Wednesday, August 28, 2013

महाराष्ट्रीयन मुलांचे खेळ - 1

आखाडी :-

कोकणातल्या दशावतारी खेळासारखा एक प्रकर. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात याचा प्रचार आहे. शेतीचा हंगाम संपल्यावर आखाडीला सुरुवात होते आणि पुन्हा पावसाळा सुरु होईपर्यंत हे खेळ चालतात. यात सगळ्या जातीचे लोक भाग घेतात. ग्रामीण लोक आखाडीत निरनिराळ्या देवांची सोंगे आणून नाचतात . एखाद्या घराण्यात काही सोंगे वंशपरंपरागत चालू अस्तात. आखाडीतले सोंग मिळणे हा मान समजला जातो . या खेळाला बोहाडा असेही नाव आहे. बोहाडा नाशिक, धुळे भागात खेळला जातो .

ओका बोका :-

लहान मुलांचा एक खेळ. यात दहा-पाच मुले जमिनीवर बसून आपल्या दोन्ही हातांची दाही बोटे जमिनीवर उभी टेकवतात. मग त्या समुदायातला एक मुलगा प्रत्येकाच्या हाताला स्पर्श करीत पुढील गाणे म्हणतो

ओका बोका तीन तडोका ।
लडवा लाठी चंदन काठी ।।
बागमे बगडवा डोले ।
सावनमे करइली फुले ।।
ओ करइली के नांव का ?
इजइल बिजइल,
पानवा फुलवा ढोढिया पचक ।।

हे त्याचे गाणे ठेक्यात चालते. प्रत्येक ठेक्याला तो मुलांच्या एकेका हातावर बोट ठेवीत जातो आणि पाचक शब्द येताच त्या मुलाच्या हातावर मुठ मारून तो हात जमिनी सरपट करतो.


खांब-खांबोळ्या :-

मुलांचा एक खेळ. पुष्कळ खांब असलेल्या जागी हा खेळ खेलतात. या खेळत जितके खांब असतील त्यापेक्षा एक गाडी जास्त घेतात. मग मुले खांब पकडायला धावतात. ज्याला खांब मिळत नाही, त्याच्यावर राज्य येते. मग इतर मुले पळून खांबांची अदलाबदल करीत रह्तात. तसे ते करीत असताना राज्य घेतलेला मुलगा शिताफी करून एखाद्याचा खांब पकडतो. मग, ज्याचा खांब धरला असेल त्याच्यावर राज्य येते.राज्य आलेला मुलगा खांबाला उद्देशून 'खांब-खांबोळ्या, दे रे आंबोळ्या' असे म्हणत राहतो व खेळ सुरु राहतो.


No comments:

Post a Comment