार ॥ काय बोलता जाहला ॥३६॥
पाखांडी म्लेंच्छ दुर्मती ॥ सदा निंदती वेदश्रुती ॥ परी पंडित काय त्यागिती ॥ जनकजापती सांगे हें ॥३७॥
मुक्तांस निंदिती वायस ॥ परी टाकिती काय राजहंस ॥ दर्दुर निंदती भ्रमरास ॥ परी तो पद्मिमीस टाकीना ॥३८॥
निंदक निंदिती संतांस ॥ परी विवेकीं पूजी रात्रंदिवस ॥ तस्कर निंदिती इंदूस ॥ परी चकोर विटेना ॥३९॥
याकारणें जनकजामाता ॥ सहसा न त्यागीं गुणसरिता ॥ त्या रजकाची सत्वतां ॥ जिव्हां आतां छेदीन ॥४०॥
श्रीराम म्हणे विशेष ॥ तरी लोक निंदितील रात्रंदिवस ॥ म्हणती दंडिले रजकास ॥ अंगीं दोष म्हणोनियां ॥४१॥
आतां सौमित्रा हेंचि जाण ॥ सीता टाकीं वनीं नेऊन ॥ नाहीं तरी आपुला प्राण ॥ मी त्यागीन आतांचि ॥४२॥
ऐसें बोलतां निर्वाण ॥ तत्काळ उठिला लक्ष्मण ॥ ब्राह्मी मुहूर्ती तेव्हां सदन ॥ जानकीचें प्रवेशला ॥४३॥
परम विव्हळ होऊन ॥ जगन्मातेचे वंदिले चरण ॥ म्हणे पहावया तापसारण्य ॥ आज्ञा दीधली रघूत्तमें ॥४४॥
ऐसें ऐकतांचि श्रवणी ॥ मनी हर्षली विदेहनंदिनी ॥ म्हणे जे डोहाळे पुरवीन चापपाणी ॥ मागे वचन बोलिले ॥४५॥
साच करावया तया वचन ॥ ॥ तुम्हांसी पाठविलें लक्ष्मणा ॥ तरी पंचरात्री क्रमोन जाणा ॥ सत्वर येऊं माघारें ॥४६॥
ऐसें सौमित्रें ऐकतां कर्णीं ॥ अश्रु सांडी नयनींहूनि ॥ मनीं म्हणे आता परतोनि ॥ कैंचे येणें माउलीये ॥४७॥
असो जानकी हर्षयुक्त ॥ वस्त्राभरणें वस्तु बहुत ॥ सौभाग्येद्रव्यें सवें घेत ॥ ऋषीअंगना पूजावया ॥४८॥
मंगळभगिनी सौभाग्यसरिता ॥ रथी बैसली क्षण न लागतां ॥ लक्ष्मणें रथ झांकून तत्वतां ॥ धुरेस आपण बैसला ॥४९॥
कोणास वार्ता न कळत ॥ जान्हवीतीरा आणिला रथ ॥ तेव्हां अपशकुन बहुत ॥ जगन्मातेस जाणवती ॥५०॥


आडवे महाउरग धांवती ॥ पतिवियोग पिंगळे वदती ॥ वायस वामभागें जाती ॥ शोक सांगती अत्यंत ॥५१॥
ऐसें अपशकून देखतां ॥ मनी दचके जनकदुहिता ॥ देवराप्रति पुसे तत्वतां ॥ चिन्हें विपरीत कां दिसती ॥५२॥
तंव तो भूधरावतार ॥ सहसा नेदी प्रत्युत्तर ॥ नयनीं वहातसे नीर ॥ कंठ सद्दित जाहला ॥५३॥
सीता म्हणे बंधुसहित ॥ सुखरूप असो जनकजामात ॥ त्याचें अशुभ दुःख समस्त ॥ ते मजवरी पडो कां ॥५४॥
मग म्हणे देवरा सुमती ॥ विलोकून वन आणी भागीरथी ॥ सत्वर जाऊं अयोध्याप्रती ॥ रघुपतीस पहावया ॥५५॥
परी तो न बोलेचि सर्वथा ॥ तटस्थ पाहे रघुवीरकांता ॥ पुढें नौकेमाजी जनकदुहिता ॥ रथासहित बैसविली ॥५६॥
सुरनदी उतरूनि ते वेळीं ॥ सत्वरपैल पार नेली ॥ मागुती रथ भूमंडळी ॥ पवनवेगें चालविला ॥५७॥
परम भयंकर कानन ॥ नाहीं मनुष्याचें दर्शन ॥ सिंह सर्प व्याघ्र पूर्ण ॥ वास्तव्य करिती त्या स्थळीं ॥५८॥
सीता म्हणे वो ऊर्मिलापती ॥ कां येथें ऋषिआश्रम न दिसती ॥ कोणीकडे राहिली भागीरथी ॥ नेतां निश्चिंतीं मज कोठें ॥५९॥
विप्रवेदघोष कानीं ॥ कां ऐकूं न येती अजूनी ॥ स्वाहास्वधावषट्कारध्वनीं ॥ यागसदनीं कां न उठतीं ॥६०॥
तों गहनवनीं नेऊनि रथ ॥ सौमित्र तृणशेज करित ॥ जानकीस उतरूनि त्वरित ॥ बैसविली तये ठायीं ॥६१॥
तों भूगर्भीचें दिव्य रत्न ॥ वनिताचक्रांत मुख्य मंडण ॥ की लावण्यभूमीचें निधान ॥ वनीं लक्ष्मण टाकित ॥६२॥
तें सौंदर्यनभींचे नक्षत्र ॥ कीं त्रिभुवनींचे कृपापात्र ॥ अंगींच्या तेजे अपार ॥ वन तेव्हां उजळले ॥६३॥
चंद्री वसे सदा कलंक ॥ त्याहूनि सुंदर जानकीचे मुख ॥ चपळेहूनि अधिक ॥ अलंकार शोभती ॥६४॥
असो तृणशेजेसी सीता बैसवून ॥ सौमित्र करी साष्टांग नमन ॥ खालतें करूनियां वदन ॥ स्फुंदत उभा ठाकला ॥६५॥
प्रदिक्षणा करून लक्ष्मण ॥ पुढती दृढ धरी चरण ॥ देवराचें शुभ वचन ॥ तटस्थ ऐके जानकी ॥६६॥
सौमित्र म्हणे जगन्माते ॥ तुज वनीं सोडिलें रघुनाथें ॥ त्याची आज्ञा अलोट मातें ॥ घेऊनि आलों म्हणोनी ॥६७॥
रजकें निंदा केली म्हणोनी ॥ तुज सोडविलें घोर वनी ॥ आतां रघुपतीचे चरण मनीं ॥ आठवीत राहें सुखेंचि ॥६८॥
कमळिणी सुकुमार बहुत ॥ तयेवरी वीज पडे अकस्मात ॥ मग पद्मिणीचा होय अंत ॥ तेवीं मूर्च्छित पडे सीता ॥६९॥
रुदन करी भूधरावतार ॥ रथारूढ झाला सत्वर ॥ तेथोनि परतला ऊर्मिलावर ॥ कठिण मन करूनियां ॥७०॥
वनदेवतां वृक्ष पाषाण ॥ वारण उरग पंचानन ॥ तयांसी विनवी लक्ष्मण ॥ जानकी जतन करा हे ॥७१॥
पृथ्वी आप तेज समीर ॥ अवघियांनो जनत करा सुकुमार ॥ असो पवनवेगें सौमित्र ॥ अयोध्यापुरा पातला ॥७२॥
इकडे सीता मूर्च्छना सांवरून ॥ उघडोन पाहे पद्मनयन ॥ तों दूरी गेला लक्ष्मण ॥ उभी ठाकून हांक फोडी ॥७३॥
बाह्या उभारून तत्वतां ॥ म्हणे परत वेगें सुमित्रासुता ॥ माझा अन्याय कांही नसतां ॥ कां हो जातां टाकूनि मज ॥७४॥
सत्वर माझा वध तरी करोनी ॥ सांगा रघुपतीस जाऊनी ॥ मी एकली दुस्तर वनीं ॥ कवण्या ठाया जाऊं आतां ॥७५॥
म्हणे धांव धांव रघुनाथा ॥ म्हणोनि हांक देत जगन्माता ॥ वनीं श्वापदें वृक्ष लता ॥ तयांस गहिंवर दाटला ॥७६॥
थरथरां कांपत मेदिनी ॥ पर्वत पक्षी रडती वनीं ॥ गज व्याघ्र मूर्च्छना येऊनी ॥ दुःखेकरून पडताती ॥७७॥
हंस मुक्तहार सांडोनी ॥ सीता देखतां रडती वनीं ॥ नृत्यकला विसरोनी ॥ शिखी शोक करिताती ॥७८॥
पक्षी स्वपदें ते वेळीं ॥ सीतेवरी करिती साउली ॥ जळें चंचू भरूनि सकळी ॥ जनकजेवरी शिंपिती ॥७९॥
वनगाई पुच्छेकरून ॥ सीतेवरी घालिती पवन ॥ वनदेवता करिती रुदन ॥ सीतादेवी देखोनियां ॥८०॥
वनचरकळप कांतारीं ॥ रुदन करित दीर्घस्वरीं ॥ वैरभाव ते अवसरीं ॥ विसरती मोहशोकें ॥८१॥
हे राम हे राम म्हणोन ॥ सीता विलापें अतिगहन ॥ गुल्मलता वापी कूप जाण ॥ सरिता शोकें कांपिन्नल्या ॥८२॥
हे रामा राजीवनेत्रा ॥ मज कां त्यागिलें पवित्रा ॥ तूं दीनदयाळा पवित्रा ॥ विसरलासी ये काळीं ॥८३॥
कांहो मोकलिले एकलीतें ॥ आतां सांभाळील कोण मातें ॥ कोठें थ्ज्ञारा न दिसेचि येथ ॥ तुजविण मज राघवा ॥८४॥
काय अन्याय जाहला मजपासूनी ॥ मज टाकिलें घोरवनीं ॥ कृपासागरा चापपाणी ॥ श्रुत मज त्वां न केले ॥८५॥
जन्मोनि नेणें दोषांते ॥ स्वप्नी नातळे दुर्बुद्धीते ॥ परी जन्मांतर न कळे मातें ॥ तें कां ठाकोनि आलें भोगावया ॥८६॥
तूं अनाथबंधु करुणाकर ॥ मी दासी हीन पामर ॥ माझा न कीजे अव्हेर ॥ सकळ गण -गोत तूं माझे ॥८७॥
अगा हे श्रीदशरथी ॥ माझी करुणा नुपजे चित्तीं ॥ कैसा स्नेह सांडोनि रघुपती ॥ निष्ठुर जाहलासी मजवरी ॥८८॥
मी अज्ञान बाळ भोळें ॥ सहज पुसिलें कृपा कल्होळें ॥ त्याचें फळ कीं त्यागिले ॥ महावनी एकटें ॥८९॥
आतां जाऊं कोणीकडे ॥ कवण जिवलग येथें सांपडे ॥ जें माझें जन्मसांकडे ॥ निवारील दर्शनी ॥९०॥
रामा तूंचि बापमाय ॥ बंधु सुहृद गोत होय ॥ मम अपराध विसरून जाय ॥ अभय देईं मज आतां ॥९१॥
करुणासागरा रघुवीरा ॥ मातें उद्धरी दयासमुद्रा ॥ तुझें ध्यान असंख्यमुद्रा ॥ चित्तीं वसो माझिया ॥९२॥
तंव अयोध्यापुराा लक्ष्मण ॥ पावला तेव्हां म्लानवदन ॥ तो गुणसिंधु रघुनंदन ॥ एकांतसदनीं बैसला असे ॥९३॥
तेथें ऊर्मिलावरें जाऊनी ॥ भाळ ठेविलें रामचरणीं ॥ करुणार्णवे सीता आठवूनी ॥ अश्रु नयनीं आणिले ॥९४॥
सौमित्र म्हणे रघुराया ॥ चित्रींच्या वृक्षाची छाया ॥ स्वप्नवत् संसारमाया ॥ लटकी जैसी मुळींहूनी ॥९५॥
नावरे अत्यंत शोकसागर ॥ परी कलशोद्भव जाहला रघुवीर ॥ आचमन करूनि समग्र ॥ उगाचि मौने बैसला ॥९६॥
असो इकडे जनकनंदिनी ॥ निघाली चालत दुःखें वनीं ॥ मूर्च्छना येऊनि क्षणक्षणीं ॥ जमिनीवरी पडतसे ॥९७॥
मागुती उठे हस्त टेंकूनी ॥ रुदन करी धाय मोकलूनी ॥ म्हणे कोण्या ठायां जाऊनी ॥ राहूं आता राघवेंद्रा ॥९८॥
मी अनाथ अत्यंत दीन ॥ जरी देऊं येथे प्राण ॥ तरी आत्महत्त्या पाप गहन ॥ दुजी गर्भहत्त्या घडेल ॥९९॥
कळपांतून धेनू चुकली ॥ कीं हरिणी एकटी वनी पडली ॥ जीवनेंविण मासोळी ॥ तळमळीत जैसी कां ॥१००॥


कीं नैषधरायाची राणी ॥ पूर्वीं पडिली घोरवनीं ॥ कीं भिल्लीवेषें भवानी ॥ एकटी काननी जेवीं हिंडे ॥१॥
एक मार्ग न दिसे तेथ ॥ सव्य अपसव्य वनीं हिंडत ॥ दीर्घस्वरें रुदन करित ॥ तों नवल एक वर्तले ॥२॥
तेथें कंदमुळें न्यावयासी ॥ वना आले वाल्मीक ऋषी ॥ तो त्रिकाळज्ञानी तेजोराशी ॥ ज्याचे ज्ञानासी सीमा नाहीं ॥३॥
अवतारादि जन्मपत्र ॥ जेणें रामकथा केली विचित्र ॥ तेणें जगन्मातेचा शोकस्वर ॥ कर्णीं ऐकिला हिंडता ॥४॥
सीता देखिली दुरोनी ॥ जवळी येत वाल्मिक मुनी ॥ म्हणे आमची तपःश्रेणी ॥ प्रकट जाहली येणें रूपें ॥५॥
म्हणे कोण हे शुभकल्याणी ॥ कीं मूळ प्रकृती प्रणवरूपिणी ॥ कीं अनादिपीठनिवासिनी ॥ दर्शन द्यावया प्रकटली हे ॥६॥
मग म्हणे जवळी येऊन ॥ सांग माते आहेस तू कोण ॥ कां सेविलें घोरवन ॥ कोणें दुःख दिधले ॥७॥
मग बोले जगन्माता ॥ मी मिथिलेश्वराची दुहिता ॥ रावणांतकाची असें कांता ॥ सौमित्रें आणोनि सोडिलें वनी ॥८॥
अन्याय नसतां किंचित ॥ टाकिलें घोर अरण्यांत ॥ परदेशी आहे मी अनाथ ॥ तरी माझा तात केवळ तूं ॥९॥
मग ऋषी म्हणे वो जननी ॥ माझें नाम वाल्मिक मुनी ॥ अयोध्यानाथ कोदंडपाणी ॥ मज बरवें जाणतसे ॥११०॥
त्याचें भाष्य मी करी निरंतर ॥ मज जाणतसे मिथिलेश्वर ॥ तुझा पिता आमुचा मित्र ॥ कन्या साचार तूं माझी ॥११॥
तुज होतील दोन पुत्र पित्याहून पराक्रमी थोर ॥ तुज घातलें जेणें बाहेर ॥ त्याचा सूड घेतील ते ॥१२॥
मग जानकीस हातीं धरून ॥ गेला आश्रमा घेऊन ॥ भोंवते मिळाले ऋषिजन ॥ काय वचन बोलिले ॥१३॥
म्हणती हे कोण आहे ताता ॥ येरु म्हणती जानकी जगन्माता ॥ ऋषि म्हणती अनर्थ तत्वतां ॥ घरासी आणिला साक्षेपें ॥१४॥
आम्ही अत्यंत भोळे ब्राह्मण ॥ टाकोनि ग्राम कुटिल जन ॥ वसविलें घोर कानन ॥ येथेंही विघ्न आणिलें ॥१५॥
इचें सुंदरपण अत्यंत ॥ इजवरी अपवाद बहुत ॥ इचे पायीं आम्हांसी घात ॥ होऊं शके एखादा ॥१६॥
एक म्हणती सीता सती ॥ जरी हे असेल निश्चिती ॥ तरी येथें वळोनि भागीरथी ॥ अकस्मात आणील ॥१७॥
हे जरी नव्हे इचेनी ॥ तरी दवडावी येच क्षणीं ॥ ऐसें ऐकतां जनकनंदिनी ॥ भागीरथीस पाचारीत ॥१८॥
म्हणे सगरकुलतारक माये ॥ हरिचरणोद्भव जन्हुतनये ॥ ब्रह्मकटाह फोडून स्वयें ॥ प्रकट होसी अद्भुत ॥१९॥
कमलोद्भव कमलावर ॥ शिव इंद्रादि सकळ निर्जर ॥ सप्तऋषि मुख्य सनत्कुमार ॥ निरंतर तुज स्तविती ॥१२०॥
तुझें अणुमात्र स्पर्शतां नीर ॥ भस्म होती पापें अपार ॥ शुभ्र समुनांचा दिव्य हार ॥ हा मुकुटीं शुभ्र तेवीं दिसे ॥२१॥
हिमनग भेदोनि साचार ॥ एकसरें भरला सागर ॥ तरी मजकारणें वेगवक्र ॥ जननी धांव या पंथे ॥२२॥
ऋषी सकळ झाले भयभीत ॥ ऐसा ओघ लोटला अद्भुत ॥ आश्रम सांडोनि ऋषी पळत ॥ चित्त उद्विग्न सर्वांचे ॥२३॥
एक सीतेस करी नमन ॥ माते आश्रम जाती बुडोन ॥ आम्हांसी रक्षावया तुजविण ॥ कोणी दुजें दिसेना ॥२४॥
मग सीतेनें प्रार्थूनी ते वेळां ॥ ओघ निश्चळ चालविला ॥ सत्य सती जनकबाळा ॥ ऋषी गर्जती सर्वही ॥२५॥
सकळ ऋषी मिळोन ॥ करिती जानकीचें स्तवन ॥ म्हणती माते तुज छळून ॥ जवळी आणिली भागीरथी ॥२६॥
असो वाल्मीकें आपुले आश्रमांत ॥ जानकीतें ठेविलें तेव्हां गुप्त ॥ सकळ ऋषींचे एक मत ॥ अणुमात्र मात फुटेना ॥२७॥
नव मास भरतां पूर्ण ॥ शुभ नक्षत्र शुभ दिन ॥ माध्यान्हीं आला चंडकिरण ॥ तों प्रसूत जाहली जानकी ॥२८॥
वृद्ध ऋषिपत्न्या धांवोनि ॥ जवळी आल्या ते क्षणीं ॥ तो दोघे पुत्र देखिले नयनीं ॥ शशी तरणीं ज्यांपरी ॥२९॥
प्रथम उपजे तो धाकुटा केवळ ॥ मागुती उपजे तो वडील ॥ असो दोघे जन्मले बाळ ॥ सांवळे जावळे ते क्षणीं ॥१३०॥
वाल्मीक गेले होते स्नानासी ॥ शिष्य धांवत गेले तयांपासीं ॥ दोघे पुत्र जानकीसी ॥ जाहले म्हणून सांगती ॥३१॥
ऐसें ऐकतांच वचन ॥ येरें कुशलहू हातीं घेऊन ॥ जानकीजवळी येऊन ॥ केलें विधान शास्त्ररीतीं ॥३२॥
कुशेंकरून अभिषेकिला बाळ ॥ त्याचें नाव ठेविला कुश निर्मळ ॥ आकर्णनेत्र घननीळ ॥ प्रतिमा केवळ रामाची ॥३३॥
लवावरी निजवूनी ॥ धाकुटा अभिषेकिला तये क्षणीं ॥ त्यासी नाम लहू ठेउनी ॥ सोहळा केला वाल्मीकें ॥३४॥
शुक्ल पक्षीं वाढे चंद्र ॥ की पळोपळीं वाढे दिनकर ॥ तेवीं दोघे राघवेय सुंदर ॥ वाढूं लागले तैसेचि ॥३५॥
दोघांचे लालन पालन ॥ वाल्मीक करी अनुदिन ॥ ऋषिबाळकांत दोघेजण ॥ क्रीडा करिती निरंतर ॥३६॥
सप्त संवत्सर होतां पूर्ण ॥ वाल्मीकें सुरभी आणोन ॥ आरंभिले मौंजीबंधन ॥ मेळवूनि ऋषी बहुत ॥३७॥
चारी दिवसपर्यंत ॥ जो जो पाहिजे पदार्थ ॥ तो सर्वही कामधेनु पुरवित ॥ जाहले तृप्त अवघे ऋषी ॥३८॥
बाळ सुंदर देखोन ॥ बहु ऋषी देती वरदान ॥ वाल्मीकें वेदाध्ययन ॥ दोघांकडून करविलें ॥३९॥
षट्शास्त्री प्रवीण जाहले ॥ सकळ पुराणें करतलामलें ॥ मग रामचरित्र पढविले ॥ शतकोटी ग्रंथ केला जो ॥१४०॥
बाळांचे ज्ञान अत्यद्भत ॥ अधिकाधिक तर्क फुटत ॥ मग मंत्रशास्त्र समस्त ॥ वाल्मीकमुनि सांगे तयां ॥४१॥
मग धनुर्वेद पढवून ॥ हातीं देत धनुष्य बाण ॥ युद्धगति सांगे पूर्ण ॥ दोघेजण धरिती मनीं ॥४२॥
असो चर्तुदश विद्या चौसष्टी कळा ॥ वाल्मीक शिकवी दोघा बाळां ॥ ऋषिपुत्रांचा सवें मेळा ॥ घेऊनि दोघे हिंडती ॥४३॥
नानागोष्टी कौतुकें बोलून ॥ रंजविती जानकीचे मन ॥ कंद मुळें आणून ॥ जगन्मातेपुढें ठेविती ॥४४॥
सत्संग घडता देख ॥ प्राणी विसरे संसारदुःख ॥ तैसें जानकी विसरे सकळिक ॥ खेद मागील त्याचेनी ॥४५॥
दश वर्षें होतां पूर्ण ॥ मृगयेस जाती दोघेजण ॥ नाना श्वापदें मारून ॥ आणिती ओढून दावावया ॥४६॥
एकें दिवशी वनीं हिंडत ॥ तों पर्वतमस्तकीं ध्यानस्थ ॥ एक श़ृंगी तप करित ॥ वाल्मीकाचा बंधु तो ॥४७॥
तो मृगवेष देखोनि पूर्ण ॥ कुशें विंधिला टाकूनि बाण ॥ तत्काळ गेला त्याचा प्राण ॥ प्रेत ओढून दोघे नेती ॥४८॥
वाल्मीक पुसे जवळी येऊन ॥ काय तें आणितां ओढून ॥ येरू म्हणती मृग वधून ॥ आणिला तुम्हांकारणें ॥४९॥
त्याचें आता चर्म काढून ॥ करूं तुम्हांकारणें आसन ॥ वाल्मीक पाहे विलोकून ॥ तंव तो बंधु वधियेला ॥१५०॥

वाल्मीक म्हणे हे दोघेजण ॥ अनिवार जाहले पूर्ण ॥ बह्महत्त्या करून ॥ कैसे आलां वनांतरी ॥५१॥
बंधूचें उत्तरकार्य सकळिक ॥ विधियुक्त करोनि वाल्मीक ॥ जानकीजवळ तात्काळिक ॥ वर्तमान सांगितलें ॥५२॥
तंव बोले जानकी हांसोन ॥ ताता सूर्यवंश अतितीक्ष्ण ॥ त्यावरी सकळकळाप्रवीण ॥ तुम्हींच केलीं बाळके ॥५३॥
परम धीट अनिवार ॥ तुमचा तुम्हां फळला मंत्र ॥ आतां याच्या दोषास परिहार ॥ करावा जी समर्था ॥५४॥
तों वाल्मीक बोलें वचन ॥ सुवर्णकमळें सहस्र आणून ॥ भावें अर्चावा उमारमण ॥ तरीच जाईल ब्रह्महत्त्या ॥५५॥
तंव ते दोघे तये वेळे ॥ ताता कोठें तीं सुवर्णकमळें ॥ तीं सांगिजे येचि वेळे ॥ घेऊन येतों दोघेही ॥५६॥
मग बोले मुनीश्वर ॥ अयोध्येसमीप ब्रह्मसरोवर ॥ तेथें कमळें अपार ॥ परी रक्षिती वीर रामाचे ॥५७॥
ती ब्रह्मकमळें नेऊन ॥ राघव करितो शिवार्चन ॥ महाबळी रक्षिती पूर्ण ॥ रात्रंदिवस सभोंवते ॥५८॥
गदागदां हांसती दोघेजण ॥ कमळें आणूं न लागता क्षण ॥ तरीच तुमचे शिष्य जाण ॥ निश्चयेसीं मुनिराया ॥५९॥
तेथें कृतांत असेल रक्षण ॥ त्यासीही शिक्षा लावूं पूर्ण ॥ जरी स्वयें आला रघुनंदन ॥ त्यासही धरून आणूं येथें ॥१६०॥
धनुष्यासी लावूनि बाण ॥ चपळ चालिले दोघेजण ॥ जैसें सिंह दिसती लहान ॥ परी प्रताप अतिविशेष ॥६१॥
कीं शशी सूर्य लघु दिसती ॥ परी प्रकाशें उजळे क्षिती ॥ लहान दिसे विप्र अगस्ति ॥ परी सरितापति प्राशिला ॥६२॥
तैसे ते धाकुटे वीर ॥ वेगें पावले ब्रह्मसरोवर ॥ कुश प्रवेशोनि समग्र ॥ कमळें तेव्हां तोडीतसे ॥६३॥
तंव ते वीर खवळले ॥ लहूनें तेव्हां शर सोडिले ॥ रक्षक बहुत प्रेत केले ॥ उरले पळाले अयोध्येसी ॥६४॥
रामासी सांगती वर्तमान ॥ ऋषिबाळ आले दोघेजण ॥ ते सबळ युद्ध करूनि जाण ॥ कमळें घेऊन गेलें पैं ॥६५॥
आश्चर्य करी रघुपती ॥ पाहा केवढी बाळांची शक्ती ॥ असो इकडे दोघे निघती ॥ कमळें घेऊनि त्वरेनें ॥६६॥
वाल्मीकापुढें कमळें ठेविती ॥ ऋषि आश्चर्य करी चित्तीं ॥ तटस्थ पाहे सीता सती ॥ अद्भुत कर्तव्य बाळकांचे ॥६७॥
मग नूतन शिवलिंग निर्मून ॥ सहस्रकमळीं केले पूजन ॥ ब्रह्महत्त्येचे पाप पूर्ण ॥ निरसोन गेले तेधवां ॥६८॥
एके दिवशी दोघे जण ॥ चुरीत जो जानकीचे चरण ॥ तंव तो कुश काय वचन ॥ बोलता जाहला ते काळीं ॥६९॥
आम्ही जन्मलों कोणें देशीं ॥ कोण ग्राम कोणे वंशीं ॥ आमुचा पिता निश्चयेसीं ॥ सांगे कोण तो आमुतें ॥१७०॥
सीता म्हणे अयोध्यानगर ॥ सूर्यवंशी अजराजपुत्र ॥ दशरथनामें नृपवर ॥ प्रचंड प्रताप तयाचा ॥७१॥
त्यासी राम लक्ष्मण भरत ॥ चौथा शत्रुघ्न विख्यात ॥ त्यांत रावणांतक प्रतापवंत ॥ तो तुमचा पिता जाणिजे ॥७२॥
रजकें निंदिलें म्हणोनी ॥ बा रे मज सोडिलें घोरवनीं ॥ तेव्हां जगन्मातेचें नयनीं ॥ अश्रु आले बोलतां ॥७३॥
वर्तमान ऐकोनि समस्त ॥ दोघेही परम तप्त ॥ मग सीतेचे समाधान बहुत ॥ करिते जाहले ते काळीं ॥७४॥
तों द्वादशवर्षेपर्यंत ॥ अवर्षण पडिलें अयोध्येंत ॥ सीता सती क्षोभली अद्भुत ॥ श्री समस्त गेली पैं ॥७५॥
जैसें उद्वस कां दग्ध कांतार ॥ तैसें कलाहीन अयोध्यानगर ॥ घन न वर्षेच अणुमात्र ॥ गाई विप्र गांजले ॥७६॥
वसिष्ठास पुसे रघुनंदन ॥ कां हो पडिले अवर्षण ॥ येरू म्हणे अपराधाविण ॥ सीता बाहेर घातली ॥७७॥
जानकीऐसें चिद्ररत्न ॥ सकळ प्रतिव्रतांचें मंडण ॥ लक्ष्मी गेली निघोन ॥ तरीच अवर्षण पडियेलें ॥७८॥
तरी अश्वमेघ महायज्ञ ॥ राघवा करावा संपूर्ण ॥ घोडा पाहून श्यामकर्ण ॥ पृथ्वीवरी सोडावा ॥७९॥
मग शरयूतीरीं एक योजन ॥ मंडप घातला विस्तीर्ण ॥ दूत पाठवून संपूर्ण ॥ मुनीश्वर मेळविले ॥१८०॥
बिभीषणा आणि सुग्रीवास ॥ बोलावूं पाठवी राघवेश ॥ ते दळासहित अयोध्येस ॥ येते जाहले ते काळीं ॥८१॥
नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ शरभ गवाक्ष बळ अद्भुत ॥ वानर पातले समस्त ॥ अष्टादश पद्में पैं ॥८२॥
सर्व सामग्री केली पूर्ण ॥ मग वसिष्ठ रघुनंदन ॥ अश्वशाळेंतूनि श्यामकर्ण ॥ निवडिती पूर्ण सुलक्षणी ॥८३॥
सुवर्णपत्रिका ते वेळी ॥ बांधिली श्यामकर्णाचे भाळीं ॥ वसिष्ठें त्यावरी लिहिल्या ओळी ॥ ऐका सकळ श्रोते हो ॥८४॥
अयोध्याप्रभु दशरथनंदन ॥ रावणांतक सुरबंधमोचन ॥ सकळनृपश्रेष्ठ रविकुळामंडन ॥ श्यामकर्ण सोडिला तेणें ॥८५॥
जो कोणी असेल बळवंत ॥ तेणें हा घोडा धरावा यथार्थ ॥ षोडशपद्में दळांसहित ॥ शत्रुघ्न राखित पाठीसीं ॥८६॥
घोडा पूजोनि राजीवनेत्र ॥ मस्तकीं बांधिलें दिव्य पत्र ॥ शत्रुघ्न करून नमस्कार ॥ दळभारेंसीं निघाला ॥८७॥
शत्रुघ्नासी म्हणे रघुनंदन ॥ सोळावे दिवशीं यावें परतोन ॥ सकळ पृथ्वी जिंकून ॥ नृप सांगातीं आणिजे ॥८८॥
मग सुवर्णप्रतिमा सुंदर ॥ जानकीची निर्मिली परिकर ॥ मग ते प्रतिमेसहित रघुवीर ॥ यज्ञदीक्षा घेत पैं ॥८९॥
जैसा किरणचक्रांत दिवाकर ॥ कीं निर्जरांत अमरेश्वर ॥ तैसा यज्ञमंडपीं रघुवीर ॥ ऋषींसहित शोभला ॥१९०॥
सुग्रीव बिभीषण मारुती ॥ यज्ञमंडपाभोंवते रक्षिती ॥ सुमंत भरत ऊर्मिलापती ॥ सदा तिष्ठत राघवापाशीं ॥९१॥
जे जे साम्रगी लागेल पूर्ण ॥ ते ते तत्काळ देती आणून ॥ तो सोहळा देवगण ॥ विमानी बैसोन पाहाती ॥९२॥
इकडे छप्पन्न देश जिंकित पूर्ण ॥ जात महावीर शत्रुघ्न ॥ सकळ राजे येती शरण ॥ करभार देऊनि सांगातें ॥९३॥
तेच काळीं पाताळी वरुण ॥ आरंभिता जाहला महायज्ञ ॥ तेणें वाल्मीक बोलावून ॥ नेला होता आधींच ॥९४॥
पाताळास गेला जेव्हां ऋृषी ॥ तेणें आज्ञा केली लहूसी ॥ बा रे माझिया उपवनासी ॥ रक्षावें तुवां निरंतर ॥९५॥
ऐसें बोलूनि पाताळा ॥ वाल्मीक गेले तये वेळां ॥ कुशही दूर वना प्रवेशला ॥ कंद मुळें आणावया ॥९६॥
लहू उपवन रक्षित ॥ सवें बटु बाळें बहुत ॥ नानाक्रीडा विनोद करित ॥ वृक्षछायेस बैसली ॥९७॥
अष्टवर्षीं दशवर्षीं कुमर ॥ कटी मौंजी कौपीन सुंदर ॥ मस्तकीं शिखा परिकर ॥ खेळतां उडती तयांच्या ॥९८॥
तो श्यामकर्ण धांवत । आता त्याचा पंथें अकस्मात ॥ ऋषिपुत्रास लहू दावित ॥ पाहा रे येथें घोडा कैसा हा ॥९९॥
मग सीतेसुतें धांवून ॥शेंडीसी धरिला श्यामकर्ण ॥ कपाळींचें पत्र तोडून ॥ वाचिता जाहला तात्काळीं ॥२००॥
पत्रार्थ पाहूनि समस्त ॥ लहू गदगदां हांसत ॥ बळिया काय रघुनाथ ॥ त्रिभुवनीं थोर जाहला ॥१॥
काय त्यासीच व्याली जननी ॥ काय निर्वीर जाहली अवनी ॥ तरी कैसा घोडा सोडोनी ॥ नेईल आतां पाहूं पां ॥२॥
माझी प्रतिज्ञा हेच आतां ॥ धरिला घोडा न सोडीं मागुता ॥ नातरी सीतेउदरीं तत्वतां ॥ जंत होऊनि जन्मलों ॥३॥
अश्वोत्तमाचे नेत्र पुसोन ॥ कौतुकेंकरून थापटी मान ॥ उत्तरीय चीर गळां घालून ॥ बांधोन ठेविला केळीसी ॥४॥
ऋषिपुत्रांस तेव्हा म्हणत ॥ पाहा रे घोडा कैसा नाचत ॥ तों ऋषिबाळें समस्त ॥ पोट बडविती भयेंकरूनी ॥५॥
कोण्या राजाचा घोडा आला ॥ तो तुवां बळेंचि धरिला ॥ तरी आम्ही सांगूं तयाला ॥ लहूनें बांधिला म्हणोनी ॥६॥
लहू तयांप्रति बोलत ॥ आमुचीच निश्चयें हे वस्त ॥ आपुली आपण घेतां यत्य ॥ शंका येथें कायसी ॥७॥
काळासी शिक्षा करूनियां ॥ लया पाववीन सर्व क्षत्रियां ॥ तों वीर आले धांवूनियां ॥ अश्वरक्षक पुढील जे ॥८॥
विप्रकुमर देखोन ॥ वीर पुसती दटावून ॥ कोणी रे हा श्यामकर्ण ॥ कर्दळीसीं बांधिला ॥९॥
लेकुरें बोलती भिऊन ॥ पैल किशोर आरक्तनयन ॥ आम्ही वारितांही ठेवीत बांधून ॥ त्याचेच कान कापा हो ॥२१०॥
रामविजय ग्रंथ पावन ॥ त्यामाजी लहूकुशआख्यान ॥ कथा गोड अमृताहून ॥ भक्तचतुरीं परिसावी ॥११॥
ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ जानकीहृदयकमलभ्रमर ॥ अगाध तयाचें चरित्र ॥ सविस्तर संख्या शतकोटी ॥१२॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ सप्तत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२१३॥
॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥  

Friday, December 16, 2011

RamVijay Adhyay - 36


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जो सद्गुरु आद्य निर्विकार ॥जो ब्रह्मादिकांचे माहेर ॥ जो आदिमायेचा निजवर ॥ तो हा रघुवीर रविकुळीं ॥१॥
अनंत ब्रह्मांडांचा कर्ता ॥ जो प्रळयकाळाचा शासनकर्ता ॥ तो भरताग्रज तत्वतां ॥ नंदिग्रामीं राहिला ॥२॥
अयोध्येचे जन सकळ ॥ षोडशपद्में राजदळ ॥ सैन्य उतरलें तुंबळ ॥ नंदिग्राम वेष्टूनियां ॥३॥
अष्टादश पद्में वानरदळ ॥ बहात्तर कोटी रीस सबळ ॥ छप्पन्नकोटी गोलांगूळ ॥ उतरलें यथावकाशें ॥४॥
यावरी विश्रव्याचा सुत ॥ बिभीषण जो कां पुण्यपंडित ॥ त्याची असुरसेना अद्भुत ॥ श्रीरघुनाथभक्त उतरले ॥५॥
अष्टादश अक्षौहिणी वाजंत्रें ॥ बिभीषणाचीं गर्जती गजरें ॥ त्याहूनि अयोध्येची परिकरें ॥ अहोरात्र वाजती ॥६॥
शत्रुघ्न आणि सुमंत ॥ हेमांबरें शिबिरे बहुत ॥ उभीं करिते जाहले तेथ ॥ लक्षानुलक्ष ते काळीं ॥७॥
त्यांसी रत्नजडित स्तंभ ॥ वरी खचित कळस सुप्रभ ॥ त्यांच्या तेजेंकरूनि नभ ॥ उजळलें ते काळीं ॥८॥
सुग्रीव बिभीषणादि नृपवर ॥ आणिक कपिराज थोरथोर ॥ त्यांसीही शिबिरगृहे सविस्तर ॥ ठाव दीधला राहावया ॥९॥
कुळाचळांत मेरु थोर ॥ तैसे मुख्य श्रीरामाचे शिबिर ॥ मातागुरुबंधूंसह रघुवीर ॥ तेथें राहता पैं जाहला ॥१०॥
अंतरगृहीं सीता सती ॥ ऊर्मिला मांडवी श्रुतकीर्ती ॥ चवघी जावा तेथें राहती ॥ आनंद चित्ती न समाये ॥११॥
आला ऐकतां रघुवीर ॥ पातला जनकराज श्वशार ॥ संगें दळभार अपार ॥ वाद्यगजरें येतसे ॥१२॥
छप्पन्न देशींचे नृपती ॥ पावले तेव्हां शीघ्रगती ॥ सप्तद्वीपीं नवखंडी जे वसती ॥ धांवती करभार घेऊनियां ॥१३॥
धांवले सकळ ऋषीश्वर ॥ नानासाधनी व्रती थोरथोर ॥ योग याग टाकोनि समग्र ॥ येती रघुवीर पाहावया ॥१४॥
सप्त पुऱ्या गिरिकंदरीं ॥ नानातीर्थी गूढविवरीं ॥ वृक्षाग्रवासी वायुआहारी ॥ आसनें जयांची नानाविध ॥१५॥
शमदमादिक साधनें ॥ अष्टांगयोग देहदंडणें ॥ नाना हठयोग व्रताचरणें ॥ सांडूनि वेगीं धांवती ॥१६॥
तितुक्यांसही रघुनंदन ॥ उठोनि देत आलिंगन ॥ समस्तांसहित सीताजीवन ॥ वस्त्रमंडपी बैसला ॥१७॥
देहीं विदेही रघुवीर ॥ त्यासी भेटी आला विदेही श्वशुर ॥ तो जगन्मातेचा पिता मिथिलेश्वर ॥ पद्मजनकें आलिंगिला ॥१८॥
असो नर वानर नृपवर ॥ वसिष्ठादि सकळ ऋषीश्वर ॥ त्यांसी मंगलस्नान रघुवीर ॥ करविता जाहला ते काळीं ॥१९॥
लक्षानुलक्ष सुवर्ण कढया ॥ उष्णोदकें तापवूनियां ॥ सुगंध तैल लावूनियां ॥ मंगलस्नानें करवीतसे ॥२०॥
सर्वांसी वस्त्रें अलंकार ॥ नानारत्नभूषणें अपार ॥ देऊनियां जनकजावर ॥ रघुवीर सर्वां पाठवी ॥२१॥
बिभीषणादि सुग्रीव वानर ॥ मंगलस्नान करिती सत्वर ॥ अमौल्य वस्त्रें अलंकार ॥ स्वयें रघुवीरें दीधले ॥२२॥
वसिष्ठ नाहतांचि सत्वर ॥ अमौल्य वस्त्रें अलंकार ॥ स्वयें उठोनि रघुवीर ॥ देता जाहला आनंदे ॥२३॥
मणिमय पादुका आणून ॥ गुरुपुढें ठेवी रघुनंदन ॥ त्या वसिष्ठें पायीं घालोन ॥ मग बैसले स्वस्थानीं ॥२४॥
त्रयभगिनींसमवेव सीता ॥ अंतरगृहीं जगन्माता ॥ नाहोनियां समस्ता ॥ लेइल्या वस्त्रें भूषणें ॥२५॥
सकळ अयोध्यावासी जन ॥ नारीनर आदिकरून ॥ अवघ्यांसी गौरव समसमान ॥ जनजामातें दीधला ॥२६॥
मग बंधूंसहित रघुनंदन ॥ करिता जाहला मंगलस्नान ॥ तैल सुगंध लावून ॥ जटा उकलल्या मस्तकींच्या ॥२७॥
चवदा वर्षेंपर्यंत ॥ भरताकारणें धरिलें व्रत ॥ तें आजि विसर्जिले समस्त ॥ सीतावल्लभें तेधवां ॥२८॥
अभ्यंग जाहलिया समग्र ॥ सुमंतें वस्त्रें अलंकार ॥ आणोनियां सत्वर ॥ रघूत्तमासी समर्पिली ॥२९॥
जो लावण्यामृतसागर ॥ लेईला वस्त्र अलंकार ॥ भरतें पादुका सत्वर ॥ मस्तकींच्या पुढें ठेविल्या ॥३०॥
मग रघुनाथआज्ञेंकरून ॥ सौमित्र भरत शत्रुघ्न ॥ चौथा सुमंत प्रधान ॥ मंगलस्नान करिते जाहले ॥३१॥
संध्यादि नित्यकर्में सारिलीं ॥ तंव पाकनिष्पत्ति जाहली ॥ सकळ ऋषि नृप ते काळी ॥ भोजनासी बैसले ॥३२॥
बिभीषण सुग्रीव वायुनंदन ॥ नळ नीळ शरभ गंधमादन ॥ बंधूसहित रघुनंदन ॥ भोजनासी बैसले ॥३३॥
मणिमय कनकताटें शोभलीं ॥ रत्नखचित अडणियां तळीं ॥ उदकपात्रें भरूनियां ठेविलीं ॥ समसमान सर्वांसी ॥३४॥
रजताचळाऐसा के वळ ॥ तैसा भात वाढिला निर्मळ ॥ पंचभक्ष्यें परमात्रें सोज्जवळ ॥ शाखा साठी पत्रशाखा शोभती ॥३५॥
दधि मधु दुग्ध घृत ॥ शर्करा पंचामृत वाढित ॥ पंक्तीस जेथें रघुनाथ ॥ तेथें कांहीं न्यून नसे ॥३६॥
तीं अन्नें वर्णावीं समस्त तरी कां व्यर्थ वाढवावा ग्रंथ ॥ सकळ जीवांसहित रघुनाथ ॥ तृप्त जाहला भोजनीं ॥३७॥
हस्त प्रक्षाळून निर्मळ ॥ त्रयोदशगुणी तांबूल ॥ सर्वांसहित तमालनील ॥ घेता जाहला ते काळीं ॥३८॥
राम कोटिमन्मथतात ॥ तीन दिवस राहिला तेथ ॥ वसिष्ठें काढिला दिव्य मुहूर्त ॥ अयोध्याप्रवेश करावया ॥३९॥
पुष्यार्कयोग बहु सुभद्र ॥ रामचंद्रासी उत्तम चंद्र ॥ त्या सुमुहूर्ते गुणसमुद्र ॥ उठता जाहला तेधवां ॥४०॥
लागला वाद्यांचा गजर ॥ भेरी ठोकिल्या चौदा सहस्र ॥ बिभीषणाची वाद्यें समग्र ॥ वाजों लागलीं तेधवां ॥४१॥
बिभीषणसुग्रीवादि नृपती ॥ बैसले तेव्हां दिव्य रथी ॥ वाद्यगजरेंकरूनि क्षिती ॥ हालों लागली तेधवां ॥४२॥
दिव्यरथीं रघुनाथ ॥ बैसला तेव्हां सीतेसहित ॥ शत्रुघ्न आणि भरत ॥ चामरें वरी ढाळिती ॥४३॥
सहस्रांचे सहस्र वेत्रधार ॥ पुढें मार्ग करिती सत्वर ॥ नगरद्वाराजवळी रघुवीर ॥ पावता जाहला तें काळीं ॥४४॥
सप्त पुऱ्यांत अतिश्रेष्ठ ॥ अयोध्यापुरी हे वरिष्ठ ॥ सकळविद्यांमाजी सुभट ॥ अध्यात्मविद्या जैसी कां ॥४५॥
अयोध्येची रचनात ते क्षणी ॥ कपी असुर पाहती नयनीं ॥ देवराजपुरी उपमे उणी ॥ अयोध्येसी तुलितां पैं ॥४६॥
अयोध्येभोंवतें उपवन ॥ उपमेसी उणें नंदनवन ॥ वृक्ष सदा सुफळ संपूर्ण ॥ गेले गगन भेदित ॥४७॥
सूर्यकिरण न दिसे तळीं ॥ ऐसी सघनच्छाया पडिली ॥ कस्तूरीमृग सर्वकाळी ॥ क्रीडा करिती वनांत ॥४८॥
रावे साळया मयूर ॥ चातकें लावे तित्तिर ॥ नानापक्षी निरंतर ॥ रामनामें गर्जती ॥४९॥
स्फटिकनिबद्ध सरोवरें ॥ माजीं रातोत्पलें सुवासकरें ॥ राजहंस आनंदें थोरें ॥ क्रीडा करिती तये स्थानीं ॥५०॥

अयोध्येभोंवते दुर्ग पूर्ण ॥ उंच सतेज अतिगहन ॥ नागफणाकृति शोभायमान ॥ चर्चा त्यांवरी विकासती ॥५१॥
कीं ओळीनें जडले गभस्ती ॥ दुर्गावरी वृक्ष विराजती ॥ ते सदा फळीं निराळ भेदिती ॥ कपी पाहती समस्त ॥५२॥
जैसे कनकाद्रीचे सुत ॥ तैसें हुडे भोंवते विराजत ॥ महाद्वारें लखलखित॥ तेज अमित न गणवे ॥५३॥
ऐरावतारी देवपाळ ॥ बैसोन महाद्वारें जाईल ॥ तेवीं चोवीस योजनें विशाळ ॥ ओतप्रोत अयोध्या ॥५४॥
अयोध्येचा बाजार बहुत ॥ मृगमदाचा सुवास सुटत ॥ मठ मंडप चौबारा शोभत ॥ रत्नजडित अपूर्व ॥५५॥
हिरेयांच्या मदलसा झळकती ॥ वरी मुक्तांचे हंस नाचती ॥ पाचूचे रावे शब्द करिती ॥ घरोंघरी नवल हें ॥५६॥
वीणे टाळ मृदंग वाजवून ॥ लेपें करिती सुस्वर गायन ॥ रत्नपुतळ्या करिती नर्तन ॥ हस्तसंकेत दावूनियां ॥५७॥
शतखणी निर्मळ गोपुरें विशाळ ॥ खणोखणी पुतळ्या निर्मळ ॥ अणुमात्र लागतां अनिळ ॥ फिरफिरून नृत्य करिती ॥५८॥
अवतारलेपें रत्नजडित ॥ गोपुरांवरी सतेज झळकत ॥ उड्डगणांसी हिणावित ॥ लक्षावधि चहूंकडे ॥५९॥
राजगृहीं अत्यंत सुप्रभ ॥ झळकती हिरीयांचे स्तंभ ॥ निळियांची उथाळीं स्वयंभ ॥ जोतीं घडलीं पाचूंची ॥६०॥
सुवर्ण तुळवट लंबायमान ॥ वरी पाचूचे दांडे सघन ॥ माणिकांच्या किलच्या संपूर्ण ॥ तेजेंकरून लखलखती ॥६१॥
अष्टमहा सिद्धि घरोघरीं ॥ नवनिधि तिष्ठती द्वारीं ॥ समानबुद्धि नरनारी ॥ पुण्यराहाटीं वर्तती ॥६२॥
मृत्यु रोग दरिद्र दुःख ॥ दुर्बुद्धि अवर्षण पाप शोक ॥ तस्कर कापट्य पीडा निंदक ॥ अयोध्येमाजी नसेचि ॥६३॥
छत्रासी एक दंड प्रसिद्ध ॥ सुमनहारासी गुंफितां बंध ॥ सारी खेळतां मारी सुबुद्ध ॥ शूरत्व युद्धीं जाणिजे ॥६४॥
घरासी न ये ऋृषि भिक्षुक ॥ तरी लोकांस वाटे परम दुःख ॥ प्रजेसी साम्राज्य सुख देख ॥ देतील तेंच घेइजे ॥६५॥
त्रिकाळ गाई दुभती ॥ इच्छिलें तितुकें दुग्ध देती ॥ यथाकाळीं मेघ वर्षती ॥ समयोचित पाहूनियां ॥६६॥
धर्मशाळा मंडप विशाळ ॥ हिऱ्यांची लिंगें शोभती सोज्वळ ॥ आरक्त माणिकांच्या निर्मळ ॥ गणेशमूर्ति झगमगती ॥३७॥
घरोघरी वेदाध्ययन ॥ न्याय मीमांसा सांख्य संपूर्ण ॥ पतंजलि वेदांत व्याकरण ॥ हेच चर्चा होतसे ॥६८॥
टाळ मृदंग उपांगेसी तेथ ॥ कीर्तन करिती प्रेमळ भक्त ॥ राग उपराग भार्येंसहित ॥ सामगायन एक करिती ॥६९॥
लास्यकलाकुशल बहुत ॥ एक करिती तांडव नृत्य ॥ विद्युत्प्राय ध्वज तेथ ॥ देउळावरी झळकती ॥७०॥
चंदनाचे सडे घालूनी ॥ वाटा रंगविल्या कुंकुमेंकरूनी ॥ वृद्धदशा कोणालागूनी ॥ अयोध्येमाजी नसेचि ॥७१॥
नानातीर्थांचीं कारंजी बहुत ॥ घरोघरीं उफाळत ॥ नीळांचे मयूर धांवत ॥ बिदोबिदीं लवलाहें ॥७२॥
आळोआळीं पाहतां मंदिरें ॥ एकाहूनि एक सुंदरें ॥ गृहागृहा प्रति गोपुरें ॥ चित्रविचित्र शोभती ॥७३॥
असो ऐसी अयोध्या देखोन ॥ तटस्थ जाहले वानरगण ।ं तंव पूर्वद्वारें रघुनंदन ॥ अयोध्येच्या पातला ॥७४॥
महाद्वारीं गणेश सरस्वती ॥ त्यांची पूजा करून श्रीरघुपती ॥ आंत प्रवेशला त्वरितगती ॥ सकळ नृपांसहित पैं ॥७५॥
जैसा नद समुद्रीं मिळाला ॥ नंदनवनीं भ्रमर संचरला ॥ कीं चतुर्मुखाचे हृदयीं निघाला ॥ वेद जैसा षडंगेसी ॥७६॥
कीं वृत्रासुर मर्दून ॥ निजमंदिरीं प्रवेशे शचीरमण ॥ ॥ तेवीं सकळांसहित रघुनंदन ॥ अयोध्येंत प्रवेशला ॥७७॥
देव अंबरी पाहती ॥ असंख्य दाटले नृपती ॥ किरीटास किरीट आदळती ॥ रत्नें विखुरती चहूंकडे ॥७८॥
त्या अयोध्येच्या समस्त नारी ॥ ज्या देवांगनांहूनि सुंदरी ॥ रत्नदीप घेऊनियां करीं ॥ ओंवाळूं आल्या रामातें ॥७९॥
लक्षानुलक्ष नगरललना ॥ म्हणती राघवा चिन्मयलोचना ॥ जयलाभ तुझिया चरणा ॥ जवळी अखंड असोत ॥८०॥
म्हणोनि आपुल्या गोपुरावरूनी ॥ ओंवाळिती सकळ कामिनी ॥ राकाइंदूहूनि वदनीं ॥ प्रभा विशेष विराजे ॥८१॥
त्यांकडे पाहून रघुनाथ ॥ सुमंतास भू्रसंकेत दावित ॥ तो त्यासी समजला अर्थ ॥ जें कां हृद्रत रामाचें ॥८२॥
वस्त्रें अलंकार आणूनी ॥ तात्काळ गौरविल्या कामिनी ॥ तों नगरलोक धांवले ते क्षणीं ॥ मंडपघसणी जाहली ॥८३॥
तयांसी वेत्रधारी मारित ॥ ते दृष्टीं देखोन रघुनाथ ॥ तात्काळ परते केले दूत ॥ म्हणे जन सर्वत्र येऊं द्या ॥८४॥
आज्ञा होतांचि जाण ॥ जवळ आले सकळ जन ॥ पाहोनियां श्रीरामाचें वदन ॥ चरणीं मिठ्या घालिती ॥८५॥
लक्षोनियां श्रीरघुनाथा ॥ नारी टाकिती वरी अक्षता ॥ एक लिंबलोण तत्वतां ॥ मुखावरून उतरिती ॥८६॥
एक म्हणती तुजवरून ॥ राघवा जाऊं ओंवाळून ॥ एक म्हणती हें वदन ॥ पुनः दृष्टीं पडेना ॥८७॥
दिव्य सुमनांचे संभार ॥ वरोनी वर्षती सुरवर ॥ असो जगद्वंद्य रघुवीर ॥ निजमंदिरी प्रवेशला ॥८८॥
जाऊनि अंतर्गुहांत ॥ पुष्पांजली देवांस समर्पित ॥ राजयांच्या सेना समस्त ॥ अयोध्याप्रदेशीं उतरल्या ॥८९॥
अष्टदशपद्में वानर ॥ उतरले लंकेचे असुर ॥ तितुक्यांसी आदर उपचार । सुमंत शत्रुघ्न करिताती ॥९०॥
बिभीषण सुग्रीव राजे सकळी ॥ ते सदा असती रामाजवळी ॥ वसिष्ठें सामग्री सिद्ध केली ॥ राज्यपदाची तेधवां ॥९१॥
श्वेत चामर श्वेत छत्र ॥ श्वेत गज श्वेत तुरंग थोर ॥ चतुःसमुद्रीचें आणिलें नीर ॥ पंच पल्लव सप्त मृत्तिका ॥९२॥
सभामंडप देदीप्यमान ॥ तेथें मांडिले दिव्य सिंहासन ॥ मिळाले सकळ विद्वजन ॥ आणि नृपती सर्वही ॥९३॥
वसिष्ठ म्हणे राजीवनयना ॥ जलजगात्रा जानकीजीवना ॥ जगद्वंद्या अनंतसदना ॥ राज्य आतां अंगिकारीं ॥९४॥
भरत सप्रेमें बोले ॥ चतुर्दश वर्षें तप केले ॥ तें आजि शीघ्र काळें ॥ सुफळ जाहलें पाहिजे ॥९५॥
सिंहासनी बैसावें आपण ॥ मग अक्षय भांडारें फोडून ॥ द्रव्य याचकांसी देईन ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥९६॥
मग वसिष्ठें हातीं धरून ॥ मंडपा आणिला रघुनंदन ॥ सीतेसहित बैसवून ॥ अभिषेक केला वेदमंत्रीं ॥९७॥
घनश्याम पूर्ण रघुवीर ॥ तप्तकांचनवर्ण पीतांबर ॥ लेवविले दिव्य अलंकार ॥ मुकुट कुंडलें कौस्तुभादि ॥९८॥
जानकीसहवर्तमान ॥ सिंहासनीं बैसविला रघुनंदन ॥ सकळ भूपती येऊन ॥ अक्षता कपाळीं लाविती ॥९९॥
सुमुहूर्त वेळा साधून सत्वर ॥ वरी उभारिलें दिव्य छत्र ॥ तों सकळ वाद्यांचा गजर ॥ होता जाहला ते काळीं ॥१००॥

जाहला एकचि जयजयकार ॥ सुमनें वर्षती सुरवर ॥ सकळ राजयांनीं करभार ॥ राघवापुढें समर्पिला ॥१॥
सर्व नृप करूनि नमन ॥ उभे ठाकती कर जोडून ॥ भरतें भांडार फोडून ॥ याचकजन गौरविले ॥२॥
उदार धीर रघुवीर ॥ ज्याचा बंधु भरत वीर ॥ मोटा बांधूनि अपार ॥ द्रव्य न्याहो म्हणतसे ॥३॥
पुरे पुरे हेचि मात ॥ याचक बोलती समस्त ॥ हय गज रत्नें अद्भुत ॥ दिधले बहुत यांचकां ॥४॥
गोदानें भूदानें अपार ॥ जें वेदीं बोलिलें साचार ॥ तितकें देऊन द्विजवर ॥ सुखी केले ते काळीं ॥५॥
ऐसा षोडश दिनपर्यंत ॥ सोहळा होतसे अद्भुत ॥ कळापात्रें येऊन तेथ ॥ विद्या दावित रामापुढें ॥६॥
लक्ष्मण आणि भरत ॥ शत्रुघ्न आणि सुमंत ॥ सुवराज्य त्यांते देत ॥ श्रीरघुनाथ ते समयीं ॥७॥
वस्त्रें भूषणें देऊन ॥ चवघे मुख्य प्रधान ॥ तुमच्या अनुमतेंकरून ॥ राज्य चालवीन राम म्हणे ॥८॥
असो दिव्य अन्नें निर्मून ॥ सकळ रायांसी दिधलें भोजन ॥ वस्त्रालंकारी पूर्ण ॥ सेनेसहित गौरविले ॥९॥
मग श्रीरामाची आज्ञा घेती ॥ सेनेसहित सकळ नृपती ॥ स्वदेशाप्रति तेव्हां जाती ॥ गुण वर्णिती राघवाचे ॥११०॥
सुग्रीव आणि बिभीषणास ॥ रामें राहविलें एक मास ॥ नित्य भोजन पंक्तीस ॥ नानाविलास सोहळे पैं ॥११॥
सिंहासनीं बैसतां रघुनाथ ॥ बंधू भोंवतें आनंदभरित ॥ भक्तिरसें शत्रुघ्न भरत ॥ चामरें वरी वारिती ॥१२॥
तों गवाक्षद्वारें ते समयीं ॥ अवलोकिती जाहली कैकयी ॥ म्हणे त्रिभुवनीं शोधितां पाहीं । अभागी नाही भरताऐसा ॥१३॥
चवदा वर्षें भिकारी ॥ जाऊनि बैसला वनांतरीं ॥ शेवटीं बंधूचें दास्य करी ॥ चामरें वरी वारितो ॥१४॥
माझे पूर्व पाप फळासी आलें ॥ ऐसें भरताची माता बोले ॥ वसिष्ठास बोलावून ते वेळे ॥ कैकयी सांगे एकांतीं ॥१५॥
म्हणे माझिया पोटी भरत ॥ दरिद्री जन्मला अत्यंत ॥ बंधूचें दास्य करित ॥ मज हें दुःख वाटतें ॥१६॥
मग बोले ब्रह्मसुत ॥ अजूनि तरी राहे निवांत ॥ ग्रासिला राजा दशरथ ॥ वना रघुनाथ धाडिला ॥१७॥
सच्चिदानंदन ब्रह्म पूर्ण ॥ तो हा अवतरला रघुनंदन ॥ मूर्खे तुज हे नाही ज्ञान ॥ अद्यापि कां कळेना ॥१८॥
जे ब्रह्मादिदेवांची ध्येय मूर्ति ॥ हृदयीं ध्यात अपर्णाति ॥ हृदयकमळीं वाहती ॥ सनकादिक प्रीतीनें ॥१९॥
पुराणपुरुष रघुनंदन ॥ त्याचे भजनीं लावीं मन ॥ आपली युक्ति ठेवीं झांकून ॥ नसतीं वचनें बोलू नको ॥१२०॥
तुजप्रति सांगावे ज्ञान ॥ जैसे काननामाजी रुदन ॥ कीं बधिरापुढें गायन ॥ लसणी कर्पूर घांसिला ॥२१॥
पुष्पवाटिकेंत पलांडु उपजला ॥ परी तो गुण न सांडी आपुला ॥ नित्य दुग्धें वायस धुतला ॥ परी कृष्णवर्ण नवजाय ॥२२॥
शर्करेचें आळें केलें ॥ माजी निंबबीज पेरिलें ॥ परी शेवटी कडू येती फळें ॥ व्यर्थ गेले कष्ट सर्व ॥२३॥
खापरास परिस घांसतां ॥ परी सुवर्ण नव्हेचि तत्वतां ॥ कीं दुग्धामाजी हरळ घालितां ॥ मवाळ नव्हे कल्पांतीं ॥२४॥
तैसें तुजप्रति जें जें शिकविलें ॥ तें तें सर्वही व्यर्थ गेले ॥ आतां स्वस्थ राहूनि उगलें ॥ चित्त ठेवीं रघुनाथीं ॥२५॥
ऐसें शिकवून तियेसी ॥ बाहेर आला वसिष्ठ ऋषि ॥ यावरी बिभीषणसुग्रीवांसी ॥ निरोप देतसे श्रीराम ॥२६॥
वानरांसी श्रीराम म्हणे ॥ भोजन करून गमन करणें ॥ ते केले मान्य वचन ॥ अवश्य म्हणती तेधवां ॥२७॥
ते दिवशीं मोठा सोहळा ॥ मेळवूनि द्विजांचा मेळा ॥ वानरांसहित सकळां ॥ भोजनविधि आरंभिला ॥२८॥
प्रेमाचिया गंधाक्षता ॥ लावी सर्वां सरसिजोद्भवपिता ॥ सुमनमाळा तत्वतां ॥ अर्पीत समस्तां आदरें ॥२९॥
चैतन्य परिमळद्रव्यें बहुत ॥ सर्वांस चर्चिलीं शोभिवंत ॥ उत्तर धूप दीप यथार्थ ॥ करूनि भोजना बैसविले ॥१३०॥
श्रीरामगृहीचें दिव्यान्न ॥ त्या सुवासालागीं ॥ वेधोन ॥ वसंत करी प्रदक्षिणा ॥ इच्छाभोजत तेथीचें ॥३१॥
त्या अन्नाचा सुवास बहुत ॥ स्वर्गीं देवांस आवंतूं जात ॥ विबुध लाल घोंटिती समस्त ॥ श्रीरामपंक्तीस जेवावया ॥३२॥
बैसावया सुवर्णपाट ॥ मांडिले दिव्यरत्नांचे ताट ॥ जडित अडणियांचे प्रकट ॥ दिव्य तेज चहूंकडे ॥३३॥
सुगंध उदकें भरूनियां ॥ जवळी ठेविल्या जडित झारिया ॥ पात्रांप्रति शोभती समया ॥ लावूनियां रत्नदीप ॥३४॥
प्रथम विश्वास संपूर्ण ॥ तेंच आधी वाढिले लवण ॥ विरक्तीचीं मिरगुंडें जाण ॥ नानासाधनें त्याचि शाखा ॥३५॥
सत्कर्मांचिया कोशिंबिरी ॥ वाढिल्या नवविधभक्तीचिया क्षीरी ॥ निश्चय शर्करा त्यावरी ॥ ऐसियापरी शुभ्र दिसे ॥३६॥
निजबोधचा भात पूर्ण ॥ अक्षय शांतीचें वरी वरान्न ॥ तेथें अभेद वडे करून ॥ नानापरीचें वाढिले ॥३७॥
पूर्णप्राप्तीचे मांडी थोर ॥ भूतकृपेच्या धारिया सुकुमार ॥ तेलवारिया गोडपुऱ्या अपार ॥ मिष्ट ऐसीं वाढिली ॥३८॥
सत्त्वघृतांत तळून ॥ गुळवरिया अंतरीं गोड पूर्ण ॥ क्षमाफेणिया शोभायमान ॥ समसमान सर्वांसी ॥३९॥
विवेकपापड चांगले ॥ वैराग्यअग्नीवरी भाजिले ॥ विज्ञान तेंचि अमृतफळें ॥ वाढिली केळें सत्वाची ॥१४०॥
सर्वांगभूती समता चोखडी ॥ तेच घमघमीत वाढिली कढी ॥ सज्जन जाणती तिची गोडी ॥ वेदांतशास्त्रवेत्ते जे ॥४१॥
मुख्य गुरुकृपेचें घृत ॥ त्याविणें अन्न विरस समस्त ॥ प्रेमेंकरून सद्यस्तप्त ॥ शुद्ध करीत अन्नातें ॥४२॥
जेवणार बसले सद्भक्त ॥ स्वानंदजळें पात्रें प्रोक्षित ॥ देहबुद्धीच्या चित्राहुति तेथ ॥ पात्राबाहेरी घातल्या ॥४३॥
सोहंगायत्री जपोनी ॥ देहबुद्धिनांवें सोडिले पाणी ॥ निवृत्ति आपोशन घेऊनी ॥ रामस्मरणें गर्जिले ॥४४॥
पंचप्राणांच्या प्राणाहुती ॥ योगाभ्यासें आधीं करिती ॥ शिखेची कामग्रंथि ॥ सत्वर सोडिती निजहस्तें ॥४५॥
निरभिमान संपूर्ण ॥ तेणेंच केले करक्षालन ॥ नेत्रांसी लाविलें जीवन ॥ जगज्जीवन सर्व दिसे ॥४६॥
श्रीरामभक्त क्षुधाक्रांत ॥ स्वाद घेऊनि प्रीतीनें जेवीत ॥ पद्मासन घालोनि निश्चित ॥ ग्रासामागें ग्रासी घेती ॥४७॥
भवरोगें जे वेष्टित ॥ नाही भावक्षुधा पोटांत ॥ ते टकमकां उगेच पाहात ॥ ग्रास एक न घेववे ॥४८॥
चंद्रोदयीं द्रवे सोमकांत ॥ इतर पाषाण कोरडे समस्त ॥ तैसे श्रीरामपंक्तीस जेविले भक्त॥ अभाग्यां प्राप्त कैचें तें ॥४९॥
ऐसी जेविती आनंदें ॥ नामें गर्जती महाशब्दें ॥ भावें चर्चा करिती ऋषि वेदें ॥ ज्याचे स्मरणेंकरूनियां ॥१५०॥

जे दैवी संपत्तीनें सभाग्य होती ॥ तेच रामपंक्तीस जेविती ॥ तृप्तीचे ढेंकर देती ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥५१॥
जे त्रिभुवनपतीची राणी ॥ वाढी जानकी त्रिजगज्जननी ॥ तेथें न्यून पदार्थांची काहाणी ॥ कदाकाळीं पडेना ॥५२॥
स्वानुभव जळ सेवून ॥ कर्मधर्माचे उत्तरापोशन ॥ घेऊनि उठले ते जन ॥ आंचवले पूर्ण संसारा ॥५३॥
अमानित्व अदंभित्व ॥ हे विडे घेती समस्त ॥ निजधन नाममुद्रांकित ॥ दक्षिणा देती याचकां ॥५४॥
भक्तीचीं भूषणें वस्त्रें ॥ सद्भक्तांसी दिधली राजीवनेत्रें ॥ तो सोहळा वर्णावया वक्रें ॥ सहस्रवदना शक्ति नोहे ॥५५॥
ऐसे स्वपंक्तीस बैसवून ॥ दिधलें सकळांसी भोजन ॥ मग सभामंडपास येऊन ॥ रघुनंदन गौरवी तयां ॥५६॥
मुकुट कुंडलें सर्व अलंकार ॥ आपण स्वयें देत रघुवीर ॥ तैसेचि इतर वानर ॥ गौरविले रघुनाथें ॥५७॥
बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ त्यांच्या सेना ज्या ज्या समस्त ॥ तितुक्या गौरवी रघुनाथ ॥ वस्त्रें अलंकार देऊनियां ॥५८॥
दोन सिंहासनें दोन छत्रें ॥ बिभीषणसुग्रीवा दिधली राजीवनेत्रें ॥ दिधली कित्येक उत्तरवस्त्रें ॥ नानावस्तू अपार ॥५९॥
परी पुढें असे हनुमंत ॥ त्याकडे न पाहे रघुनाथ ॥ वानरगण पहाती समस्त ॥ विपरीतार्थ देखोनी ॥१६०॥
कां न पाहे रघुनंदन ॥ तरी हनुमंताऐसें निधान ॥ हें ब्रह्मांड ओंवाळून ॥ तयारून टाकावें ॥६१॥
ज्याच्या उपकारांच्या राशी अपार ॥ मेरूपरीस जाहल्या थोर ॥ त्यासी द्यावया अलंकार ॥ दृष्टीस कांही दिसेना ॥६२॥
मग उठोनिया रघुपति ॥ हृदयी दृढ धरी मारुति ॥ म्हणे तव हृदयीं निश्चितीं ॥ मीच सर्वदा राहेन ॥६३॥
तुजवेगळा एक क्षण ॥ जिवलगा मी नव्हे जाण ॥ हनुमंतें दृढ धरिले चरण ॥ म्हणे मज हेंचि देईं ॥६४॥
सीतेनें वस्त्रें अलंकार ॥ देऊनि गौरविले सकळ वानर ॥ परी आपुले गळ्याचा दिव्य हार ॥ हनुमंतासी दीधला ॥६५॥
त्या हारासी तत्वतां ॥ उपमा नाहीं सर्वथा ॥ त्रिभुवनींचे मोल देतां ॥ तेंही उणे तयासी ॥६६॥
पृथ्वीचे मोल संपूर्ण ॥ एक एक मणी जाण ॥ तो हार जानकीनें घेऊन ॥ मारुतीच्या गळां घातला ॥६७॥
हनुमंत तात्काळ उडाला ॥ वृक्षावरी समोर बैसला ॥ एक एक मणि फोडिला ॥ दाढेखालीं घालूनियां ॥६८॥
जो मणि पाहे फोडून ॥ म्हणे यांत नाहीं रघुनंदन ॥ म्हणोनि देतसे भिरकावून ॥ व्यर्थ पाषाण काय हे ॥६९॥
बोलती सुग्रीवादि वानर ॥ व्यर्थ कां फोडिसी दिव्य हार ॥ मारुती म्हणे रघुवीर ॥ याचे अंतरीं दिसेना ॥१७०॥
वानर म्हणती तुझे हृदयीं ॥ राम दावीं ह्या समयीं ॥ ऐसें बोलतां लवलाहीं ॥ काय केलें हनुमंतें ॥७१॥
हृदयकपाट उघडिलें ॥ उदर विदारून दाविलें ॥ ती आंत श्रीरामरूप सांवळे ॥ समस्ती देखिलें एकदांचि ॥७२॥
जैसा सिंहासनी रघुनाथ ॥ तैसा मारुतीचे हृदयी दिसत ॥ मग वानर उठोनि समस्त ॥ नमस्कारिती हनुमंता ॥७३॥
असो अयोध्येसी निरंतर ॥ राहिला अंजनीचा कुमर ॥ वरकड सिद्ध जाहले वानर ॥ निजग्रामासी जावया ॥७४॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ तिहीं सुग्रीव बिभीषण ॥ वस्त्राभरणीं गौरविलें पूर्ण ॥ सदना आपुलें नेऊनियां ॥७५॥
कौसल्या सुमित्रेप्रति ॥ सुग्रीव बिभीषण पुसती ॥ म्हणे माता हो आम्हांवरी प्रीति ॥ असो द्यावी बहुसाल ॥७३॥
कौसल्या सुमित्रा बोलत ॥ बारे तुमचे उपकार अमित ॥ विजयी करून रघुनाथ ॥ माझा मज भेटविला ॥७७॥
अमोल्य अलंकार देऊन ॥ गौरविले ते दोघेजण ॥ मग सुग्रीव आणि बिभीषण ॥ कैकयीसदना चालिले ॥७८॥
तों आडवा येऊन भरत ॥ तिकडे न जावें जी म्हणत ॥ कैकयी विपरीत बोलत ॥ चित्त खेद पावेल तुमचें ॥७९॥
ऐसें भरतें बोलोन ॥ परतविलें सुग्रीव बिभीषण ॥ रघुनाथाजवळी येऊन ॥ आज्ञा मागती जावया ॥१८०॥
उभे राहिले जोडोनि कर ॥ सर्वांचे अश्रूंनी भरले नेत्र ॥ म्हणती राघवा निरंतर ॥ सर्वथा आम्हां न विसरावें ॥८१॥
त्रिभुवनींचे राज्य टाकावें ॥ रामा तुजजवळीच नित्य राहावें ॥ परी हें प्राक्तन नाही बरवें ॥ ओढून नेतें बळेचि ॥८२॥
काय आठवावे उपकार ॥ जन्मोजन्मीं न पडावा अंतर ॥ तुझे बोल गोड निरंतर ॥ राघवा हृदयीं आठवती ॥८३॥
स्फुंदस्फुंदोनि दोघजण ॥ बोलती सुग्रीव बिभीषण ॥ मग म्हणे रघुनंदन ॥ तुमच्या हृदयीं वसें मी ॥८४॥
मग उठोनियां रघुनाथ ॥ दोघांचे मस्तकीं ठेवी हस्त ॥ मग सव्य घालोनि सीताकांत ॥ निघते जाहले ते काळीं ॥८५॥
तयांसी बोळवीत रघुवीर ॥ गेला अयोध्येबाहेर मग सर्व वानरीं नमस्कार ॥ रघुनाथासी घातला ॥८६॥
बिभीषण सुग्रीव जांबुवंत ॥ नळ नीळ शरभ वाळिसुत ॥ इहीं साष्टांग नमूनि रघुनाथ ॥ जाते जाहले ते काळीं ॥८७॥
दक्षिणपंथें चालिले त्वरित ॥ मागुती राघवाकडे पाहात ॥ तेथून नमस्कार घालित ॥ सद्रद चित्ती होऊनियां ॥८८॥
मग पवनवेगेंकरून ॥ कपि असुर निघाले तेथून ॥ किष्किंधेस सूर्यनंदन ॥ राहिला कपींसमवेत ॥८९॥
तेणें बिभीषण गौरविला ॥ मग घेऊनि असुरमेळा ॥ रावणानुज लंकेसीं आला ॥ स्वस्थानीं स्वस्थ राहिला ॥१९०॥
इकडे अयोध्येसीं रघुनाथ ॥ बंधूंसहित राज्य करित ॥ पृथ्वी संपूर्ण आनंदभरित ॥ दुःख किंचित असेना ॥९१॥
अकरा सहस्र वर्षेवरी ॥ अयोध्यानाथ राज्य करी ॥ लोक सर्व धर्माधिकारी ॥ पाप तिळभरी असेना ॥९२॥
अवतार हरि उदंड धरी ॥ परी बहुत सुख रामावतारीं ॥ अकरासहस्र वर्षवरी अक्षय राज्य चालविलें ॥९३॥
जरा मृत्यु दुःख दरिद्र ॥ राज्यांत नाहीं अणुमात्र ॥ सीतेसहित राजीवनेत्र ॥ ब्रह्मांनंदें वर्ततसे ॥९४॥
वसिष्ठ विश्वामित्र अगस्ति ॥ आणिक ऋषि जैसे गभस्ति ॥ अयोध्येमाजी सदा वसती ॥ जनकजापतीचे समीप ॥९५॥
अगस्तीच्या मुखें श्रवण ॥ नित्य करी रघुनंदन ॥ सदा तृप्त याचकजन ॥ राघवदर्शन घेतांचि ॥९६॥
सुरस रामविजय ग्रंथ ॥ उत्तराकांड कथा अद्भुत ॥ राज्यीं बैसला राजीवनेत्र ॥ धन्य कार्यार्थ सुरस हा ॥९७॥
रामविजयाचें एक आवर्तन ॥ करी संपूर्ण पापाचें दहन ॥ आणि शत्रुपराजय पूर्ण ॥ श्रवण करितां होतसे ॥९८॥
अज्ञानांसी होय ज्ञान ॥ निपुत्रिकांसी पुत्रसंतान ॥ भवरोग जाय विरून ॥ भावेंकरून परिसतां ॥९९॥
अयोध्याप्रवेश जाहला पूर्ण ॥ पुढें रसाळ कथा गहन ॥ श्रवण करोत पंडितजन ॥ राघवीं मन समर्पूनियां ॥२००॥
अयोध्यापुरवासिया रामा ॥ श्रीब्रह्मानंदा कल्याणधामा ॥ श्रीधरवरदा पूर्णकामा ॥ नामा अनामा अतीत तूं ॥१॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ षट्त्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२०२॥
॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥