Friday, December 31, 2010

Gurucharitra - Adhyay 7

Chapter 7 describes the importance of the Gokarna-Mahabaleshwar (as descibed in adhyay 6) as told by sage Gautam.

CHAPTER 7
Soumini and Madayanti at Gokarna.
Namdharak- "Swamin, will you tell me who were benefited by visiting this holy place of Gokarna?" Shri Siddha- "Just listen. Formerly there lived a brave king in the family of Ikshwaku. He knew all the Shastras. He was considerate, strong and kind. Once he wwent on hunting and seeing a demon like a flame of fire, he aimed an arrow and the demon fell on the ground senseless. The brother of the demon wept bitterly in grief. Before dying, the demon asked his brother to take revenge of his death.

The brother approached the king in human form and sought his service and was engaged as a cook. On the anniversay day the king had invited rishis like Vashistha and others. When Vashistha and others were seated on their seats, the new cook served human flesh in the plate of Shri Vashistha. Being enraged, Vashistha cursed the king that he would become a Brahmarakshas.

The king was also annoyed to see that he was being cursed for no fault of his. He therefore, took water in his hand and intended to curse Shri Vashistha in return, Maharani Madayanti hestened to the king and entreated and prevented him from cursing his Guru. She requested him to pray Vashistha for `Usshap' (blessing to nullify the effects of the course).

Being pacified, the poured the water in his hands on his own feet, whereby after being a Brahmarakshas, he was called ~Kalmashpad'. Madayanti bowed to Vashistha and prayed for Usshap for the king. Vashistha was also cooled by this time. He assured her that the king would attain human form and return from the forest on completion of 12 years.

Kalmashpad lived in a dense forest. Once he saw a young Brahmin couple passing by. He clasped the Brahmin youth with the intention of devouring him. The young wife of the youth wept bitterly and requested Kalmashpad with folded hands, saying, `kindly release my young husband who is well-versed in Vedas and thus give me my Sowbhagya.

By doing this you will add to your vitues. Treat me as your daughter. If I beget a son I shall give him your name.' But the demon did not listen to her and killed the youth and ate his flesh.
The wife of the youth collected the bones of her husband, arranged a pyre and set fire to it. Before burning herself in the same pyre, she cursed the demon, `You will die instantly, when after 12 years you become king and touch your wife.'

The king returned to his city after 12 years. He told his wife Rani Madayanti all about the curse of the Brahmin's wife. Madayanti was much grieved to hear it. She exclaimed, `Even after staying in the forest in hardship for 12 years you are not relieved of the evil effects of your evil actions! There is no son in our family. What should we do now?

The king called the old priest and told him `I have killed a Brahmin when I was a demon and was staying in the forest. How can I be relieved of its evil effects?'
The priest said, `you should visit all the holy places and then all your sins will be wiped off' The king then started to visit all the holy places one after the other. He performed sacrifices, gave money in charity, served meals to the Brahmins and the poor and did other virtuous acts. Still the sin of Brahma-hatya followed him like a shadow. Accidentlly he met Goutam muni. He bowed to the muni respectfully. Goutam asked, `When you have your own statee (kingdom) why are you wandering from place to place and why are you so much worried?'

`I have committed a Brahmahatya. I performed sacrifices and several Vratas. I visited holy places and did virtuous acts. Yet I am not relieved of this sin. I am fortunate to see your holyself to day,' replied the king.

Goutam said, `You need not worry. Shri Shiva will protect you. You should go to Gokarna to get rid of this sin. Mrityunjaya (the conqueror of Death) Shri Shiva, always stays there. Though the fire and the moon can do away with the darkness of the night, yet there is the necessity of the Sun. Similarly though your sins are not wiped off even after going to several holy places, still if you go to Gokarna, all your sins will be destroyed. Even if you have committed 1000 Brahmahatyas, all will be destroyed and you shall become sinless. Even Vishnu and Brahmadeo lived there for penance and their desires were fulfilled. Gokarna is like Kailas and Shri Shiva stays there. At the instance of shri Vishnu, Shri Ganesh installed this Shivalinga. All the gods, demons, rishis, munis,siddhas live and worship Shri Shiva and thereby they attain all the four valous (purusharthas) with the blessing of Shri Shiva. Brahma, Vishnu, Kartavirya, Vinayak, Durga and others have also installed lingas here
known after their names. All waters here holy. This is thus the most important holy place.

In Kritayug this Linga was white, in Treta it became red, in Dwapar yellow, and in the Kaliyug it has become black. The root of this Linga is in the Sapta Patal below. Even with the sight of this Linga one is relieved of the sins of Brahmahatya, gets one's desires fulfilled and after death one attains salvation. The devotees staying here go to Kailas in the end.

One should bathe and offer charities on Sunday, Monday and Wednesday.
It is virtuous to worship here on "Vyatipat", Makar Sankrant and Mahashivaratri days. Bholenath Shiva passes judgement over all our actions. In the month of Magh, if one observes fast on the Shivaratri day and offers "Bel" leaf to Shri Shiva Linga, one's entrance in the heaven is ensured.'

Goutam Muni further said, `so many have been benefitted by visiting Gokarna. I myself have wwitnessed a most wonderful incident, when I had been to that place. When I was sitting under a tree, I saw a leper shudra woman. She was without food the whole day. All her body was affected and pus and germs were seen all over. She had lost her teeth and had no clothes on her body. Being a widow, her head was shaved and she was much troubled due to midday hot Sun. She sat under a tree being
tired, and soon died. shiva Dootas came there with a divine place to take her to the Kailas.
While living with the shudra, she ate flesh Shudra, she ate flesh and took wine daily. One day she killed a calf thinking it to be a lamb and reserved its head for the next day. When it was time for milking the cow she looked for the calf and she came to know that my mistake, she had killed it. In grief she uttered the words Shiva' `Shiva' and `What a great sin I have committed unknowingly'.

Fearing the warth of her husband, she burried the head, flesh and bones of the calf and told people that her calf was taken away by a tiger. When she died Yam Dootas took her to the Yampuri and placed her in hell. She suffered tortures and was again born as a Shudra woman. She was ugly, black and blind. Her parents cared for her for ssome time and afterwards shebegged for her food. She was an orphan without any
shelter. She developed leprosy and incourse of time she grew old.

Many people were going to Gokarna on Maha Shivaratri day Expecting to get good alms, she also followed them. It being a fast day nobody offered her food. In joke, some one placed "Bel" leaf in her hand. Knowing that it was not etable, she threw it away, which by chance, fell on the Shiva Linga and thus she had the credit of wworshipping Shiva in that dark night. This pleased Shri Shiva and hence we have come to take her to Shivalok. Shivadootas sprinkled nector on her body and soon she looked like a heavenly woman, she was then taken to Shiva Lok'

Hearing this the king was delighted. He went to Gokarna and was relieved of all his sins. Gokarna has great sifnificance. Hence Shripad Shrivallabha had also been there and stayed therefor 3 years."

Contd.....

श्रीगणेशाय नमः ।

नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा आम्हांसी । निरोपिजे स्वामी कृपेसी । पूर्वी कवणा साक्ष झाली ॥१॥

समस्त तीर्थ सांडुनी । श्रीपाद गेले किंकारणी । पूर्वी आधार केला कवणी । पुराण कथा सांगा मज ॥२॥

ज्यावरी असेल गुरूची प्रीति । तीर्थमहिमा ऐकणे चित्ती । वांछा होतसे ज्ञानज्योती । कृपासिंधु गुरुराया ॥३॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । गोकर्णमहिमा मज पुससी । सांगेन तुज विस्तारेसी । एकचित्ते परियेसा ॥४॥

पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी । मित्रसह राजा परियेसी । प्रतापवंत क्षत्रियराशी । सर्वधर्मरत देखा ॥५॥

राजा सकळशास्त्रज्ञ । विवेकी असे श्रुतिनिपुण । बलाढ्य शूर महाभीम । विद्योद्योगी दयानिधि ॥६॥

असता राजा एके दिवशी । विनोदे निघाला पारधीसी । प्रवेशला महावनासी । वसती शार्दूल सिंह जेथे ॥७॥

निर्मनुष्य अरण्यात । राजा पारधि खेळत । भेटला तेथे अद्‌भुत । दैत्य ज्वाळाकार भयानक ॥८॥

राजा देखोनि तयासी । वर्षता शर झाला कोपेसी । मूर्छना येऊनि धरणीसी । पडला दैत्य तया वेळी ॥९॥

होता तयाचा बंधु जवळी । आक्रंदतसे प्रबळी । पाषाण हाणी कपाळी । बंधुशोके करोनिया ॥१०॥

प्राण त्यजिता निशाचर । बंधूसी म्हणतसे येर । जरी तू होसी माझा सहोदर । सूड घेई माझा तू ॥११॥

ऐसे बोलोनि बंधूसी । दैत्य पावला पंचत्वासी । अनेक मायापाशी । नररूप धरिले तया वेळी ॥१२॥

रूप धरोनि मानवाचे । सौम्य वाणी बोले वाचे । सेवकत्व करी राजयाचे । अतिनम्रत्वे बोलोनिया ॥१३॥

सेवा करी नानापरी । सेवकाचे सारखे मन धरी । कितीक दिवसांवरी । वनांतरी राजा होता देखा ॥१४॥

समस्त मृग जिंकूनि । दुष्ट जीवाते वधोनि । राजा आला परतोनि । आपुल्या नगरा परियेसा ॥१५॥

ऐसे असता एके दिवशी । पितृश्राद्ध आले परियेसी । आमंत्रण सांगे ऋषींसी । वसिष्ठादिका परियेसा ॥१६॥

ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक । करवीतसे सविवेक । कापट्ये होता तो सेवक । तया स्थानी ठेविला ॥१७॥

राजा म्हणे तयासी । पाकस्थानी तू वससी । जे जे मागेल भाणवसी । सर्व आणूनि त्वा द्यावे ॥१८॥

अंगिकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख । कापट्यभावे करवी पाक । केली शाक तया वेळी ॥१९॥

ठाय घालिता ऋषेश्वरांसी । पहिलेच वाढिले नरमांसासी । पाहता कोप आला वसिष्ठासी । दिधला शाप तये वेळी ॥२०॥

वसिष्ठ म्हणे रायासी । नरमांस वाढिले आम्हांसी । त्वरित ब्रह्मराक्षस होसी । म्हणोनि शाप दिधला ॥२१॥

शाप देता तये काळी । राजा कोपला तात्काळी । अपराध नसता प्रबळी । वाया मज का शापिले ॥२२॥

नेणे मांसपाक कोणी केला । माझा निरोप नाही झाला । वृथा आमुते शाप दिधला । आपण शापीन म्हणतसे ॥२३॥

उदक घेऊनि अंजुळी । शापावया सिद्ध झाला तये काळी । तव राजपत्‍नी येऊनि जवळी । वर्जी आपुले पतीते ॥२४॥

पतीसी म्हणे ते नारी । गुरूसी शापिता दोष भारी । वंदुनी तयाचे चरण धरी । तेणे भवसागर तरशील ॥२५॥

मदयंती सतीचे वचन । मानिता झाला राजा आपण । अंजुळीचे उदक जाण । टाकी आपुले चरणावरी ॥२६॥

शाप देता कल्मषपाणी । पडले राजाचे चरणी । कल्मषपाद नाम म्हणोनि । ब्रह्मराक्षस झाला तो राव ॥२७॥

राजपत्‍नी येऊनि परियेसी । लागली वसिष्ठचरणांसी । उद्धरी स्वामी बाळकासी । एवढा कोप काय काज ॥२८॥

करुणावचन ऐकोनि । शांत झाला वसिष्ठ मुनि । वर्षे बारा क्रमोनि । पुनरपि राजा होशील ॥२९॥

उःशाप देऊनि वसिष्ठ ऋषि । गेला आपुले स्थानासी । ब्रह्मराक्षस राजा परियेसी । होऊनी गेला वनांतरा ॥३०॥

निर्मनुष्य अरण्यात । राजा राहिला प्रख्यात । भक्षीतसे अनेक जंत । पशुमनुष्य आदिकरूनि ॥३१॥

ऐसे क्रमिता तये वनी । मार्गस्थ दंपत्ये दोनी । ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी । देखिला राक्षस भयासुर ॥३२॥

येऊनि धरी ब्राह्मणासी । व्याघ्र जैसा पशूसी । घेऊनि गेला भक्षावयासी । विप्रस्त्री समागमे ॥३३॥

अतिशोक करी ब्राह्मणी । जाऊनि लागे राक्षसचरणी । राखे मजला अहेवपणी । प्राणेश्वराते सोडी पितया ॥३४॥

न भक्षी गा माझा पति ।माझी तयावरी अतिप्रीति । मज भक्षी गा म्हणे सुमति । वल्लभाते सोडोनिया ॥३५॥

पतीविण राहता नारी । जन्म वृथाचि दगडापरी । पहिले माते स्वीकारी । प्राण राखे पतीचे ॥३६॥

पति लावण्य पूर्ववयेसी । वेदशास्त्रपारंगेसी । याचा प्राण जरी तू रक्षिसी । जगी होईल तुज पुण्य ॥३७॥

कृपा करी गा आम्हावरी । होईन तुझी कन्या कुमारी । मज पुत्र होतील जरी । नाम वाढवीन तुझे मी ॥३८॥

ऐसे नानापरी देखा । विप्रस्त्री करी महादुःखा । बोल न मानोनि राक्षसे ऐका । त्या ब्राह्मणाते भक्षिले ॥३९॥

पतीते भक्षिले देखोनि । शाप वदली ते ब्राह्मणी । म्हणे राक्षसा ऐक कानी । शाप माझा निर्धारे ॥४०॥

तू राजा सूर्यवंशी । शापास्तव राक्षस झालासी । पुढे मागुती राजा होसी द्वादश वर्षे क्रमोनि ॥४१॥

परि रमता स्त्रियेसवे । प्राण जाईल स्वभावे । अनाथा भक्षिले दुष्ट भावे । दुरात्म्या तू राक्षसा ॥४२॥

शाप देऊनि तया वेळी । पतीच्या अस्थि मिलवूनि जवळी । काष्ठे घालोनिया प्रबळी । अग्निप्रवेश केला तिने ॥४३॥

ऐसे असता राव देखा । क्रमी बारा वर्षे निका । पुनरपि राजा होऊन ऐका । आला आपुले नगरासी ॥४४॥

विप्रस्त्रियेचे शापवचन । स्त्रियेसी सांगितली खूण । म्हणे संग करिता तत्क्ष्ण । मृत्यु असे आपणासी ॥४५॥

ऐकोनि पतीचे वचन । मदयंती दुःख करी आपण । मन करूनि निर्वाण । त्यजावया प्राण पहातसे ॥४६॥

मदयंती म्हणे रायासी । संतान नाही तुमचे वंशासी । वनी कष्टला बारा वर्षी । आपुले कर्म न चुकेची ॥४७॥

ऐकोनि सतीचे वचन । शोके दाटला अतिगहन । अश्रु आले नेत्रांतून । काय करू म्हणतसे ॥४८॥

मंत्रीवृद्धपुरोहितांसी । बोलाविले परियेसी । ब्रह्महत्या घडली आम्हांसी । विमोचन होय कवणेपरी ॥४९॥

मंत्रीवृद्धपुरोहित । तयासी म्हणती ऐका मात । तीथे आचरावी समस्त । तेणे पुनीत व्हाल तुम्ही ॥५०॥

करोनि ऐसा विचार । राजा निघे तीर्था साचार । सर्व तीर्थपरिकर । विधिपूर्वक करीतसे ॥५१॥

ज्या ज्या तीर्था जाय आपण । अनेक पुण्य करी जाण । यज्ञादिक कर्म अन्नदान । ब्राह्मणादिका देतसे ॥५२॥

ऐसी नाना तीर्थे करीत । परी ब्रह्महत्या सवेचि येत । अघोररूपी असे दिसत । कवणेपरी न जायची ॥५३॥

कष्टोनि राजा बहुतांपरी । निर्वाण होऊनि मनाभीतरी । हिंडत पातला मिथिलापुरी । चिंताग्रस्त होवोनिया ॥५४॥

नगरा-बाह्यप्रदेशी । श्रमोनि राजा परियेसी । चिंता करी मानसी । वृक्षच्छाये बैसलासे ॥५५॥

ऋषेश्वरासमवेत । जैसा रुद्र प्रकाशित । गौतम ऋषि अवचित । तया स्थानासि पातला ॥५६॥

राजा देखोनि गौतमासी । चरणी लोळे संतोषी । नमन करी साष्टांगेसी । भक्तिभावे करोनिया ॥५७॥

आश्वासूनि तये वेळी । गौतम पुसे करुणाबहाळी । क्षेमसमाधान सकळी । पुसता झाला वृत्तान्त ॥५८॥

काय झाले तुझे राज्य । अरण्यवासाचे काय काज । चिंताकुलित मुखांबुज । कवण कार्य घडले असे ॥५९॥

ऐकोनि ऋषीचे वचन । राजा सांगे विस्तारोन । शाप जाहला ब्रह्मवचन । ब्रह्महत्या घडली मज ॥६०॥

प्रायश्चित्ते सकळिक । यज्ञादि कर्मे धर्मादिक । सुक्षेत्रे अपार तीर्थे देख । आपण सकळ आचरली ॥६१॥

शमन न होय महादोष । सवेचि येत अघोर वेष । व्रते आचरलो कोटीश । न जाय दोष सर्वथा ॥६२॥

आजिचेनि माझे सफळ जनन । दर्शन झाले जी तुमचे चरण । होतील माझे कष्ट निवारण । म्हणोनि चरणा लागलो ॥६३॥

ऐकोनि रायाचे वचन । करुणासागर गौतम आपण । म्हणे भय सांडी गा निर्वाण वचन । तारील शंकर मृत्युंजय ॥६४॥

तुझे पापनिवारणासी । सांगेन तीर्थविशेषी । महापातक संहारावयासी । गोकर्ण क्षेत्र असे भले ॥६५॥

स्मरण करितां गोकर्णासी । ब्रह्महत्यादि पाप नाशी । तेथे ईश्वर सदा निवासी । मृत्युंजय सदाशिव ॥६६॥

जैसे कैलासाचे शिखर । अथवा स्वर्धुनीमंदिर । निश्चय वास कर्पूरगौर । गोकर्णक्षेत्री परियेसा ॥६७॥

जैसी अंधकाररजनी । प्रकाशावया जेवी अग्नि । चंद्रोदय जरि होय निर्वाणी । तरी सूर्यप्रकाशावीण गति नव्हे ॥६८॥

तैसे समस्त तीर्थाने । पाप नच जाय याचि कारणे । सूर्योदयी तमहरणे । तैसे गोकर्णदर्शने होय ॥६९॥

सहस्त्र ब्रह्महत्या जरी । घडल्या असती या शरीरी । प्रवेश होता गोकर्णक्षेत्री । शुद्धात्मा होय परियेसा ॥७०॥

रुद्रोपेंद्रविरिंचि देखा । जाऊनि तया स्थानी ऐका । तप केले हो सकळिका । कार्यसिद्धि होय त्यांप्रती ॥७१॥

भक्तिपूर्वक तया स्थानी । जप व्रत करिती जाणोनि । फळ होय त्या लक्षगुणी । असे पुण्यक्षेत्र असे ॥७२॥

जैसे ब्रह्मा विष्णु देखा । इंद्रादि देवा सकळिका । साध्य झाले तप ऐका । यावेगळे काय सांगू ॥७३॥

जाणा तो साक्षात्‌ ईश्वर । गोकर्णक्षेत्र कैलासपुर । प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर । विष्णुनिरोपे विनयार्थ ॥७४॥

समस्त देव तेथे येती । पुण्यक्षेत्री वास करिती । ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती । विश्वेदेवे मरुद्‍गण ॥७५॥

चंद्र सूर्य वस्वादिक । पूर्वद्वारी राहिले ऐक । प्रीति करी भक्तिपूर्वक । बैसले असती तये स्थाना ॥७६॥

अग्नि यम चित्रगुप्त । एकादश रुद्र पितृदैवत । दक्षिणद्वारी वास करीत । संतोषे राहिले असती ॥७७॥

वरुणासहित गंगा सकळी । राहती पश्चिमद्वारस्थळी । प्रीति करी चंद्रमौळी । तया सकळां परियेसा ॥७८॥

कुबेर वायु भद्रकाळी । मातृदेवता चंडी सकळी । उत्तरवास त्रिकाळी । पूजा करिती महाबळेश्वराची ॥७९॥

चित्ररथादि विश्वावसु परियेसी । चित्रसेन गंधर्व सुरसी । पूजा करिती सदाशिवासी । सदा वसोनि तया ठायी ॥८०॥

घृताची रंभा मेनका । तिलोत्तमा उर्वशी ऐका । नित्य नृत्य करिती देखा । महाबळेश्वराचे सन्मुख ॥८१॥

वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि । विश्वामित्र महातापसी । भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथे ॥८२॥

कृतयुगी ब्रह्म-ऋषि । आचार करिती महातापसी । महाबळेश्वराचे भक्तीसी । राहिले गोकर्णक्षेत्रांत ॥८३॥

मरीचि नारद अत्रि ऋषि । दक्षादि ब्रह्म-ऋषि परियेसी । सनकादिक महातापसी । उपनिषदार्थ उपासिती ॥८४॥

अनेक सिद्ध साध्य जाण । मुनीश्वर अजिनधारण । दंडधारी संन्यासी निर्गुण । ब्रह्मचारी तेथे वसती ॥८५॥

त्वगस्थिमात्रशरीरेसी । अनुष्ठिती महातापसी । पूजा करिती भक्तीसी । चंद्रमौळीची परियेसा ॥८६॥

गंधर्वादि समस्त देव । पितर सिद्ध अष्टवसव । विद्याधर किंपुरुष सर्व । सेवेसी जाती निरंतर ॥८७॥

गुह्यक किन्नर स्वर्गलोक । शेषादि नाग तक्षक । पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजेसी तया स्थाना ॥८८॥

नाना श्रृंगार करूनि । अनेक भूषणे विराजमानी । सूर्यशशी विमानी । वहनी येती वळंघोनिया ॥८९॥

स्तोत्रे गायन करिती देखा । नमिती नृत्य करिती अनेका । पूजेकारणे येती सकळिका । महाबळेश्वरलिंगासी ॥९०॥

जे जे इच्छिती मनकामना । पावती त्वरित निर्धारे जाणा । समान नाही क्षेत्र गोकर्ण । या ब्रह्मांडगोलकांत ॥९१॥

अगस्त्यादि सनत्कुमार । प्रियव्रतादि राजकुमार । अग्निदेवदानवादि येर । वर लाधले सर्व तया ठायी ॥९२॥

शिशुमारी भद्रकाळी । पूजा करिती त्रिकाळी । नागाते गरुड न गिळी । महाबळेश्वरदर्शने ॥९३॥

रावणादि राक्षसकुळी । कुंभकर्ण येर सकळी । वर लाधले ये स्थळी । बिभीषण पूजीतसे ॥९४॥

ऐसे समस्त देवकुळ । सिद्धदानवादि सकळ । गोकर्णक्षेत्रा जाऊनि प्रबळ । आराधिती नानापरी ॥९५॥

लिंग स्थापिती आपुले नामी । असे ख्याति तया नामी । वर लाधले अनेक कामी । चतुर्विध पुरुषार्थ ॥९६॥

ब्रह्मा विष्णु आपण देखा । कार्तवीर्य विनायका । आपुले नामी लिंग देखा । प्रतिष्ठा केली तये ठायी ॥९७॥

धर्मक्षेत्रपाळादी । दुर्गादेवीशक्तिवृंदी । लिंग स्थापिले आपुले नामी । ज्या गोकर्णक्षेत्रात ॥९८॥

गोकर्णक्षेत्र असे गहन । लिंग तीर्थे असंख्य जाण । पदोपदी असे निर्गुण । ऐसे क्षेत्र अनुपम असे ॥९९॥

सांगो किती विस्तारोन । असंख्यात तीर्थे जाण । पाषाण समस्त लिंग खूण । समस्त उदके जाणावी तीर्थे ॥१००॥

कृतयुगी महाबलेश्वर श्वेत । त्रेतायुगी लोहित । द्वापारी सुवर्णपित । कलियुगी कृष्णवर्ण जाहला ॥१॥

सप्त पाताळ खोलावोन । उभे असे लिंग आपण । कलियुगी मृदु होऊन । दिसे सूक्ष्ममरूपाने ॥२॥

पश्चिम समुद्रतीरासी । गोकर्णक्षेत्रविशेषी । ब्रह्महत्यादि पातके नाशी । काय आश्चर्य परियेसा ॥३॥

ब्रह्महत्यादि महापापे । परदारादि षट्‍ पापे । दुःशील दुराचारी पापे । जाती गोकर्णदर्शने ॥५॥

दर्शनमात्रे पुनीत होती । समस्त काम्यार्थ साधती । अंती होय तयांसी गति । गोकर्णलिंगदर्शने ॥५॥

तये स्थानी पुण्यदिवशी । जे जे अर्चिती भक्तीसी । तेचि जाणा रुद्रवंशी । रायासी म्हणे गौतम ॥६॥

एखादे समयी गोकर्णासी । जाय भक्तीने मानुषी । पूजा करिता सदाशिवासी । शिवपद निश्चये पावे जाणा ॥७॥

आदित्य सोम बुधवारी । अमावास्यादि पर्वाभितरी । स्नान करूनि समुद्रतीरी । दानधर्म करावा ॥८॥

शिवपूजा व्रत हवन । जप ब्राह्मणसंतर्पण । किंचित्‍ करिता अनंत पुण्य । गौतम म्हणे रायासी ॥९॥

व्यतिपातादि पर्वणीसी । सूर्य-संक्रांतीचे दिवशी । महाप्रदोष त्रयोदशी । पूजितां पुण्य अगण्य ॥११०॥

काय सांगो त्याचा महिमा । निवाडा होय अखिल कर्मा । ईश्वर भोळा अनंतमहिमा । पूजनमात्रे तुष्टतसे ॥११॥

असित पक्ष माघमासी । शिवरात्री चतुर्दशीसी । बिल्वपत्र वाहिले यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥१२॥

ऐसे अनुपम स्थान असता । न जाती मूर्ख लोक ऐकता । शिवतीर्थ असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥१३॥

उपोषणादि जागरण । लिंग सन्निध गोकर्ण । स्वर्गासि जावया सोपान । पद्धति असे परियेसा ॥१४॥

ऐसे या गोकर्णस्थानासी । जे जाती जन यात्रेसी । चतुर्विध पुरुषार्थांसी । लाधती लोक अवधारा ॥१५॥

स्नान करूनि समस्त तीर्थी । महाबळेश्वरलिंगार्थी । पूजा करावी भक्त्यर्थी । पातकाव्यतिरिक्त होय जाणा ॥१६॥

ऐशापरी गोकर्णमहिमा । प्रकाश केला ऋषी गौतमा । राजा ऐकोनि अतिप्रेमा । पुसता झाला ते वेळी ॥१७॥

राजा म्हणे गौतमासी । गोकर्णस्थान निरोपिलेसी । पूर्वी पावला कोण यापासी । साक्ष झाली असेल ॥१८॥

विस्तारोनि ते आम्हांसी । सांगावे स्वामी करुणेसी । म्हणोनि लागला चरणांसी । अतिभक्ति करोनिया ॥१९॥

म्हणे गौतम तये वेळी । गोकर्णक्षेत्र महाबळी । जाणो आम्ही बहुकाळी । अपार साक्षी देखिली असे ॥१२०॥

गेलो होतो आम्ही यात्रे । देखिला दृष्टान्त विचित्र । आले होते तेथे जनमात्र । यात्रारूपे करोनिया ॥२१॥

माध्याह्नकाळी आम्ही तेथे । बैसलो होतो वृक्षच्छायेते । दुरोनि देखिले चांडाळीते । वृद्ध अंध महारोगी ॥२२॥

शुष्कमुखी निराहारी । कुष्ठ सर्वांगशरीरी । कृमि पडले अघोरी । पूय शोणित दुर्गंधी ॥२३॥

कुक्षिरोगी गंडमाळा । कफे दाटला असे गळा । दंतहीन अति विव्हळा । वस्त्र नाही परिधाना ॥२४॥

चंद्रसूर्यकिरण पडता । प्राण जाय कंठगता । शौचव्याधी असे बहुता । सर्वांगशूळ महादुःखी ॥२५॥

विधवा आपण केशवपनी । दिसे जैसी मुखरमणी । क्षणक्षणा पडे धरणी । प्राणत्याग करू पाहे ॥२६॥

ऐशी अवस्था चांडाळीसी । आली वृक्षच्छायेसी । देह टाकिला धरणीसी । त्यजू पाहे प्राण आपुला ॥२७॥

प्राण त्यजिता तये वेळी । विमान उतरे तत्काळी । शिवदूत अतिबळी । त्रिशूळ खट्‍वांग धरूनिया ॥२८॥

टंकायुधे चंद्र भाळी । दिव्यकांति चंद्रासारखी केवळी । किरीटकुंडले मिरवली । चतुर्वर्ग येणेपरी ॥२९॥

विमानी सूर्यासारिखे तेज । अतिविचित्र दिसे विराज । आले चांडाळियेकाज । अपूर्व वर्तले तये वेळी ॥३०॥

आम्ही पुशिले शिवदूतांसी । आलेति कवण्या कार्यासी । दूत म्हणती आम्हांसी । न्यावया आलो चांडाळिते ॥३१॥

ऐकोनि दूताचे वचन । विस्मित झाले आमुचे मन । पुनरपि केला त्यासी प्रश्न । ऐक राया तू एकचित्ते ॥३२॥

ऐशिया चांडाळी पापिणीसी । कैसी योग्य विमानेसी । नेऊनिया श्वानासी । सिंहासनी कैसे योग्य ॥३३॥

या जन्मादारभ्य इसी । पापे पापसंग्रहासी । ऐशी पापीण दुर्वृत्त इसी । केवी न्याल कैलासा ॥३४॥

नाही इसी शिवज्ञान । न करीच हे तपसाधन । दया सत्य कदा नेणे । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३५॥

पशुमांस आहार इसी । सदा करी जीवहिंसी । ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिणीसी । केवी नेता स्वर्गभुवना ॥३६॥

अथवा कधी शिवपूजन । न करी पंचाक्षरीजपन । नाही केले शिवस्मरण । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३७॥

शिवरात्री उपोषण । नाही केले पुण्यदान । यज्ञयागादि साधन । नाही केले इणे कधी ॥३८॥

न करी स्नान पर्वकाळी । नेणे तीर्थ कवणे वेळी । अथवा व्रतादि सकळी । केले नाही इणे कधी ॥३९॥

या सर्वांगी पूय शोणित । दुर्गंधी असे बहुत । ऐशी चांडाळी दुर्वृत्त । कैसी विमानी बैसवाल ॥१४०॥

अर्चन जन्मांतरीचे म्हणा । कुष्ठ सर्वांग तेचि खुणा । कृमि निघती मुखांतून । पूर्वाजित काय केले ॥४१॥

ऐशी पापिणी दुराचारी । केवी नेता कैलासपुरी । योग्य नव्हे चराचरी । तुम्ही केवी न्याल इसी ॥४२॥

गौतम म्हणे रायासी । ऐसे पुशिले दूतांसी । त्यांनी सांगितला आम्हांसी । आद्यंत तये चांडाळीचा ॥४३॥

म्हणे गौतम ऋषेश्वर । चांडाळीचे पूर्वापार । सांगेन तुम्हांस सविस्तर । असे आश्चर्य परियेसा ॥४४॥

पूर्वी इचे जन्मस्थान । ब्राह्मणकन्या असे जाण । सौदामिनी नाम असे पूर्ण । सोमबिंबासारखे मुख ॥४५॥

अतिसुंदर रूप इसी । उपवर जाहली पितृगृहासी । न मिळे वर तियेसी । चिंता करिती मातापिता ॥४६॥

न मिळे वर सुंदर तिसी । उन्मत्त जाहली दहा वरुषी । मिळवूनि एका द्विजासी । गृह्योक्तेंसी लग्न केले ॥४७॥

विवाह झालियावरी । होती तया पतीचे घरी । क्वचित्काळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥४८॥

वर्तता असे पुढे देख । तिचे पतीस झाले दुःख । पंचत्व पावला तात्काळिक । विधिलेख करूनिया ॥४९॥

ऐकोनि तिचे मातापिता । कन्या आपुले घरा आणिती तत्त्वता । पतीचे दुःखे दुःखिता । खेद करी ते नारी ॥१५०॥

अतिसुंदर पूर्ववयासी । मदे व्याप्त प्रतिदिवसी । चंचळ होय मानसी । परपुरुषाते देखोनिया ॥५१॥

गुप्तरुपे क्वचित्काळी । जारकर्म करी ते बाळी । प्रगट जाहले तत्काळी । गौप्य नोहे पातक ॥५२॥

आपण विधवा असे नारी । पूर्ववयासी अतिसुंदरी । विषयी प्रीति असे भारी । स्थिर नोहे तिचे मन ॥५३॥

ऐसे तिचिया पातकासी । विदित जाहले सर्वांसी । वाळीत केले तियेसी । मातापिताबंधुवर्गी ॥५४॥

शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यभिचारासी । प्रकटरूप अहर्निशी । रमो लागली नगरांत ॥५६॥

तिये नगरी एक वाणी । रूपे होता अतिलावण्यगुणी । त्यासी तिणे पूर्ववयस देखोनि । झाली त्याची कुलस्त्री ॥५७॥

तया शूद्राचिया घरी । वर्ततसे ते नारी । ऐसी पापिणी दुराचारी । कुळवैरीण बेचाळीस ॥५८॥

श्लोक ॥ स्त्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया । राजानो ब्रह्मदंदेन यतयो भोगसंग्रहात ॥५९॥

टीका ॥ स्त्रिया नासती कामवेगे । ब्राह्मण नासती हीनसेवे । राज्य जाय द्विजक्षोभे । यति नासे विषयसेवने ॥१६०॥

शूद्रासवे अहर्निशी । रमत होती अतिहर्षी । पुत्र जाहला तियेसी । शूद्रगृही असता ॥६१॥

नित्य मांस आहार तिसी । मद्यपान उन्मत्तेसी । होऊनि तया शूद्रमहिषी । होती पापिणी दुराचारी ॥६२॥

वर्तता एके दिवसी । उन्मत्त होवोनि परियेसी । छेदिले वासरू आहारासी । मेष म्हणोनि पापिणीने ॥६३॥

छेदोनि वत्स परियेसी । पाक केला विनयेसी । शिर ठेविले शिंकियासी । दुसरे दिवशी भक्षावया ॥६४॥

आपण भ्रमित मद्यपानी । जागृत जाहली अस्तमानी । वासरू पाहे जावोनि । धेनु दोहावयालागी ॥६५॥

वत्सस्थानी असे मेष । भ्रमित जाहली अतिक्लेश । घरी पाहातसे शिरास । स्पष्ट दिसे वासरू ॥६६॥

अनुतप्त होवोनि तये वेळी । शिव शिव म्हणे चंद्रमौळी । अज्ञानाने ऐशी पापे घडली । म्हणोनि चिंती दुरात्मिणी ॥६७॥

तया वत्सशिरासी । निक्षेप केला भूमीसी । पति कोपेल म्हणोनि परियेसी । अस्थिचर्म निक्षेपिले ॥६८॥

जाऊनि सांगे शेजार लोका । व्याघ्रे वत्स नेले ऐका । भक्षिले म्हणोनि रडे देखा । पतीपुढे येणेपरी ॥६९॥

ऐसी कितीक दिवसांवरी । नांदत होती शूद्राघरी । पंचत्व पावली ते नारी । नेली दूती यमपुरा ॥१७०॥

घातली तियेसी नरकात । भोग भोगी अतिदुःखित । पुनरपि जन्मा चांडाळी जात । उपजली नारी परियेसा ॥७१॥

उपजतांचि जाहलि अंधळी । विद्रूपवर्ण जैशी काजळी । माता पिता क्वचित्काळी । प्रतिपाळिती मायामोहे ॥७२॥

उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा । स्वजन तियेचे अखंडा । बाळपणी तयेसि विघडा । पोसिताती येणेपरी ॥७३॥

ऐसे असता वर्तमानी । सर्वांग झाले कुष्ठवर्णी । पंचत्व पावली पिताजननी । दरिद्री झाली निराश्रय ॥७४॥

सर्वांग कुष्ठवर्णपीडित । त्यजिती तियेसि स्वजन भ्रात । भिक्षा मागोनि उदर भरित । रक्षण करी शरीर आपुले ॥७५॥

येणेपरी चांडाळी । वर्तत असे बहुतकाळी । क्षुधेने पीडित सर्वकाळी । आपण अंध कुष्ठ देही ॥७६॥

न मिळे तिसी वस्त्र अन्न । दुःख करीत अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म । झाली वृद्ध अतिकष्टे ॥७७॥

भिक्षा मागे जनांसी । मार्गी पडोनि अहर्निशी । कधी न भरे उदर तिसी । दुःखे विलापे अपार ॥७८॥

व्याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी । दुर्गंधि येत असे महादोषी । सर्वांग कुष्ठे गळतसे ॥७९॥

ऐसे वर्ततांम माघमासी । लोक निघाले यात्रेसी । महास्थान गोकर्णासी । कलत्रपुत्रसहित देख ॥१८०॥

शिवरात्रीचे यात्रेसी । येती लोक देशोदेशी । चतुर्वर्ण आसपासी । हरुषे येती परियेसा ॥८१॥

देशोदेशीचे राजे देखा । हस्तीरथादिसहित ऐका । येती समस्त भूमांडलिका । महाबळेश्वरदर्शनासी ॥८२॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । येती यात्रेसी विनोद । समारंभ वाद्यनाद । अमित लोक परियेसा व८३॥

किती हासती गायन करिती । धावती नृत्य करीत येती । शिवस्मरणे गर्जना करिती । यात्राप्रसंगी जन देखा ॥८४॥

ऐसी महाजनांसमवेत । चांडाळी गेली तेथे त्वरित । सवे भिक्षुक असती बहुत । तयांसवे जात असे ॥८५॥

येणेपरी गोकर्णासी । चांडाळी पातली सायासी । करावलंबे महाजनांसी । भिक्षा मागे करुणावचने ॥८६॥

लोक जाती मार्गात । शयन करी आक्रंदत । कर वोढूनि मागत । महाजन लोकांसी ॥८७॥

पूर्वीची पापी आपण । पीडत असे याची कारण । भिक्षा घाला क्षुधानिवारण । म्हणोनि मागे सकळिका ॥८८॥

नेणे कधीच वस्त्र प्रावरण । धुळीत लोळे आपण । क्षुधाक्रांत होतसे मरण । धर्म करा सकळांसी म्हणे ॥८९॥

सर्वांगी रोगग्रस्त । वस्त्रावीण बाघे शीत । अक्ष नाही क्षुधाक्रांत । धर्म करा सकळिक हो ॥१९०॥

पूर्वी जन्मशतांतरी । नाही केले पुण्य येरी । याचि कारणे पीडित भारी । धर्म करा सकळिक ॥९१॥

येणेपरी मार्गांत । चांडाळी असे याचित । ते दिवशी असे शिवरात्रीव्रत । कोणी न घाली भिक्षा तिसी ॥९२॥

येरी विव्हळे क्षुधाक्रांत । जठराग्नि प्रदीप्त असे बहुत । धर्म करा ऐसे म्हणत । पडली मार्गात तेधवा ॥९३॥

पूजेसि जाती सकळजन । त्याते मागे आक्रंदोन । एक म्हणती हांसोन । उपवास आजि अन्न कैचे ॥९४॥

हाती होती बिल्वमंजरी । घाली ती तियेच्या करी । आघ्राणोनि पाहे येरी । भक्षणवस्तु नव्हे म्हणे ॥९५॥

कोपोनि टाकी ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी । रात्री असती अंधारी । अलभ्य पूजा घडली देखा ॥९६॥

कोणी न घालिती भिक्षा तिसी । उपास घडला ते दिवशी । पूजा पावली त्या शिवासी । बिल्वमंजरी शिवमस्तकी ॥९७॥

इतुके पुण्य घडले तिसी । प्रयत६न न करिता परियेसी । तुष्टला ईश्वर हर्षी । भवार्णवाकडे केले ॥९८॥

येणेपरी चांडाळीसी । उपवास घडला अनायासी । तेथूनि उठली दुसरे दिवसी । भिक्षा मागावयाकारणे ॥९९॥

पहिलीच कुष्ठरोगी असे । अशक्त झाली उपवासे । चक्षुहीन मार्ग न दिसे । जात असे मंदमंद ॥२००॥

सूर्यरश्मीकरूनि तिसी । दुःख होय असमसहसी । पूर्वार्जित कर्मे ऐसी । म्हणती दूत गौतमाते ॥१॥

ऐसी चांडाळी कष्टत । आली वृक्षच्छायेसमीप । त्यजूं पाहे प्राण त्वरित । म्हणोनिया आलो धावोनि ॥२॥

पुण्य घडले इसी आजी । उपवास शिवतिथीकाजी । बिल्वपत्रे ईश्वर पूजी । घडले रात्री जागरण ॥३॥

तया पुण्येकरूनि इचे । पाप गेले शतजन्मीचे । हे प्रीतिपात्र ईश्वराचे । म्हणोनि पाठविले आम्हांसी ॥४॥

ऐसे म्हणती शिवदूत । तियेवरी शिंपूनिया अमृत । दिव्यदेह पावूनि त्वरित । गेली ऐका शिवलोका ॥५॥

ऐसे गोकर्ण असे स्थान । गौतम सांगे विस्तारोन । रायासि म्हणे तू निघोन । त्वरित जाई गोकर्णासी ॥६॥

जातांचि तुझी पापे जाती । इह सौख्य परत्र उत्तम गति । संशय न धरी गा चित्ती । म्हणोनि निरोपी रायासी ॥७॥

परिसोनि गौतमाचे वचन । राजा मनी दृढ संतोषोन । त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण । पापावेगळा जाहला तो ॥८॥

ऐसे पुण्यपावन स्थान । म्हणोनि राहिले श्रीपाद आपण । सिद्ध म्हणे ऐक कथन । नामधारका एकचित्ते ॥९॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगे गुरुचरित्र विस्तारू । श्रोते करूनि निर्धारू । एकचित्ते परियेसा ॥२१०॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमावर्णन नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥

ओवीसंख्या ॥२१०॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु
क्रमशः

Thursday, December 30, 2010

Gurucharitra - Adhyay 6

CHAPTER 6 of Gurucharitra describes the story behind the Sthapana of Shivlinga at Gokarna-Mahabaleshwar. This is a dramatic story having Shiva Parvati and how Ganesha takes the shivlinga from Ravana. This story has been demonstrated in many other pothis / Granthas, eg. Shivlilamrut, Ganesh Puran etc.

CHAPTER 6
Ravan and Gokarna Mahabaleshwar

Namdharak- "Swami, though Trimurti was Siddha, (Having Yogic power to do and undo things) why did he visit different holy placed and why did he prefer Gokarna to other places? What is its significance?"
Shri Siddha "I am much delighted with your question and I am encouraged to narrate incidents from Shri Guru's life. Shripad Shrivallabha reached Gokarna and on his way he made disciples and gave them divine advice.

Gokarna is a sacred place of Shri Shiva and one of the Twelve famous Jyotirlingas. Shri Ganesh founded here the original Linga-image of Shiva.
It is known as Mahabaleshwar, the tale of which I shall narrate to you now.

"Ravan's mother Kaikaya (wife of Pulasti Manasaputra of Brahma) was a great devotee of Shiva. She worshiped a new Shiva Linga every day. One day she could not get a new Shiva Linga. Fearing that her `Vrat' would be futile, she prepared an earthen Linga and began to worship it with devotion. Seeing this, Ravan asked her what she was doing. she said that she was worshiping a Shiva-Linga. Ravan said, "You being my mother, it is a great misfortune that you should earthen Shiva Ling. Well what do
you intend to achieve by this worship.?"

Mother replied that thereby she will get a place in Kailas, abode of Shiva after death. Thereupon Ravan said, `why do you take so much troubles? I shall bring Kailas itself to you'.

Saying this, he went to Kailas and began to shake it violently with his 20 hands. He tried to lift it up. Due to this action of his, 7 Patals were shaken, Shesh moved his hood, the tortoise began to tremble with fear. Amarpur (capital of Indra the King of Gods) and Heaven were shocked.
Parvati went to Shri Shiva with fear and said, `What has happened to Kailas today? When everyone was distress how are you lying at ease? Please do something to check this calamity.'

Shri Shiva said to her, `You need not be anxious. Ravan, one of my devotees, is playing a game'. Parvati entreated, `Kindly protect the Gods who terrified'. Shri Shiva pressed Ravan's 10 heads and 20 hands underneath the Kailas. Finding himself in distress, Ravan uttered `Shiva-Shiva' and further prayed `Shri Shiva', I have made a mistake. For give me. I seek your shelter. Kindly do not kill me, your devotee.'

Shri Shiva, who is very simple and kind, was pleased by his prayer, so he took him up from breath. Ravan then cut his head, turned his hands into violin, he attached his intestines to serve as musical wires. He then began to chant Samveda and sing other Ragas on the tune of this musical instrument. He praised Shri Shiva in Nine Rasas and Thirtysix Ragas.

Being much pleased by Ravan's performance at great personal sacrifice, Shri shiva appeared before him and said, `I am much pleased. Ask for whatever you desire'.

Ravan said `Oh God of Gods, Laxmi is my maid-servant. I possess all the 8 treasures. Brahma is my priest, and all 33 crore Gods are serving me day and night. The Sun, the Moon, the Varuna and the Wind also obey me. Agni (Fire God) washes my clothes, Yama does not take away anybody without my permission. Indrajit is my son and Kumbakarna is my brother. Kamadhenu is at my doors. Now I have come to take away Kailas with me as my mother has accepted a `Vrat' to worship you daily. Kindly
fulfill my mother's desire.'

Kailaspati Shri Shiva said, `If your mother wishes to worship me, what is the necessity of taking Kailas to her. I shall give you Atma-Linga which will fulfill all her desires instantly. It is just like my soul.

Saying this, he gave his Atma-Linga to Ravan and said, `After bath, place this at a holy place reciting Rudra sukta and worship it with 108 lap recitation of a particular mantra). One, who worships this Linga continuously for 3 years, will again my prowess. One, who possesses this Linga, will live for eternity, one is relieved of any great sin, simply with the sight of this Linga. Do not place this on the ground till you reach Lanka.'

Taking the Atma-Linga, Ravan at once started for Lanka. Naradamuni immediately approached Indra and said to him, `How are you sitting idle? Ravan has become immortal. You will lose all your prominence. Shri Shiva has given him Atma-Linga and has assured him that if he would worship it for 3 years with devotion, he will be Ishwar himself. How will you then rescue 33 crores of gods who are in his custody. Better you all be his slaves. Also send divine damsels like Urwashi, rambha, Menka etc. to him'.

Being shocked, Indra requested Narad to advise what he would do. Narad asked him to go to brahma. Indra and Narad went to Brahma and narrated what had taken place. Then accompanied by Indra and Narad, Brahma went to Shri Vishnu and requested him to devise some means to overcome this calamity.

Shri Vishnu was enraged to hear this tale. He, with all others immediately went to Shri Shiva. Shri Vishnu said to Shri Shiva, 'What made you give Atma-Linga to Ravan, the most wicked, who has made all the gods his captives? How do you bless such cruel persons? Now he will conquer even heaven.'

Shri Shiva said, 'I was extremely pleased with his devotion. He cut his head and hands and made a violin using his intestines as strings and sang Samveda and other songs in different ragas. This time if he had asked for Parwati, I would have given her even to him.'

Shri Vishnu said, 'You give such blessings and the demons become impudent and then we are troubled much as they harass the gods and Brahmins and I have to descend on the earth. Well tell me when did you give the Ling to Ravan?'

Shri Shiva said, 'I gave it to him only two hours before.' Hearings this Shri Vishnu immediately sent his Sudarshan Chakra to hide the Sun and asked Narad to Ravan and induce him to linger on the way, as he would like to observe evening Sandhya. Then he called Ganesh and said to him, 'Ravan always disregards you. All bow to you first and you fulfill their desires. While those who speak ill of you, you bring obstacles in their undertakings. Ravan deceived Shri Shiva and has taken away from him
the most valuable Atma-Linga. So you should go to him in the form of a Brahmachari boy and winning his confidence, take the Atma- Linga from him at Sun-set, when he would engage himself in the evening Sandhya and place the Linga on the earth. If you do so, the Linga will remain there. Saying this Shri Vishnu gave Ganesh various sweets, tilballs, gur, coconut kernel, milk, gee sugar etc.

Narad had already proceeded. Ganesh followed him hurriedly. Narad approached Ravan and said, 'I had just been to Kailas and knew that you pleased Shri Shiva by your hard penance and have brought his Atma-Linga from him. You have obtained extraordinary power and strength due to this. This Linga has great significance. Please let me see the Linga, I shall explain to you all its qualities.'

As Ravan did not believe Narad, he showed him the Linga from a distance. Narad asked, 'Do you know when and how this Linga came into existence? This is a very interesting account. A black skinned bright deer having all fragrant things, was lying in Brahmand-Khand. Brahma, Vishnu, and Mahesh once went there for hunting. They killed this deer and satisfied their hunger with its flesh. The deer had 3 horns on its head and 3 Lingas below. Each one of them took one Linga and preserved it as his Atma-Linga. One, who worships this for 3 years, becomes Ishwar himself. The place where this Linga is place, is like Kailas. Therefore Brahma, Vishnu and Mahesh have great prominence over all other gods.'

Ravan intercepted, ' I have no time to listen to you, as I have to reach Lanka soon. Let me proceed further on my way.' Narad said, 'This is evening time. You know the Vedas, you should act as prescribed by the vedas. This is the time for evening Sandhya. Let us perform the same.' Saying this Narad went away for Sandhya.

In the meantime Ravan saw Ganesh in the form of a Brahmachari boy who was plucking 'durvas'(a particular grass). Ravan thought that that boy would not deceive him. Better observe Sandhya entrusting the Linga to that boy.

So thinking he approached Ganesh, who was afraid to see ravan with ten heads coming to him. But he began to run away. Ravan asked him, 'who are you? who are your parents?'
Ganesh said, 'Why are you inquiring? What does my father owe you?
Ravan smiled and said 'Don't be afraid of me. I am asking this only out of curiosity.'

Ganesh replied, 'I am the son of Shri Shiva. He has ash marks all over the body, has a necklace of Rudra-beads around his neck and bears hair-locks on his head. My mother is Parwati. My father rides a bull Nandi with my mother and begs for alms daily.

Ravan said, 'your father is a pauper. He begs for alms from door to door. So it seems that you are unhappy at home. Inside in a beautiful city Lanka, rich with magnificent buildings, gardens and other wealth. You live with me. I shall give you whatever you desire.'

Ganesh said, 'there are many rakshasas in Lanka. They will devour me, a boy living in forest. Hence I would not come to Lanka. I am hungry and so I am eating these sweets.'

Ravan again entreated him to hold the Linga in his hand till he observed Sandhya. Thereafter Ganesh said with hesitation, 'I am an ignorant boy. I won't hold this Linga in my hand as it may be heavy. Let me go to my place.' Still Ravan persuaded him and induced Ganesh to hold the Linga and he proceeded to observe Sandhya on the sea shore.

Ganesh warned him, 'Mind, as soon as I feel the Linga heavy, I shall place it on the earth.' Saying this Ganesh took the Linga and waited there. All the gods had gathered in the sky and were witnessing this event.

When ravan was offering arghyas (water ablutions to fire god), Ganesh called Ravan and said that he is fatigued and he should take his Linga from him soon.' Ravan made signs by hand and asked him to wait for a little more time.

After a while Ganesh again called Ravan and asked him to come immediately as it was becoming unbearable for him to hold the Linga. Ravan was meditating this time. Seeing that ravan was not coming, Ganesh recollected Shri Vishnu's words and placed the Linga on the ground in the presence of the gods in the sky. All the gods were greatly pleased to see this and showered flowers in the head of Ganesh in admiration.

Soon after ravan returned and seeing that the Linga was placed on the ground, he was much annoyed. He began to thrash Ganesh in wrath. Ravan tried his best with all his might to lift up the Linga. The earth trembled but the Linga could not be shaken a bit. As Ravan tried to lift it up by screwing, it took the shape of an ear of the cow and so it is known as "Gokarna" and as Ravan excercised all his might to lift it up it is called "Mahabaleshwar".

In dispair Ravan then went to the forest for hard penance. There are many other incidents signifying the greatness of this holy place. This is narrated in the Skand Purana.

Contd......

श्रीगणेशाय नमः ।
नामधारक म्हणे सिद्धासी । स्वामी तू ज्योति अंधकारासी । प्रकाश केला जी आम्हांसी । गुरुपीठ आद्यंत ॥१॥
त्रैमूर्ति होऊनि आपण । तीर्थे करावी किंकारण । विशेष असे काय गोकर्ण । म्हणोनि गेले तया स्थान ॥२॥
तीर्थे असती अपरंपारी । समस्त सांडूनि प्रीति करी । कैसा पावला दत्तात्री । अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ॥३॥
ऐक शिष्या शिखामणी । तुवा पुशिले जे का प्रश्नी । संतोष जाला अंतःकरणी । सांगेन चरित्र श्रीगुरूंचे ॥४॥
विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागला चरणांसी । नामधारक प्रीतिकारे ॥५॥
ऐकोनि नामधारकाचे वचन । संतोषले सिद्धाचे मन । सांगतसे विस्तारोन । गुरुचरित्र परियेसा ॥६॥
तुजकरिता आम्हासी । लाभ झाला असे मानसी । गुरुचरित्र सांगावयासी । उत्कंठा मानसी होय ते ॥७॥
म्हणे त्रैमूर्ति अवतरोन । तीर्थे हिंडे केवी आपण । विशेष पावला गोकर्ण । म्हणोनि पुससी आम्हाते ॥८॥
दत्तात्रेय आप्ण । तीर्थे हिंडे तयाचे कारण । भक्तजनाहितार्थ दीक्षेस्तव जाण । उपदेश करावया ॥९॥
विशेष तीर्थ आपुले स्थान । गोकर्णी शंकर असे जाण । याच कारणे निर्गुण । त्रैंमूर्ति वसती तया ठाया ॥१०॥
गोकर्णीचे माहात्म्य । सांगतसे अनुपम्य । एकचित्त करूनि नेम । ऐक शिष्या नामधारका ॥११॥
त्या तीर्थाचे आदि अंती । सांगेन तुम्हां विस्तृती । जे पूर्वी वर लाधले असती । अपूर्व असे ऐकता ॥१२॥
महाबळेश्वरलिंग देखा । स्वयंभू शिव असे ऐका । आख्यान त्याचे ऐका । लंबोदरे प्रतिष्ठले ते ॥१३॥
शिष्य म्हणे सिद्धासी । तीर्थमहिमा वानिसी । विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी । विस्तारोनि सांग मज ॥१४॥
ऐसे शिष्य विनवीत । ऐकोनि बहु संतोषत । निरोपित आद्यंत । महाबळेश्वरचरित्र ॥१५॥
पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या । नाम तियेचे कैकया । ईश्वरभक्ति अतिप्रिया । शिवपूजा सर्वकाळ ॥१६॥
नित्य करी शिवपूजन । पूजेवीण न घे अन्न । ऐसे करिता एक दिन । न मिळे लिंग पूजेसी ॥१७॥
व्रतभंग होईल म्हणोनि । मृत्तिकालिंग करूनि । पूजी अति संतोषोनि । भक्तिपुर्वक अवधारा ॥१८॥
तिचा पुत्र अतिक्रूर । नाम तया दशशिर । आला तेथे वेगवत्तर । मातृदर्शन करावया ॥१९॥
नमिता झाला मातेसी । पुसे पूजा काय करिसी । माता सांगे विस्तारेसी । लिंग पूजिले मृत्तिकेचे ॥२०॥
रावण म्हणे जननीसी । माझी माता तू म्हणविसी । मृतिकेचे लिंग पूजेसी । अभाग्य आपुले म्हणतसे ॥२१॥
मागुती म्हणे तियेसी । पूजिता फळ काय यासी । कैकया सांगे पुत्रासी । कैलासपद पाविजे ॥२२॥
रावण म्हणे मातेसी । कैलास आणुनी तुजपासी । देईन हे निश्चयेसी । सायास का वो करित्येसी ॥२३॥
ऐसे बोले तो रावण । मातेसवे करी पण । आणीन त्वरित उमारमण । कैलासासहित लंकेसी ॥२४॥
पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी । मृत्तिकालिंग का करिसी । म्हणोनि निघाला त्वरितेसी । मनोवेगे निशाचर ॥२५॥
पावला त्वरे शिवपुरासी । शुभ्र रम्य पर्वतासी । धरोनि हालवीक्रोधेसी । वीस बाहु भुजाबळे ॥२६॥
आंदोळले कैलासभुवन । उपटीतसे तो रावण । दाही शिरे टेकून । उचलीन म्हणे उल्हासे ॥२७॥
शिर लावून पर्वतासी । कर टेकून मांडीसी । उचलिता झाला प्राणेसी । सप्तपाताळ आंदोळले ॥२८॥
फणा चुकवी शेष आपण । कूर्म भ्याला कांपोन । भयचकित देवगण । अमरपुर कांपतसे ॥२९॥
कंप झाला स्वर्गभुवन । सत्यलोक विष्णुभुवन । येरू पडतसे गडबडोन । म्हणती प्रळय मांडला ॥३०॥
कैलासपुरीचे देवगण । भयाभीत झाले कंपायमान । भयाभीत गिरिजा आप । होऊनि गेली शिवापासी ॥३१॥
पार्वती विनवी शिवासी । काय झाले कैलासासी । आंदोळतसे सभेसी । पडो पहात निर्धारे ॥३२॥
नगरात झाला आकान्त । बैसलेती तुम्ही स्वस्थ । करा प्रतिकार त्वरित । म्हणोनि चरणां लागली ॥३३॥
ईश्वर म्हणे गिरिजेसी । न करी चिंता मानसी । रावण माझा भक्त परियेसी । खेळतसे भक्तीने ॥३४॥
ऐसे वचन ऐकोनि । विनवी गिरिजा नमोनि । रक्ष रक्ष शूलपाणी । समस्त देवगणाते ॥३५॥
ऐकोनि उमेची विनंती । शंकरे चेपिला वामहस्ती । दाही शिरे भुजांसहिती । दडपलासे गिरीच्या तळी ॥३६॥
चिंता करी मनी बहुत । शिव शिव ऐसे उच्चारित । ध्यातसे स्तोत्र करीत । शरणागता रक्ष म्हणोनि ॥३७॥
त्राहि त्राहि पिनाकपाणी । जगद्रक्षकशिरोमणी । शरण आलो तुझे चरणी । मरण कैचे भक्तासी ॥३८॥
शंकर भोळा चक्रवर्ती । ऐकोनि त्याची विनंती । चेपिले होते वामहस्ती । काढिले त्वरित कृपेने ॥३९॥
सुटला तेथूनि लंकेश्वर । स्तोत्र करीतसे अपार । स्वशिरे छेदोनि परिकरे । तंतु लाविले निज अंत्रे ॥४०॥
वेद सहस्त्र एकवचनी । वर्णक्रमादि विस्तारोनि । सामवेद अतिगायनी । समस्त रागे गातसे ॥४१॥
गण रसस्वरयुक्त । गायन करि लंकानाथ । तयांची नामे विख्यात । सांगेन ऐका एकचित्ते ॥४२॥
आठही गण प्रख्यात । उच्चारीतसे लंकानाथ । मगण ब्राह्मण प्रख्यात । नगण क्षत्री विशेष ॥४३॥
भगण वैश्य ध्यानेसी । तगण शूद्रवर्णेसी । जगण दैत्य परियेसी । रगण प्रत्यक्ष च्यूतगुणे ॥४४॥
सगण तुरंगरूपेसी । यगण शुद्ध परियेसी । विस्तारित गायनेसी । लंकापति रावण ॥४५॥
गायन करीत नवरसेसी । नांवे सांगेन परियेसी । शांत भयानक अद्‌भुतेसी । शृंगार हास्य करुणरसे ॥४६॥
रौद्र वीर बीभत्सेसी । गायन करी अति उल्हासी । वेणू वाजवी सप्तस्वरेसी । ध्यानपूर्वक विधीने ॥४७॥
जंबुद्वीप वास ज्यासी । षड्‌जस्वर नाम परियेसी । कंठीहूनि उपज ज्यासी । मयूरस्वर आलापित ॥४८॥
उत्तमवंशी उपज ज्यासी । गीर्वाणकुळी ब्रह्मवंशी । पद्मपत्र वर्ण परियेसी । वन्हि देवता शृंगार रसे ॥४९॥
द्वितीय स्वर ऋषभासी । जन्म प्लक्ष द्वीपासी । उपज ह्रदयस्थानेसी । चाषस्वर आलापित ॥५०॥
प्रख्यात जन्म क्षत्रवंशी । विराजवर्ण यमदेवतेसी । क्रीडा अद्‌भुत रस ऐसी । वीणा वाजवी रावण ॥५१॥
तृतीय स्वर गांधारेसी । गायन करी रावण परियेसी । कुशद्वीप वास ज्यासी । नासिकस्थान अवधारा ॥५२॥
अजस्वर आलापत्यासी । गीर्वाण कुल वैश्यवंशी । सुवर्णवर्ण कांतीसी । चंद्रदेवता अद्‌भुत रसे ॥५३॥
मध्यम स्वर चातुर्थक । क्रौचद्वीप वास ऐक । उरस्थान उक्त उच्चारी मुखे । क्रौचस्वरे आलापित ॥५४॥
गीर्वाणकुळ ब्रह्मवंश । कुंदवर्ण रूप सुरस । ध्यान करी लंकाधीश । लक्ष्मी देवता करुणा रस ॥५५॥
शाल्मली द्वीप भूमीसी । जन्म पंचमस्वरासी । कंठी उपजोनि नादासी । कोकिळास्वरे गातसे ॥५६॥
ध्यान करी तया स्वरासी । उपज झाला पितृवंशी । कृष्णवर्ण रूप त्यासी । गणनाथ देव हास्यरसे ॥५७॥
श्‍वेतद्वीप जन्म ख्यात । स्वर असे नाम धैवत । ललाट स्थान नाद व्यक्त । दर्दुरस्वरे आलापी देखा ॥५८॥
ऐसा धैवत स्वरासी । बीभत्स रस अतिउल्हासी । गाय रावण परियेसी । ईश्वराप्रती भक्तीने ॥५९॥
पुष्कर द्वीप उपजे त्यासी । निषाद स्वर नाम परियेसी । उत्पत्ति तालव्य संधीसी । हस्तिस्वरे गातसे ॥६०॥
असुरवंश वैश्यकुळी । कल्प शुद्ध वर्ण पाटली । तुंबर मुनि देवता जवळी । सूर्य देवता अवधारी ॥६१॥
भयानक रस देखा । चर्ची व्याकुळ असे निका । येणेपरी सप्त स्वरिका । गायन करी लंकानाथ ॥६२॥
रागसहितरागिणीसी । गायन करी सामवेदासी । श्रीरागादि वसंतासी । आलाप करी दशशिर ॥६३॥
भैरवादि पंचमरागी । नटनारायण मेघरागी । गायन करी अभ्यासयोगी । लंकानाथ शिवाप्रति ॥६४॥
गौडी कोल्हाळ आंधळी । द्राविडरागी कौशिकमाळी । देवगांधार आनंदलिळी । गायन करी लंकानाथ ॥६५॥
धनाश्रिया वराडीसी । रामकलि मंजिरेंसी । गौडकी दशाक्षी हारिसी । गायन करी लंकेश्वर ॥६६॥
भैरवी गुर्जरीसहित । वेळावली राग ललित । कर्नाटकी हंसयुक्त । गायन करी दशशिर ॥६७॥
त्राटकी मोटकि देखा । टंकाक्षी सुधा नाटका । सैधवा माळाकी ऐका । गायन करी लंकानाथ ॥६८॥
बंगाली राग सोरटीसी । कामबोध मधुमाधवीसी । देवाक्रिया भूपाळीसी । गायन करी दशानन ॥६९॥
रागवल्लभ माधुरीसी । राव्हेरी राग हर्षी । विहंगदात्री चंडीसी । वसवीजादि रागाने ॥७०॥
शिर कापून आपुले देखा । यंत्र केले करकमळिका । शिरा काढून तंतुका । रावणेश्वर गातसे ॥७१॥
समयासमयी आलापन । करी दशशिर आपण । प्रातःकाळी करी गायन । अष्टराग परियेसा ॥७२॥
मध्यमराग वेळोवेळी । दशांकभैरव करी भूपाळी । मल्हार धनाश्री बंगाली । प्रातःकाळी गातसे ॥७३॥
बराडी ललिता गुर्जरासी । गौडक्री आहिरी कौशिकेसी । माध्याह्नसमयी गायनासी । रावण करी परियेसा ॥७४॥
कुरंजी तोडी मालश्रियेसी । दशांक पंचम परियेसी । अपराह्न वेळ अतिहर्षी । ईश्वराप्रती गातसे ॥७५॥
चारी प्रकार गौडियेसी । रामकली श्रीरागासी । देवकीपट मंजिरेसी । वसंतुरागे ऋतुकाळी ॥७६॥
ऐसे छत्तीस रागेसी । गायन करी सामवेदासी । निर्वाणरूप भक्तीसी । चंद्रमौळी सांबाचिये ॥७७॥
रावणाचे भक्तीसी । प्रसन्न ईश्वर त्वरितेसी । निजरूप अतिहर्षी । उभा राहिला सन्मुख ॥७८॥
पंचवक्त्र त्रिनेत्रेसी । उभा राहोनि संतोषी । काय इच्छा तुझे मानसी । माग वर म्हणतसे ॥७९॥
म्हणे रावण शिवासी । काय मागावे तुजपासी । लक्ष्मी माझे घरची दासी । आठ निधि माझे घरी ॥८०॥
चतुरानन माझा जाशी । तेहेतीस कोटी देव हर्षी । सेवा करिती अहर्निशी । सूर्य चंद्र वरुण वायु ॥८१॥
अग्नि सारिखा सेवा करी । वस्त्रे धूत अतिकुसरी । यम माझा आज्ञाधारी । निरोपावेगळा न मारी कवणा ॥८२॥
इंद्रजितासारिखा पुत्र । कुंभकर्णाऐसा भ्रात्र । स्थान समुद्रामाजी पवित्र । कामधेनु माझे घरी ॥८३॥
सहस्त्र कोटी आयुष्य मज । हे सांगणे नलगे तुज । आलो असे जे काज । कैलास नेईन लंकेसी ॥८४॥
व्रत असे जननीसी । नित्य पुजन तुम्हांसी । मनोरथ पुरवावे भक्तीसी । कृपासिंधु दातारा ॥८५॥
ईश्वर म्हणे रावणासी । जरी चाड असे पूजेसी । काय करिसी कैलासासी । आत्मलिंग तुज देतो आता ॥८६॥
जे जे मनीची वासना । पुरेल त्वरित ऐक जाणा । लिंग असे प्राण आपणा । म्हणोनि दिधले रावणासी ॥८७॥
पूजा करी वेळ तिन्ही । अष्टोत्तर शत जप करोनि । रुद्राभिषेके अभिषेकोनि । पूजा करावी एकचित्ते ॥८८॥
वर्षे तीन जे पूजिती । तेचि माझे स्वरूप ओती । जे जे मनी इच्छिती । ते ते पावती अवधारा ॥८९॥
हे लिंग असे जयापासी । मृत्यु नाही गा परियेसी । दर्शनमात्रे महादोषी । उद्धरतील अवधारा ॥९०॥
ठेवू नको भूमीवरी । जोवरी पावे तुझी नगरी । वर्षे तीन पूजा करी । तूचि ईश्वर होशील ॥९१॥
वर लाधोनि लंकेश्वर । निरोप देत कर्पूरगौर । करूनि साष्टांग नमस्कार । निघाला त्वरित लंकेसी ॥९२॥
इतुका होता अवसर । नारद होता ऋषीश्वर । निघोनि गेला वेगे सत्वर । अमरपुरा इंद्रभुवना ॥९३॥
नारद म्हणे इंद्रासी । काय स्वस्थ चित्ते बैसलासी । अमरत्व दिधले रावणासी । लक्ष्मी गेली आजि तुमची ॥९४॥
चिरायु झाला लंकेश्वर । प्राणलिंग देत कर्पूरगौर । आणिक दिधला असे वर । तूचि ईश्वर होशील ॥९५॥
वर्षे तीन पूजिलियासी । तूचि माझे स्वरूप होसी । तुझे नगर कैलासी । मृत्यु नाही कदा तुज ॥९६॥
ऐसा वर लाधोनि । गेला रावण संतोषोनि । तेहेतीस कोटी देव कोठूनि । सुटती आता तुम्हासी ॥९७॥
जावे त्वरित तुम्ही आता । सेवा करावी लंकानाथ । उर्वशी रंभा मेनका । त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ॥९८॥
ऐसे वचन ऐकोनि । इंद्र भयभीत मनी । नारदा विनवी कर जोडूनि । काय करावे म्हणतसे ॥९९॥
नारद म्हणे इंद्रासी । उपाय काय त्वरितेसी । जावे तुम्ही ब्रह्मयासी । तयासी उपाय करील ॥१००॥
इंद्र नारदासमवेत । गेले ब्रह्मलोका त्वरित । विस्तारोनिया वृत्तान्त । सांगे इंद्र ब्रह्मयासी ॥१०१॥
ब्रह्मा म्हणे इंद्रासी । जावे त्वरित वैकुंठासी । दैत्येवरी ह्रषीकेशी । उपाय करील निर्धारे ॥२॥
म्हणोनि निघाले तिघेजण । पावले त्वरित वैकुंठभुवन । भेटला तत्काळ नारायण । सांगती वृत्तान्त रावणाचा ॥३॥
विरिंचि म्हणे विष्णूसी । प्रतिकार करावा वेगेसी । कारण असे तुम्हांसी । राम-अवतारी परियेसा ॥४॥
तेहतीस कोटी देवांसी । घातले असे बंदीसी । याचि कारणे तुम्हांसी । करणे असे अवधारा ॥५॥
ईश्वराचे प्राणलिंग । घेऊनि गेला राक्षस चांग । आता रावणा नाही भंग । तोचि होईल ईश्वर ॥६॥
त्वरित उपाय करावा यासी । पुढे जड होईल तुम्हांसी । निर्दाळावया राक्षसांसी । अवतरोनि तुम्हीच यावे ॥७॥
ऐसे विनवी चतुरानन । मग कोपोन नारायण । कार्य नासेल म्हणोन । निघाला झडकर कैलासा ॥८॥
विष्णु आला ईश्वरापाशी । म्हणे शंकरा परियेसी । प्राणलिंग रावणासी । द्यावया कारण तुम्हां काय ॥९॥
रावण क्रूर महादैत्य । सुरवर सकळ त्याचे भृत्य । कारागृही असती समस्त । केवी सुटती सांग आम्हा ॥११०॥
ऐसे दुराचारियासी । वर देता उल्हासी । देवत्व गेले त्याचे घरासी । घेईल स्वर्ग निर्धारे तो ॥११॥
ईश्वर म्हणे विष्णुसी । तुष्टलो तयाचे भक्तीसी । विसर पडला आम्हांसी । संतोषे दिधले प्राणलिंग ॥१२॥
आपले शिर छेदोनि देखा । वीणा केला स्वहस्तका । सप्तस्वर वेदादिका । गायन केले संतोषे ॥१३॥
जरी मागता पार्वतीसी । देतो सत्य परियेसी । भुली पडली भक्तीसी । लिंग नेले प्राण माझा ॥१४॥
विष्णु म्हणे उमाकांता । तुम्ही ऐसा वर देतां । आम्हां सायास होय तत्त्वतां । दैत्य उन्मत्त होताती ॥१५॥
देवद्विज लोकांसी । पीडा करिती बहुवशी । कारणे आम्हांसी । अवतार धरणे घडते देखा ॥१६॥
कधी दिले लिंग त्यासी । नेले असेल लंकेसी । शंकर म्हणे विष्णुसी । पांच घटी झाल्या आता ॥१७॥
ऐकताच शिववचन । उपाय करी नारायण । धाडिले चक्र सुदर्शन । सूर्याआड व्हावया ॥१८॥
बोलावूनि नारदासी । सांगतसे ह्रषीकेशी । तुम्ही जावे त्वरितेसी । रावण जातो लंकेसी देखा ॥१९॥
मार्गी जाऊनि तयासी । विलंब करावा परियेसी । जाऊ न द्यावे लंकेसी । त्वरित जावे म्हणतसे ॥१२०॥
चक्र झाले सूर्याआड । स्नानसंध्या रावणा चाड । तुम्ही जाऊनिया दृढ । विलंब करावा तयासी ॥२१॥
ऐकोनिया श्रीविष्णूच्या बोला । नारद त्वरित निघोन गेला । मनोवेगे पावला । जेथे होता लंकानाथ ॥२२॥
नारदाते पाठवूनि । विष्णू विचारी आपुल्या मनी । गणेशासी बोलावूनि । पाठवू म्हणे विघ्नासी ॥२३॥
बोलावूनि गणेशासी । सांगे विष्णु परियेसी । कैसा रावण तुजसी । सदा उपेक्षितो ॥२४॥
सकळ देव तुज वंदिती । त्याचे मनोरथ पुरती । तुज जे का उपेक्षिती । विघ्ने बाधती तयांसी ॥२५॥
तुज नेणतां रावण देखा । घेऊनि गेला निधान ऐका । प्राण लिंगा अतिविशेखा । नेले शिवाजवळूनि ॥२६॥
आता त्वा करावे एक । रावणापाशी जाऊनि देख । कपटरुपे कुब्जक । बाळवेष धरोनिया ॥२७॥
वाटेसि होईल अस्तमान । रावण करील संध्यावंदन । नारद गेला याचि कारण । विलंब करावया दैत्यासी ॥२८॥
आज्ञा शिवाची रावणासी । न ठेवी लिंग भूमीसी । शौचाचमनसमयासी । आपणाजवळी न ठेविजे ॥२९॥
बाळवेषे तुवा जावे । शिष्यरूप करुणाभावे । सूक्ष्मरूप दाखवावे । लिंग घ्यावे विश्वासुनी ॥३०॥
संध्यासमयी तुझे हाती । लिंग देईल विश्वासरीती । तुवा ठेवावे तत्काळ क्षिती । लिंग राहील तेथेची ॥३१॥
येणेपरी गणेशासी । शिकवी विष्णु परियेसी । संतोषोनि हर्षी । भातुके मागे तये वेळी ॥३२॥
लाडू तिळव पंचखाद्य । इक्षु खोबरे दालिम आद्य । शर्करा घृत क्षीर सद्य । द्यावे त्वरित आपणासी ॥३३॥
चणे भिजवून आपणासी । तांदूळ लाह्या साखएसी । त्वरित भक्षण करावयासी । द्यावे स्वामी म्हणतसे ॥३४॥
जे जे मागितले विघ्नेश्वरे । त्वरित दिधले शार्ङ्गधरे । भक्षित निघाला वेगवक्त्रे । ब्रह्मचारीवेष धरूनि ॥३५॥
गेला होता नारद पुढे । ब्रह्मऋषि महात्म्य गाढे । उभा ठाकला रावणापुढे । कवण कोठूनि आलासी ॥३६॥
रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी । केले उत्कृष्ट तपासी । तोषविले तया शिवा ॥३७॥
तेणे प्रसन्न होऊनि आम्हांसी । लिंग दिधले परियेसी । आणिक सांगितले संतोषी । लिंग महिमा अपार ॥३८॥
नारद म्हणे लंकानाथा । दैव थोर तुझे आता । लिंग लाधलासी अद्‌भुता । जाणो आम्ही आद्यंत ॥३९॥
दाखवी लिंग आम्हांसी । खुणे ओळखू परियेसी । लिंगलक्षण विस्तारेसी । सांगू आम्ही तुजलागी ॥१४०॥
नारदाचिया वचनासी । न करी विश्वास परियेसी । दाखवीतसे दुरोनि लिंगासी । व्यक्त करोनि त्या समयी ॥४१॥
नारद म्हणे लंकेशा । लिंग महिमेचा प्रकार ऐसा । सांगेन तुज बहु सुरसा । बैसोनि ऐके स्वस्थ चित्ते ॥४२॥
लिंग उपजले कवणे दिवशी । पूर्वी जाणिले तयासी । एकचित्ते परियेसी । कथा असे अतिपूर्व ॥४३॥
गिळूनि सकळ सौरभासी । मृग एक काळाग्निसमेसी । ब्रह्मांडखंड परियेसी । पडिला होता तो मृग ॥४४॥
ब्रह्माविष्णु महेश्वरांसी । गेले होते पारधियेसी । मृग मारिले परियेसी । भक्षिले मेद तये वेळी ॥४५॥
तयासी होती तीन शृंगे । खाली असती तीन लिंगे । तिघी घेतली तीन भागे । प्राणलिंगे परियेसा ॥४६॥
लिंगमहिमा ऐक कानी । जे पूजिती वर्षे तिनी । तेचि ईश्वर होती निर्गुणी । वेदमूर्ति तेचि होय ॥४७॥
लिंग असे जये स्थानी । तोचि कैलास जाण मनी । महत्त्व असे याच गुणी । ब्रह्माविष्णुमहेश्वरांसी ॥४८॥
असे आणिक एक बरवे । सांगेन ऐक एकभावे । रावण म्हणे आम्हा जाणे । असे त्वरित लंकेसी ॥४९॥
म्हणोनि निघाला महाबळी । नारद म्हणे तये वेळी । सूर्यास्त आहे जवळी । संध्याकाळ ब्राह्मणासी ॥१५०॥
सहस्त्रवेद आचरसी । संध्याकाळी मार्ग क्रमिसी । वाटेस होईल तुज निशी । संध्यालोप होईल ॥५१॥
आम्ही जाऊ संध्यावंदनासी । म्हणोनि नारद विनयेसी । पुसोनिया रावणासी । गेला नदीतीरा ॥५२॥
इतुकिया अवसरी । पातला गणेश ब्रह्मचारी । रावणापुढे चाचरी । समिधा तोडी कौतुके ॥५३॥
रावण चिंती मानसी । व्रतभंग होईल आपणासी । संध्या करावी त्रिकाळेसी । संदेह घडला म्हणतसे ॥५४॥
ईश्वरे सांगितले आम्हांसी । लिंग न ठेवावे भुमीसी । संध्यासमयो झाली निशी । काय करू म्हणतसे ॥५५॥
तव देखिला ब्रह्मचारी । अति सुंदर बाळकापरी । हिंडतसे नदीतीरी । देखिला रावणे तये वेळी ॥५६॥
मनी विचारी लंकानाथ । ब्रह्मचारी कुमार दिसत । न करी आमुचा विश्वासघात । लिंग देऊ तया हाती ॥५७॥
संध्या करू स्वस्थचित्तेसी । लिंग असेल तयापाशी । बाळक असे हे निश्चयेसी । म्हणोनि गेला तया जवळी ॥५८॥
देखोनिया दशशिर । पळतसे लंबोदर । रावण झाला द्विजवर । अभय देऊनि गेला जवळी ॥५९॥
रावण म्हणे तयासी । तू कवण बा सांग आम्हांसी । मातापिता कवण तुजसी । कवण कुळी जन्म तुझा ॥१६०॥
ब्रह्मचारी म्हणे रावणा । इतुके पुससी कवण्या कारणा । आमुच्या बापे तुझ्या ऋणा । काय द्यावे सांग मज ॥६१॥
हासोनिया लंकेश्वर । लोभे धरिला त्याचा कर । सांग बाळका कवणाचा कुमर । प्रीतीभावे पुसतो मी ॥६२॥
ब्रह्मचारी म्हणे रावणासी । आमुचा पिता काय पुससी । जटाधारी भस्मांगासी । रुद्राक्ष माळा असती देखा ॥६३॥
शंकर म्हणती तयाशी । भिक्षा मागणे अहर्निशी । वृषारूढ उमा सरसी । जननी ते जगन्माता ॥६४॥
इतुके आम्हांसी पुसतोसी । तुज देखता भय मानसी । बहुत वाटे परियेसी । सोड हात जाऊ दे ॥६५॥
रावण म्हणे ब्रह्मचारी । तव पिता असे दरिद्री । भिक्षा मागे घरोघरी । सौख्य तुज काही नसे ॥६६॥
आमुचे नगर लंकापूर । रत्‍नखचित असे सुंदर । आम्हांसवे चाल सत्वर । देवपूजा करीत जाई ॥६७॥
जे जे मागसी आम्हांसी । सकळ देईन परियेसी । सुखे रहावे मजपाशी । म्हणे रावण तये वेळी ॥६८॥
ब्रह्मचारी म्हणे त्यासी । लंकेसी बहुत राक्षसी । आम्ही बाळक अरण्यवासी । खातील तेथे जातांची ॥६९॥
न येऊ तुझिया नगरासी । सोड जाऊं दे घरासी । क्षुधे पीडतो बहुवसी । म्हणोनि भक्षितो भातुके ॥१७०॥
इतुके ऐकोनि लंकानाथ । त्या बाळका संबोधित । लिंग धरी ऐसे म्हणत । मी संध्या करीन तोवरी ॥७१॥
बाळक विनवी तयासी । न धरी लिंग परियेसी । मी ब्रह्मचारी अरण्यवासी । उपद्रवू नको म्हणतसे ॥७२॥
तव लिंग असे जड । मी पण बाळ असे वेड । न घे लिंग जाऊ दे सोड । धर्म घडेल तुजलागी ॥७३॥
नानापरी संबोधित । लिंग देत लंकानाथ । संध्या करावया आपण त्वरित । समुद्रतीरी बैसला ॥७४॥
ब्रह्मचारी तयासी । उभा विनवीतसे रावणासी । जड झालिया आपणासी । ठेवीन त्वरित भूमीवरी ॥७५॥
वेळ तीन परियेसी । बोलवीन तुम्हांसी । वेळ लागलिया परियेसी । आपण ठेवीन भूमीवरी ॥७६॥
ऐसा निर्धार करोनि । उभा गणेश लिंग घेऊनि । समस्त देव विमानी । बैसोनि पाहती कौतुके ॥७७॥
अर्घ्यसमयी रावणासी । बोलवी गणेश परियेसी । जड झाले लिंग आम्हांसी । सत्वर घे गा म्हणतसे ॥७८॥
न्यासपूर्वक अर्घ्य देखा । रावण करी अति विवेका । हाता दाखवी बाळका । येतो राहे म्हणोनि ॥७९॥
आणिक क्षणभर राहोनि । गणेश बोले वेळ दोनी । जड झाले म्हणोनि । शीघ्र यावे म्हणतसे ॥८०॥
न ये रावण ध्यानस्थ । गणेश असे विचारीत । समस्त देवांते साक्षी करीत । लिंग ठेवीत भूमीवरी ॥८१॥
श्रीविष्णूते स्मरोनि । लिंग ठेविले स्थापोनि । संतोष जाहला गगनी । पुष्पे वर्षती सुरवर ॥८२॥
अर्घ्य देवोनी लंकेश्वर । निघोनि आला सत्वर । लिंग देखिले भूमीवर । मनी विकळ जाहला ॥८३॥
आवेशोनि रावण देखा । ठोसे मारी गणनायका । हास्यवदन रडे तो ऐका । भूमीवरी लोळतसे ॥८४॥
म्हणे माझिया पित्यासी । सांगेन आता त्वरितेसी । का मारिले मज बाळकासी । म्हणोनि रडत निघाला देखा ॥८५॥
मग रावण काय करी । लिंग धरोनिया दृढ करी । उचलू गेला नानापरी । भूमीसहित हालतसे ॥८६॥
कापे धरणि तये वेळी । रावण उचली महाबळी । न ये लिंग शिर आफळी । महाबळी राहिला ॥८७॥
नाम पाविला याचि कारणे । महाबळेश्वर लिंग जाणे । मुरडोनि ओढिता रावणे । गोकर्णाकार जाहले ॥८८॥
ऐसे करिता लंकानाथ । मागुती गेला तपार्थ । ख्याती झाली गोकर्णांत । समस्त देव तेथे आले ॥८९॥
आणिक असे अपार महिमा । सांगतसे अनुपमा । स्कंदपुराण वर्णिली सीमा । प्रख्याद असे परियेसा ॥१९०॥
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक संतोषोन । पुनरपि चरणा लागे जाण । म्हणे सरस्वती गंगाधरू ॥१९१॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ ।
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमा वर्णनं नाम षष्ठोऽध्यायः॥६॥
श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥१९१॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

Wednesday, December 29, 2010

Gurucharitra - Adhyay 5

Namaskar!!! The first four Chapters of Gurucharitra had a base of Mythological stories. The Fifth chapter describes the story behind the birth of Shripad shri Vallabh. Now from Fifth chapter onwards there are stories about the divine guru Shripad shree Vallabh.

CHAPTER 5
Birth of Shripad Shri Vallabh

Shri Siddha - "Namdharak, Shri Vishnu had several incarnations as Matsya (Fish), Kachha (Tortoise), Varah (Bear), Narasimha (Man with lion's head), Waman, Parashram, Rama, Krishna, Buddha and Kalanki to protect the Sadhus and punish the wicked.

Bhagirath did his utmost to bring the Ganges on the Earth for the salvation of his fore-fathers, the Sagar Kings. Similarly a Brahmin women worshipped Shri Dattatraya and hence Shri Dattatraya took birth from her womb. I shall now narrate this tale to you.

"A Brahmin named Apalraj lived at Peethapur in the East. Sumatha was his most devoted wife. On one Amavasya day there was an anniversary day at the house of Apalraj. On that day Shri Datta came in disguise to his house for alms. Generally alms are not given to beggers, on the anniversary day. But though the Brahmins invited for the ceremony had not dined, Sumatha offered him alms. Hence Shri Datta was much pleased and he disclosed his divine appearance to her. She humbly
bowed to Shri Datta who said, "Mother what do you desire?".

She said, " You are a treasure of kindness and protector of the devotees.
You are well-Known in all the 14 Bhuwans. You just called me `mother'. I
begot children, but some of them died soon and of those that are surviving, one is blind and one is lame. I therefore feel my life to be futile without a good son. I wish I should have a son who would be world famous and learned like yourself. Will you fulfill this desire of mine?".

Shri Datta said, "You will have a son wellknown in Kaliyug. You abide by his wishes. He will be learned. He will fulfill all your desires". Saying this Shri Datta disappeared.
Sumatha told this to her husband. He too was much pleased. Both believed that Shri Datta himself will come to their home in the form of a child. The husband said, "Shri Datta lives at Mahur and Kolaphur. He comes in the mendicant's form daily alms at midday. You should always give him alms".

Sumatha told her husband that she had offered alms to Shri Datta that day even before the Brahmins invited for performing the Shraddha had dined. The husband said You did very well My fore-fathers will be more satisfied, as Shri Datta himself has taken alms to day. As you have obtained blessings from him, you will surely get a son. You need not worry".

Thus they were passing their time with pleasure. Sumata became pregnant. After the full period of nine months, she gave birth to a son. Brahmins foretold that this child will be a great Guru and an ascetic.
Thinking him to be an incarnation of Shri Datta, he was called after one of
Datta's name `Shripad', His thread ceremony was performed when he was seven years old. Even at this age, he knew all four Vedas, Mimansa, Thark (Logic) etc. All people wondered at his brilliancy and said he must be a God in human form. He taught the Brahmins of the city various subjects as Achar, Vyuawahar, Prayaschitta, Vedant, Bhashya, Vedarth etc. When Shripad was sixteen years of age his parent began to think of his marriage. Shripad warned that would marry with the woman called
disintrigation. All other ladies liked mother to him. He said, "I am a Brahmachari and an ascetic. I love Yoga and my name is Shri Vallabha. I now intend to go to the forests for observing penance and obtaining divine knowledge."

Hearing this, the parents recollected the words of Shri Datta, the mendicant and realised that he would have his own way. Still due to affection, they were very much aggrieved. The mother said, "we expected you to protect us in our old age". Saying so the mother became unconscious. Shripad consoled her and said, "Do not be anxious. I shall give you what you wish. Believe in me and live happily".

The mother said, "My Dear son, I forgot all my previous miseries only on account of you and I cherished a great hope that you would protect us in our old age. We have two other sons; but one is lame and the other is blind, who will look after them?"

Shripad looked at his lame and blind brother with nectar like sight.
Instantly the blind brother got his sight and lame one got his legs. Both became learned, well-versed in Vedas, Shastras and Vyakaran. Thy prostrated before Shripad Shri Valabha and he blessed them. Just as iron is transformed into gold by the touch of the philosopher's stone, so both the brothers were enlightened and they became respectable due to the blessings of Shripad. He then said to the brothers, "You will have sons, grand-sons and great grand-sons and you all shall live happily."

He told his brothers further, "Serve your parents. You will be happy in this world and shall get salvation in the end." He then said, to his mother, "you should be happy now. But your sons will live for 100 years. They will have sons and daughters and you will see them living merrily. They will have wealth for generations and shall
be famous for their learning. Now donot prevent me from going to forest.
I have to go to the North to guide the Sadhus."

Saying this, Shripad Swami disappeared and came to Kashi where he began to live secretly. After some days he went to Badri Narayan. He visited holy places one after the other and in course of time one day reached Gokarna."


Contd.......



श्रीगणेशाय नमः ।

नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी । अवतार झाला मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥

ऐक भक्ता नामधारका । अंबरीषाकारणे विष्णु देखा । अंगकारिले अवतार ऐका । मानुषी नाना रूप घेतसे ॥२॥

मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह सिंहाचे मुख । वामनरूप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी ॥३॥

दशरथाचे कुळी जन्म । प्रख्यात अवतार श्रीराम । राजा होऊनि मागुती जन्म । गौळियाघरी गुरे राखी ॥४॥

वस्त्रे फेडूनि झाला नग्न । बौद्धरूपी झाला आपण । होऊनि कलंकी अवतार जाण । तुरुंगारूढ काय आवडी ॥५॥

नाना प्रकार नाना वेष । अवतार धरी ह्रषीकेश । तारावया भक्तजनास । दुष्टहनन करावया ॥६॥

द्वापारांती झाला कली । अज्ञान लोक ब्राह्मणकुळी । आचारहीन होऊनि प्रबळी । वर्तती महिमा कलियुगी ॥७॥

भक्तजनतारणार्थ । अवतार धरी श्रीगुरुनाथ । सगराकारणे भगीरथ । आणी गंगा भूमंडळी ॥८॥

तैसे एक विप्रवनिता । आराधी श्रीविष्णु दत्ता । तिचे उदरी अवतार धरिता । आश्चर्य झाले परियेसा ॥९॥

पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी । आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥

तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता । अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥

ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी । अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥

वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी । श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥

न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी । दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥

त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी । पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥
दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी । जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६॥

ऐकोनि स्वामींचे वचन । विप्रवनिता करी चिंतन । विनवीतसे करद्वय जोडून । नानापरी स्तवोनिया ॥१७॥

म्हणे जय जय जगन्नाथा । तू तारक भवासी तत्त्वता । माझे मनी असे जे आर्ता । पुरवावी ते देवराया ॥१८॥

तू कृपाळु सर्वा भूती । वेदपुराणे वाखाणिती । केवी वर्णावी तुझी कीर्ती । भक्तवत्सला कृपानिधि ॥१९॥

मिथ्या नोहे तुझा बोल । जे का ध्रुवासी दिधले पद अढळ । बिभीषणासी लंकास्थळ । देऊनि राज्य समर्पिले ॥२०॥

भक्तजना तू आधार । तयालागी धरिसी अवतार । ब्रीद असे चराचर । चौदा भुवनामाझारी ॥२१॥

आता माते वर देसी । वासना असे माझे मानसी । न व्हावे अन्यथा बोलासी । कृपानिधि देवराया ॥२२॥
माझे मनीची वासना । पुरवावी जगज्जीवना । अनाथरक्षका नारायणा । म्हणोनि चरणा लागतसे ॥२३॥

ऐकोनि तियेचे करुणावचन । संतोषला त्रयमूर्ति आपण । कर धरिला आश्वासोन । सांग जननी म्हणतसे ॥२४॥

तव बोलिली पतिव्रता । स्वामी जे निरोपिले आता । जननी नाम मज ठेविता । करा निर्धार याच बोला ॥२५॥

मज पुत्र झाले बहुत । नव्हेत स्थिर उपजतमृत । जे वाचले आता असत । अक्षहीन पादहीन ॥२६॥

योग्य झाले नाही कोणी । काय करावे मूर्ख प्राणी । असोनि नसती येणे गुणी । पुत्रावीण काय जन्म ॥२७॥

व्हावा पुत्र मज ऐसा । ज्ञानवंत पुराणपुरुषा । जगद्वंद्य वेदसदृशा । तुम्हांसारिका दातारा ॥२८॥

ऐकोनि तियेचे वचन । प्रसन्न झाला दत्त आपण । पुढे असे कार्यकारण । दीक्षार्थ भक्तजनांसी ॥२९॥

तापसी म्हणे तियेसी । पुत्र होईल परियेसी । उद्धरिल तुझे वंशासी । ख्यातिवंत कलियुगी ॥३०॥

असावे तुम्ही त्याचे बोली । येर्‍हवी न राहे तुम्हांजवळी । ज्ञानमार्गी अतुर्बळी । तुमचे दैन्य हरील ॥३१॥
इतुके सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसी । विस्मय करितसे मानसी । विप्रवनिता तयेवेळी ॥३२॥

विस्मय करोनि मनात । पतीसी सांगे वृत्तान्त । दोघे हर्षे निर्भर होत । म्हणती दत्तात्रेय होईल ॥३३॥

माध्यान्हसमयी अतिथिकाळी । दत्त येताती तये वेळी । विमुख न होता तये काळी । भिक्षा मात्र घालिजे ॥३४॥

दत्तात्रेयाचे स्थान । माहूर करवीर क्षेत्र खूण । तयाचा वास सदा जाण । पांचाळेश्वर नगरात ॥३५॥

नाना वेष भिक्षुकरूप । दत्तात्रेय येती साक्षेप । न पुसतां मज निरोप । भिक्षा घाली म्हणतसे ॥३६॥

विप्रस्त्री म्हणे पतीसी । आजि अवज्ञा केली तुम्हांसी । ब्राह्मण न जेवता आपण त्यासी । भिक्षा घातली म्हणतसे ॥३७॥

ऐकोनी सतीच्या बोला । विप्र मनी संतोषला । म्हणे पतिव्रते लाभ झाला । पितर माझे तृप्त झाले ॥३८॥
करावे कर्म पितरांच्या नामी । सर्मपावे विष्णुसी आम्ही । साक्षात्कारे येऊनि स्वामी । भिक्षा केली आम्हा घरी ॥३९॥

कृतार्थ झाले पितृगण समस्त । निर्धारे झाले स्वर्गस्थ । साक्षात्‍ विष्णु भेटले दत्त । त्रैमूर्तिअवतार ॥४०॥

धन्य तुझी मातापिता । जे वर लाधलीस मुख्य आता । पुत्र होईल निभ्रांता । न धरी चिंता मानसी ॥४१॥

हर्षे निर्भर होवोनि । राहिली दोघे निश्चित मनी । होती जाहली गर्भिणी । विप्रस्त्री परियेसा ॥४२॥

ऐसे नव मास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनी । विप्रे स्नान करूनि । केले जातककर्म तये वेळी ॥४३॥
मिळोनि समस्त विप्रकुळी । जातक वर्तविती तये वेळी । म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्‍गुरू ॥४४॥

ऐकोनि म्हणती मातापिता । हो कां आमुचा कुळउद्धरिता । आम्हा वर दिधला दत्ता । म्हणोनि ठेविती तया नाव ॥४५॥

श्रीपाद म्हणोनि या कारण । नाम ठेवी तो ब्राह्मण । अवतार केला त्रैमूर्ति आपण । भक्तजन तारावया ॥४६॥

वर्तत असता त्याचे घरी । झाली सात वर्षे पुरी । मौजीबधन ते अवसरी । करिता झाला द्विजोत्तम ॥४७॥
बांधिता मौजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी । मीमांसा तर्क अतिविस्तारी । म्हणो लागला तये वेळी ॥४८॥

ऐकोनि समस्त नगरलोक। विस्मय करिती सकळिक । होईल अवतार कारणिक । म्हणोन बोलती आपणात ॥४९॥

आचार व्यवहार प्रायश्चित्त । समस्तांसी आपण बोलत । वेदान्तभाष्य वेदार्थ । सांगतसे द्विजवरांसी ॥५०॥
वर्तता ऐसे तयासी । झाली वर्षे षोडशी । विवाह करू म्हणती पुत्रासी । मातापिता अवधारा ॥५१॥

विचार करिती पुत्रासवे । बा रे लग्न तुवा करावे । श्रीपाद म्हणे ऐका भावे । माझी वांछा सांगेन ॥५२॥

कराल विवाह माझा तुम्ही । सांगो ऐका विचार आम्ही । वैराग्यस्त्रीसंगे असेन मी । काम्य आमुचे तियेजवळी ॥५३॥

ते स्त्रियेवाचूनि आणीक नारी । समस्त जाणा मातेसरी । जरी आणाल ते सुंदरी । वरीन म्हणे तये वेळी ॥५४॥

आपण तापसी ब्रह्मचारी । योगस्त्रियेवांचोनि नारी । बोल धरा निर्धारी । श्रीवल्लभ नाम माझे ॥५५॥

श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे । झाले त्रिमूर्ति कैसे । पितयाते म्हणतसे । जाउ उत्तरपंथासी ॥५६॥

ऐकोनि पुत्राचे वचन । आठविले पूर्वसूचन । भिक्षुके सांगितली जे खूण । सत्य झाली म्हणतसे ॥५७॥

आताच या बोलासी । मोडा घालिता परियेसी । विघ्न होईल त्वरितेसी । म्हणोनि विचारिती तये वेळी ॥५८॥

न म्हणावे पुत्र यासी । अवतारपुरुष तापसी । जैसे याचे वसे मानसी । तैसे करावे म्हणती दोघे ॥५९॥

निश्चय करूनि आपुले मनी । पुत्राभिमुख जनकजननी । होती आशा आम्हांलागुनी । प्रतिपाळिसी म्हणोनिया ॥६०॥

ऐशी मनी व्याकुळित । डोळा निघती अश्रुपात । माता पडली मूर्च्छागत । पुत्रस्नेहे करोनिया ॥६१॥

देखोनि मातेचे दुःख । संबोखित परमपुरुष । उठवूनि स्वहस्ते देख । अश्रुपात पुशितसे ॥६२॥

न करी चिंता अहो माते । जे मागसी ते देईन तूते । दृढ करूनि चित्ताते । रहा सुके म्हणतसे ॥६३॥

बा रे तुजकरिता आपण । दुःख विसरले संपूर्ण । रक्षिसी आम्हा वृद्धांलागून । दैन्यावेगळे करोनि ॥६४॥

पुत्र असती आपणा दोन । पाय पांगुळ अक्षहीन । त्याते पोशील आता कोण । आम्हा कवण रक्षील ॥६५॥

ऐकोनि जननीचे वचन । अवलोकी अमृतदृष्टीकरून । पुत्र दोघेही झाले सगुण । आली दृष्टिचरणादिक ॥६६॥

वेदशास्त्रादि व्याकरण । सर्व म्हणती तत्क्षण । दोघे येऊनि धरिती चरण । कृतार्थ झालो म्हणोनिया ॥६७॥

आश्वासून तया वेळी । दिधला वर तत्काळी । पुत्रपौत्री नांदा प्रबळी । श्रियायुक्त सनातन ॥६९॥

सेवा करा जनकजननी । पावा सुख महाज्ञानी । इह सौख्य पावोनि । व्हाल मुक्त हे निश्चये ॥७०॥

ऐसे बोलोनि तयांसी । संबोधितसे मातेसी । पाहोनिया दोघा पुत्रांसी । राहता सुख पावाल ॥७१॥

पुत्र दोघे शतायुषी । निश्चय धरी वो मानसी । कन्या पुत्र होतील यांसी । तुम्ही नेत्री देखाल ॥७२॥

अखंड लक्ष्मी यांचे घरी । यांचे वंशपरंपरी । कीर्तिवंत सचराचरी । संपन्न होती वेदशास्त्रे ॥७३॥

आमची अवज्ञा न करिता । निरोप द्यावा आम्हा त्वरिता । जाणे असे उत्तरपंथा । दीक्षा द्यावया साधुजना ॥७४॥

सांगोनि मातापित्यासी । अदृश्य झाला परियेसी । पावला त्वरित पूरी काशी । गुप्तरूपे होता तेथे ॥७५॥

निघाला तेथूनि बदरीविना । भेटी घेऊनि नारायणा । अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेही ॥७६॥

दीक्षा करावया भक्तजना । तीर्थे हिंडणे आपणा । मनोवेगे मार्गक्रमणा । आले तीर्थ गोकर्णासी ॥७७॥

ऐकोनि सिद्ध मुनींचे वचन । विनवी नामधारक आपण । ते परिसा श्रोतेजन । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥७८॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेयावतारकथनं नाम पंचमेऽध्यायः ॥५॥

श्रीपादश्रीवल्लभनृसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पणमस्तु ।

ओवीसंख्या ॥७८॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु
क्रमशः

Tuesday, December 28, 2010

Gurucharitra - Adhyay 4

Chapter 4 describes the famous story of Atri-Anusuya and Datta-janma.

CHAPTER 4
Birth of Shri Dattatraya

"In the first instance there was all water everywhere. Then an egg `Hiranya garbha' (with Gold inside) came into existence. Universe has come out of it. Due to `Raj' Brahma came in to existence. He is known as Hiranyagarbha. It broke into two hemispheres & the earth & the sky came into existence. Brahma thus created 14 Bhuvans, 10 directions, mind, speech, time, six enemies as desire, anger etc. Brahma created seven sons (manas putras) namely - 1.Marichi, 2.Atri, 3.Angiras, 4.Pulasti, 5.Pulaha, 6.Kratu and 7.Vashishtha. Of these Shri Guru took birth in the house of Atri. "Ansuya (devoid of hatred) was the devoted wife of Atri Rishi. She was very beautiful also. Seeing her exceptional devotion to her husband, the Gods in heaven began to fear that someday she might overcome them. Hence Indra and other Gods went to Brahma, Vishnu and Mahesh and said to them, "How can one describe the greatness of the devotion of Ansuya to her husband Atri. She served her husband with body, mind and speech . She also serves guests giving them desired food. None returns disappointed from her place. Fire, Sun and Wind are also afraid of her. We all are afraid of her. She may sometime win over this heaven. Therefore kindly do something to give us relief'.

Hearing this, Brahma, Vishnu and Mahesh said angrily, "we shall test her devotion". Brahma, Vishnu and Mahesh came to Atri Muni's Ashram in the mendicants' disguise, when Atri had been out to the river for daily rituals.
The mendicants said to Ansuya, "We are very hungry. Give us food. We have come here hearing your good name for offering the guests their desired food".

Ansuya bowed to them respectfully and said, "you please return soon after finishing your bath and daily rituals". The three Gods replied, "We have already taken bath and finished the rituals. Atri Rishi may take time to return. Better you serve us food soon". Ansuya seated them on carpets and began serving food on leaf-plates. The guests said to Ansuya, "We have one more desire. We have come here from a long distance as we have heard of your beauty. We wish you to put off your garments and then serve us with food. If you do not comply with this. we shall leave this place without meals".

This made Ansuya bitterly anxious. She realised that some great personages have come to test her chastity. She thought that if they return without food she would lose sanctity of her penance. Believing that her mind is pure and that her husband's penance will protect her in this ordeal, she told them, "You have your food without any doubt. I shall serve you food as you desire".

She went into her kitchen and remembering her husband, put off her garments and saying `The guests are like my children', she came out to serve food to the guests. Instantly all the three Gods were transformed into three newly born crying babies. She was terrified to see thee crying babies. She put on her clothes and took the babies one after the other to her breast for feeding. What great power does a Pativrata possess? Those who have 14 bhuvans, 7 oceans and fire in the belly, were all satisfied with the little milk in her breast. Ansuya thus became the mother of the three Great Gods. She placed them in a cradle and pulled the string to and fro and began singing lullabies.

It was midday. Atri Rishi returned from the river after finishing his rituals. He was very much astonished to see Ansuya pulling the string of a cradle and singing songs. Ansuya narrated all that had happened. Atri Rishi by power of intuition knew that the babies were Trimurties and so he bowed to them. The three Gods were also much pleased. They stood before him and told Atri to ask for a boon. Atri said to Ansuya, "You may ask for whatever you desire".

Ansuya said, "These babies should stay in this Ashram as our sons". The Trimurties readily complied. Ansuya began to nurse and feed them. Brahma was known as Chandra, Vishnu was called Datta and Mahesh was called Durvas.

After some time Chandra and Durvas told their mother Ansuya that they both were going away for penance and that the third Datta would be staying with her; she should know him as Trimurti. After this chandra and Durvas went away, Chandra went to Chandralok and Durvas went to the forest for penance. Datta or Dattatraya remained with Ansuya. Dattatraya is the founder of the seat of shri Guru.

Contd.....


श्रीगणेशाय नमः ।

ऐशी शिष्याची विनंती । ऐकोन सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीति पावो गुरुचरणी ॥१॥

ऐक शिष्यचूडामणी । धन्य धन्य तुझी वाणी । आठवतसे तुझ्या प्रश्नी । आदिमध्यावसानक ॥२॥

प्रश्न केला बरवा निका । सांगेन आतां तुज विवेका । अत्रि ऋषीचा पूर्वका । सृष्टीपासोनि सकळ ॥३॥

पूर्वी सृष्टि नव्हती काही । जलमय होते सर्वही । आपोनारायण म्हणोनि पाही । वेद बोलती याची कारणे ॥४॥

उदक आपोनारायण । सर्वां ठायी वास पूर्ण । बुद्धिसंभवप्रपंचगुण । हिरण्यगर्भ अंड निर्मिले ॥५॥

तेचि ब्रह्मांड नाम जाहले । रजोगुने ब्रह्मासि निर्मिले । हिरण्यगर्भ नाम पावले । देवतावर्ष एक होते ॥६॥

तेचि ब्रह्मांड देखा । फुटोनि शकले झाली ऐका । एक शकल भूमिका । होऊनि ठेली शकले दोनी ॥७॥

ब्रह्मा तेथे उपजोन । रचिले चवदाहि भुवन । दाही दिशा मानसवचन । काळ कामक्रोधादि सकळ ॥८॥

सृष्टि रचावयासी । सप्त पुत्र उपजवी मानसी । नामे सांगेन परियेसी । सात जण ब्रह्मपुत्र ॥९॥

मरीचि अत्रि आंगिरस । पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ । सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ । सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण ॥१०॥

सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि । तेथूनि पीठ गुरुसंतति । सांगेन ऐका एकचित्ती । सभाग्य नामधारका ॥११॥

ऋषि अत्रीची भार्या । नाम तिचे अनसूया । पतिव्रताशिरोमणिया । जगदंबा तेचि जाण ॥१२॥

तिचे सौंदर्यलक्षण । वर्णू शके ऐसा कोण । जिचा पुत्र चंद्र आपण । तिचे रूप काय सांगो ॥१३॥

पतिसेवा करी बहुत । समस्त सुरवर भयाभीत । स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित । म्हणोनि चिंतिती मानसी ॥१४॥

इंद्रादि सुरवर मिळुनि । त्रयमूर्तिपासी जाउनी । विनविताती प्रकाशोनी । आचार अत्रि ऋषीचा ॥१५॥

इंद्र म्हणे स्वामिया । पतिव्रता स्त्री अनसूया । आचार तिचा सांगो काया । तुम्हाप्रती विस्तारोनि ॥१६॥

पतिसेवा करी भक्तीसी । मनोवाक्कायमानसी । अतिथिपूजा महाहर्षी । विमुख नव्हे कवणे काळी ॥१७॥

तिचा आचार देखोनि । सूर्य भीतसे गगनी । उष्ण तिजला होईल म्हणोनि । मंद मंद तपतसे ॥१८॥

अग्नि झाला भयाभीत । शीतळ असे वर्तत । वायु झाला भयचकित । मंद मंद वर्ततसे ॥१९॥

भूमि आपण भिऊनि देखा । नम्र जाहली पादुका । शाप देईल म्हणोनि ऐका । समस्त आम्ही भीतसो ॥२०॥

नेणो घेईल कवण स्थान । कोण्या देवाचे हिरोन । एखाद्याते वर देता जाण । तोही आमुते मारू शके ॥२१॥

यासि करावा उपाय । तू जगदात्मा देवराय । जाईल आमुचा स्वर्गठाय । म्हणोनि आलो तुम्हा सांगो ॥२२॥

न कराल जरी उपाय यासी । सेवा करू आम्ही तिसी । तिचे द्वारी अहर्निशी । राहू चित्त धरोनिया ॥२३॥

ऐसे ऐकोनि त्रयमूर्ति । महाक्रोधे कापती । चला जाऊ पाहू कैसी सती । म्हणती आहे पतिव्रता ॥२४॥

वतभंग करूनी तिसी । ठेवूनि येऊ भूमीसी । अथवा वैवस्वतालयासी । पाठवू म्हणोनि निघाले ॥२५॥

सत्त्व पहावया सतीचे । त्रयमूर्ती वेष भिक्षुकाचे । आश्रमा आले अत्रीचे । अभ्यागत होऊनिया ॥२६॥

ऋषि करू गेला अनुष्ठान । मागे आले त्रयमूर्ति आपण । अनसूयेसी आश्वासून । अतिथि आपण आलो म्हणती ॥२७॥

क्षुधे बहु पीडोन । आम्ही आलो ब्राह्मण । त्वरित द्यावे सती अन्न । अथवा जाऊ आणिका ठाया ॥२८॥

सदा तुमचे आश्रमांत । संतर्पण अभ्यागत । ऐको आली कीर्ति विख्यात । म्हणोनि आलो अनसूये ॥२९॥
इच्छाभोजनदान तुम्ही । देता म्हणोनि ऐकिले आम्ही । ठाकोनि आलो याचि कामी । इच्छाभोजन मागावाया ॥३०॥

इतुके ऐकोनि अनसूया । नमन केले तत्क्षणिया । बैसकार करूनिया । क्षालन केले चरण त्यांचे ॥३१॥

अर्ध्य पाद्य देऊनि त्यांसी । गंधाक्षतापुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी । आरोगण सारिजे ॥३२॥

अतिथी म्हणे तये वेळी । करोनि आलो आंघोळी । ऋषि येती बहुता वेळी । त्वरित आम्हा भोजन द्यावे ॥३३॥

वासना पाहोनि अतिथीते । काय केले पतिव्रते । ठाय घातले त्वरिते । बैसकार केला देखा ॥३४॥

बैसवोनिया पाटावरी । घृतेसी पात्र अभिधारी । घेवोनी आली आपण क्षीरी । शाक पाक तये वेळी ॥३५॥

तिसी म्हणती अहो नारी । आम्ही अतिथी आलो दुरी । देखोनि तुझे स्वरूप सुंदरी । अभीष्ट मानसी आणिक वसे ॥३६॥

नग्न होवोनि आम्हांसी । अन्न वाढावे परियेसी । अथवा काय निरोप देशी । आम्ही जाऊ नाही तरी ॥३७॥

ऐकोनि द्विजांचे वचन । अनसूया करी चिंतन । आले विप्र पहावया मन । कारणिक पुरुष होतील ॥३८॥

पतिव्रता शिरोमणी । विचार करी अंतःकरणी । अतिथी विमुख तरी हानि । निरोप केवी उल्लंघू ॥३९॥

माझे मन असे निर्मळ । काय करील मन्मथ खळ । पतीचे असे तपफळ । तारील मज म्हणतसे ॥४०॥
ऐसे विचारोनि मानसी । तथास्तु म्हणे तयांसी । भोजन करावे स्वस्थ चित्तेसी । नग्न वाढीन म्हणतसे ॥४१॥

पाकस्थाना जाऊनि आपण । चिंतन करी पतीचे चरण । वस्त्र फेडोनि नग्न । म्हणे अतिथी बाळे माझी ॥४२॥

नग्न होवोनी सती देखा । घेऊनि आली अन्नोदका । तव तेचि झाले बाळका । ठायांपुढे लोळती ॥४३॥

बाळे देखोनि अनसूया । भयचकित होवोनिया । पुनरपि वस्त्रे नेसोनिया । आली तया बाळकांजवळी ॥४४॥

रुदन करिती तिन्ही बाळे । अनसूया रहावी वेळोवेळ । क्षुधार्त झाली केवळ । म्हणोनि कडिये घेतसे ॥४५॥

कडिये घेवोनि बाळकांसी । स्तनपान करवी अतिहर्षी । एका सांडोनि एकाशी । क्षुधा निवारण करितसे ॥४६॥

पाहे पा नवल काय घडले । त्रयमूर्तीची झाली बाळे । स्तनपान मात्रे तोषले । तपफळ ऐसे पतिव्रतेचे ॥४७॥

ज्याचे उदरी चौदा भुवन । सप्त समुद्र वडवाग्नि जाण । त्याची क्षुधा निवारण । पतिव्रतास्तनपानी ॥४८॥
चतुर्मुख ब्रह्मयासी । सृष्टि करणे अहर्निशी । त्याची क्षुधा स्तनपानेसी । केवी झाली निवारण ॥४९॥

भाळाक्ष कर्पूर गौर । पंचवक्त्र काळाग्निरुद्र । स्तनपान करवी अनसूया सुंदर । तपस्वी अत्री ऐसा ॥५०॥
अनसूया अत्रिरमणी । नव्हती ऐशी कोणी । त्रयमूर्तीची झाली जननी । ख्याति झाली त्रिभुवनांत ॥५१॥

कडिये घेवोनि बाळकांसी । खेळवीतसे तिघांसी । घालोनिया पाळण्यासी । पर्यंदे गाई तये वेळी ॥५२॥

पर्यंदे गाय नानापरी । उपनिषदार्थ अतिकुसरी । अतिउल्हासे सप्त स्वरी । संबोखितसे त्रिमूर्तीसी ॥५३॥

इतुके होता तये वेळी । माध्यान्हवेळ अतिथिकाळी । अत्रि ऋषि अतिनिर्मळी । आला आपुले आश्रमा ॥५४॥

घरामाजी अवलोकिता । तव देखिली अनसूया गाता । कैची बाळे ऐसे म्हणता । पुसतसे स्त्रियेसी ॥५५॥

तिणे सांगितला वृत्तान्त । ऋषि ज्ञानी असे पाहात । त्रयमूर्ति हेचि म्हणत । नमस्कार करितसे ॥५६॥

नमस्कारिता अत्रि देखा । संतोष विष्णुवृषनायका । आनंद झाला चतुर्मुखा । प्रसन्न झाले तये वेळी ॥५७॥

बाळ राहिले पाळणेसी । निजमूर्ति ठाकले सन्मुखेसी । साधु साधु अत्रि ऋषि । अनसूया सत्य पतिव्रता ॥५८॥

तुष्टलो तुझे भक्तीसी । माग मनी वर इच्छिसी । अत्रि म्हणे सतीसी । जे वांछिसी माग आता ॥५९॥

अनसूया म्हणे ऋषीसी । प्राणेश्वरा तूचि होसी । देव पातले तुमच्या भक्तीसी । पुत्र मागा तुम्ही आता ॥६०॥

तिघे बाळक माझे घरी । रहावे माझे पुत्रापरी । हेचि मागतो निर्धारी । त्रयमूर्ति आपणां एकरूपा ॥६१॥

ऐसे वचन ऐकोनि । वर दिधला मूर्ती तिन्ही । राहती बाळके म्हणोनि । आपण गेले निजालयासी ॥६२॥
त्रिमूर्ति राहिले त्यांचे घरी । अनसूया पोशी बाळकापरी । नामे ठेविली प्रीतिकरी । त्रिवर्गांची परियेसा ॥६३॥

ब्रह्मामूर्ति चंद्र झाला । विष्णुमूर्ति दत्त केवळा । ईश्वर तो दुर्वास नाम पावला । तिघे पुत्र अनसूयेचे ॥६४॥
दुर्वास आणि चंद्र देखा । उभे राहूनि मातेसन्मुखा । निरोप मागती कौतुका । जाऊ तपा निजस्थाना ॥६५॥

दुर्वास म्हणे जननी । आम्ही ऋषि अनुष्ठानी । जाऊ तीर्थे आचरोनि । म्हणोनि निरोप घेतला ॥६६॥

चंद्र म्हणे अहो माते । निरोप द्यावा आम्हा त्वरिते । चंद्रमंडळी वास माते । नित्य दर्शन तुमचे चरणी ॥६७॥

तिसरा दत्त विष्णुमूर्ति । असेल तुमचे धरोनि चित्ती । त्रयमूर्ति तोचि निश्चिती । म्हणोनि सांगती तियेसी ॥६८॥

त्रयमूर्ति जाण तोचि दत्त । सर्व विष्णुमय जगत । राहील तुमचे धरोनि चित्त । विष्णुमूर्ति दत्तात्रेय ॥६९॥

त्रयमूर्ति ऐक्य होऊन । दत्तात्रेय राहिला आपण । दुर्वास चंद्र निरोप घेऊन । गेले स्वस्थाना अनुष्ठानासी ॥७०॥

अनसूयेचे घरी देखा । त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका । नाम दत्तात्रेय एका । मूळपीठ श्रीगुरूचे ॥७१॥

ऐशापरी सिद्ध देखा । कथा सांगे नामधारका । संतोषे प्रश्न करी अनेका । पुसतसे सिद्धासी ॥७२॥

जय सिद्ध योगीश्वरा । भक्तजनमनोहरा । तारक संसारसागरा । ज्ञानमूर्ति कृपासिंधो ॥७३॥

तुझेनि प्रसादे मज । ज्ञान उपजले सहज । तारक आमुचा योगिराज । विनंती माझी परियेसा ॥७४॥

दत्तात्रेयाचा अवतारू । सांगितला पूर्वापारू । पुढे अवतार जाहले गुरु । कवणेपरी निरोपिजे ॥७५॥

म्हणे सरस्वतीगंगाधरू । पुढील कथेचा विस्तारू । ऐकता होय मनोहरू । सकळाभीष्टे साधती ॥७६॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥

ओवीसंख्या ॥७७॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

क्रमशः

Monday, December 27, 2010

Gurucharitra - Adhyay 3

chapter 3 of Gurucharitra describes Ambarish-Durvas story and how god Vishnu was made to take 10 avatars।

CHAPTER 3
Durwas Curses King Ambarish.

Namdharak - "Swamiji, you have removed my doubt by giving me the knowledge of the greateness of Shri Guru. I am much pleased at heart. Will you kindly inform me where you stay? What is your food? I wish to be in your service. Kindly accept me as your disciple".

Shri Siddha embraced him with affection and blessing him said "You will see that miraculous incidents are occurring at the dwelling place of Shri Guru. Studying the life of shri Guru is like draining nectar. I always read this life again and again" saying this he showed his sacred book titled (Life of Shri Guru) to Namdharak and further said, "Whatever pleasure or social status we desire, we shall get it soon by reading this. We shall not be affected by any disease incurred due to displeasure of the planets or other reasons. The sin of killing a Brahmin, is also wiped off if this book is read with devotion and concentration of mind".

Namdhrak - "Oh the Ocean of kindness, you appear to me be Shri guru himself. I wish to know the life of Shri Guru. Will you please remove the darkness of my ignorance by the light of this life of Shri Guru, which is as bright as the Sun?"

Shri Siddha assured him and holding his hand took him to a lovely place, seated him under Ashwatha tree which is like Kalpa Vriksha, i.e. a tree fulfilling one's desires and began to narrate him the nector like life of Shri Guru.

He told him, "You do not know how to serve Shri Guru and hence you have to suffer from anxieties, pains and miseries. You should therefore, try to know Shri Guru by good actions and firm belief".

Namdharak - "My body is burning due to threefold fires in this earthly ocean. I am obsessed by sex, anger and temptation. So kindly take me in the boat of knowledge, steer it by the wind of kindness and thus give salvation to me".

Shri Siddha said, "You need not be anxious. You will surely be relieved of your miseries, engrossed in illusion and temptation, those who doubt the great power of Shri Guru, they have always to suffer from poverty and hardship. So give up suspicion. Shri Guru is an Ocean of Kindness. He will give you everything. Just as clouds give rain everywhere, similarly Shri
Guru gives showers of kindness. As water is stored in the deep portions of earth and on the rocky place, so an individual attains Shri Guru's favour. Therefore worship Shri Guru wholeheartedly."
Namdhrak - "My mind is clear now and I am anxious to listen to the life story of Shri Guru. Kindly tell me why Shri Guru took birth in Bharat?"

Shri Siddha - "Oh ! my good disciple, you have given inspiration to me. Shri Guru's life is like Kamadhenu. You will get all the four valours or favours viz., religion, wealth, pleasure and salvation.
"Shri Hari and Shri Har have to come this Earth in the form of different species at different times for the benefits of their devotees. Three Murtis have three different characteristics - Brahma's Raj, Vishnu's Satwa and Shiva's Tam. But these do not exists separately.

"In former times there lived a King by name Ambarish. He observed Ekadahsi fast(11th day of every fortnight dark and bright). He induced Shri Vishnu to come to Earth.

"In order to test Ambarish's Ekadashi Vrat, Durwas Rishi came to him as a guest. That day Sadhan Dwadashi was only for 24 minutes after Sunrise. Ambarish received the Rishi warmly, worshiped him and requested him to return soon for dinner finishing his morning bath and
rituals.

"Durvas went to the river, took bath and started rituals. Seeing that the time for Dwadashi (12th day of fortnight) was finishing and fearing the break of his Vrat, Ambarish took holywater and dines. In the meanwhile Durvas returned and seeing that Ambarish had dined before him, he was enraged and so he cursed Ambarish.

"Ambarish prayed Shri Vishnu, Protector of devotees. Shri Vishnu came from Vaikunth, his abode. Ambarish told Shri Vishnu that Durvas had for no reason cursed him to take birth in different species. Shri Vishnu told Durvas that he had cursed Ambarish in vain and that he should curse him (Vishnu) instead of Ambarish.

"Durvas thought that people on Earth cannot see Shri Vishnu, so it would be better to ask Shri Vishnu to descend on Earth with Shri Lakshmi for
the salvation of the people. So he said to Shri Vishnu, 'You should
descend on the Earth ten times'.

Contd......


श्रीगणेशाय नमः ।

येणेपरी सिद्ध मुनि । सांगता झाला विस्तारोनि । संतोषोनि नामकरणी । विनवितसे मागुती ॥१॥

जय जयाजी सिद्ध मुनी । तारक तू आम्हालागुनी । संदेह होता माझे मनी । आजि तुवा फेडिला ॥२॥

तुझेनि सर्वस्व लाधलो । आनंदजळी बुडालो । परम तत्त्व जोडलो । आजिचेनि दातारा ॥३॥

ऐसे श्रीगुरुमहिमान । मज निरोपिले त्वां ज्ञान । आनंदमय माझे मन । तुझेनि धर्मे स्वामिया ॥४॥

कवणे ठायी तुमचा वास । नित्य तुम्हा कोठे ग्रास । होईन तुझा आतां दास । म्हणोनि चरणी लागला ॥५॥

कृपानिधी सिद्ध मुनी । तया शिष्या आलिंगोनि । आशीर्वचन देऊनि । सांगे आपुला वृत्तान्त ॥६॥

जे जे स्थानी होते गुरु । तेथे असतो चमत्कारू । पुससी जरी आम्हां आहारू । गुरुस्मरणी नित्य जाणा ॥७॥

श्रीगुरुचरित्र महिमान । तेचि आम्हा अमृतपान । सदा सेवितो याचे गुण । म्हणोनि पुस्तक दाविले ॥८॥

भुक्ति मुक्ति परमार्थ । जे जे वांछिजे मनांत । ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥९॥

धनार्थी यासी अक्षय धन । पुत्रपौत्रादि गोधन । कथा ऐकता होय जाण । ज्ञानसिद्धी तात्काळ ॥१०॥

जे भक्तीने सप्तक एक । पढती ऐकती भक्तलोक । काम्य होय तात्कालिक । निपुत्रिका पुत्र होती ॥११॥

ग्रहरोगादिपीडन । न होती व्याधि कधी जाण । जरी मनुष्यास असेल बंधन । त्वरित सुटे ऐकता ॥१२॥

ज्ञातवंत शतायुषी । ऐकता होय भरवसी । ब्रह्महत्यापापे नाशी । एकचित्ते ऐकता ॥१३॥

इतुके ऐकोनि त्या अवसरी । नामधारक नमस्कारी । स्वामी माते तारी तारी । कृपानिधि सिद्ध मुनी ॥१४॥

साक्षात्कारे गुरुमूर्ति । भेटलासी तू जगज्योती । होती वासना माझे चित्ती । गुरुचरित्र ऐकावे ॥१५॥

एखादा तृषेने पीडित । जात असता मार्गस्थ । त्या आणूनि देती अमृत । तयापरी तू मज भेटलासी ॥१६॥

गुरूचा महिमा ऐको कानी । सांगिजे स्वामी विस्तारोनि । अंधकार असतां रजनी । सूर्योदयापरी करी ॥१७॥

इतुकिया अवसरी । सिद्ध योगी अभय करी । धरोनिया सव्य करी । घेवोनि गेला स्वस्थाना ॥१८॥

असे ठाव ज्ञानपंथी । कल्पवृक्ष अश्वत्थी । बैसोनि सांगे ज्ञानज्योती । ऐक शिष्या नामधारका ॥१९॥

नेणती सोय गुरुदास्यका । याचि कारणे उपबाधका । होती तुज अनेका । चिंता क्लेश घडती तुज ॥२०॥

ओळखावया गुरुमूर्तीसी । आपुला आचार परियेसी । दृढ भक्ति धरोनि मानसी । ओळखिजे मग श्रीगुरु ॥२१॥

ऐकोनि सिद्धांचे वचन । संतोषे नामधारक सगुण । क्षणक्षणा करी नमन । करुणावचने करोनिया ॥२२॥

तापत्रयाग्नीत पोळलो । मी संसारसागरी बुडालो । क्रोधादि जलचरी वेष्टिलो । अज्ञानजाळे वेष्टूनिया ॥२३॥
ज्ञाननौकी बसवूनि । कृपेचा वायू पालाणुनि । देहा तारक करूनि । तारावे माते स्वामिया ॥२४॥

ऐशिया करुणावचनी । विनवितसे नामकरणी । मस्तक सिद्धाचिया चरणी । ठेविता झाला पुनः पुनः ॥२५॥

तव बोलिला सिद्ध मुनि । न धरी चिंता अंतःकरणी । उठवीतसे आश्वासोनि । सांकडे फेडीन तुझे आता ॥२६॥

ज्यांसी नाही दृढ भक्ति । सदा दैन्ये कष्टती । श्रीगुरूवरी बोल ठेविती । अविद्यामाया वेष्टूनि ॥२७॥

संशय धरोनि मानसी । श्रीगुरु काय देईल म्हणसी । तेणे गुणे हा भोग भोगिसी । नाना कष्टे व्याकुळित ॥२८॥

सांडोनि संशय निर्धार । गुरुमूर्ति देईल अपार । ऐसा देव कृपासागर । तुज नुपेक्षी सर्वथा ॥२९॥

गुरुमूर्ति कृपासिंधु । प्रख्यात असे वेदा बोधु । तुझे अंतःकरणी वेधु । असे तया चरणांवरी ॥३०॥

तो दातार अखिल मही । जैसा मेघाचा गुण पाही । पर्जन्य पडतो सर्वां ठायी । कृपासिंधु ऐसा असे ॥३१॥
त्यांतचि पात्रानुसार । सांगेन साक्षी एक थोर । सखोल भूमि उदक स्थिर । उन्नती उदक नाही जाण ॥३२॥

दृढ भक्ति जाणा सखोल भूमि । दांभिक ओळखा उन्नत तुम्ही । याचिया कारणे मनोकर्मी । निश्चयावे श्रीगुरूसी ॥३३॥

म्हणोनि श्रीगुरुउपमा । ऐसा कणव असे महिमा । प्रपंच होय परब्रह्मा । हस्त मस्तकी ठेवोनिया ॥३४॥

कल्पतरूची द्यावी उपमा । कल्पिले लाभे त्याचा महिमा । न कल्पितां पुरवी कामा । कामधेनु श्रीगुरु ॥३५॥

ऐसा श्रीगुरु ब्रह्ममूर्ति । ख्याति असे श्रुतिस्मृती । संदेह सांडूनि एकचित्ती । ध्याय पदांबुज श्रीगुरूचे ॥३६॥

इतके परिसोनि नामधारक । नमन करोनि क्षणैक । करसंपुट जोडोनि ऐक । विनवितसे सिद्धासी ॥३७॥

श्रीगुरू सिद्ध योगेश्वरा । कामधेनु कृपासागरा । विनवितसे अवधारा । सेवक तुमचा स्वामिया ॥३८॥

स्वामींनी निरोपिले सकळ । झाले माझे मन निर्मळ । वेध लागला असे केवळ । चरित्र श्रीगुरूचे ऐकावया ॥३९॥

गुरु त्रयमूर्ति ऐको कानी । का अवतरले मनुष्ययोनी । सर्व सांगावे विस्तारोनि । म्हणोनि चरणी लागला ॥४०॥

मग काय बोले योगींद्र । बा रे शिष्या तू पूर्णचंद्र । माझा बोधसमुद्र । कैसा तुवा उत्साहविला ॥४१॥

तूते महासुख लाधले । गुरुदास्यत्व फळले । परब्रह्म अनुभवले । आजिचेनि तुज आता ॥४२॥

हिंडत आलो सकळ क्षिति । कवणा नव्हे ऐशी मति । गुरुचरित्र न पुसती । तूते देखिले आजि आम्ही ॥४३॥

ज्यासी इहपरत्रींची चाड । त्यासी ही कथा असे गोड । त्रिकरणे करोनिया दृढ । एकचित्ते ऐकिजे ॥४४॥

तू भक्त केवळ श्रीगुरुचा । म्हणोनि भक्ति झाली उंचा । निश्चयो मानी माझिया वाचा । लाधसी चारी पुरुषार्थ ॥४५॥

धनधान्यादि संपत्ति । पुत्रपौत्र श्रुतिस्मृति । इह सौख्य आयुष्यगति । अंती गति असे जाणा ॥४६॥

गुरुचरित्र कामेधेनु । वेदशास्त्रसंमत जाणु । अवतरला त्रयमूर्ति आपणु । धरोनि नरवेष कलियुगी ॥४७॥

कार्याकारण अवतार । होऊनि येती हरिहर । उतरावया भूमिभार । भक्तजनाते तारावया ॥४८॥

ऐकोनि सिद्धाच वचना । प्रश्न करी शिष्यराणा । त्रयमूर्ति अवतार किंकारणा । देह धरोनि मानुषी ॥४९॥

विस्तारोनि ते आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागला चरणासी । करुणावचने करोनिया ॥५०॥

सिद्ध म्हणे नामधारका । त्रयमूर्ति तीन गुण ऐका । आदिवस्तु आपण एका । प्रपंच वस्तु तीन जाणा ॥५१॥

ब्रह्मयाचा रजोगुण । सत्त्वगुन विष्णु जाण। तमोगुण उमारमण । मूर्ति एकचि अवधारा ॥५२॥

ब्रह्मा सृष्टिरचनेसी । पोषक विष्णु परियेसी । रुद्रमूर्ति प्रळयासी । त्रयमूर्तीचे तीन गुण ॥५३॥

एका वेगळे एक न होती । कार्याकारण अवतार होती । भूमीचा भार फेडिती । प्रख्यात असे पुराणी ॥५४॥

सांगेन साक्ष आता तुज । अंबरीष म्हणिजे द्विज । एकादशीव्रताचिया काज । विष्णूसी अवतार करविले ॥५५॥

अवतार व्हावया कारण । सांगेन तुज विस्तारून । मन करोनि सावधान । एकचित्ते परियेसा ॥५६॥

द्विज करी एकादशीव्रत । पूजा करी अभ्यागत । निश्चयो करी दृढचित्त । हरिचिंतन सर्वकाळ ॥५७॥

असो त्याचिया व्रतासी । भंग करावया आला ऋषि । अतिथि होऊनि हठेसी । पावला मुनि दुर्वास ॥५८॥
ते दिवशी साधनद्वादशी घडी एक । आला अतिथि कारणिक । अंबरीषास पडला धाक । केवी घडे म्हणोनिया ॥५९॥

ऋषि आले देखोनि । अंबरीषाने अभिवंदोनि । अर्घ्य पाद्य देवोनि । पूजा केली उपचारे ॥६०॥

विनवितसे ऋषीश्वरासी । शीघ्र जावे स्नानासी । साधन आहे घटिका द्वादशी । यावे अनुष्ठान सारोनिया ॥१॥

ऋषि जाऊनि जाऊनि नदीसी । अनुष्ठान करती विधींसी । विलंब लागता तयासी । आली साधन घटिका ॥६२॥

व्रत भंग होईल म्हणोनि । पारणे केले तीर्थ घेऊनि । नाना प्रकार पक्वानी । पाक केला ऋषीते ॥६३॥

तव आले दुर्वास देखा । पाहूनि अंबरीषाच्या मुखा । म्हणे भोजन केलेसि का । अतिथीविण दुरात्मया ॥४॥

शाप देता ऋषीश्वर । राजे स्मरला शार्ङ्गधर । करावया भक्ताचा कैवार । टाकून आला वैकुंठा ॥६५॥

भक्तवत्सल नारायण । शरणागताचे रक्षण । बिरूद बोलती पुराणे जाण । धावे धेनु वत्सासि जैसी ॥६६॥

शापिले ऋषीने द्विजासी । जन्मावे गा अखिल योनीसी । तव पावला ह्रषीकेशी । येऊनि जवळी उभा ठेला ॥६७॥

मिथ्या नव्हे ऋषीचे वचन । द्विजे धरिले श्रीविष्णुचे चरण । भक्तवत्सल ब्रीद जाण । तया महाविष्णूचे ॥६८॥

विष्णु म्हणे दुर्वासासी । तुवा शापिले अंबरीषासी । राखीन आपुल्या दासासी । शाप आम्हासी तुम्ही द्यावा ॥६९॥

दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर । केवळ ईश्वर अवतार । फेडावयास भूमिभार । कारण असे पुढे म्हणतसे ॥७०॥

जाणोनि ज्ञानीशिरोमणी । म्हणे तप करितां युगे क्षोणी । भेटी नव्हे हरिचरणी । भूमीवरी दुर्लभ ॥७१॥

शापसंबंधे अवतरोनि । येईल लक्ष्मी घेऊनि । तारावयालागोनी । भक्तजना समस्ता ॥७२॥

परोपकारसंबंधेसी । शाप द्यावा विष्णुसी । भूमिभार फेडावयासी । कारण असे म्हणोनिया ॥७३॥

ऐसे विचारोनि मानसी । दुर्वास म्हणे विष्णूसी । अवतरोनी भूमीसी । नाना स्थानी जन्मावे ॥७४॥

प्रसिद्ध होसी वेळ दहा । उपर अवतार पूर्ण दहा । सहज तू विश्वात्मा महा । स्थूळसूक्ष्मी वससी तू ॥७५॥

ऐसा कार्यकारण शाप । अंगिकारी जगाचा बाप । दुष्टांवरी असे कोप । सृष्टिप्रतिपाळ करावया ॥७६॥

ऐसे दहा अवतार झाले । असे तुवा कर्णी ऐकिले । महाभागवती विस्तारिले । अनंतरूपी नारायण ॥७७॥
कार्यकारण अवतार होती । क्वचित्प्रकट क्वचित्‍ गुप्ती । ते ब्रह्मज्ञानी जाणती । मूढमति काय जाणे ॥७८॥

आणीक सांगेन तुज । विनोद झालासे सहज । अनुसया अत्रिऋषीची भाज । पतिव्रताशिरोमणी ॥७९॥

तिचे गृही जन्म जाहले । त्रयमूर्ति अवतरले । कपटवेष धरोनि आले । पुत्र जाहले तियेचे ॥८०॥

नामधारक पुसे सिद्धासी । विनोदकथा निरोपिलीसी । देव अतिप्रकट वेषी । पुत्र जाहले कवणे परी ॥८१॥

अत्रि ऋषि पूर्वी कवण । कवणापासूनि उत्पन्न । मूळ पुरुष होता कवण । विस्तारोनि मज सांगावे ॥८२॥

म्हणे सरस्वती गंगाधर । पुढील कथेचा विस्तार । ऐकता होय मनोहर । सकलांभीष्टे साधती ॥८३॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अंबरीषव्रतनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥

ओवीसंख्या ॥८३॥

क्रमशः