Sunday, February 27, 2011

Gurucharitra - Adhyay 52

Hello Friends,
It was my pleasure to post the complete grantha of Gurucharitra.
Today posting a last chapter which gives the summary of all previous 51 chapters, of this holy book. Hope that you all liked this and keep visiting for more.. :)

CHAPTER 52

Conclusion:Week-Reading Awatarnika(Contents).

After hearing the 51 Chapters of Shri Guru-Charitra, Namdharak lost senses and got samadhi. His body perspired, his throat got choked and tears flowed from his eyes. He could not speak out a word. Shri Siddha Muni was pleased to see this state of Namdharak. Though the disciple got samadhi, he should be awakened for the benefit of the people. Thinking thus he moved his hand over his face and body with affection and called him and said, "Dear boy, come on senses. You have got 'dnyan' and you will get salvation. But if you remain in meditation, how will the people be benefited and enlighten? You asked me and I narrated to you these nectar-like tales of Shri Guru's life. You also heard them conscientiously. You should therefore elaborate them and propagate amongst the people."

Namdharak opened his eyes and placed his head on the feet of Shri Siddha and said, "You are Shri Guru yourself. Shri Guru's life, that you have narrated, is even more sweeter than the nectar. I am not contended yet. Please tell me the whole life again in short".

Hearing this just as a physician prepares the Sanjivani pills mixing many medicines and keeps the pills with him, similarly I am telling you the summary of this life of Shri Guru.

Further Shri Siddha said, "Though Shri Guru has disappeared still he gives darshan to his sincere devotees as before".

Namdharak- "Kindly tell me the procedure of week-reading and other rules to be followed during the week".

Shri Siddha-"Shri Guru-Charitra can be read any time with pure mind. The credit of reading it in a week is still great. For this, one place and seat should be selected. Keep control on the senses during the week. Before starting the reading bow to God, Brahmin and elders. Worship the volume of "Shri Guru-Charitra". One should complete 7 chapters on the first day, read up to 18th chapter on the second day, up to 28th on the third day, up to 34th on the fourth day, up to 37th on the fifth day, up to 43rd on the sixth day and up to 52nd chapters on the seventh day. After reading, worship the volume and take light dinner. Some observe fast for the week; but if this is not possible have food of only one type of corn. On the eighth day, for completion of the week reading, take meals with a brahmin couple and offer money as dakshina. If the reading is done with devotion and pure heart, Shri Guru gives darshan in dream and fulfills one's desires. The trouble of spirits and ghosts vanishes and one gets peace of mind.

Namdharak again expressed to Shri Siddha Muni his gratitude for narrating the life of Shri Guru, which has made his life fortunate and enabled him to attain the bliss.

The End.

श्रीगणेशाय नमः ।

नामधारक विनवी सिद्धासी । श्रीगुरु निघाले शैल्ययात्रेसी । पुढें कथा वर्तली कैसी । तें विस्तारेंसी मज सांगावें ॥१॥

सिद्ध म्हणे शिष्योत्तमा । काय सांगूं सद्‌गुरुची महिमा । आतां वर्णनाची झाली सीमा । परी गुरुभक्तिप्रेमा नावरे ॥२॥

श्रीगुरु सिद्ध झाले जावयासी । श्रीपर्वतीं यात्राउद्देशीं । हा वृत्तान्त नागरिक जनासी । कळला परियेसीं तात्काळ ॥३॥

समस्त जन आले धावत । नरनारी सर्व मिळाल्या बहुत । गुरुसी प्रार्थित अनेक भक्त । श्रीपर्वतासी स्वामी कां जातां ॥४॥

आम्हांसी भासतें व्यक्त । तुम्ही अवतार करितां समाप्त । निरंतर आपण असा अव्यक्त । परिजनांसी सुव्यक्त दिसत होतां ॥५॥

तुमचे चरणांचें होतां दर्शन । पातकांचें होतसे दहन । आतां कैसें करतील जन । म्हणोनि लोटांगणें घालिती ॥६॥

पुढें आम्हांस काय गति । आम्हीं तरावें कैशा रीतीं । स्वामीचे चरण नौका होती । तेणें पार उतरत होतों ॥७॥

तुम्ही भक्तास कामधेनूपरी । कामना पुरवीत होतां बरी । म्हणोनि जगले आजवरी । याउपरी आम्हीं काय करावें ॥८॥

स्वामीकरितां गाणगापूर । झालें होतें वैकुंठपूर । आतां दीपाविणें जैसें मंदिर । तैसें साचार होईल हें ॥९॥

माउलीविणें तान्हें बाळ । कीं देवाविणें देऊळ । जळाविणे जैसें कमळ । तैसें सकळ तुम्हांविणें ॥१०॥

माता पिता सकळ गोत । इष्‍टमित्र कुळदैवत । सर्वही आमुचा गुरुनाथ । म्हणोनि काळ क्रमित होतों ॥११॥

आपुल्या बाळकांसी अव्हेरुनी । कैसें जातां स्वामी येथुनी । अश्रुधारा लागल्या लोचनीं । तळमळती सकळ जन ॥१२॥

तेव्हां गुरु समस्त जनांप्रती । हास्यवदन करुनि बोलती । तुम्ही जनहो मानूं नका खंती । सांगतों यथास्थित तें ऐका ॥१३॥

आम्ही असतों याचि ग्रामीं । स्नान पान करुं अमरजासंगमीं । गौप्यरुपें रहातों नियमीं । चिंता कांहीं तुम्हीं न करावी ॥१४॥

राज्य झालें म्लेंच्छाक्रांत । आम्ही भूमंडळीं विख्यात । आमुचे दर्शनास बहु येथ । यवन सतत येतील पैं ॥१५॥

तेणें प्रजेस होईल उपद्रव । आम्ही अदृश्य रहातों यास्तव । ज्यास असे दृढ भक्तिभाव । त्यास दृश्य स्वभावें होऊं ॥१६॥

लौकिकामध्यें कळावयासी । आम्ही जातों श्रीशैल्यपर्वतासी । चिंता न करावी मानसीं । ऐसें समस्तांसी संबोधिलें ॥१७॥

मठीं आमुच्या ठेवितों पादुका । पुरवितील कामना ऐका । अश्वत्थवृक्ष आहे निका । तो सकळिकांचा कल्पतरु ॥१८॥

कामना पुरवील समस्त । संदेह न धरावा मनांत । मनोरथ प्राप्त होती त्वरित । ही मात आमुची सत्य जाणा ॥१९॥

संगमीं करुनिया स्नान । पूजोनि अश्वत्थनारायण । मग करावें पादुकांचें अर्चन । मनकामना पूर्ण होतील ॥२०॥

विघ्नहर्ता विनायक । आहे तेथें वरदायक । तीर्थें असती अनेक । पावाल तुम्ही सुख अपार ॥२१॥

पादुकांची करुनि पूजा । त्रिकाळ आरती करुनि ओजा । आमुचें वचन यथार्थ समजा । म्हणोनि द्विजांसी गुरु सांगती ॥२२॥

आम्ही येथेंच रहातों मठांत । हें वचन जाणावें निश्चित । ऐसें संबोधूनि जना आद्यंत । निघाले त्वरित गुरुराज पैं ॥२३॥

समागमें जे धावले जन । त्यांचें करुन समाधान । शिष्यांसहित त्वरित गतीनें । गेले निघून श्रीगुरु ॥२४॥

लोक माघारे परतले । समस्त गुरुच्या मठासी आले । तेथें समस्तांनीं गुरु देखिले । बैसले होते निजासनीं ॥२५॥

सवेंचि पहातां झाले गुप्त । जन मनीं परम विस्मित । आम्ही सोडूनि आलों मार्गांत । येथें गुरुनाथ देखिले ॥२६॥

सर्वव्यापी नारायण । त्रैमूर्ति अवतार पूर्ण । चराचरी श्रीगुरु आपण । भक्तांकारणें रुप धरिती ॥२७॥

ऐसा दृष्‍टान्त दावूनि जनांसी । आपण गेले श्रीशैल्यासी । पावले पाताळगंगेसी । राहिले त्या दिवसीं तेथें ॥२८॥

श्रीगुरु शिष्यांसी म्हणती । मल्लिकार्जुनासी जावोनि शीघ्र गतीं । पुष्पांचें आसन यथास्थितीं । करोनि निगुती आणावें ॥२९॥

शिष्य धावले अति शीघ्र । पुन्नागादि कंद कल्हार । करवीर बकुळ चंपक मंदार । पुष्पें अपार आणिलीं ॥३०॥

त्या पुष्पांचें केलें दिव्यासन । तें गंगाप्रवाहावरी केलें स्थापन । त्यावरी श्रीगुरु आपण । बैसले ते क्षणीं परमानंदें ॥३१॥

बहुधान्य संवत्सर माघमास । कृष्णप्रतिपदा शुभ दिवस । बृहस्पति होता सिंहराशीस । उत्तर दिशे होता सूर्य पैं ॥३२॥

शिशिर ऋतु कुंभ संक्रमण । लग्नघटिका सुलक्षण । ऐसे शुभमुहूर्तीं गुरु आपण । आनंदें प्रयाण करिते झाले ॥३३॥

मध्यें प्रवाहांत पुष्पासनीं । बैसोनि शिष्यास संबोधोनि । आमुचा वियोग झाला म्हणोनि । तुम्हीं मनीं खेद न मानावा ॥३४॥

त्या गाणगापुरांत । आम्ही असोच पूर्ववत । भावता दृढ धरा मनांत । तुम्हां दृष्‍टान्त तेथें होईल ॥३५॥

आम्ही जातों आनंदस्थानासी । तेथें पावलों याची खूण तुम्हांसी । फुलें येतील जिनसजिनसीं । तुम्हांस तो प्रसाद ॥३६॥

पुष्पांचें करिता पूजन । तुम्हां होईल देव प्रसन्न । भक्तिभावें करावी जतन । प्राणासमान मानुनी ॥३७॥

आणिक एक ऐका युक्ति । जे कोणी माझें चरित्र गाती । प्रीतीनें नामसंकीर्तन करिती । ते मज प्रिय गमती फार ॥३८॥

मजपुढें करितील गायन । जाणोनि रागरागिणी तानमान । चित्तीं भक्तिभाव धरुन । करिती ते मज कीर्तन परमानंदें ॥३९॥

भक्त मज फार आवडती । जे माझें कथामृत पान करिती । त्यांचे घरीं मी श्रीपती । वसतों प्रीतीनें अखंडित ॥४०॥

आमुचें चरित्र जो पठण करी । त्यास लाभती पुरुषार्थ चारी । सिद्धि सर्वही त्याच्या द्वारीं । दासीपरी तिष्‍ठतील ॥४१॥

त्यासी नाहीं यमाचें भय । त्यास लाभ लाभे निश्चय । पुत्रपौत्रांसहित अष्‍टैश्चर्य । अनुभवोनि निर्भय पावे मुक्ति ॥४२॥

हें वचन मानी अप्रमाण । तो भोगील नरक दारुण । तो गुरुद्रोही जाण जन्ममरण । दुःख अनुभवणें न सुटे त्यासी ॥४३॥

या कारणें असूं द्या विश्वास । सुख पावाल बहुवस । ऐसें सांगोनि शिष्यांस । श्रीगुरु तेथूनि अदृश्य झाले ॥४४॥

शिष्य अवलोकिती गंगेंत । तों दृष्‍टीं न दिसती श्रीगुरुनाथ । बहुत होवोनि चिंताक्रांत । तेथें उभे तटस्थ झाले ॥४५॥

इतुकियात आला नावाडी तेथ । तो शिष्या सांगे वृत्तान्त । गंगेचे पूर्वतीरीं श्रीगुरुनाथ । जात असतां म्यां देखिले ॥४६॥

आहे वेष संन्यासी दंडधारी । काषयांबर वेष्‍टिलें शिरीं । सुवर्णपादुका चरणामाझारीं । कांति अंगावरी फाकतसे ॥४७॥

तुम्हांस सांगा म्हणोनि । गोष्‍टी सांगितली आहे त्यांनीं । त्यांचे नांवें श्रीनृसिंहमुनि । ते गोष्‍टी कानीं आइका ॥४८॥

कळिकाळास्तव तप्त होउनी । आपण असतों गाणगाभुवनीं । तुम्हीं तत्पर असावें भजनीं । ऐसें सांगा म्हणोनि कथिलें ॥४९॥

प्रत्यक्ष पाहिले मार्गांत । तुम्ही कां झाले चिंताक्रांत । पुष्पें येतील जळांत । घेऊनि निवांत रमावें ॥५०॥

नावाडी यानें ऐसें कथिलें । त्यावरुनि शिष्य हर्षले । इतुकियांत गुरुप्रसाद फुलें । आलीं प्रवाहांत वाहत ॥५१॥

तीं परमप्रसादसुमनें । काढोनि घेतलीं शिष्यवर्गानें । मग परतले आनंदानें । गुरुध्यान मनीं करित ॥५२॥

सिद्धासी म्हणे नामधारक । पुष्पें किती आलीं प्रासादिक । शिष्य किती होते प्रमुख । तें मज साद्यंत सांगावें ॥५३॥

सिद्ध म्हणे नामधारका । तुवां भली घेतली आशंका । धन्य बा तुझ्या विवेका । होसी साधक समर्थ ॥५४॥

खूण सांगतों ऐक आतां । श्रीगुरु गाणगापुरीं असता । बहुत शिष्य होते गणितां । नाठवती ते ये समयीं ॥५५॥

ज्यांणीं केला आश्रमस्वीकार । ते संन्यासी थोर थोर । तीर्थें हिंडावया गेले फार । कृष्णबाळसरस्वती प्रमुख ते ॥५६॥

जे शिष्य झाले गृहस्थ केवळ । ते आपुल्या गृहीं नांदती सकळ । तारक होते श्रीगुरुनाथ प्रबळ । भक्त अपरिमित तारिले ॥५७॥

श्रीजगद्गुरुच्या समागमीं । चारीजण होतों आम्ही । सायंदेव नंदी नरहरी मी । श्रीगुरुची सेवा करीत होतों ॥५८॥

चौघांनीं घेतलीं पुष्पें चारी । गुरुप्रसाद वंदिला शिरीं । हीं पहा म्हणोनि पुष्पें करीं । घेऊनि झडकरी दिधलीं ॥५९॥

चौघांनीं चारी पुष्पांसी । मस्तकीं धरिलीं भावेंसी । आनंद झाला नामधारकासी । गुरुप्रसाद त्याचे दृष्‍टीं पडला ॥६०॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्ध नामधारकासी सांगत । श्रीगुरुप्रसाद झाला प्राप्त । द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥६१॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रसादप्राप्तिर्नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥५२॥

ओवीसंख्या ॥६१॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥

समाप्त.

Saturday, February 26, 2011

Puneri Patya

Hi friends,
Have a look at the Pune's Specialty in Sign boards.

लोक पुणेरी पाट्यांबद्दल जरा जास्तच बोलतात असे मला आधी वाटायचे. पण लग्न होवून पुण्यात गेल्यावर मलाही कळली ह्या पाट्यांमागची गंमत. कुठे अतिशयोक्ती तर कुठे शालजोडीतला फटका....
वाचून पहा तुम्हालाही आवडेल.....

देवळाबाहेरची नम्र सूचना :-


गिर्हाइकाला मारलेला फटका अर्थात शालजोडीतला हं..
इंग्रजी सूचनेचे मराठीकरण...

पार्सल काय मिळणार म्हणालात???

लिफ्टचा वापर करणाऱ्यांना संयमी सुचना
तुम्ही सवयी बदला अन्यथा आमच्या सवयींचे परिणाम भोगा...
पुणेकरांची कृतज्ञता व्यक्त ....

अनोखी जाहिरातबाजी :-
काय बंद राहणार आहे????

Friday, February 25, 2011

Gurucharitra - Adhyay 51

Chapter 51 Shri guru decides to take samadhi and He disappears in Karadali-van. This is the last chapter of Gurucharitra, though while reading the whole holy book most of the people prefer to read the last adhyay which has the complete summary.

CHAPTER 51

Shri Guru's Journey unto Bliss: Disciples Get Flower-Gift.

Knowing that Shri Guru has decided to go to Shri Shailya, all the disciples and citizens felt very happy. They said, "You are our treasure. Why do you go leaving us?"

Shri Guru smiled and said, "You need not worry. I shall stay here secretly. I shall have bath at the Amarja Sangam in the morning. In the midday I shall come to Gangapur math and accept nirguna puja and give darshan to the devotees. From the view point of the public, I am going to Shri Shailya Yatra. Have no doubt. I shall always stay at Gangapur. The Aswattha here are like Kalpataru."

Saying this Shri Guru started for Shri Shailya. People accompanied him for some distance and when they returned to the math they saw Shri Guru there. After some time he disappeared. All wondered at this miracle.

Shri Guru went to Patal Ganga, flowing at the base of of Shri Shailya, He asked his disciples to prepare a flower-seat and said, "I have to go to Mallikarjuna on Shri Shailya on the other side of the river." The disciples prepared a nice seat of flowers of Shevanti, lotus, malati, kanher etc. on the leaf of kardali and placed it on the river side.

Shri Guru said, "Now you should return to your respective places". All were greatly aggrieved. Shri Guru sat on the flower seat on Magh Vad 1st, on Friday when Guru(jupiter) was in Kanya(vergs) Rasa at evening time and before going away said, " I am going to the place of self-bliss. I shall send flowers as gift which you should distribute amonst yourselves and worship them daily. I like singing. I shall be near those, who sing prayers. They will get all the pleasures".

Saying this Shri Guru disappeared in the river. After some time some boatmen came from the other side of the river. They told, "We saw Shri Guru on the other side. He was looking like a sanyasi and was holding a dand(stick) in his hand. He had golden sandals. He told his name as 'Narsinha-Saraswati. He has given amessage for you, 'I am going to the Kardali-Van. Still I shall be at Gangapur. Do not worry. I am sending flowers as gift, which may be distributed amongst yourselves".

All were waiting for the flowers. After a little time, four flowers came flowing. They were taken one each by Sayamdeo,Nandi, Narhari and myself. Here is the flower given to me. Saying this, Shri Sidha showed the flower to Namdharak.

Such is the greatness of Shri Guru. I have narrated only a part of Shri Guru's life, which is very exhaustive. Those who read, hear and write this life, will attain all the pleasures. These nectar-like tales will give four Purusharthas and also Paramarth".

Contd....

श्रीगणेशाय नमः ।

नामधारक विनवी सिद्धासी । कथा सांगितली आम्हांसी । म्लेंच्छराजें श्रीगुरुसी । होतें नगरासी नेलें ॥१॥

तेथोन आले गाणगाभुवना । पुढील वर्तल्या निरुपणा । सांगा स्वामी कृपाघना । गुरुचरित्र आम्हांसी ॥२॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा । ऐकतां जाती सकळ दोषा । चिंतिलें काम्य पाविजे ॥३॥

राजाची भेट घेऊनि । श्रीगुरु आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुल्या मनीं । गुप्त रहावें म्हणोनिया ॥४॥

प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटीसी । उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना जाती येतील ॥५॥

म्हणोनि आतां गुप्त व्हावें । लोकमतें निघोनि जावें । पर्वतयात्रा म्हणोनि भावें । निघाले श्रीगुरु परियेसीं ॥६॥

गुप्त राहिले गाणगापुरीं । प्रगट दाविलें लोकाचारीं । निघाले स्वामी पर्वतगिरीं । शिष्यांसहित अवधारा ॥७॥

भक्तजन बोळवित । चिंता करीत अत्यंत । श्रीगुरु संबोखिती समस्त । रहावविती अतिप्रीतीनें ॥८॥

दुःख करिती सकळ जन । लागताती श्रीगुरुचरण । स्वामी आम्हांतें सोडून । केवी जातां यतिराया ॥९॥

भक्तजनांची तूं कामधेनु । आम्ही बाळक अज्ञानु । होतासि आम्हां निधानु । सोडोनि जातां श्रीगुरु ॥१०॥

नित्य तुझें करितां दर्शन । दुरितें जाती निरसून । जी जी कामना इच्छी मन । त्वरित पावे स्वामिया ॥११॥

बाळकातें सोडोनि माता । केवी जाय अव्हेरितां । तूं आमुचा मातापिता । नको अव्हेरुं म्हणताती ॥१२॥

ऐकोनि नानापरी विनंति । हांसते झाले श्रीगुरुमूर्ति । संबोखिती अतिप्रीतीं । न करा चिंता म्हणोनि ॥१३॥

आम्ही असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं । वसों माध्यान्हीं मठधामीं । गुप्तरुपें अवधारा ॥१४॥

जे भक्त असती माझ्या प्रेमीं । त्यांतें प्रत्यक्ष दिसों आम्ही । लौकिकमतें अविद्याधर्मीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥१५॥

प्रातःस्नान कृष्णातीरीं पंचनदी वृक्ष औदुंबरीं । अनुष्‍ठाना बिंदुक्षेत्रीं । माध्यान्हीं येतों भीमातटीं ॥१६॥

अमरजासंगमीं स्नान करोनि । पूजा घेऊं मठीं निर्गुणीं । चिंता न करा अंतःकरणीं । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥१७॥

ऐसें सांगती समस्तांसी । संदेह न धरावा मानसीं । गाणगाभुवनीं अहर्निशीं । वसों आम्ही त्रिवाचा ॥१८॥

जे जे जन भक्ति करिती । त्यांसी आमुची अतिप्रीति । मनकामना पावती । सिद्धवाक्य असे आमुचें ॥१९॥

अश्वत्थ नव्हे कल्पवृक्ष । संगमीं असे प्रत्यक्ष । तुमच्या मनीं जें अपेक्ष । त्वरित होय पूजितां ॥२०॥

कल्पवृक्षातें पूजोनि । मग यावें आमुचे स्थानीं । पादुका ठेवितों निर्गुणी । पूजा करा मनोभावें ॥२१॥

विघ्नहर चिंतामणी । त्यातें पूजितां एकमनीं । चिंतिलें फळ तत्क्षणीं । लाभे तुम्हां अवधारा ॥२२॥

समस्त विघ्नांचा अंतक । पूजा तुम्हीं विनायक । अष्‍टतीर्थें असती विशेख । आचरावीं मनोभावें ॥२३॥

संतोषकारक आम्हांप्रती । त्रिकाळ करावी आरती । भक्तजन जें इच्छिती । त्वरित होय अवधारा ॥२४॥

ऐसें सांगोनि तयांसी । निघालें स्वामी परियेसीं । भक्त परतोनि मठासी । आले चिंतित पायांतें ॥२५॥

चिंतित निघती मठांत । तेथें दिसती श्रीगुरुनाथ । लोक झाले विस्मित । म्हणती वस्तु त्रैमूर्ति ॥२६॥

यासी म्हणती जे नर । ते पावती यमपूर । सत्य बोलिले निर्धार । न कळे महिमा आम्हांसी ॥२७॥

सवेंचि पाहतां न दिसे कोणी । प्रेमळ भक्त देखती नयनीं । यापरी गौप्यरुप धरोनि । राहिले श्रीगुरु मठांत ॥२८॥

दृष्‍टान्त दाखविला भक्तांसी । पातले आपण श्रीपर्वतासी । पाताळगंगातीरासी । राहिले स्वामी परियेसा ॥२९॥

शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा । जाणें असे पैलतीरा । ऐक्य होऊं मल्लिकार्जुनीं ॥३०॥

निरोप देतां श्रीगुरुमूर्ति । आणिलीं पुष्पें शेवंती । कुमुदें कल्हारें मालती । कर्दळीपर्णें वेष्‍टोनि ॥३१॥

आसन केलें अतिविचित्र । घातलें गंगेमध्यें पात्र । शिष्यां सांगती वेगवक्र । जावें तुम्ही गृहासी ॥३२॥

दुःख करीत येत सकळी । यांसी सांगती श्रीगुरु चंद्रमौळी । गाणगाग्रामीं असों जवळी । भाव न धरावा दुजा तुम्ही ॥३३॥

लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्‍टान्तीं दिसतों । भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥३४॥

ऐसें भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथोनि । पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥३५॥

कन्यागतीं बृहस्पति । बहुधान्य संवत्सरी ख्याति । सूर्य चाले उत्तर दिगंतीं । संक्रांति कुंभ परियेसा ॥३६॥

शिशिर ऋतु माघमासीं । असितपक्ष प्रतिपदेसी । शुक्रवारीं पुण्यदिवसीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥३७॥

श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी । पावतां खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥३८॥

येतील पुष्पें जाती शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं । पूजा करावी अखंड रीतीं । लक्ष्मी वसों तुम्हां घरीं ॥३९॥

आणिक सांगेन एक खूण । गायनीं करी जो माझे स्मरण । त्याचे घरीं असे जाण । गायनप्रीति आम्हांसी ॥४०॥

नित्य जें जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । तयांचे घरी अखंडिती । आपण असों अवधारा ॥४१॥

व्याधि न होय त्यांचे घरीं । दरिद्र जाय त्वरित दुरी । पुत्रपौत्र श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥४२॥

ऐकतील चरित्र माझें जरी । वाचतील नर निरंतरी । लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मनांत ॥४३॥

ऐसें सांगोनि भक्तांसी । श्रीगुरु जहाले अदृशी । चिंता करिती बहुवशी । अवलोकिती गंगेंत ॥४४॥

ऐशी चिंता करितां थोर । तटाकीं पातले नावेकर । तिहीं सांगितला विचार । श्रीगुरु आम्हीं देखिले ॥४५॥

शिष्यवर्गासी मनोहर । व्यवस्था सांगती नावेकर । होतों आम्ही पैलतीर । तेथें देखिले मुनीश्वर ॥४६॥

संन्यास वेष दंड हातीं । नामें श्रीनृसिंहसरस्वती । निरोप दिधला आम्हांप्रती । तुम्हां सांगा म्हणोनि ॥४७॥

आम्हांस आज्ञापिती मुनि । आपण जातों कर्दळीवनीं । सदा वसों गाणगाभुवनीं । ऐसें सांगा म्हणितलें ॥४८॥

भ्रांतपणें दुःख करितां । आम्हीं देखिलें दृष्‍टान्ता । जात असतां श्रीगुरुनाथा । सुवर्णपादुकां त्यांचे चरणीं ॥४९॥

निरोप सांगितला तुम्हांसी । जावें आपुल्या स्थानासी । सुखी असावें वंशोवंशीं । माझी भक्ति करोनि ॥५०॥

प्रसादपुष्पें आलिया । घ्यावीं शिष्यें काढोनिया । ऐसें आम्हां सांगोनिया । श्रीगुरु गेले अवधारा ॥५१॥

ऐसें सांगती नावेकर । समस्त राहिले स्थिर । हर्षें असती निर्भर । प्रसादपुष्पें पहाती ॥५२॥

इतुकिया अवसरीं । आलीं प्रसादपुष्पें चारी । मुख्य शिष्यें प्रीतिकरीं । काढोनि घेतलीं अवधारा ॥५३॥

नामधारक म्हणे सिद्धासी । मुख्य शिष्य कोण उपदेशीं । विस्तारोनिया आम्हांसी । पुष्पें कोणा लाभलीं ॥५४॥

सिद्ध म्हणे नामधारका । शिष्य बहुत गुरुनायका । असती गाणगापुरीं ऐका । गेले शिष्य आश्रमा ॥५५॥

आश्रम घेती संन्यासी । त्यांसी पाठविलें तीर्थासी । तयांचीं नामें परियेसीं । सांगेन ऐका विस्तारोन ॥५६॥

बाळकृष्णसरस्वती । उपेंद्रमाधवसरस्वती । पाठविते झाले प्रीतीं । आपण राहिले संगमीं ॥५७॥

गृहस्थधर्म शिष्य बहुत । समस्त आपुले घरीं नांदत । त्रिवर्ग आले श्रीपर्वताप्रत । चवथा होतों आपण ॥५८॥

साखरे नाम सायंदेव । कवीश्वर-युग्में पूर्वभाव । नंदी नामें नरहरी देव । पुष्पें घेतलीं चतुर्वर्गी ॥५९॥

गुरुप्रसाद घेऊन । आले शिष्य चौघेजण । तींच पुष्पें मज पूजन । म्हणोनि पुष्पें दाखविती ॥६०॥

ऐसा श्रीगुरुचा महिमा । सांगतसे अनुपमा । थोडें सांगितलें तुम्हां । अपार असे सांगतां ॥६१॥

श्रीगुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुज विस्तारोनु । दुःख दरिद्र गेलें पळोनु । ऐसें जाण निर्धारीं ॥६२॥

ऐसें श्रीगुरुचरित्र । श्रवणीं कीर्तनी अतिपवित्र । सुखें नांदती पुत्रपौत्र । लक्ष्मीवंत होती जाण ॥६३॥

धर्म अर्थ काम मोक्ष । तयांसी लाभे प्रत्यक्ष । महा आनंद उभयपक्ष । पुस्तक लिहितां सर्वसिद्धि ॥६४॥

ऐसें सिद्धें सांगितलें । नामधारक संतोषले । सकळाभीष्‍ट लाधलें । तात्काळिक अवधारा ॥६५॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । श्रीगुरुचरित्र अतिमनोहर । ऐकतां पावती पैल पार । संसारसागरा तरोनिया ॥६६॥

श्रीगुरुचरित्र ऐकतां । सकळाभीष्‍टें तत्त्वतां । लाधती म्हणोनि समस्तां । ऐका म्हणे नामधारक ॥६७॥

अमृताची असे माथणी । स्वीकारितां भाविक जनीं । धर्मार्थ काम मोक्ष साधनीं । हेचि कथा ऐकावी ॥६८॥

पुत्रपौत्रां ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड । राहे लक्ष्मी स्थिर अखंड । श्रवणमात्रें घरीं नांदे ॥६९॥

चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणे परमार्थ । श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशीं ॥७०॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । श्रोतयांसी करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्‍टें साधती ॥७१॥

मुख्य भाव कारण । प्रेमें करितां श्रवण पठण । निजध्यास आणि मनन । प्रेमें करोनि साधिजे ॥७२॥

श्रीनृसिंहसरस्वती शंकर । त्याचे चरणीं अर्पण साग्र । त्याचेचि प्रसादें समग्र । समस्त प्रजा सुखी असती ॥७३॥

ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानीं । शुद्ध वस्त्रीं शुद्ध मनीं । नित्य पूजा करोनि । ग्रंथ गृहामाजीं ठेवावा ॥७४॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्धनामधारकसंवाद अमृत । गुरुसमाधि नाम विख्यात । एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥७५॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुसमाधिगमनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥
ओवीसंख्या ॥७५॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥
क्रमशः

Thursday, February 24, 2011

Ek hote khobre

This is a Marathi childrens song written by famous poetess Shanta Shelke. Poetess has explained the method to make Khirapat - a sweet snack (usually served as Prasad) in a very kid friendly manner.

ह्या बडबड गीतामध्ये प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी खिरापत कशी करतात हे फार सोप्या पण गमतीशीर भाषेत सांगितले आहे. हे गाणे वाचल्यावर माझीसुद्धा खिरापत करण्याची आणि खाण्याची सुद्धा इच्छा झाली बरे का...... हे गाणे तुमच्या चिमुरड्यांना नक्की आवडेल अशी आशा आहे.

एक होते खोबरे
गाल काळे गोबरे

ताईला ते दिसले
तिने त्याला किसले

त्यात घातली साखर
वेलची अन् केशर

छान केली खिरापत
अशी तिची करामत

कवयित्री - शांता शेळके

Wednesday, February 23, 2011

Gurucharitra - Adhyay 50

Chapter 50 Muslim king (possibly Allauddin-II of Bedar and the previous birth washer-man) visits him and he is cured of tumor on his leg.

CHAPTER 50

The Muslim King Comes to See Shri Guru.

We have seen a reference of a Rajak in the 9th chapter. By the blessing of Shripad Shri Vallabha, he was born in a Muslim Royal family and he became king of Bidar. Due to denotation of previous birth he was kind and pious. He treated all religions and sects equally. There were several temples for which he had due sympathy. He also had respect for brahmins. Muslim priests despised Brahmins and Vedic religion. But king said to them, "God is one. Only the names are different. All are created from 5 great elements (Panch --- Mahabhoot). The earth is the mother of all. Cows are different colours, but their milk is white. Ornaments may be many, but the gold is the same. Similarly Paramatma (God) is everywhere. So make no difference between the religions and castes."

Thus the king was ruling impartially. Once he had a tumour on his thigh, Vaidyas and Hakims treated him but to no effect. The king had great pain due to it. He called some Brahmins and requested them to suggest a remedy.

The Brahmins said, "Sins of the previous birth harass one in the form of some disease. For this, visit holy places and give something in charity. Live in the company of saints. You go to the Papvinashi Tirth and bathe there. The tumour will subside."

The king went to the Papvinashi Thirth. He met a Sanyasi there. He bowed to him and showed him his tumour. The Sanyasi said, - "When you see a saint, you will be relieved of the disease. I shall tell you a tale in this connection."

"A Brahmin lived in Awanti i.e., Uijjain. He gave up bath and the Brahmin's rites i.e., sandhya, puja etc. and lived with a prostitute named Pingla. Once Rishabha Muni came to them. They greated him well. They worshiped him and took the tirth of his feet. When the Muni was asleep, both served him keeping awake the whole night. Next morning the Muni went away. Later on in their old age, both the Brahmin and Pingla died.

The Brahmin became the son of king Vajrabahu in the next birth. When he was in Sumati's (eldest) womb, the younger queen became jealous and she gave poison to the eldest queen, who got eruptions all over the body. She delivered a male child, who was also affected by eruptions all over the body. The king got them treated by physicians but they could be cured. The king suspected that the infection would spread in the whole family and he therefore asked a fisherman to take the queen and her son to the forest and leave them there. People were sorry to know about this evil act of the king. Sumathi was roaming in the forest with her son in despair. Due to exertion, she was thirsty and was searching for water. She came to a mandir and met some females, who told her, "Padmakar is the king of this country. He is kind and pious. He will protect you." In the mean time some maid servants of the king came there. Sumati narrated to them her sad account. They took Sumati to the palace and reported to the king about her. The king was very kind and he arranged for her stay.

Here too the eruptions on the body of the mother and son harassed them. One day due to unbearable pain, the child expired. Sumati began to weep bitterly. The ladies of the neighborhood tried to console her, but she continued mourning.

In the meanwhile Rishabha Muni came there. King Padmakar received him warmly. As he heared a mourning sound he inquired. Padmakar narrated to him the sad account of Sumati. Rishabha Muni came to her and began to console her, saying, "It is futile to mourn for the bygone. All lives are like bubbles in water, This body is made of five elements and when these elements separate, nothing remains behind. So do not mourn for the perishable body. One has to suffer as per one's previous actions. For self-emancipation adore Shri Shankar".

Sumati said, "I had to come here leaving the kingdom and here too I met this fate. Now I do not wish to live any longer". Saying so she fell on the feet of the Muni.

The Muni was moved to see her state. He remembered the service that her son had given him in his last birth. He applied a little bhasma to his forehead and put a little in his mouth. Suddenly the child got life and began to move. The eruptions on his body and on his mother's body also vanished by the powerful sight of the Muni. Both looked as bright as gold. Sumati and the child bowed to the Muni devotedly. The Muni blessed them and went away. The greatness of the blessing of a saint is like this. "If you serve a saint you will be relieved from the tumour".

The Muslim king asked with folded hands, "Kindly tell me where there is a saint, I shall go there". The Sanyasi said "Shri Guru lives at Ganagaput on the bank of Bhima. You go to him".

The king immediately went to Ganagapur and inquired about Shri Guru. The people were afraid when the saw that the Muslim king had come to Ganagapur. They did not speak due to fear. When the king asked again he was told that Shri Guru had gone to the Sangam and he would return soon. Hearing this, the Muslim king started to go to the Sangam. On the way he saw Shri Guru coming. He came down Palanquin and bowed to Shri Guru respectively.

Shri Guru said, " O, Rajak, where have you been so far? I am seeing you after a long period".

Hearing this, the Muslim king recollected his life of last birth. He lay prostrate before Shri Guru and began to shed tears of love and joy. With choked voice he asked "Gurudeo, why did you keep me away so long? Being entangled in the royal pleasures, I forgot you. Now I have come to your shelter. Liberate me. I am much harassed due to this tumour on my thigh."

Shri Guru smiled and said, "Show me, where is the tumour?". The king began to look his thigh. But no! The tumour had vanished! He said, "By your blessings, I could enjoy the royal pleasures and glory. All my desires are fulfilled. I now wish that your holyself should come to my palace and bless my family members".

Shri Guru said, "We are Sanyasis. We should not live in cities. You being Muslim, cows are slaughtered daily in your city. This is a great sin. Prohibit killing of cows in your kingdom."

The King said, "I am not a king now. I am your devotee, a Rajak. Give me a place at your feet."

Shri Guru began thinking. Now in this Kaliyug, cruelty will be increasing. It would be bestter if I disappear from here. He therefore thought of going to Gautami (Godavary). While returning to the math, the king seated Shri Guru in his palakhi and he took his padukas (sandals) in his hands and walked on foot behind the palakhi.

Shri Guru said, "You should ride on a horse as you are a king. Your persons will blame you for serving a Brahmin and a Sanyasi".

The king said, "I may be a king for the people, but for you I am your devotee, a Rajak. My body of iron is transformed into gold by your sight. All my desires are now fulfilled".

By this time all thee elephants, horses and soldiers of the King had reached the place. Shri Guru said, "Listen to me, ride a horse ".

The King first seated all the disciples of Shri Guru on the horses and then he rode a horse and the procession started ceremoniously.

Shri Guru then said to the king, "If we come with you, we cannot observe our rituals punctually. Therefore I will go ahead. You come to Papvinashi to see me".

Saying this, Shri Guru disappeared instantly with all his disciples and reached Bidar. Nagnath thee son of Sayamdeo met Shri Guru there. He worshiped Shri Guru and did a samaradhana. Then Shri Guru went to the Papvinnashi tirth.

The Muslim king was very sorry to see the disappearance of Shri Guru from the procession suddenly. But he remembered that he was asked by Shri Guru to see him at Papvinashi. He rode a swift horse and started for Papvinashi. He covered the distance of 88 miles in a day. He saw Shri Guru and again requested him to grace his city by holy presence.

The kind decorated his city with flags, buntings and arches. He seated Shri Guru in a Palakhi. Nine kinds of gems were waved on him. The citizens waved aarati at various places. The Muslims censured the king for serving for the Brahmins; but the Hindu citizens and Brahmins praised him for liberal, learned and pious.

The procession was going with musical instruments. Coins and clothes were being distributed to the poor. When the procession reached the main gate of palace, Shri Guru walked on the costly carpet spread on the path. Shri Guru was seated on the decorated throne and all the queens and children of the king bowed to Him respectfully. Shri Guru blessed the king and his family members and asked, "Are all your desires fulfilled by now?"

The king said, "I have fully enjoyed the royal glory I now wish to serve at your feet".

Shri Guru asked him to come to Shri Shailya and went to Gautami at Nasik. He bathed there and returned to Ganagapur. All the citizens were pleased to see that Shri Guru had come back safe.

Shri Guru called all the disciples and said, "Now I wish live secretly. Therefore I intend to go to Shri Shailya. Still I shall be staying at Ganagapur. If I live fear openly, the Muslims will come here daily and trouble me for fulfillment of their desires as the King himself had been here".

Contd.....

श्रीगणेशाय नमः ।

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । पूर्वीं रंजक-कथानका । तूंतें आपण निरोपिलें ॥१॥

तयानें मागितला वर । राज्यपद धुरंधर । प्रसन्न झाले तयासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥२॥

उपजला तो म्लेंच्छ जातींत । वैदुरीनगरीं राज्य करीत । पुत्रपौत्रीं नांदत । महानंदें परियेसा ॥३॥

ऐसा राजा तो यवन । होता आपण संतोषोन । अश्व गज अपार धन । पायभारा मिति नाहीं ॥४॥

आपण तरी यातिहीन । पुण्यवासना अंतःकरण । दानधर्म करी जाण । समस्त यातीं एकभावें ॥५॥

विशेष भक्ति विप्रांवरी । ती असे पूर्वसंस्कारीं । असती देवालयें भूमीवरी । उपद्रव नेदी तयांसी ॥६॥

तया घरचे पुरोहित । तया रायातें शिकवीत । आपण होऊन म्लेंच्छ जात । देवद्विज निंदावें ॥७॥

तयांतें तुम्ही सेवितां देख । तेणें होय अपार पातक । यातिधर्म करणें सुख । अनंत पुण्य असे जाणा ॥८॥

मंदमति द्विजजाती । देखा पाषाणपूजा करिती । समस्तांतें देव म्हणती । काष्‍ठवृक्षपाषाणांसी ॥९॥

धेनूसी म्हणती देवता होय । पृथ्वी सोम अग्नि सूर्य । तीर्थयात्रा नदीतोय । समस्तां देव म्हणताती ॥१०॥

ऐसे विप्र मंदमती । निराकारा साकार म्हणती । तयांतें म्लेंच्छ जे भजती । ते पावती अधःपात ॥११॥

ऐसे यवनपुरोहित । रायापुढें सांगती हित । ऐकोनि राजा उत्तर देत । कोपें करोनि परियेसा ॥१२॥

राजा म्हणे पुरोहितांसी । निरोपिलें तुम्हीं आम्हांसी । अणुरेणुतृणकाष्‍ठेंसी । सर्वेश्वर पूर्ण असे ॥१३॥

समस्त सृष्‍टि ईश्वराची । स्थावर जंगम रचिली साची । सर्वत्र देव असे साची । तर्कभेद असंख्य ॥१४॥

समस्त जातींची उत्पत्ति । जाणावी तुम्ही पंचभूतीं । पृथ्वी आप तेज वायु निगुती । आकाशापासाव परियेसा ॥१५॥

समस्तांची वृद्धि एक । जाणती मृत्तिका कुलाल लोक । नानापरीचीं करिती अनेक । भांडीं भेद परोपरी ॥१६॥

नानापरीच्या धेनु असती । क्षीर असे एकचि रीतीं । सुवर्ण जाण तेचि रीतीं । परोपरीचे अलंकार ॥१७॥

तैसा देह भिन्न जाण । परमात्मा एकचि पूर्ण । जैसा नभीं मृगलांछन । नाना घटीं दिसतसे ॥१८॥

दीप असे एक घरीं । वाती लाविल्या सहस्त्र जरी । समस्त होती दीपावरी । भिन्न भाव कोठें असे ॥१९॥

एकचि सूत्र आणोनि । नानापरीचे ओविती मणि । सूत्र एकचि जाणोनि । न पाविजे भाव भिन्न ॥२०॥

तैशा जाति नानापरी । असताती वसुंधरीं । समस्तांसी एकचि हरी । भिन्न भाव करुं नये ॥२१॥

आणिक तुम्ही म्हणाल ऐसें । पूजिती पाषाण देव कैसे । सर्वां ठायीं पूर्ण भासे । विश्वात्मा आहेचि ॥२२॥

प्रतिमापूजा स्वल्पबुद्धि । म्हणोनि सांगती प्रसिद्धीं । आत्माराम पूजिती विधीं । त्यांचे मतीं ऐसें असे ॥२३॥

स्थिर नव्हे अंतःकरण । म्हणोनि करिती प्रतिमा खूण । नाम ठेवोनि नारायण । तया नामें पूजिताती ॥२४॥

तयातें तुम्ही निंदा करितां । तरी सर्वां ठायीं पूर्ण कां म्हणतां । प्रतिष्‍ठाव्या आपुले मता । द्वेष आम्हीं न करावा ॥२५॥

या कारणें ज्ञानवंतीं । करुं नये निंदास्तुति । असती नानापरी जाती । आपुले रहाटीं रहाटती ॥२६॥

ऐशापरी पुरोहितांसी । सांगे राजा विस्तारेंसी । करी पुण्य बहुवसीं । विश्वास देवद्विजांवरी ॥२७॥

राजा देखा येणेंपरी । होता तया वैदुरीनगरीं । पुढें त्याचे मांडीवरी । स्फोटक एक उद्भवला ॥२८॥

नानापरीचे वैद्य येती । तया स्फोटकासी लेप करिती । शमन न होय कवणे रीतीं । महादुःखें कष्‍टतसे ॥२९॥

ऐसें असतां वर्तमानीं । श्रीगुरु असतां गाणगाभुवनीं । विचार करिती आपुले मनीं । राजा येईल म्हणोनिया ॥३०॥

येथें येतां म्लेंच्छ लोक । होईल द्विजां उपबाधक । प्रगट झालों आतां ऐक । आम्हीं येथें असूं नये ॥३१॥

प्रगट जहाली महिमाख्याति । पहावया येती म्लेंच्छ जाति । आतां रहावें आम्हीं गुप्तीं । लौकिकार्थ परियेसा ॥३२॥

आला ईश्वरनाम संवत्सरु । सिंहेसी आला असे गुरु । गौतमी तीर्थ थोरु । यात्राप्रसंगें जावें आतां ॥३३॥

म्हणती समस्त शिष्यांसी । करा आयती वेगेंसी । येतो राजा बोलावावयासी । जावें त्वरित गंगेला ॥३४॥

ऐसें ऐकोनि शिष्यजन । विचार करिती आपआपण । जरी येईल राजा यवन । केवी होय म्हणताती ॥३५॥

ऐसा मनीं विचार करिती । काय होईल पहा म्हणती । असे नरसिंहसरस्वती । तोचि रक्षील आपणांतें ॥३६॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । असतां गाणगापुरीं ख्याति । राजा यवना झाली मति । पूर्वसंस्कारीं परियेसा ॥३७॥

स्फोटकाचे दुःखें राजा । अपार कष्‍टला सहजा । नानापरी औषधें वोजा । करितां न होय तया बरवें ॥३८॥

मग मनीं विचार करी । स्फोटकें व्यापिलें अपरंपारी । वैद्याचेनि नोहे दूरी । काय करावें म्हणतसे ॥३९॥

बोलावूनि विप्रांसी । पुसे काय उपाय यासी । विप्र म्हणती रायासी । सांगतों ऐका एकचित्तें ॥४०॥

पूर्वजन्मीं पापें करिती । व्याधिरुपें होऊन पीडिती । दानधर्में तीर्थी दैवतीं । व्याधि जाय परियेसा ॥४१॥

अथवा भल्या सत्पुरुषासी- । भजा आपण भावेंसी । तयाचे दृष्‍टिसुधारसीं । बरवें होईल परियेसा ॥४२॥

सत्पुरुषाचे कृपादृष्‍टीं । पापें जाती जन्म साठी । मग रोग कैचा पोटीं । स्फोटकादि त्वरित जाय ॥४३॥

ऐकोनिया विप्रवचन । राजा करीतसे नमन । मातें तुम्ही न म्हणा यवन । दास आपण विप्रांचा ॥४४॥

पूर्वजन्मी आपण । केली सेवा गुरुचरण । पापास्तव झालों जाण । यवनाचे कुळीं देखा ॥४५॥

एखादा पूर्ववृत्तान्त । मातें निरोपावा त्वरित । महानुभावदर्शन होत । कवणाचा रोग गेला असे ॥४६॥

रायाचें वचन ऐकोनि । विचार करिती विप्र मनीं । सांगूं नये या स्थानीं । एकान्तस्थळ पाहिजे ॥४७॥

तुम्ही राव म्लेंच्छजाती । समस्त तुम्हां निंदा करिती । आम्ही असों द्विजजाती । केवी करावें म्हणताती ॥४८॥

विप्रवचन ऐकोन । विनवीतसे तो यवन । चाड नाहीं जातीवीण । आपणास तुम्हीं उद्धरावें ॥४९॥

ऐसें रायाचें अंतःकरण । अनुतप्त झालें असे जाण । मग निरोपिती ब्राह्मण । तया रायातें परियेसा ॥५०॥

विप्र म्हणती रायासी । स्थान बरवें पापविनाशी । जावें तुम्हीं सहजेंसी । विनोदार्थ परियेसा ॥५१॥

तेथें असे स्थळ बरवें । एकान्तस्थान पहावें । स्नान करावें मनोभावें । एकचित्तें परियेसा ॥५२॥

ऐकोनिया विप्रवचन । संतोषला राजा आपण । निघाला त्वरित तेथोन । आला पापविनाश तीर्थासी ॥५३॥

समस्तांतें राहवूनि । एकला गेला तया स्थानीं । स्नान करितां तये क्षणीं । आला एक यति तेथें ॥५४॥

राजा देखोनि यतीसी । नमन करी भावेंसी । दावीतसे स्फोटकासी । म्हणे उपशमन केवी होय ॥५५॥

ऐकोनि तयाचें वचन । सांगता झाला विस्तारोन । महानुभावाच्या दर्शनें । तूंतें बरवें होय जाणा ॥५६॥

पूर्वीं याचें आख्यान । सांगेन ऐक विस्तारोन । एकचित्तें करोनि मन । ऐक म्हणती तये वेळीं ॥५७॥

अवंती म्हणिजे थोर नगरी । तेथें होता एक दुराचारी । जन्मोनिया विप्र उदरीं । अन्य रहाटीं रहातसे ॥५८॥

आपण असे मदोन्मत्त । समस्त स्त्रियांसवें रमत । स्नानसंध्या त्यजूनि निश्चित । अन्यमार्गें वागतसे ॥५९॥

ऐसें दुराचारीपणें । रहाटतसे तो ब्राह्मण । पिंगला म्हणिजे वेश्या जाण । तयेसवें वर्ततसे ॥६०॥

न करी कर्म संध्यास्नान । रात्रंदिवस वेश्यागमन । तिचे घरीं भक्षी अन्न । येणेंपरी दोष केले ॥६१॥

ऐसें असतां वर्तमानीं । ब्राह्मण होता वेश्यासदनीं । तेथें आला एक मुनि । वृषभनामा महायोगी ॥६२॥

तया देखोनि दोघें जण । करिती साष्‍टांग नमन । भक्तिभावें करोन । घेवोनि आलीं मंदिरांत ॥६३॥

बैसवोनिया पीठावरी । पूजा करिती षोडशोपचारीं । अर्घ्यपाद्य देवोनि पुढारी । गंधाक्षता लाविती ॥६४॥

नाना परिम ळ पुष्प जाती । तया योगियासी समर्पिती । परिमळ द्रव्यें अनेक रीतीं । समर्पिलीं तया योगेश्वरा ॥६५॥

चरणतीर्थ घेऊन । पान करिती दोघेंजण । त्यांतें करविती भोजन । नानापरी पक्वान्नेंसी ॥६६॥

करवूनिया भोजन । केलें हस्तप्रक्षालन । बरवा पलंग आणोन । देती तया योगियासी ॥६७॥

तया मंचकीं निजवोन । तांबूल देती आणोन । करिती पादसंवाहन । भक्तिभावें दोघेंही ॥६८॥

निद्रिस्त झाला योगेश्वर । दोघें करिती नमस्कार । उभें राहोनि चारी प्रहर । सेवा केली भावेंसी ॥६९॥

उदय झाला दिनकरासी । संतोषला तो तापसी । निरोप घेऊनि संतोषीं । गेला आपुल्या स्थानाप्रती ॥७०॥

ऐसें विप्रें वेश्याघरीं । क्रमितां क्वचित्‌ दिवसांवरी । तारुण्य जाउनी शरीरीं । वार्धक्य पातलें तयासी ॥७१॥

पुढें तया विप्रासी । मरण आलें परियेसीं । पिंगला नाम वेश्येसी । दोघें पंचत्व पावलीं ॥७२॥

पूर्वकर्मानुबंधेंसी । जन्म झाला राजवंशीं । दशार्णवाधिपतिकुशीं । वज्रबाहूचे उदरांत ॥७३॥

तया वज्रबाहूपत्‍नी । नाम तिचें वसुमती । जन्मा आला तिचे पोटीं । तो विप्र परियेसा ॥७४॥

तया वज्रबाहूसी । ज्येष्‍ठ राणीच्या गर्भेसी । उद्‌भवला विप्र परियेसीं । राजा समारंभ करीतसे ॥७५॥

देखोनि तिचे सवतीसी । क्रोध आला बहु मानसीं । गर्भ झाला सपत्‍नीसी । म्हणोनि द्वेष मनीं धरी ॥७६॥

सर्पगरळ आणोनि । दिल्हें सवतीस नाना यत्‍नीं । गरळें भेदिलें अतिगहनीं । तया राजज्येष्‍ठ स्‍त्रियेसी ॥७७॥

दैवयोगें न ये मरण । सर्व शरीरीं झाले व्रण । चिंता करी अतिगहन । महाकष्‍ट भोगीतसे ॥७८॥

ऐशापरी राजयुवती । कष्‍टें झाली प्रसूति । उपजतां बाळका मातेप्रती । सर्वांग स्फोट वाहत ॥७९॥

विषें व्यापिलें सर्वांगासी । म्हणोनि आक्रंदती दिवानिशीं । दुःख करी राजा क्लेशीं । म्हणे काय करुं आतां ॥८०॥

देशोदेशींच्या वैद्यांसी । बोलाविती चिकित्सेसी । वेंचिती द्रव्य अपारेंसी । कांहीं केलिया बरवें नोहे ॥८१॥

तया माता बाळकासी । व्रण झाले बहुवसीं । निद्रा नाहीं रात्रीसी । सर्वांगीं कृमि पडले असती ॥८२॥

त्यांतें देखोनि रायासी । दुःख झालें बहुवसीं । निद्रा नाहीं दिवानिशीं । त्याचे कष्‍ट देखोनिया ॥८३॥

व्यथें करोनि मातासुत । अन्न उदक न वचे क्वचित । शरीरीं सर्व क्लेश होत । क्षीण झालें येणेंपरी ॥८४॥

राजा येऊनि एके दिवसीं । पाहे आपुले स्त्री-सुतासी । देखोनिया महाक्लेशी । दुःख करीतसे परियेसा ॥८५॥

म्हणें आतां काय करुं । केवी करणें प्रतिकारु । नाना औषधें उपचारु । करितां स्वस्थ नव्हेचि ॥८६॥

स्त्री-पुत्रांची ऐशी गति । जिवंत शवें झाली असती । यांच्या रोगासी होय शांति । केवी पाहूं म्हणतसे ॥८७॥

आतां यातें पहावयासी । कंटाळा येतो आम्हांसी । बरवें नव्हे सत्य यांसी । काय करणें म्हणतसे ॥८८॥

यांतें देखतां आम्हांसी । श्रम होती देहासी । नेवोनिया अरण्यासी । त्यांतें त्यजूं म्हणतसे ॥८९॥

जे जे असती पापीजन । त्यांतें जीवन अथवा मरण । भोगिल्यावांचोनि न सुटे जाण । आपुलें आपण भोगिजे ॥९०॥

विचार करोनि मानसीं । बोलाविलें कोळियासी । सांगतसे विस्तारेंसी । ऐका श्रोते एकचित्तें ॥९१॥

राजा म्हणे सूतासी । माझे बोल परियेसीं । नेऊनि आपुले स्त्री -पुत्रांसी । अरण्यांत ठेवावें ॥९२॥

मनुष्यांचा संचार । जेथें नसेल निर्धार । तेथें ठेवीं वेगवक्र । म्हणे राजा सूतासी ॥९३॥

येणेंपरी सूतासी । राजा सांगे विस्तारेंसी । रथा दिधला संजोगेंसी । घेऊनि गेला झडकरी ॥९४॥

तिचे दासदासी सकळ । दुःख करिती महाप्रबळ । माता पिता बंधु सकळ । समस्त प्रलाप करिताती ॥९५॥

दुःख करिती नर नारी । हा हा पापी दुराचारी । स्त्री-सुतांसी कैसेपरी । केवी यांतें मारवितो ॥९६॥

रथावरी बैसवोनि । घेवोनि गेला महारानीं । जेथें नसती मनुष्य कोणी । तेथें ठेविलीं परियेसा ॥९७॥

सूत आला परतोनि । सांगे रायासी विस्तारोनि । महाअरण्य दुर्गम वनीं । तेथें ठेविली म्हणतसे ॥९८॥

ऐकोनि राजा संतोषला । दुसरे स्त्रियेसी वृत्तान्त सांगितला । दोघांसी आनंद जाहला । वनीं राहिलीं मातासुत ॥९९॥

मातापुत्र दोघेंजण । पीडताती दुःखेंकरुन । कष्‍टती अन्नउदकावीण । महाघोर वनांत ॥१००॥

राजपत्‍नी सुकुमार । तिये शरीरीं व्रण थोर । चालूं न शके पृथ्वीवर । महाकंटक भूमीवरी ॥१॥

कडिये घेवोनि बाळकासी । जाय ती मंदगमनेंसी । आठवी आपुले कर्मांसी । म्हणे आतां काय करुं ॥२॥

तया वनीं मृगजाति । व्याघ्र सिंहादिक असती । सर्प थोर अपरिमिती । हिंडताती वनांत ॥३॥

मातें जरी व्याघ्र मारी । पापापासून होईन दुरी । पुरे आतां जन्म संसारीं । वांचोनि काय व्यर्थ जिणें ॥४॥

म्हणोनि जाय पुढें रडत । क्षणोक्षणीं असे पडत । पुत्रासहित चिंता करीत । जात असे वनमाजी ॥५॥

उदकाविणें तृषाक्रांत । देह व्रणें असे पीडित । व्याघ्रसर्पादि देखत । भयें चकित होतसे ॥६॥

देखे वेताळ ब्रह्मराक्षस । वनगज भालुका बहुवस । केश मोकळे पायांस । कांटे धोंडे लागताती ॥७॥

ऐसे महाअरण्यांत। राजश्री असे हिंडत । पुढें जातां देखिलें वनांत । गुरें चरती वाणियांचीं ॥८॥

तयांपासीं जावोनि । पुसतसे करुणावचनीं । गोरक्षकांतें विनवोनि । मागे उदक कुमारासी ॥९॥

गोरक्षक म्हणती तियेसी । जावें तुवां मंदिरासी । तेथें उदक बहुवसी । अन्न तूंतें मिळेल ॥११०॥

म्हणोनि मार्ग दाखविती । हळूहळू जाय म्हणती । राजपत्‍नी मार्ग क्रमिती । गेली तया ग्रामांत ॥११॥

तया ग्रामीं नरनारी । दिसताती अपरंपारी । ऐकोन आली मनोहरी । पुसे तयां स्त्रियांसी ॥१२॥

म्हणे कवण येथें राजा । संतोषी दिसे समस्त प्रजा । ऐकोनि सांगती वैश्यराजा । महाधनिक पुण्यात्मा ॥१३॥

त्याचें नांव पद्माकर । पुण्यवंत असे थोर । तूंतें रक्षील साचार । म्हणोनि सांगती तियेसी ॥१४॥

इतुकिया अवसरीं । तया वैश्याचे घरीं । दासी होत्या मनोहरी । त्याही आल्या तियेजवळी ॥१५॥

येवोनि पुसती वृत्तान्त । घेवोनि गेल्या मंदिरांत । आपल्या स्वामीसी सांगत । आद्यंतेंसीं विस्तारें ॥१६॥

तीस देखोनिया वैश्यनाथ । कृपा करी अत्यंत । नेऊनिया मंदिरांत । दिल्हें एक गृह तिसी ॥१७॥

पुसोनिया वृत्तान्त । वाणी होय कृपावंत । दिल्हें अन्नवस्त्र बहुत । नित्य तिसी रक्षीतसे ॥१८॥

ऐशी तया वैश्याघरीं । होती रायाची अंतुरी । वर्धतसे पीडा भारी । व्रण न वचे परियेसा ॥१९॥

येणेंपरी राजसती । तया वैश्याचे घरीं होती । वाढले व्रण तयांसी बहुती । प्राणांतक होतसे ॥१२०॥

वर्ततां ऐसें एके दिवसीं । मरण आलें कुमारकासी । प्रलाप करी बहुवसी । राजपत्‍नी तये वेळीं ॥२१॥

मूर्च्छा येऊनि तये क्षणीं । राजपत्‍नी पडे धरणीं । आपुलें कर्म आठवोनि । महाशोक करीतसे ॥२२॥

त्या वाणियाच्या स्त्रिया देखा । संबोखिताति ती बाळिका । कवणेंपरी तिचे दुःखा । शमन नोहे परियेसा ॥२३॥

नानापरी दुःख करी । आठवीतसे पूर्वापारी । म्हणे ताता माझ्या सौरी । कोठें गेलासी बाळका ॥२४॥

राजकुमारा पूर्णचंद्रा । माझ्या आनंदसमुद्रा । मातें धरिसी मौनमुद्रा । तूंतें काय बरवें असे ॥२५॥

मातापिता बंधुजन । सोडोनि आल्यें सकळ जाण । तुझा भरंवसा होता पूर्ण । मातें रक्षिसी म्हणोनिया ॥२६॥

मातें अनाथ करोनि । तूं जातोसि सोडोनि । मज रक्षिता नसे कोणी । प्राण त्यजीन म्हणतसे ॥२७॥

येणेंपरी राजनारी । दीर्घस्वरें रुदन करी । देखोनिया नरनारी । दुःख करिती परियेसा ॥२८॥

समस्तही दुःखाहुनी । पुत्रशोक केवळ वाहि । मातापितरांतें दाहोनि । भस्म करी परियेंसा ॥२९॥

येणेंपरी दुःख करितां । ऋषभ योगी आला त्वरिता । पूर्वजन्मींच्या उपकारार्था । पातला तेथें महाज्ञानी ॥१३०॥

योगियातें देखोनि । वंदिता झाला तो वाणी । अर्घ्यपाद्य देवोनि । उत्तम स्थानीं बैसविला ॥३१॥

योगी तया अवसरीं । पुसे कवण दीर्घस्वरीं । शोक करितसे अपारीं । कवण असे म्हणतसे ॥३२॥

सविस्तर वैश्यनाथ । सांगता जाहला वृत्तान्त । योगीश्वर कृपावंत । आला तिये जवळीक ॥३३॥

म्हणे योगी तियेसी । मूढपणें दुःख करिसी । कवण जन्मला भूमीसी । कवण मेला सांग मज ॥३४॥

देह म्हणिजे विनाशी जाण । जैसा गंगेंत दिसे फेण । व्यक्ताव्यक्त सवेंचि होय जाण । जलबुद्‌बुदापरी देखा ॥३५॥

पृथ्वी तेज वायु आप । आकाश मिळोनि सर्वव्याप । पंच गोठली शरीररुप । दिसत असे परियेसा ॥३६॥

पंच भूतें पांचांठायीं । निघोन जातां शून्य पाहीं । दुःख करितां अवकाश नाहीं । वृथा कां तूं दुःख करिसी ॥३७॥

गुणापासाव उत्पत्ति । निज कर्में होय निरुती । काळ नाचवी दृष्‍टिविकृतीं । वासना तयापरी जाणा ॥३८॥

मायेपासोनि माया उपजे । होय गुणें सत्त्वरजें । तमोगुणें तेथें सहजें । देहलक्षण येणेंपरी ॥३९॥

या तीन गुणांपासाव । उपजताती मनुष्यभाव । सत्त्वगुणें असती देव । रजोगुण मनुष्याचा ॥१४०॥

तामस तोचि राक्षस । जैसा गुण असे त्यास । तैसा जन्मे पिंडाभास । कधीं स्थिर नव्हेचि ॥४१॥

या संसारवर्तमानीं । उपजती नर कर्मानुगुणीं । जैसें अर्जित असे पूर्वपुण्यीं । सुखदुःखें घडती देखा ॥४२॥

कल्पकोटिवर्षांवरी । जिवंत असती सुर जरी । तेही न राहती स्थिरी । मनुष्यांचा काय पाड ॥४३॥

या कारणें ज्ञानीजनें । उपजतां संतोष न करणें । मेलिया दुःख न करणें । स्थिर नव्हे देह जाणा ॥४४॥

गर्भ संभवें जिये काळीं । विनाश म्हणोनि जाणती सकळी । कोणी मरती यौवनकाळीं । क्वचिद्वार्धक्यपाणीं जाणा ॥४५॥

जैसें कर्म पूर्वार्जित । तेणेंपरी असे घडत । मायामोहें म्हणत । सुत नरदेही हे ॥४६॥

जैसें लिखित ललाटेसी । ब्रह्मदेवें लिहिलें परियेसीं । कालकर्म उल्लंघावयासी । शक्ति न होय कवणा जाणा ॥४७॥

ऐसें अनित्य देहासी । कां वो माते दुःख करिसी । तुझी पूर्वपरंपरा कैसी । सांगा आम्हां म्हणतसे ॥४८॥

तूं जन्मांतरीं जाणा । कवणा होतीस अंगना । किंवा झालीस जननी कोणा । भगिनी कोणाची सांग पां ॥४९॥

ऐसें जाणोनि मानसी । वायां कां हो दुःख करिसी । जरी बरवें तूं इच्छिसी । शरण जाईं शंकरा ॥१५०

ऐसें ऐकोनि राजयुवती । करी ऋषभयोगिया विनंति । आपणासी झाली ऐसी गति । राज्यभ्रष्‍ट होऊनि आल्यें ॥५१॥

मातापिता बंधुजन । सोडोनि आलें मी रान । पुत्र होता माझा प्राण । भरंवसा मज तयाचा ॥५२॥

तया जहाली ऐशी गति । आपण वांचोनि काय प्रीति । मरण व्हावें मज निश्चिती । म्हणोनि चरणीं लागली ॥५३॥

ऐसें निर्वाण देखोनि । कृपा उपजली योगियामनी । पूर्व उपकार स्मरोनि । प्रसन्न झाला तये वेळीं ॥५४॥

भस्म काढोनि तये वेळीं । लाविलें प्रेताचे कपाळीं । घालितां त्याचे मुखकमळीं । प्राण आला परियेसा ॥५५॥

बाळ बैसला उठोनि । सर्वांग झालें सुवर्णवर्णी । मातेचे व्रणही तेच क्षणीं । जाते झाले तात्काळ ॥५६॥

राजपत्‍नी पुत्रासहित । करी योगियासी दंडवत । ऋषभयोगी कृपावंत । आणीक भस्म प्रोक्षीतसे ॥५७॥

तात्काळ तया दोघांसी । शरीर होय सुवर्णसंकाशी । शोभायमान दिसे कैसी । दिव्य काया उभयतांची ॥५८॥

प्रसन्न झाला योगेश्वर । तये वेळीं दिधला वर । तुम्हां न होय जराजर्जर । तारुण्यरुप चिरंजीवी ॥५९॥

तुझा सुत भद्रायुषी । कीर्ति वरील बहुवशी । राज्य करील परियेसीं । पित्याहूनि अधिक जाणा ॥१६०॥

ऐसा वर देऊनि । योगी गेला तेथोनि । ऐक राजा एकमनीं । सत्पुरुषाचें महिमान ॥६१॥

सत्पुरुषाची सेवा करितां । तुझा स्फोटक जाईल त्वरिता । तुवां न करावी कांहीं चिंता । दृढ धरीं भाव एक ॥६२॥

ऐसें यतीचें वचन ऐकोनि । राजा नमन करी तये क्षणीं । विनवीतसे कर जोडोनि । कोठें असे सत्पुरुष ॥६३॥

मातें निरोपावें आतां । जाईन आपण तेथें तत्त्वतां । मजला त्यांचें दर्शन होतां । होईल बरवें म्हणतसे ॥६४॥

ऐकोनि राजाचें वचन । सांगतसे मुनि आपण । भीमातीरीं गाणागाभुवन । असे तेथें परमपुरुष ॥६५॥

तयापासीं तुवां जावें । दर्शनमात्रें होईल बरवें । ऐकोनि राजा एकभावें । निघता झाला तये वेळीं ॥६६॥

एकभावें राजा आपण । घ्यावया श्रीगुरुदर्शन । प्रयाणावरी करी प्रयाण । आला गाणगापुरासी ॥६७॥

ग्रामीं पुसे सकळिकांसी । कोण येथें एक तापसी । रुप धरिलें संन्यासी । कोठें आहे म्हणतसे ॥६८॥

भयभीत झाले सकळिक । म्हणती आतां नव्हे निक । श्रीगुरुसी पुसतों ऐक । काय करील न कळे म्हणती ॥६९॥

कोणी न बोलती तयासी । राजा कोपला बहुवसी । म्हणे आलों भेटीसी । दावा आपणा म्हणतसे ॥१७०॥

मग म्हणती समस्त लोक । श्रीगुरु अनुष्‍ठानस्थान असे निक । अमरजासंगमीं माध्यान्हिक । करोनि येती ग्रामातें ॥७१॥

ऐसें ऐकोनि म्लेंच्छ देखा । समस्तां वर्जूनि आपण एका । बैसोनिया आंदोलिकां । गेला तया स्थानासी ॥७२॥

दुरोनि देखतां श्रीगुरुसी । चरणीं चाले म्लेंच्छ परियेसीं । जवळी गेला पहावयासी । नमन करुनि उभा राहे ॥७३॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कां रे रजका कोठें अससी । बहुत दिवशीं भेटलासी । आमचा दास होवोनिया ॥७४॥

ऐसें वचन ऐकोनि । म्लेंच्छ झाला महाज्ञानी । पूर्वजन्म स्मरला मनीं । करी साष्‍टांग दंडवत ॥७५॥

पादुकांवरी लोळे आपण । सद्‌गदित अंतःकरण । अंगीं रोमांच उठोन । आनंदबाष्पें रुदन करी ॥७६॥

पूर्वजन्मीं आठवोन देखा । रुदन करी अति दुःखा । कर जोडून विनवी ऐका । नाना परी स्तोत्र करी ॥७७॥

राजा म्हणे श्रीगुरुसी । कां उपेक्षिले आम्हांसी । झालों आपण परदेशी । चरणावेगळें केलें मज ॥७८॥

अंधकारसागरांत । कां घातलें मज येथ । मी होऊनि मदोन्मत्त । विसरलों चरण तुझे ॥७९॥

संसारसागरमायाजाळीं । बुडालों आपण दुर्मति केवळीं । सेवा न करीं चरणकमळीं । दिवांध झालों आपण ॥१८०॥

होतासि तूं जवळी निधान । न ओळखें आपण मतिहीन । तमांधकारीं वेष्‍टोन । तुझे चरण विसरलों ॥८१॥

तूं भक्तजनां नुपेक्षिसी । निर्धार होता माझे मानसीं । अज्ञानसागरीं आम्हांसी । कां घातलें स्वामिया ॥८२॥

उद्धरावें आतां मज । आलों आपण हेंचि काज । सेवोनि तुझे चरणरज । असेन आतां राज्य पुरे ॥८३॥

ऐसें नानापरी देखा । स्तुति करी राजा ऐका । श्रीगुरु म्हणती भक्त निका । तुझी वासना पुरेल ॥८४॥

राजा म्हणे श्रीगुरुसी । झाला स्फोटक आपणासी । व्यथा होतसे प्रयासी । कृपादृष्‍टीं पहावें ॥८५॥

ऐसें वचन ऐकोन । श्रीगुरु करिती हास्यवदन । स्फोटक नाहीं म्हणोन । पुसताती यवनासी ॥८६॥

राजा पाहे स्फोटकासी । न दिसे स्फोटक अंगासी । विस्मय करीतसे मानसीं । पुनरपि चरणीं माथा ठेवी ॥८७॥

राजा म्हणे स्वामियासी । तुझें प्रसन्नत्व आम्हांसी । राज्य पावलों संतोषीं । अष्‍टैश्चर्य माझें अवलोकावें ॥८९॥

भक्तवत्सल ब्रीद तुझें । वासना अर्थ पुरवीं माझे । इंद्रियसंसार उतरीं ओझें । लीन होईन तुझे चरणीं ॥१९०॥

श्रीगुरु म्हणती तयासी । आम्ही तापसी संन्यासी । येऊं नये तुझे नगरासी । महापातकें होती तेथें ॥९१॥

नगरीं नित्य धेनुहत्या । यवनजाति तुम्ही सत्या । जीवहिंसा मद्यपी कृत्या । वर्जावें आतां निर्धारें ॥९२॥

सर्व अंगिकार करोनि । राजा लागे दोन्ही चरणीं । म्हणे मी दास पुरातनीं । पूर्वापारीं दृष्‍टि देणें ॥९३॥

पूर्वी माझें जन्म रजक । स्वामीवचनें राज्य विशेख । पावोनि देखिलें नाना सुख । उणें एक म्लेंच्छजाति ॥९४॥

दर्शन होतां तुझे चरण । संतुष्‍ट झालें अंतःकरण । पुत्रपौत्र दृष्‍टीं पाहोन । मग मी राहीन तुझे सेवे ॥९५॥

ऐसें नानापरी देखा । राजा विनवी विशेखा । पाया पडे क्षणक्षणिका । अतिकाकुळती येतसे ॥९६॥

श्रीगुरु मनीं विचार करिती । पुढें होणार ऐसी गति । कलियुगीं असे दुर्जन जाति । गौप्य असतां पुढें बरवें ॥९७॥

सहज जावें सिंहस्थासी । महातीर्थ गौतमीसी । जावें हें भरंवसी । आतां आम्हीं गुप्त व्हावें ॥९८॥

ऐसें मनीं विचारुनि । श्रीगुरु निघाले संगमाहूनि । राजा आपुले सुखासनीं । बैसवी प्रीती करोनिया ॥९९॥

पादुका घेतल्या आपुले करीं । सांगातें येतसे पादचारीं । श्रीगुरु म्हणती आरोहण करीं । लोक निंदा तुज करिती ॥२००॥

राष्‍ट्राधिपति तुज म्हणती । जन्म तुझा म्लेंच्छजाती । ब्राह्मणसेवें तुज हांसती । जाति दूषण करितील ॥१॥

राजा म्हणे स्वामी ऐका । कैचा राजा मी रजका । तुझे दृष्‍टीं असे निका । लोह सुवर्ण होतसे ॥२॥

समस्तांसी राजा आपण सत्य । मी रजक तुझा भक्त । पूर्ण झाले मनोरथ । तुझें झालें दर्शन मज ॥३॥

इतुकिया अवसरीं । समस्त दळ मिळालें भारी । मदोन्मत्त अतिकुंजरी । वारु नाना वर्णाचे ॥४॥

उभा राहोनि राजा देखा । समस्त दाखवी सैन्यका । संतोष मनीं अति हरिखा । आपुलें ऐश्वर्य दाखवितसे ॥५॥

श्रीगुरु निरोपिती यवनासी । आरोहण करीं वारुवेसी । दूर जाणें असे नगरासी । निरोप आमुचा नको मोडूं ॥६॥

श्रीगुरुवचन ऐकोन । समस्त शिष्यांतें आरोहण । देता झाला तो यवन । आपण वाजीं आरुढला ॥७॥

आनंद बहु यवनाचे मनीं । हर्षनिर्भर न माये गगनीं । श्रीगुरुभेटी झाली म्हणोनि । अति उल्हास करीतसे ॥८॥

श्रीगुरुमूर्ति बोलाविती यवनासी । म्हणती झालों अतिसंतोषी । तूं भक्त केवळ गुणराशी । संतुष्‍ट झालों आपण आजी ॥९॥

आम्ही संन्यासी तापसी । नित्य करावें अनुष्‍ठानासी । तुम्हांसमागमें मार्गासी । न घडे वेळीं संध्यादिक ॥२१०॥

यासी उपाय सांगेन । अंगिकार करावा जाण । पुढें जाऊं आम्ही त्वरेनें । स्थिर यावें तुम्हीं मागें ॥११॥

पापविनाशी तीर्थासी । भेटी होईल तुम्हांसी । ऐसें म्हणोनि रायासी । अदृश्य झाले गुरुमूर्ति ॥१२॥

समस्त शिष्यांसहित । श्रीगुरु गुप्त झाले त्वरित । मनोवेगें मार्ग क्रमित । गेले वैदूरपुरासी ॥१३॥

पापविनाशी तीर्थासी । श्रीगुरु पातले त्वरितेंसी । राहिले तेथें अनुष्‍ठानासी । समस्त येती भेटावया ॥१४॥

साखरे सायंदेवाचा सुत । भेटीस आला नागनाथ । नानापरी पूजा करीत । समाराधना आरंभिली ॥१५॥

श्रीगुरु नेऊनि आपुले घरा । पूजा केली षोडशोपचारा । आरती करोनि एक सहस्त्रा । समाराधना करी बहुत ॥१६॥

इतुकें होतां झाली निशी । श्रीगुरु म्हणती नागनाथासी । सांगोनि आलों म्लेंच्छासी । पापविनाशीं भेटूं म्हणोनि ॥१७॥

जाऊं आतां तया स्थानासी । राहतां यवन येईल परियेसीं । उपद्रव होईल ब्राह्मणांसी । विप्रघरा म्लेंच्छ येती ॥१८॥

ऐसें सांगोनि आपण । गेले पापविनाशीं जाण । शुभासनीं बैसोन । अनुष्‍ठान करीत होते ॥१९॥

इतुकिया अवसरीं । राजा इकडे काय करी । गुरुनाथ न दिसती दळभारीं । मनीं चिंता बहु वर्तली ॥२२०॥

म्हणे कटकटा काय झालें । गुरुनाथें मज उपेक्षिलें । काय सेवे अंतर पडलें । तेणें गेले निघोनिया ॥२१॥

मागुती मनीं विचारी । पुढें जातों म्हणोनि येरी । पापविनाशी तीर्थातीरीं । भेटी देतों म्हणितलें ॥२२॥

न कळे महिमान श्रीगुरुचें । कोण जाणें मनोगत त्यांचें । दैव बरवें होतें आमुचें । म्हणोनि चरणांचें दर्शन झालें ॥२३॥

राजस्फोटक होता मज । आलों होतों याचि काज । कृपानिधि श्रीगुरुराज । भेटी झाली पुण्य माझें ॥२४॥

पुढें गेले निश्चित । म्हणोनि मनीं विचार करित । दिव्य अश्वावरी आरुढोनि त्वरित । निघाला राजा परियेसा ॥२५॥

चतुश्चत्वारिंशत्‌ क्रोश देखा । राजा पातला दिवसें एका । पापविनाशी तीर्थीं देखा । अवलोकितसे श्रीगुरुसी ॥२६॥

विस्मय करी अति मानसीं । येऊनि लागला चरणांसीं । विनवीतसे भक्तींसी । गृहाप्रति यावें म्हणतसे ॥२७॥

नगर सर्व श्रृगांरिलें । प्रवाळ-मोतियां तोरण केलें । गुडिया मखर उभारविलें । समारंभ थोर नगरांत ॥२८॥

बैसवोनिया पालखींत । आपण चरणचालीं येत । नवरत्‍न असे ओवाळित । नगर लोक आरत्या आणिती ॥२९॥

ऐशा समारंभें राजा देखा । घेऊनि गेला गुरुनायका । विस्मय झाला सकळ लोकां । महदाश्चर्य म्हणताती ॥२३०॥

लोक म्हणती म्लेंच्छजाती । पहा हो विप्रपूजा करिती । राजा अनाचारी म्हणती । जातिधर्म सांडिला आजी ॥३१॥

ज्याचें पाहूं नये मुख । त्याची सेवा करी देख । राजा नष्‍ट म्हणोनि सकळिक । म्लेंच्छजाती बोलती ॥३२॥

विप्रकुळ समस्त देख । संतोष करिती अतिकौतुक । राजा झाला विप्रसेवक । आतां बरवें राज्यासी ॥३३॥

ऐसा राव असतां । महाराष्‍ट्रधर्मीं वर्ततां । आपुला द्वेष तत्त्वतां । न करील जाण पां ॥३४॥

ऐसा राजा असतां बरवें । ज्ञानवंत असे स्वभावें । ब्रह्मद्वेषी नव्हे पहावें । पुण्यश्लोक म्हणती ऐसा ॥३५॥

नगरलोक पहावया येती । नमस्कारिती अतिप्रीतीं । राजे चरणचालीं येती । लोक म्हणती आश्चर्य ॥३६॥

एक म्हणती हा होय देव । म्हणोनि भजतो म्लेंच्छराव । या कलियुगीं अभिनव । देखिलें म्हणताती सकळिक ॥३७॥

सवें वाजंत्र्यांचे गजर । बंदीजन वाखाणिती अपार । राजा हर्षें निर्भर । घेऊनि जातो गुरुसी ॥३८॥

नानापरीचीं दिव्य वस्त्रें । वांटीतसे राजा पवित्रें । द्रव्य ओवाळुनि टाकी पात्रें । भिक्षुक तुष्‍टले बहुत देखा ॥३९॥

ऐशा समारंभें देखा । घेऊनि गेला राजा ऐका । महाद्वारीं पातलें सुखा । पायघडया अंथरती ॥२४०॥

नानापरीचीं दिव्यांबरें । मार्गीं अंथरती अपारें । वाजती भेरी वाजंत्रें । राजगृहा पातले ॥४१॥

मरासिंहासनस्थानीं । श्रृंगार केला अतिगहनीं । जगद्‌गुरुतें नेऊनि । सिंहासनीं बैसविलें ॥४२॥

राजमंदिरींच्या नारी । आरत्या घेऊनिया करीं । ओवाळिती हर्षनिर्भरीं । अनन्यभावें करोनियां ॥४३॥

समस्त लोक बाहेर ठेवोन । श्रीगुरु होते एकले आपण । सवें शिष्य चवघेजण । जवळी होते परियेसा ॥४४॥

अंतःपुरींचे कुलस्त्रियांसी । पुत्रपौत्रीं सहोदरासी । भेटविलें राजें परियेसीं । साष्‍टांगीं नमन करिती ते ॥४५॥

राजा विनवी स्वामियासी । पुण्यें देखिलें चरणांसी । न्याहाळावें कृपादृष्‍टीसी । म्हणोनि चरणीं लागला ॥४६॥

संतोषले श्रीगुरुमूर्ति । तयांसी आशीर्वाद देती । राजयातें बोलाविती । पुसताती गृहवार्ता ॥४७॥

श्रीगुरु म्हणती तयासी । संतुष्‍ट झालास कीं मानसीं । अजूनि व्हावें कांहीं भावेंसी । विस्तारोनि सांग म्हणती ॥४८॥

राजा विनवी स्वामियांसी । अंतर पडतें चरणासी । राज्य केलें बहुवसीं । आतां द्यावी चरणसेवा ॥४९॥

ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । आमुची भेटी श्रीपार्वतीं । तुझे पुत्र राज्य करिती । तुवां यावें भेटीसी ॥२५०॥

ऐसा निरोप देऊनि । श्रीगुरु निघाले तेथोनि । राजा विनवी चरण धरोनि । ज्ञान मजला असावें ॥५१॥

कृपासिंधु गुरुनाथ । ज्ञान होईल ऐसें म्हणत । आपण निघाले त्वरित । गेले गौतमी- तीरासी ॥५२॥

स्नान करोनि गौतमीसी । आले गाणगापुरासी । आनंद झाला समस्तांसी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥५३॥

संतुष्‍ट झाले समस्त लोक । पहावया येती कौतुक । वंदिताती सकळिक । आरती करिती मनोभावें ॥५४॥

समस्त शिष्यांतें बोलाविती । श्रीगुरु त्यांसी निरोपिती । प्रगट झाली बहु ख्याति । आतां रहावें गुप्तरुपें ॥५५॥

यात्रारुपें श्रीपर्वतासी । निघावें आतां परियेसीं । प्रगट बोले हेचि स्वभावेंसी । गुप्तरुपें राहूं तेथें ॥५६॥

स्थान आपुलें गाणगापुरीं । येथूनि न वचे निर्धारीं । लौकिकमतें अवधारीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥५७॥

प्रगट करोनिया यात्रेसी । वास निरंतर गाणगाभुवनासी । भक्तजन तारावयासी । राहूं येथें निर्धार ॥५८॥

कठिण दिवस युगधर्म । म्लेंच्छराजा क्रूरकर्म । प्रगटरुपें असतां धर्म । समस्त म्लेंच्छ येती ॥५९॥

राजा आला म्हणोनि । समस्त यवन ऐकोनि । सकळ येती मनकामनी । म्हणोनि गुप्त असावें ॥२६०॥

ऐसें म्हणोनि शिष्यांतें । सांगितलें श्रीगुरुनाथें । सिद्ध सांगे नामधारकातें । चरित्र ऐसें श्रीगुरुचें ॥६१॥

पुढें येतील दुर्दिन । कारण राज्य यवन । समस्त येती करावया भजन । म्हणोनि गुप्त राहिले ॥६२॥

लौकिकार्थ दाखवावयासी । निघाले आपण श्रीशैल्यासी । कथा असे विशेषी । सिद्ध म्हणे नामधारका ॥६३॥

गंगाधराचा सुत । सरस्वती असे विनवीत । प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ । देखिलें असे गाणगापुरीं ॥६४॥

सद्भावें भजती भक्तजन । त्यांची कामना होईल पूर्ण । संदेह न धरीं अनुमान । त्वरित सिद्धि असे जाणा ॥६५॥

न लागतां कष्‍ट सायास । कामना पुरती गाणगापुरास । भक्तिभावें विशेष । कल्पवृक्ष तेथें असे ॥६६॥

जें जें कल्पिलें फळ । त्वरित पावती सकळ । धनधान्यादि विपुळ । पुत्रपौत्रादि शीघ्र होती ॥६७॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । हें गुरुचरित्र दिनीं निशीं । मनोभावें वाचनेंसी । सकळ कामना पुरतील ॥६८॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्ध नामधारका सांगत । यवनाचा उद्धार येथ । तुम्हांकारणें सांगितला ॥२६९॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सार्वभौमस्फोटकशमने ऐश्वर्यावलोकने वैदुरीप्रवेशो नाम पंचाशत्तमोऽध्यायः ॥५०॥
ओवीसंख्या ॥२६९॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥

क्रमशः

Tuesday, February 22, 2011

Gurucharitra - Adhyay 49

Chapter 49 Importance of Guru-Geeta and method of recitation is described.

CHAPTER 49

The Gist of Guru Geeta.

Namdharak bowed to Shri Siddhamuni with folded hands and said, "gurudeo, you have narrated to me the life of Shri Guru and have given me the real gnyan(knowledge) which has wiped off my karma and by your blessing, I have known the essence of religion. Devotion to Shri Guru is like the Kalpataru and Rishis like Vashishta and Shuka also follow this path. Now kindly tell me the path of Sadguru."

Being pleased with the question, Shri Siddha said, "Namdharak, you are very fortunate as you as you have asked question regarding the eternal principles, knowing with illusion and ignorance are wiped off and the mind becomes becomes as clear as the light of the sun.

Once when Shri Shankar was sitting on a beautiful point of Kailas, dDevi Parvati with folded hands said to him with devotion, "Great God of Gods, Guru of the universe, give me Gurumantra and kindly tell me the means by which one's soul becomes united with Brahma".

Shri Shankar said, "Dear Devi, this is a question which has never been asked to me so far by anybody. You are my second form. So I shall tell you this gist and this will benefit all the people also".

Veda, Shastra, Purana, Ithihas, Mantra-tantravidya, Smriti-jaran-maran(using the power doing miracles by the devotees of shiva and shakti) and other various sciences put one in illusion. Without knowing the gist of devotion to Guru, people perform sacrifices, observe penance, vrat, charity, recitation and go to the holy places but only after the rise of the light of Shri Guru, difficult vidya, worldly illusion and ignorance are all wiped off. By serving Shri Guru, all sins perish and the soul becomes pure and united with Brahma.

Taking the holy water, touched by the lotus like feet of Shri Guru, is like a bath at a holy place. This Tirth is as holy as Kashi or Prayag.

Always remember Shri Guru. Recite Shri Guru's name all the time. Obey his orders, serve and worship Shri Guru with devotion. Doing this, one can even attain my position.

The alphabet 'Gu' means darkness and 'Ru' means light. Guru means the knowledge of the light of Brahma, that destroys darkness of ignorance. 'Gu' is the first alphabet to create illusion and other attributes. 'Ru' is the second alphabet of Brahma which destroys illusion and vain appearance. This power of Guru is supreme and is difficult even for the Gods to obtain.

A Sadhak (disciple) should offer to Shri Guru good seat, bed, clothes, ornaments, conveyances etc. He should serve him with devotion for getting one's position, ashram, caste and pray him with body, senses, money, son, wife, etc. clearly and should not be ashamed to lay prostrate before him.

Men go to hell by living in family life as one's body is full of worms, night-soil, urine, phelgm, blood, flesh and bad odor. Bow to Shri Guru, who liberates a person from the worldly miseries.

Shri Guru is Brahma, Vishnu and Mahesha and Para-Brahma. He is the cause of the creation of Universe, liberator of persons from this worldly sea and giver of the knowledge of all the vidyas.

By applying the ointment of Shri Guru's knowledge to one's eyes, closed eyes are opened, parents, brothers, and good men who give real knowledge of worldly life, are all Gurus. Though there is diversity in the universe, yet there is oneness. Shri Guru protects one from all difficulties, showing the cause and effect.

If Shri Shankar or Shri Vishnu are enraged, Shri Guru protects the devotees, but when Shri Guru himself is enraged, even Shri Shankar or Shri Vishnu cannot protect them.

Just as the blind man cannot see the light of the Sun, so the dull persons do not see the nectar-like appearance of Shri Guru, which is visible only to the eyes of the thoughtful. Shri Guru is like a monarch, who is witnessing the drama of creation and destruction of the universe.

Three Nath, Ganesh, 3 Bhairava Peethas, Siddha, 3 Batus, 2 Pad, 3 Dooties, Shri Shankar, 4, 6, 8, 9 Veeresh, 5 Veeravalies are all associated with the best 'Shri Malini' mantra. Bow to this Shri Guru mandal.

To think about Shri Guru's body is like thinking about everlasting Shri Shiva and to recite Shri Guru's name to praise to eternal Shiva's qualities.

Shri Guru is birth-less, devoid of old age and has no beginning. He is self created, devoid of change, full of bright bliss, minutest of the minute, greatest of the great and eternal. He is self shining, spotless, sky pervading, everlasting and has no decrease. Vedas and Manu describe Shri Guru's penance in this way. Therefore always remember Shri Guru.

By the knowledge of self, which is pervading all the universe, movable and immovable, sins of several births are atoned. There are no greater principle than the knowledge of self. There is no greater penance than the service of Shri Guru and there is no deeper knowledge than the advice of Shri Guru.

Shri Guru is Jagannath (lord of the universe) and the Guru of the 3 Lokas. Shri Guru is the universe and our soul is the soul of all the creation. Bow to Shri Guru, who gives this knowledge.

The persons, who are proud of penance and knowledge and who are engrossed in the worldly affairs, are like the pots moving on the wheel of a pot-maker. Gods, Gandharvas, fore fathers, yaksh, kinnar, rishi, siddha, who do not serve Shri Guru do not get salvation.

Bow to Shri Guru, who is supreme joy and who gives the best pleasure. He is shrine of knowledge, above division, sky pervading, knowing of 'Tattwam Asi' (that thou art) principle, only one, eternal, pure, immovable, who witnesses everything and who is devoid of existence and three qualities(Satwa,Raj and Tam).

To know one's self is the supreme knowledge and the utmost goal of life. This is attained only by the favour of Shri Guru.

Remember Shri Guru till death. Even if he is fickle minded, do not forget or forsake him.

The wise should not speak about Shri Guru with disrespect. Do not tell a lie before him.

Those who despise Shri Guru go to hell. Those who discuss vainly with Shri Guru become Brahma Rakshas and have to live in barren and waterless places.

Oh Parvati, Shri Guru protects his disciples, even if god, muni or pannag curses. Gods and munies are weak before Shri Guru, whose curses can destroy them in no time.

O Devi, according to Smrities and Vedas, Shri Guru is Parabrahma. Guru is a mantra of two syllables.

Bow to Shri Guru, who is pervading all the universe from Brahma to grass, who is eternal, whole, formless, devoid of qualities, engrossed in self-knowledge, above divisions and full of real bright-joy (sat-chit-anand rup).

Brahma is eternal like fragrance in camphor and flowers and like the coolness and warmth in an object. This knowledge can be got only through Shri Guru. So worship and serve him with pure and clear heart and singular devotion. One, who is united with Brahma in meditation, realises Kundalini, Brahma Randhra and formlessness and gets salvation without doubt.

The ignorant wins over the worldly sea and the wise besides gets knowledge of actions and no-actions by following the path of Shri Guru.

Those, who read, hear or write Shri Guru Geeta and give it in charity with money, all their desires are fullfilled. Always read Sri Guru-Geeta to get rid of the miseries of the wordly life.

Each and every syllable of Guru-Geeta enables to win death, remove all difficulties and fear of yaksha, Rakshas, ghosts, thieves, tigers and diseases. It gives the power of using Bhasma, mesmerism and hypnotism.

O Devi, read Shri Guru-Geeta, sitting on a site of kush grass(dharbhasan) or white blanket withattentive mind. Use a white seat for peace, red for mesmerising, black for punishing the evildoers and yellow for getting wealth. For peace, sit facing the north, for mesmerising facing the east, for punishing the evildoers facing the south and for wealth facing the west.

Recitation of Guru-Geeta, gives one incentive power, develops one's qualities, destroys evil acts, makes good acts successful, removes fear of Grahas(planets), destroys evil dreams, gives issues even to sterile women, gives goodluck to the married women(keep their husbands alive all their lives) and gives peace of mind.

If a widow reads Shri Guru-Geeta without object, she gets salvation. If she reads with desire, she will get a good husband in the next birth and all her miseries, difficulties and curses will perish.

Shri Guru-Geeta is like a Kamadhenu to those who read it with some expectation. It is like a kalpataru to those, who read with desires. It is like a chintamani to the thinkers of everything good. If you read it for salvation you get salvation, if you read it for worldly pleasures, you will get them.

One can read Shri Guru-Geeta with some object, sitting on a bank of a river or the sea shore, in the mandir of Vishnu, Shiva, Devi or other God, math, cowshed, under vat, awala, mango tree or near a plant of Tulsi or dhotra or in the cremation ground at aa lonely but clean and neat place.

Even though a devotee of Shri Guru may be a fool, still he is great, all his good acts, penance, vrat, diksha become successful. They are never futile.

As Shri Guru knows Brahma, he is always pure and whereever he goes, there is the presence of God, Tirth and Peeth. One who reads Guru-Geeta sitting or lying on a bed, standing, walking, speaking, riding on a horse or an elephant, is pure. He has no rebirth.

A soul is one with God, just as the water in the sea, the milk in the milk pot, the ghee in the ghee-pot and the sky in the broken pot are one with them, similarly the Dnyani(learned), is united with God and lies lost in himself day and night.

O Parvati, when one is blessed by Shri Guru, all his doubts vanish, goddess Saraswati resides on his tongue and he gets both the pleasures and salvation by the favour of Shri Guru. One's recitation, vrat and penance of several births bear fruit.

O Waranane (having good face), I told you, this principle of Sankhya sastra One God, one religion, one devotion, one penance are nothing else but Shri Guru himself. There is no higher principle than that of Shri Guru.

The home, where is devotion of Shri Guru, parents, family and race, is fortunate. Those, who do not adore Shri Guru due to Vanity of knowledge and penance, are unfortunate.

Even to Brahma, Vishnu, Mahesh, Gods, Rishi, Forefathers, kinnar, siddha, charan, yaksh, munies, the favour of Shri Guru, is like the great holy Tirth. Shri Guru's Tirth is the root of all the Tirths.

If one reads Shri Guru-Geeta in travel, or during war, at the time of the attack of an enemy, he gets victory in life and salvation at death.

If Shri Guru-Geeta is read with evil acts, at evil places and with fickle mind, it gives evil effects.

As you are dear to me, I have told this gist to you. Keep it with yourself. Tell this to one, who is not engrossed in worrdly pleasures and has devotion; but do not tell it to him, who is not devoted, who is a deceit, cunning, atheist and who discusses vainly.

Here ends the gist of Shri Guru-Geeta in the form of a dialogue between Ishwar and Parvati, included in the Uttarkhand of Skand Purana.

Contd....

श्रीगणेशाय नमः ।

नामधारक शिष्य सगुण । सिद्धमुनीतें नमन करुन । विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरोनिया ॥१॥

त्रैमूर्तीचा अवतार । झाला वेषधारी नर । राहिला प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणोनिया ॥२॥

भूमीवरी प्रख्यात । तीर्थें असती असंख्यात । समस्त सांडोनिया येथ काय कारण वांस केला ॥३॥

या स्थानाचें महिमान । सांगा स्वामी विस्तारोन । म्हणोनि धरी सिद्धाचे चरण । नामधारक तये वेळीं ॥४॥

ऐकोन तयाचें वचन । सिद्धमुनि संतोषोन । सांगतसे विस्तारोन । ऐका श्रोते एकचित्तें ॥५॥

आश्विन वद्य चतुर्दशीसी । दिपवाळी पर्वणीसी । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । स्नान करावें त्रिस्थळीचें ॥६॥

गया-प्रयाग-वाराणशीसी । चला यात्रे पुत्रकलत्रेंसी । विप्र म्हणती श्रीगुरुसी । आइती करणें म्हणोनिया ॥७॥

ऐकोन श्रीगुरु हांसती । ग्रामजवळी तीर्थें असती । करणें न लागे तुम्हां आइती । चला नेईन तुम्हांसी ॥८॥

ऐसें म्हणोनि भक्तांसी । गेले अमरजासंगमासी । स्नान केलें महाहर्षीं । शिष्यांसहित श्रीगुरुंनीं ॥९॥

गुरु म्हणती शिष्यांसी । महिमा अपार संगमासी । प्रयागसमान परियेसीं । षट्‌कुळामध्यें स्नान करणें ॥१०॥

विशेष नदी भीमातीर । अमरजासंगम थोर । गंगा यमुना वाहे निर्धार । तीर्थ बरवें परियेसा ॥११॥

विशेषें आपण उत्तरे वाहे । याचें पुण्य अपार आहे । शताधिक पुण्य पाहे । काशीहून परियेसा ॥१२॥

आणिक अष्‍ट तीर्थें असती । तयांचा महिमा विख्यात जगतीं । सांगेन ऐका एकचित्तीं । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी ॥१३॥

ऐकोन श्रीगुरुचें वचन । विनविताती भक्तजंन । अमरजानदी नाम कोण । कोणापासाव उत्पत्ति ॥१४॥

श्रीगुरु म्हणती भक्तांसी । बरवें पुसिलें आम्हांसी । जालंधर पुराणासी । असे कथा प्रख्यात ॥१५॥

जालंधर नामें निशाचर । समस्त जिंकिलें सुरवर । आपुलें केलें इंद्रपुर । समस्त देव पळाले ॥१६॥

देवा दैत्यां झालें युद्ध । सुरवर मारिले बहुविध । इंद्रें जाऊनि प्रबोध । ईश्वराप्रती सांगितला ॥१७॥

इंद्र म्हणे ऐक शिवा । दैत्यें मारिलें असे देवां । शीघ्र प्रतिकार करावा । म्हणोनि चरणीं लागला ॥१८॥

आम्ही मारितों दैत्यांसी । रक्त पडतसे भूमीसी । अखिल दैत्यबिंदूंसी । अधिक उपजवी भूमीवरी ॥१९॥

स्वर्ग मृत्यु पाताळ । सर्वत्र मारिलें दैत्यकुळ । मारिले आमुचे देव सकळ । म्हणोनि आलों तुम्हांपासीं ॥२०॥

ऐसें वचन ऐकोनि । ईश्वर प्रज्वाळला मनीं । निघाला रुद्र होऊनि । दैत्यनिर्दाळण करावया ॥२१॥

इंद्र विनवी ईश्वरासी । वधावया दैत्यांसी । जीवन आणावया देवांसी । ऐसा प्रतिकार करावा ॥२२॥

संतोषोनि गिरिजारमण । अमृतमंत्र उच्चारोन । घट दिधला तत्क्ष्ण । संजीवनी उदक देखा ॥२३॥

तें उदक घेवोनि इंद्रराव । शिंपताचि समस्त देव । उठोनिया अमर सर्व । स्वर्गास जाती तये वेळीं ॥२४॥

उरलें अमृत घटीं होतें । घेऊनि जातां अमरनाथें । पडिलें भूमीं अवचितें । प्रवाह आला क्षितीवरी ॥२५॥

ते संजीवनी नामें नदी । उद्‌भवली भूमीं प्रसिद्धी । अमरजा नाम याचि विधीं । प्रख्यात झाली अवधारा ॥२६॥

या कारणें या नदीसी । जे स्नान करिती भक्तींसी । काळमृत्यु न बाधे त्यासी । अपमृत्यु घडे केवी ॥२७॥

शतायुषी पुरुष होती । रोगराई न पीडिती । अपस्मारादि रोग जाती । ब्रह्महत्यादि पातकें ॥२८॥

अमृतनदी नाम तियेसी । संगम झाला भीमरथीसी । तीर्थ झालें प्रयागसरसी । त्रिवेणीचा संगम ॥२९॥

कार्तिकादि माघमासीं । स्नान करिती भक्तींसी । इह सौख्य परलोकासी । मोक्षस्थाना पावती ॥३०॥

सोम-सूर्य-ग्रहणासी । संक्रमण सोम-अमावास्येसी । पुण्यतिथि एकादशीसी । स्नान करावें अनंत पुण्य ॥३१॥

साधितां प्रतिदिवस जरी । सदा करावें मनोहरी । समस्त दोष जाती दूरी । शतायुषी श्रियायुक्त होय ॥३२॥

ऐसा संगममहिमा ऐका । पुढें सांगतसें तीर्थ विशेखा । दिसे अश्वत्थ संमुखा । मनोहर तीर्थ असे ॥३३॥

या तीर्थी स्नान केलिया । मनोहर पाविजे काया । कल्पवृक्षस्थानीं अनुपम्या । कल्पिलें फळ पाविजे ॥३४॥

अश्वत्थ नव्हे हा कल्पतरु । जाणावें तुम्हीं निर्धारु । जें जें चिंतिती मनीं नरु । पावती काम्यें अवधारा ॥३५॥

ऐसें मनोहर तीर्थ । ठावें असे प्रख्यात । संमुख असे अश्वत्थ । सदा असो याचिया गुणें ॥३६॥

जे जन येऊनि सेवा करिती । तयांचे मनोरथ पुरती । न धरावा संदेह आतां चित्तीं । ऐसें म्हणती श्रीगुरुनाथ ॥३७॥

आम्ही वसतों सदा येथें । ऐसें जाणा तुम्ही निरुतें । दृष्‍टीं पडतां मुक्ति होते । खूण तुम्हां सांगेन ॥३८॥

कल्पवृक्षातें पूजोनि । मग जावें शंकरभुवनीं । संगमेश्वर असे त्रिनयनी । पूजा करावी मनोभावें ॥३९॥

जैसा पर्वती मल्लिकार्जुन । तैसा संगमीं रुद्र आपण । भक्तिपूर्वक प्रदक्षिण । करावी तुम्ही अवधारा ॥४०॥

नंदिकेश्वरातें नमोनि । नमन करावें चंडस्थानीं । पूर्ण नदीं सव्य करोनि । मग जावें सोमसूत्रासी ॥४१॥

सवेंचि परतोनि वृषभासी । नमोनि जावें चंडापासीं । पुनः जावें सोमसूत्रासी । येणें विधीं प्रदक्षिणा ॥४२॥

ऐसी प्रदक्षिणा देखा । तीन वेळां करोनि ऐका । वृषभस्थानीं येऊनि निका । अवलोकावें शिवासी ॥४३॥

वामहस्तीं वृषण धरोनि । तर्जनी अंगुष्‍ठ शृंगीं ठेवोनि । पूजा पहावी दोनी नयनीं । इंद्रासमान होय नर ॥४४॥

धनधान्यादि संपत्ति । लक्ष्मी राहे अखंडिती । पुत्र पौत्र त्यासी होती । संगमेश्वर पूजिलिया ॥४५॥

पुढें तीर्थ वाराणशी । अर्घ कोश परियेसीं । ग्राम असे नागेशी । तेथोनि उद्‌भव असे जाण ॥४६॥

याचें असे आख्यान । कथा नव्हे प्रत्यक्ष जाण । होता एक ब्राह्मण । भारद्वाज गोत्राचा ॥४७॥

विरक्त असे ईश्वरभक्त । सर्वसंग त्याग करीत । आपण रत अनुष्‍ठानांत । सदा ध्याई शिवासी ॥४८॥

प्रसन्न झाला चंद्रमौळी । सदाशिव दिसे जवळी । विप्रा आल्हाद सर्व काळीं । देहभाव विसरोनि हिंडत ॥४९॥

लोक म्हणती पिसा त्यासी । निंदा करिती बहुवसीं । दोघे बंधु असती तयासी । नामें त्यांचीं अवधारा ॥५०॥

एका नाम असे ईश्वर । दुसरा नामें असे पांडुरंगेश्वर । बंधु एकला करोनि अव्हेर । आपण निघाले काशीसी ॥५१॥

करोनिया सर्व आइती । सर्व निघाले त्वरिती । तया पिशातें पाचारिती । चला जाऊं म्हणोनिया ॥५२॥

ब्रह्मज्ञानी द्विज निका । पिसा म्हणती मूर्ख लोका । बंधूंसि म्हणे द्विज ऐका । नका जाऊं काशीसी ॥५३॥

विश्वेश्वर असे मजजवळी । दावीन तुम्हां तात्काळीं । आश्चर्य करिती सकळी । दावीं म्हणती बंधुजन ॥५४॥

काशीस जावें अति प्रयास । येथें भेटे तरी कां सायास । म्हणोनि बोलताती हर्ष । तये वेळीं अवधारा ॥५५॥

इतुकिया अवसरीं । विप्र गंगास्नान करी । ध्यानस्थ होता साक्षात्कारी । ईश्वर आला तयाजवळी ॥५६॥

विनवीतसे शिवासी । आम्हां नित्य पाहिजे काशी । दर्शन होय विश्वेश्वरासी । म्हणोनि चरणीं लागला ॥५७॥

ईश्वर भोळा चक्रवर्ती । प्रसन्न झाला अतिप्रीतीं । दिसे तीच काशी त्वरितीं । मणिकर्णिका कुंड झालें ॥५८॥

विश्वेश्वराची मूर्ति एक । निघाली कुंडीं विशेख । नदी उत्तरे दिसे निक । एकबाणप्रमाण असे ॥५९॥

उदक निघालें कुंडांतून । जैसें भागीरथी गहन । ज्या ज्या असती काशींत खुणा । समस्त असती तयासी ॥६०॥

संगम झाला नदी भीमा । तीर्थ असे काशी उत्तमा । आचार करिती सप्रेमा । बंधु ज्ञानी म्हणती मग ॥६१॥

म्हणे ब्राह्मण बंधूंसी । काशीस न जावें आमुचे वंशीं । समस्तें आचरावें ही काशी । आम्हां शंकरें सांगितलें ॥६२॥

आपुलें नाम ऐसें जाणा । गोसावी नाम निर्धारीं खुणा । तुम्हीं बंधु दोघेजणां । आराधावें ऐसें निरोपिलें ॥६३॥

दोघीं जावें पंढरपुरा । तेथें असे पुंडलीकवरा । सदा तुम्ही पूजा करा । आराध्या नामें विख्यात ॥६४॥

प्रतिवर्षीं कार्तिकीसी । येथें यावें निर्धारेंसी । तीर्थ असे विशेषीं । ऐसें म्हणे ब्राह्मण ॥६५॥

श्रीगुरु म्हणती भक्तासी । काशीतीर्थ प्रगटलें ऐसी । न धरावा संशय तुम्हीं मानसीं । वाराणसी प्रत्यक्ष ही ॥६६॥

ऐकोनि समस्त द्विजवर । करिती स्नान निर्मळ आचार । तेथोनि पुढें येती गुरुवर । सिद्ध सांगे नामधारका ॥६७॥

श्रीगुरु म्हणती सकळिकांसी । तीर्थ दाविती पापविनाशी । स्नानमात्रें पाप नाशी । जैसा तृणा अग्नि लागे ॥६८॥

आपुले भगिनी रत्‍नाईसी । दोष असे बहुवसीं । बोलावोनि त्या समयासी । पुसताती श्रीगुरुमूर्ति ॥६९॥

ऐक पूर्वदोष भगिनी । तूं आलीस आमुचे दर्शनीं । पाप तुझें असे गहनीं । आठवणें करीं मनांत ॥७०॥

ऐकोनि श्रीगुरुच्या बोला । पायां पडे वेळोवेळां । अज्ञान आपण मूढ केवळा । इतुकें कैसें ज्ञान मज ॥७१॥

तूं जगदात्मा विश्वव्यापक । तूंचि ज्ञानज्योतिप्रकाशक । सर्व जाणसी तूंचि एक । विस्तारोनि सांग मज ॥७२॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । आपुलें पाप मज पुससी । वधिलें पांच मार्जारांसी । नेणसी खूण धरीं आपुलीं ॥७३॥

होती मार्जारी गर्भिणी । प्रसूति झाली भांडयामधुनी । न पाहतां उदक घालुनी । झाकोनि ठेविली अग्नीवरी ॥७४॥

पांच मार्जारांचा घात । लागला दोष बहुत । ऐसें ऐकोनिया त्वरित । श्वेतकुष्‍ठ झाले तिसी ॥७५॥

देखोनिया भयाभीत झाली । श्रीगुरुचरणा येऊनि लागली । विनवीतसे करुणा बहाळी । कृपा करी गा गुरुमूर्ति ॥७६॥

करोनि समस्तपापराशि । तीर्थीं जाती वाराणशी । मी आलें तुझे दर्शनासी । पापावेगळी होईन म्हणोनि ॥७७॥

श्रीगुरु पुसती तियेसी । तुज राहे पापराशि । पुढले जन्मीं जरी भोगिसी । तरी कुष्‍ठ जाईल आतां ॥७८॥

रत्‍नाई विनवी स्वामियासी । उबगलें बहुत जन्मासी । याचि कारणें तुझे दर्शनासी । पापावेगळें होऊं म्हणतसें ॥७९॥

आतां पुरे जन्म आपणा । म्हणोनि धरिले तुझे चरणा । याचि जन्मीं भोगीन जाणा । पापाचें फळ म्हणतसे ॥८०॥

इतुकें ऐकोनि गुरुमूर्ति । रत्‍नाईस निरोप देती । पापविनाश तीर्था जाय त्वरिती । स्नानमात्रें जाईल कुष्‍ठ ॥८१॥

नित्य करीं हो येथें स्नान । सप्तजन्मींचे दोष दहन संदेह न करितां होय अनुमान । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥८२॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । आम्हीं देखिलें दृष्‍टींसी । स्नान करितां त्रिरात्रीसी । कुष्‍ठ तिचें परिहारिलें ॥८३॥

ऐसें प्रख्यात तीर्थ देखा । नाम पापविनाशी ऐका । जे करिती स्नान भक्तिपूर्वका । सप्तजन्मींचीं पापें जाती ॥८४॥

तीर्थमहिमा देखोन । रत्‍नाबाई संतोषोन । राहिली मठ बांधोन । तीर्थासन्निध अवधारा ॥८५॥

पुढें कोटितीर्थ देखा । श्रीगुरु दाविती सकळिकां । स्नानमात्रें होय निका । याचें आख्यान बहु असे ॥८६॥

जंबुद्वीपीं जितकीं तीर्थें । एकेक महिमा अपरिमितें । इतुकिया वास कोटितीर्थें । विस्तार असे सांगतां ॥८७॥

सोम-सूर्य-ग्रहणासी । अथवा संक्रांतिपर्वणीसी । अमापौर्णिमा प्रतिपदेसी । स्नान तेथें करावें ॥८८॥

सवत्सेसी धेनु देखा । सालंकृत करोनि ऐका । दान द्यावें द्विजा निका । एकेक दान कोटिसरसे ॥८९॥

तीर्थमहिमा आहे कैसी । स्नान केलिया अनंत फळ पावसी । एकेक दान कोटीसरसी । दोन तीर्थीं करावें ॥९०॥

पुढें तीर्थ रुद्रपद । कथा असे अतिविनोद । गयातीर्थ समप्रद । तेथें असे अवधारा । जे जे आचार गयेसी । करावे तेथें परियेसीं । पूजा करा रुद्रपदाची । कोटि जन्मींचीं पापें जाती ॥९२॥

पुढें असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र । केशव देव सन्निध तत्र । पुण्यराशिस्थान असे ॥९३॥

या तीर्थी स्नान करिता । ज्ञान होय पतितां । अस्थि होती चक्रांकिता । द्वारावतीसमान देखा ॥९४॥

या तीर्थीं स्नान करोनि । पूजा करावी केशवचरणीं । द्वारावती चतुर्गुणी । पुण्य असे अवधारा ॥९५॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । समस्त करिती स्नान दान । पुढें असे मन्मथदहन । तीर्थ सांगती श्रीगुरु ॥९६॥

ग्रामपूर्वभागेसी । कल्लेश्वर देव परियेसीं । जैसें गोकर्णमहाबळेश्वरासी । समान क्षेत्र परियेसा ॥९७॥

मन्मथ तीर्थीं स्नान करावें । कल्लेश्वरातें पूजावें । प्रजावृद्धि होय बरवें । अष्‍टैश्चर्यें पाविजे ॥९८॥

आषाढ श्रावण मासीं । अभिषेक करावा देवासी । दीपाराधना कार्तिकमासीं । अनंत पुण्य अवधारा ॥९९॥

ऐसा अष्‍टतीर्थमहिमा । सांगती श्रीगुरु पुरुषोत्तमा । संतोषोनि भक्त उत्तमा । अति उल्हास करिताती ॥१००॥

म्हणती समस्त भक्तजन । नेणों तीर्थाचें महिमान । स्वामीं निरोपिलें कृपेनें । पुनीत केलें आम्हांसी ॥१॥

जवळी असतां समस्त तीर्थें । कां जावें दूर यात्रे । स्थान असे हें पवित्र । म्हणोनि समस्त आचरती ॥२॥

अष्‍टतीर्थें सांगत । श्रीगुरु गेले मठांत । समाराधना करिती भक्त । महानंद प्रवर्तला ॥३॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । तीर्थमहिमा आहे ऐसी । श्रीगुरु सांगती आम्हांसी । म्हणोनि तुज निरोपिलें ॥४॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । क्षेत्र थोर गाणगापुर । तीर्थें असती अपरंपार । आचरा तुम्ही भक्तीनें ॥५॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्धमुनि-शिष्यसंवाद बहुत । गाणगापुरमाहात्म्य विख्यात । एकुणपन्नासाव्यांत कथियेलें ॥१०६॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अमरजासन्गमगानगापुरक्शेत्रमहिमावर्ननन् नाम एकोनपंचाशत्तमोऽध्यायः ॥४९॥

ओवीसंख्या ॥ १०६ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

क्रमशः

Monday, February 21, 2011

Gurucharitra - Adhyay 48

Chapter 48 Amaraja-sangam importance is told and his own sister's leprosy is cured.

CHAPTER 48

Amarja Sangam and the Greatness of Ganagapur.

On the parva day of Ashvin Vad 14, Shri Guru said to the disciple, 'We shal have bath at trishali (3 Holy places i. e. Prayag, Kashi and Gaya ) with family and children.

The disciple said, 'For such a long journey, we require some time for preparations'.

Shri Guru, 'These holy places are near about. So there is no need for special preparation.'

Saying this he went with them all to the sangamam. All took bath there. Shri Guru said, 'The Sangam is like Prayag. Bhima flows there northwards. This Amarja Sangam is as holy as the Ganga-Yamuna Sangam of Prayag. There are other eight holy places (Tirthas) near about.'

The disciples, -'Why this river is called Amarja?'

Shri Guru, -'Jallundhar Rakshasa were on War. Indra went to Shri Shankar and said, 'We kill Rakshasa but from each drop of their blood, new Rakshasa are born and they have spread in Three Lokas. They have killed many Gods.'

Hearing this, Shri Shankar was enraged and started to kill the Rakshas in the form of Rudra. Indra said, 'You will kill the Rakshas: but kindly suggest any device to make the gods alive.'

Shri Shankar recited Amrutmantra and gave a jar filled with nectar. Indra sprinkled the nectar on the Gods and made them alive. While Indra was going with the jar of the remaining nectar some drops fell on the earth and a river hus created was called 'Amarja'. Bath in this river prevents diseases and untimely death. This river meets Bhima and this Sangam is great like Triveni Sangam of Prayag. Bath in this Kartika and Magha months, on Somwati, Sankratini grahan (eclipse) Parva at this Sangam is very virtuous.

Before this Sangam is the Ashwattha, bath near which fulfils all the desires. I also live here. After worshipping this Ashwattha, worship the 'Sangameshwar' with devotion. This is like Mallikarjuna of Shri Shailya. Bow to Nandi and Chandi, have three rounds and see Shiva Shankar.

There is the 'Varanashi' Tirth i. e. Kashi one mile ahead. One Brahmin of Bhardwaj Gotra was a great devotee of Shri Shiva. He roamed everywhere without clothes, people called him 'mad'. He had two brothers Ishwar and Pandurang. They were thinking of going to Kashi. At this time one devotee of Shri Shiva came there and said to his brothers, ' Why do you go to Kashi? Here is Kashi Visheshwar.' The brothers said, 'Where is it? Show us'.

The devotee took a bath and sat in meditation. Shri Shankar appeared before him. The devotee requested him to create an idol of Kashi Vishveshwar there for daily worship and darshan. Shri Shankar conceded and Manikarnika Kund was created first and the shrine of Kashi Vishveshwar came out of it. A river flowing northward like Bhagirthi also came into existence. All the principal places of Kashi were thus created here. Both the brothers then worshipped Kashi Vishveshwar. These brothers lived at Pandharpur and were known as 'Aradhye'.

Hearing this from Shri Guru, all took bath there and worshipped Shri Vishveswar with devotion and observed other rites.

Shri Guru -'Here is ' Papavinashi Teerth' bath in which destroys all sins.' Shri Guru called his sister Ratnai here and said, 'You had killed a cat with a stickand therefore you are having leprosy. You bathe in this Tirth daily and your disease will disappear.' As advised, she bathed here for three days and her disease was wiped off.

A little further is 'Kothi Tirth'. One should bathe here on Sankranthi, Grahan, Purnima and Amavasya and give a cow with a calf in charity. Further to this is 'Rudra Tirth'. It is as holy as Gaya. Observe Sraddha here.

Further is 'Chakra Tirth' like Dwaraka. Beyond is 'Manmath Tirth'. To the east of it, is 'Kalleshwar' like Gokarna Mahabaleshwar. By doing this, eight glories are obtained.'

Shri Guru thus narrated the greatness of the eight holy places and all were pleased. They bathed and observed other rites and returned to Gangapur with Shri Guru. A grand samardhana was arranged jointly.

Contd....

श्रीगणेशाय नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व झालें परियेसीं । गुरुचरित्र विस्तारेंसी । सांगतां संतोष होतसे ॥१॥

गाणगापुरीं असतां गुरु । ख्याति झाली अपरंपारु । भक्त होता एक शूद्रू । तयाची कथा ऐक पां ॥२॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात असता अनुष्‍ठानासी । मार्गी तो शूद्र परियेसीं । आपुले शेतीं उभा असे ॥३॥

श्रीगुरुतें नित्य देखोनि । धावत येऊनि शेतांतूनी । आपण साष्‍टांगीं नमोनि । पुनरपि जात आपुले स्थाना ॥४॥

माध्यान्हकाळीं मठासी येता । पुनरपि चरणीं ठेवी माथा । ऐसे कितीएक दिवस होतां । शूद्राची भक्ति वाढली ॥५॥

श्रीगुरु तयासी न बोलती । नमन केलिया उभे असती । येणें विधीं बहु काळ क्रमिती । आला शूद्र नमस्कारा ॥६॥

नमस्कारितां शूद्रासी श्रीगुरु पुसती संतोषीं । कां गा नित्य तूं कष्‍टतोसी । नमन करिसी येऊनिया ॥७॥

तुझे मनीं काय वासना । सांग त्वरित आम्हां जाणा । शूद्र म्हणे आवड मना । शेत अधिक पिकावें ॥८॥

तयासी पुसती गुरुनाथ । काय पेरिलें शेतांत । शूद्र म्हणे यावनाळ बहुत । पीक आलें तुझे धर्मीं ॥९॥

नमस्कारितां तुम्हां नित्य । पीक आलें असे अत्यंत । पोटरीं येतील त्वरित । आतां तुझेनि धर्मीं जेवूं ॥१०॥

स्वामी यावें शेतापासीं । पहावें अमृतदृष्‍टींसी । तूं समस्तां प्रतिपाळिसी । शूद्र म्हणोनि न उपेक्षावें ॥११॥

श्रीगुरु गेले शेतापासीं । पाहूनि म्हणती त्या शूद्रासी । सांगेन एक ऐकसी । विश्वास होईल बोलाचा ॥१२॥

जें सांगेन मी तुजसी । जरी भक्तीनें अंगिकारिसी । तरीच सांगूं परियेसीं । एकभावें त्वां करावें ॥१३॥

शूद्र विनवी स्वामियासी । गुरुवाक्य कारण आम्हांसी । दुसरा भाव आम्हांसी । नाहीं स्वामी म्हणे तो ॥१४॥

मग निरोपिती श्रीगुरु तयासी । आम्ही जातों संगमासी । परतोनि येऊं मध्यान्हासी । तंव कापावें सर्व पीक ॥१५॥

ऐसें सांगोनि शूद्रासी । श्रीगुरु गेले संगमासी । शूद्र विचारी मानसीं । गुरुवाक्य आपणा कारण ॥१६॥

शीघ्र आला ग्रामांत । अधिकारियासी विनवीत । खंडोनि द्यावें मला शेत । गत संवत्सराप्रमाणें धान्य देईन ॥१७॥

अधिकारी म्हणती तयासी । पीक झालें असे बहुवसीं । या कारणें उक्तें मागसी । अंगिकार न करिती ॥१८॥

नाना प्रकारें विनवी त्यांसी । द्विगुण देईन गतसंवत्सरेसी । अंगिकारिलें संतोषीं । वचनपत्र लिहून घेती ॥१९॥

आपण अभयपत्र घेऊनि । लोक मिळवोनि तत्क्षणीं । गेला शेतांत संतोषोनि । म्हणे कापा तयासी ॥२०॥

कापूं लागतां शेतासी । स्त्री-पुत्र वर्जिती तयासी । पाषाण घेऊनि स्त्रियेसी । मारुं आला तो शूद्र ॥२१॥

पुत्रातें मांरी येणेंपरी । पळत आले गांवाभीतरीं । आड पडतां राजद्वारीं । पिसें लागलें पतीसी ॥२२॥

पीक असे बहुवसी । कापून टाकितो मूर्खपणेंसी । वर्जितां पहा आम्हांसी । पाषाणघाईं मारिलें ॥२३॥

संन्याशाचें माहात्म्य वाचें बोले । पीक सर्व कोमळ कापिलें । आमुचें जीवित्व भाणास गेलें । आणिक भक्षितों एक मास आम्ही ॥२४॥

अधिकारी म्हणती तयासी । कापी ना का आपुल्या शेतासी । पत्र असे आम्हांपासीं । गतसंवत्सरा द्विगुण धान्य द्यावें ॥२५॥

वर्जावया माणसें पाठविती । शूद्र न ऐके कवणे गतीं । शूद्र म्हणे अधिकारी भीतीं । पेवीचे कण आतां देईन ॥२६॥

दूत सांगती अधिकारियासी । आम्हीं सांगितलें शूद्रासी । सांगोनि पाठविलें तुम्हांसी । विनोद असे परियेसा ॥२७॥

जरी भितील अधिकारी । तरी देईन आतांचि घरीं । गुरें बांधीन तयांचे द्वारीं । पत्र आपण दिलें असे ॥२८॥

दूत सांगती ऐशा रीतीं । पुढें वर्तली काय स्थिति । राजा अधिकारी तयाप्रती । काय उत्तर बोलतसे ॥२९॥

अधिकारी म्हणती तयासी । आम्हां चिंता कायसी । पेव ठाउकें आहे आम्हांसी । धान्य आहे अपार ॥३०॥

इतुकें होतां शूद्रें देखा । पीक कापिलें मनःपूर्वका । उभा असे मार्गीं ऐका । श्रीगुरु आले परतोनि ॥३१॥

नमन करोनि श्रीगुरुसी । शेत दाखविलें कापिलें ऐसी । श्रीगुरु म्हणती तयासी । वायां कापिलें म्हणोनि ॥३२॥

विनोदें तुज सांगितलें । तुवां निर्धारें कापलें । शूद्र म्हणे तुमचें वाक्य भलें । तेंचि मज कामधेनु ॥३३॥

ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । निर्धार असे तुझे चित्तीं । होईल अत्यंत फळप्राप्ति । चिंता न करीं मानसीं ॥३४॥

ऐसें सांगोनि श्रीगुरुनाथ । आले आपण ग्रामांत । सवें शूद्र असे येत । आपुले घराप्रती गेला ॥३५॥

पुसावया येती समस्त । तयाचे घरीं होतो आकांत । स्‍त्री-पुत्र सर्व रुदन करीत । म्हणती आपुला ग्रास गेला ॥३६॥

शूद्र समस्तांतें संबोखी । न करीं चिंता रहा सुखी । गुरुसोय नेणती मूर्खी । कामधेनु वाक्य तयांचें ॥३७॥

एकेकाचे सहस्‍त्रगुण । अधिक लाभ तुम्हां जाण । स्थिर करा अंतःकरण । हानि नव्हे निर्धार पैं ॥३८॥

गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैचें होय त्यासी । निधान जोडलें आम्हांसी । म्हणोनि शूद्र सांगतसे ॥३९॥

नर म्हणूं नये श्रीगुरुसी । शिवस्वरुप जाणा भरंवसीं । असे कारण पुढें आम्हांसी । म्हणोनि निरोपिलें असे मज ॥४०॥

नानापरी स्‍त्री-पुत्रांसी । संबोधित असे शूद्र अति हर्षीं । इष्‍टजन बंधुवर्गासी । येणेंचि रीतीं सांगतसे ॥४१॥

समस्त राहिले निवांत । ऐसें आठ दिवस क्रमित । वायु झाला अति शीत । समस्त पिकें नासलीं ॥४२॥

समस्त ग्रामींची पिकें देखा । शीतें नासलीं सकळिका । पर्जन्य पडला अकाळिका । मूळ नक्षत्रीं परियेसा ॥४३॥

ग्राम राहिला पिकावीण । शूद्रशेत वाढलें शतगुणें । वाढला यावनाळ सगुण । एकेका अकरा फरगडेंसी ॥४४॥

तैं शूद्र-स्‍त्री संतोषोनि । शेता आली पूजा घेऊनि । अवलोकितसे आपुले नयनीं । महानंद करितसे ॥४५॥

पीक झालें अत्यंत । देखोनिया समस्त । येऊनि जन समस्त तेथ । महदाश्चर्य करीत देखा ॥४६॥

येऊनि लागे पतिचरणीं । विनवीतसे कर जोडोनि । बोले मधुर करुणावचनीं । क्षमा करीं म्हणतसे ॥४७॥

अज्ञानमदें अति वेष्‍टिलें । नेणतां तुम्हांतें निंदिलें । गुरु कैचा काय म्हणितलें । क्षमा करणें प्राणनाथ ॥४८॥

ऐसें पतीसी संबोधोनि । शेतींचा देव पूजोनि । विचार केला दोघांनीं । गुरुदर्शना जावें आतां ॥४९॥

म्हणोनि सांगे स्त्रियेसी । पूजों आलीं श्रीगुरुसी । स्वामी पुसती तयांसी । काय वर्तमान म्हणोनिया ॥५०॥

चरणीं लागलीं तेव्हां दोन्ही । हस्तद्वय जोडोनि । स्वामीदर्शन उल्हासोनि । उभीं ठाकलीं संमुख ॥५१॥

दोघेंजणें स्तोत्र करिती । जय जयाजी श्रीगुरुमूर्ती । कामधेनु कुळदैवत म्हणती । तूंचि आमुचा गुरुराया ॥५२॥

तुझें अमृतवचन आम्हां । चिंतामणिप्रकार महिमा । पूर्ण केलें आमुच्या कामा । शरण आलों तुज आम्ही ॥५३॥

भक्तवत्सल ब्रीदख्याति । ऐसें जगीं तुज वानिती । आम्हीं देखिलें दृष्‍टांतीं । म्हणोनि चरणीं लागलीं ॥५४॥

नाना प्रकारें पूजा आरती । शूद्र-स्‍त्री करीतसे भक्तीं । श्रीगुरु बोलती अतिप्रीतीं । लक्ष्मी अखंड तुझे घरीं ॥५५॥

निरोप घेऊनि दोघेंजण । गेलीं आपुले आश्रमीं जाण । करितां मास काळक्रमण । पीक आलें अपार ॥५६॥

गतसंवत्सराहूनि देखा । शतगुणी झालें धान्य अधिका । शूद्र म्हणतसे ऐका । अधिकारियातें बोलावोनि ॥५७॥

शूद्र म्हणे अधिकारियासी । पीक गेलें सर्व गांवासी । वोस दिसे कोठारासी । आपण देऊं अर्धा भाग ॥५८॥

गतवर्षा द्विगुण तुम्हांसी । अंगिकारिलें मीं परियेसीं । धान्य झालें बहुवसीं । शतगुणें अधिक देखा ॥५९॥

परी देईन अर्ध संतोषीं । संदेह न धरा हो मानसीं । अधिकारी म्हणती तयासी । धर्महानि केवी करुं ॥६०॥

गुरुकृपा होतां तुजवरी । पीक झालें बहुतांपरी । नेऊनिया आपुले घरीं । राज्य करीं म्हणती तया ॥६१॥

संतोषोनि शूद्र देखा । विप्रासी वांटी धान्य अनेका । घेऊनि गेला सकळिका । राजधान्य देऊनि ॥६२॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र-महिमा परियेसीं । दृढ भक्ति असे ज्यासी । दैन्य कैचें तया घरीं ॥६३॥

सकळाभीष्‍टें त्यासी होती । लक्ष्मी राहे अखंडिती । गुरु सेवा हो निश्चिती । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥६४॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । गुरुशिष्यसंवाद विख्यात । भक्ता शूद्रा वर प्राप्त । अष्‍टचत्वारिंशोऽध्याय हा ॥६५॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शूद्रवरप्रदानं नाम अष्‍टचत्वारिंशो‍ऽध्यायः ॥४८॥
ओवीसंख्या ॥६५॥

श्रीगुरुद्त्तात्रेयार्पणमस्तु ॥